सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१६

हसण्यासारखं काही नाही...

हसण्यासारखं काही नाही...
रविवार , संध्याकाळची वेळ , मित्रांना भेटायला
म्हणून घरातून बाहेर पडलो. पायी चालायची नित्य नेहमीचीच सवय , त्यामुळे चालतच रेल्वे स्टेशन गाठलं. अन तिकीट वगैरे घेऊन ठाणे- वाशी लोकल ट्रेन पकडली. हार्बर लाईन आणि त्यातल्या त्यात रविवार असल्यामुळे फारशी अशी गर्दी न्हवती.

तुरळक असे प्रवाशी .. तर असो.
नियोजित वेळेप्रमाणे लोकलने होर्न देऊन प्रवाशांना Alert केल . अन धीम्या गतीनं ट्रेन गतीवान झाली. ऐरोली गेलं,
रबाळे आलं प्रवाशांचा आत - बाहेर सुरु झालं . मी आपला दाराशी उभा (लटकत न्हवे हा ..आतच )पुढच्या स्टेशनची वाट पाहू लागलो. त्यातही फारसा वेळ गेला नाही.
काही क्षणाच्या अवधीतच घणसोली स्टेशन आलं . इथेच मित्र भेटावयास येणार होता. म्हणून पायउतार झालो अन सांगितल्याप्रमाणे स्टेशनच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वाराशी वाट पाहत उभा राहिलो. तेवढ्यात मित्र हि हजर झाला.
वेळचं अन आम्हा मित्राचं 'गणित' तसं नेहमीच चुकतं , पण आज सगळ अचूक जुळून आलं होतं. 
भेट होताच नेहमीच्या आदराने त्याची खुशालकी विचारली अन गप्पांच्या ओघात आम्ही पुढे निघू लागलो. तोच...
एक सहा फुट उंचीचा ,साध्याश्या पेहरावातला, एक माणूस तिरक्या चालीने माझ्या रोघाने येऊ लागला. नजरेला नजर भिडली. त्याकडे पाहून , त्याने जराशी घेतलीच असावी, असा एक तर्क धरून मी मोकळा झालो. 
पण त्याचा रोख हा माझ्याकडेच , जणू त्याची अन माझी फार वर्षापासूनची ओळख असावी . ती हि सुडेच्या
भावनेने पेटलेली . म्हणून मी हि फुल तयारीत होतो . येत्या प्रसंगाला तोंड देण्यास..., 
मित्रही सोबतीला होताच .. तरीही , नक्की कोणता प्रसंग उद्भवणार आता, , ह्या विचारांनी मनात घेरा केला. 
आणि त्या विचारात असताच , तिरक्या चालीने तो माझ्यापुढे येऊन उभा राहिला. 
आणि अभिनयाच्या सुरात , रोघ नजरेनेच ,सरळ प्रश्न टाकला .
भाऊ, कोल्हापूर कोणत्या बाजूला आलं ? 
त्याच्या ह्या सहज अन काहीश्या अवघड अश्या प्रश्नाने , नकळत हास्याच्या बांध फुटला गेला. . 
आणि खो खो हसत हसत मी अन मित्र पुढे जावू लागलो. 
त्याचा प्रश्नाचं उत्तर काही मला देता आले नाही . थोड पुढे गेल्यावर मात्र पुन्हा मागे वळून पाहिलं . तर तो हि
त्याच लयात आमच्या कडे पाहून मिश्किलपणे हसू लागला होता. 
स्टेशन घणसोली ,आणि प्रश्न कोल्हापूर कोणत्या बाजूला आलं ? कस वाटतं ?
आयुष्याच्या प्रवासात एकेक अशी माणसं भेटत जातात . काही भावना चीथाळून देतात. 
काही नकळत एक संदेश देऊन जातात तर काही हास्यलेपाचा मुलामा, अलगद चेहऱ्यावर फासून जातात.
आयुष्याचा हा प्रवासच फार मजेशीर अन गहन अश्या अर्थाने भरलेला आहे. म्हणूनच हा प्रवास मला आवडतो. 

असंच उगाच काही ..लिहायचं म्हणून ..
- संकेत य पाटेकर
०८.०२.२०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .