मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

क्षणाचे सांगाती..

कुठलेही भाव न दर्शवता, सतत दृष्टी समोर येणारी वा घडणारी एखाद गोष्ट, सातत्याने टाळत राहणं वा इग्नोर करत राहणं, ह्या साठी खूप मोठं असं मानसिक 'बळ' लागतं रे.., आणि ते तुझ्याकडे भरपूर प्रमाणात आहे. हो  ना ?
किती सहजतेने अगदी जमवून घेतेस तू सगळं,
जे मला अद्याप हि जमलेलं नाही वा जमणार नाही. कसं जमतं तुला रे , हे सगळं ?सांग ना ?
ह्यालाच मी प्रेम म्हणू का ? तुझं माझ्यावरचं , निस्सीम नितळ ? कि प्रेमातली आहुती ? नातं हळुवार उमळताना,  त्यातलं जीव   काढून घेण्याचा वा स्वतःहून देण्याच्या  ह्या  अवस्थेला  नाहीतरी काय बोलावं,  बोल ना..?
तो भरभरून लिहत होता . कित्येक दिवस मनात उसळलेल्या आपल्या भावनांना कागदवर उलगद उमटवून देतं.  आज तिच्यापुढे  हे सगळं  मांडायचं होतं. पत्राद्वारे ...तो लिहत होता .

कुणावर प्रेम करणं हे  पाप  तर नाही ना  रे  ?
नकळत घडणारी सहज अशी हि क्रिया आहे.  आणि अश्या सह्जतेतूनच तुझं- माझं , आपलं नातं जोडलं गेलेलं , न्हाई का ? पण त्याला असं एकाकी वेगळं वळण लागेल.  हे ध्यानी मनी हि न्हवतं.

म्हणतात आयुष्यभर कोण सोबत राहील वा नाही ते आपलं स्वभाव ठरवतं असतं. म्हणायला काही अंशी ठीक आहे हे ,
पण सगळ्याच गोष्टी  आपल्या हाती नसतात रे , हे कळून चुकलंय आता . कर्ता करविता कुणी और असतो.  आपण केवळ क्षणाचे सांगाती.  फक्त चालायचे . मार्ग कोणता तो,  तो ठरवणार .
पण त्या अनामिक मार्गावर जुळलेल्या क्षणिक भेटी गाठी  अन ते  क्षण  आपण केवळ आपल्या स्मृतीत गुंडाळून ठेवू शकतो. इतकंच. 
आणि हाच एक पर्याय उरलाय मला वाटतं माझ्याकडे. अन त्यालाच धरून मला जगायचं आहे .

आयुष्यात एकदाच आणि पहिल्यांदाच कुणावर प्रेम केलं रे मी ,  स्वतःला झोकावून देतं. आणि त्याला असं वळण लागलं बघ ..
तुझं हे  टाळाटाळ करणं ,  ना बोलणं ,   दूर जाणं.,  सगळं समजतंय मला . पण सोसवत नाही . इतकंच .
त्या वेदना अपार आहेत. आणि काळच त्यावर औषध ठरेल. 
तुझाच ...
- मनातलं काही ..
सहज लिहता लिहता ..

 संकेत पाटेकर
११.०४.२०१७ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .