सोमवार, १५ डिसेंबर, २०१४

आयुष्यं हे असंच असतं ...

एका ठराविक अंतरापर्यंत, एका क्षणापर्यंत , एका ठराविक मर्यादे पर्यंत आपण न बोलता...
न भेटता एखादयापासून दूर राहू शकतो . पण ती ठराविक रूपरेखा ओलांडली कि मनाचा विस्फोट झालाच समजा.
मन मग मागे पुढे पाहत नाही .आपण स्वतहून पुढे सरसावतो अन बोलू लागतो.
समोरील व्यक्तीशी...
काही वेळा प्रश्न सुटतो , पण काही वेळा प्रश्न इथूनच पुढे सुरु होतो.
आपलं 'मन' पुन्हा शोध घेऊ पाहतो हव्या त्या प्रश्नाच्या त्या उत्तराचं ...
उत्तर तर मिळत नाही . पण स्वतःशीच पाठ थोपावतं,   स्वतःलाच दोष देत मन शांत राहतं .
शांत राहण्याचा तसा पुन्हा प्रयत्न करतं .
कारण ..आयुष्यं हे असंच असत .
जगायचं असतं , जगू द्यायचं असतं
संयमानं 'क्षणाशी' झुंजायचं असतं
संकेत १५.०४.२०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .