गुरुवार, २८ ऑगस्ट, २०१४

धागा - गैरसमजुतीचा - शब्दात विणलेला .

वाचनालयातल्या शांत नि गहनिय वातावरणात विश्वास पाटलांची ' पांगिरा' ह्या कादंबरी विषयक ' आपला मनोगत सांगणारा (पांगिरा कादंबरी कशी घडली , कशी लिहिली गेली ह्याविषयक ) ' लेख ' ' वाचण्यात अगदी गुंग झालो होतो.
हे लेखक वगैरे कसे लिहित असतील न्हाई , एवढ्या मोठ मोठ्या कादंबऱ्या , कथा वगैरे , त्यांचे अनुभव ..
ह्याचं एक प्रकार कुतूहल मनी असतं.
 अन ते पाहण्याची , ऐकण्याची , वाचण्याची उत्सुकता फार शिगेला पोचली असते.
अशातच काही लेख वगैरे हाती आलं तर ते अगदी झपाटून वाचून होतं हि . असाच हा लेख काही मिनिटातच वाचून पूर्ण झाला. अन तेवढ्यात फोन खणाणला .
ओळखीचाच , जवळचाच , जवळच्याच व्यक्तीचा , पण कित्येक दिवसाआड ने उगवलेला . नात्यात रुसवा म्हणतात ता ..तो रुसवा धरून बसलेल्याचा कॉल, क्षणभर हसू आलं.
 म्हटलं , कोण कधी काय गैरसमज करून घेईल सांगता येत नाही.
लिहायचं , बोलायचं एकाबद्दल अन वाटायचं दुसऱ्याला कि हा मलाच म्हणतोय असं...अन मग रुसून बसायचं , न बोलायचं , ना भेटायचं ...बस्स..
माणसं भेटून बोलून एकमेकांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यापेक्षा , आपल्या तर्कानेच आपली शक्कल लढवून अधिक गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करतात अन अधिक अधिक त्यातच गुंतत जातात. अन मग सुरु होतो खेळ , मनातल्या भावनांचा ..गहिऱ्या शब्दसावल्यांचा
सर्वच गोष्टी तर्काने सुटत नाही . अन सर्वच गोष्टी आपण म्हणू तशा असत नाही. त्यामागच सत्य काही और हि असू शकत. पण हे सांगणार कुणाला ?
पण हे हि तितकंच खरे कि तर्काने मांडलेल्या सर्व गोष्टी ह्या चुकीच्याच असतातच असं हि नाही.
पण एकदा सत्य काय आहे ते डोळसपणे पाहायला काय हरकत आहे . उगाच नात्याची चिरफाड कशाला ? आणि का ?आणि का म्हणून ?
जे मनापासून नातं जपतात अन समोरच्या व्यक्तीला आपलं म्हणून मानतात , त्यांच्या मनात त्या व्यक्तीबद्दल प्रेम यत्किंचितही कमी झालेलं नसतं.
पण गैरसमजुतीचे हे धागे मनाला गुंतागुंतीच्या डोहात पार ढकलून देतात. अन गूढ वलयांमध्ये आपण आपलाच आवाज शोधू पाहतो.
मनातले प्रश्न , शंका -कुशंका , एकमेकांबद्दल असलेल्या भावनां जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला कळत नाही . किंव्हा सांगत नाही तोपर्यंत असलेला गैरसमजुतीचा धागा हा सुटा करता येत नाही.
उगाचच शंभर प्रश्नाचा ढिगारा मनात साठविन्यापेक्षा सरळ भेटून बोलून असलेल्या प्रश्नांची , शंकाची उकल केली तर ती गोष्ट वेळेत तर सुटतेच पण नात्याची ती रेशीम गाठ अन त्यातला ओलावा तसाच कायम राहतो.
ज्यांच्या मनात आपल्याबद्दल अन आपल्या मनात त्यांच्याबद्दल प्रेमाचा अन आपुलकीचा  कायम आहे . किंव्हा असतो. 
तिथे गैरसमजुतीचा हा तिढा हि काही क्षणापुरताच असतो. 
 कारण एकाची बाजू खचली तरी दुसरा सावरायला लगेच तत्पर असतो.
अन तेच खर नातं . प्रेमाने जपलेलं.
- संकेत य पाटेकर
२८.०८.२०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .