सोमवार, १६ फेब्रुवारी, २०१५

बा'चा बाची...

आज  कुणास ठाऊक कसला परिणाम झाला होता मनावर ,  कुठलीशी प्रेरित शक्ती अंगभर संचारली होती जणू ..
डोळ्यादेखत,समोर जे  विपरीत घडतंय ते थांबविण्यासाठी  ...

आपली जीवनवाहिनी म्हणजे हि 'मुंबई लोकल' , दिवसभरात हजारो लाखो लोक आपला जीव मुठीत घेऊनच रोजचा हा  जीवावरच प्रवास करतात . कशासाठी तर पोटासाठी ...आपल्या कुटुंबियांसाठी ..

रोजची ये जा करणारी, धावणारी हि मुंबई लोकल ..आपल्याला तशी  अनेक  भावचित्रांचे कधी हसरे कधी अधिक दु:खद असे प्रसंग डोळ्यादेखत घडवून आणते. आणि आपल्या मनाला विचारांच्या भाउक गर्दीत हळूच लोटून देते . काय घ्यायचा तो धडा आपण त्यातून  घेतो हि किंव्हा काही जणू  घडलच नाही अश्या अविर्भावात आपण  सगळ सोडून देतो हि  .

अवघा क्षणभरचा  प्रवास काय तो   ....तुमचा आमचा ....अनोळख्यांचा ... एकाच  वाटेचा , त्या  क्षणापुरती काय तो   ..,
प्रत्येकाची  वाट  निराळी  तरी हि भेटतोच आपण एका वळणावर ..
पण तो  वळण हि असा जिवावर लोटला तर ...कल्पनाच नको करायला .

ह्या आपल्या धावत्या  मुंबई लोकल मध्ये  रोज बघावं  तर आपली बाचा- बाची सुरूच असते.
कधी ह्याची तर कधी त्याची ,
नुसता हलकासा धक्का लागला   कि त्यावरून   वाद , चौथ्या सीटसाठी वाद   , ट्रेन मध्ये चढता उतरता  वाद , त्यातून एकमेकांना शिवीगाळ , अन त्या हि पुढे मग टोकाची भूमिका अर्थात  ..हाणामारी ..

अवघा क्षणाचा प्रवास, रम्य कधी रटाळ हि असेल पण हे लोक बेरंग करून टाकतात . कुणी ऐकून घेत नाही अन समजून हि घेत नाही .अन हे थांबावं म्हणून बघणारे सुद्धा पुढे येत नाही . ते फक्त बघ्याची भूमिका घेतात. येणारे येऊ पाहतात पुढे  . पण त्याना हि जागीच अडवलं  जात . कशाला नुस्कारण मध्ये पडतोयस  ? ते ऐकणार नाहीत अस बोलून गप्प बसवलं जातं  . अन पुढे जे घडणार तेच घडतं  . 

आजचा हि असाच काहीसा प्रसंग
विषय तोच , पण जरा वेगळा ,
वेगळा ह्या अर्थी   कि फक्त वयोमानाचा फरक काय तो ...

एकीकडे  सळसळतं  तरुणपण मनगटात पोलादी ताकत असलेल तर दुसरीकडे  वृद्धत्वाकडे झुकलेलं  म्हातारपण.. अनुभवी बोल तेच काय त्याचं  प्रभावी  शस्त्र ...

वार शनिवार ,  काला घोडा फेस्टिवल पाहून झाल्यावर सी एस टी   वरून ठाणे लोकल पकडली अन निवांत सीट वर बसलो होतो . तीन चार स्थानक अशीच निघून गेली .
अन वारे माप शब्दांचा एकंच गोंधळ उडाला. त्यान सार्यांचे लक्ष  वेधून घेतलं .

बापाने हे असच  शिकवलं का रे ?XXXXXX
बाप काढू नका हा , अन शिव्या हि देऊ नका .
ये ..XXXXXX
वाद वाढत होता...पण कुणीच  ऐकेना अन समजूनच घेईना..

जागेवरून काहीतरी बिनसलं होत . त्या दोघात .
ते दोघे म्हणजे  एक साठीच्या आसपास असलेले  'काका' अन एक हट्टा कट्टा 'तरुण'
अन त्या दोघां समवेत असलेले त्यांचे इतरसहकारी ...

सुरवातीला साधेपणाचेच  शब्द काय ते रागाने वरचढ करत होते मग मात्र  हळूहळू त्यात इतर अवजड शब्दांची (शिवीगाळ )रस मिसळ होऊ लागली अन हात उगारन्यापर्यंत  मजल  गेली.
पण ते ते थांबविन्यास्ठी कुणी हि पुढे येईना .
जणू काही मनोरंजनाचा खेळ चालू  होता . अन लोक टकमकतेने अविर्भावपणे ते  बघत होते. मजा घेत होते .

कुणी हि मोठी व्यक्ती असो , वयोमानानुसार एक आदर असतोच  त्यांची विषयी आपल्या मनात,
मग ती व्यक्ती ओळखीची असो वा अनोळखी.
त्याना एकेरी शब्दाने बोलण्या इतपत  आपण कुसंस्कारित  नसतो..अन बोललो तर
'हेच का रे तुझ्या आई वडलांनी  दिलेले संस्कार' असे बोल समोरच्या मुखातून हमखास निघून जातात .

इथे हि असच झालं.
त्या काकांनी रागा भरात एक शिवी हाणली काय अन बाप काढला काय ? त्या तरुणाच सळसळ रक्त ताप लं  अन तो लगेच 'अरे तुरे' ची भाषा करू लागला.
इतपर्यंत सगळ ठीक होत पण त्याने जेंव्हा वयोमानाच भान सोडून त्यांच्यवर जेव्हा हात उगारायला सुरवात केली  तेंव्हा तो तिथेच चुकला .....अस म्हणाव लागेल. कारण मनगटात ताकद असली म्हणून काय झालं समोरील व्यक्ती कोण कशी आहे त्याचा तरी विचार करावा. निदान वयोमनचा तरी ..

इथे वादाला सुरवात पहिला कुणी केली हे महत्वाच नाही.
महत्वाच हे होत कि सुरु झालेला वाद , दोघांपैकी एकाने हि समजून न घेता , तो  मिटवावा ह्या करिता  प्रयत्न हि केला नाही उलट तो  वाढत नेला  ...

अन गम्मत  अशी कि जेंव्हा मी  त्यांच्या मध्ये पडू लागलो . सगळ निवळण्यासाठी  म्हणून ..तर एका दोघांनी मला , कशाला मध्ये पडतोयस ? ते ऐकणार नाहीत अस बोलून निवांत  राहायला सांगितल .
पण ते सगळ  ऐकून घेणार अन निवांत बसणार माझ मन तेंव्हा माझ नव्हतच  ..ते प्रयत्न करत होत . शांत होण्यसाठी ..ये दादा, वोह काका ...अशी आर्त हाक मारत ..
हे  झालं माझ्याबाबतीत ,

पण त्याचवेळेस माझ्या शेजारी उभ्या असलेल्या .. त्या बाईनी सुद्धा हातवारे करत अन 'तुम्ही गप्प बसा हो, कशाला मध्ये पडतायेत अस म्हणत आपल्या नवऱ्याला   हि त्यामध्ये पडू दिलं नाही .

पुढे हे सगळ निवांत झालं ..खरं ..

पण वयोमानाच विचार करता....वाद घालणाऱ्या त्या दोघात
एकमेकांना समजून घेण्याची वृत्तीच कुठे दिसली नाही.

आपल्या पेक्षा वयोमानाने मोठे म्हणून शांत राहावं ते त्या तरुणाला कळून आलं नाही .
अन आपण मोठे आहोत जाणकार आहोत अस समजूनही त्या काकांनी  माघार घेतली नाही .
अन हा वाद सुरु असता  बघनार्यांनी हि नुसतीच बघ्याची भूमिका घेतली .

शब्दाने शब्द अन वादाने वाद वाढत जातो. तो वाढविण्यापेक्षा कुणी एकाने तरी माघार घ्यावी  लागते. अन्यथा 
क्षणाच्या त्या प्रवासात तुमच्या अमुच्या आयुष्याची राख होवू शकते . 
हे कुणी समजूनच घेत नाही . 

- संकेत य पाटेकर
१६.०२.२०१५ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .