शुक्रवार, २० जून, २०१४

अंकल मत कहो ना...

अंकल घाटकोपर उतरेंगे क्या ?
सकाळचं ऐन गर्दीच्या वेळी ट्रेन मध्ये धक्के बुक्के खात असता , पाठीमागून एक आवाज आला.
अंकल घाटकोपर उतरेंगे क्या ?
माझ्याच वयाचा तो ,जेंव्हा हे अस म्हणाला , 'तेंव्हा त्या वाक्यातला फक्त ' अंकल' हा शब्द एखाद्या चाबुका प्रमाणे सरकन मनावर बसला .
अन डोळ्यासमोर चित्र उमटलं.
 हाती लाकडी काठी , सुरकुत्या पडलेल शरीर , डोळ्यावर जाड भिंगेचा चष्मा , थरथरते हात , अन थकलेलं ते मन ...म्हातारपणाचं हुबेहुब चित्र अस डोळ्यसमोर उमटलं.
 क्षणभर तरी ते चित्र डोळ्यापुढून हटेना. म्हटलं , काय मुलगा आहे हा...
अजून वयाची तिशी नाही पार केली मी , तर मला हा अंकल म्हणतोय.
आणि तो हि माझ्याच वयाचा ..काय म्हणावं त्याला .
गल्ली बोलीतला एखादा मुलगा हि कधी ' दादा ' म्हणायचा सोडून जेंव्हा अंकलंच म्हणतो,
तेंव्हा ' अकालीच म्हातारपण आलं असल्यासारखं भासत.
अन मन आरश्यात आपलं प्रतीबिंद पाहून खरंच कि काय ते निरखू लागतं.
अन मन म्हणतं चल चल अजून आपण काही म्हातारे नाही झालो बुवा , तेवढ आयुष्य हि देईल कि नाही कुणास ठाऊक हा ईश्वर आपल्याला .
- संकेत य पाटेकर
असंच लिहिता लिहिता ...
२०.०६.२०१४

गुरुवार, १९ जून, २०१४

नातं बहिण भावाचं - नातं प्रेमाचं

सर्वच नाती काही रक्ताची नसतात . काही नाती मनानं जुळली जातात .
आयुष्याच्या पायवाटेवर निवांतपणे कधी धावत पळत असता...
त्यात बहिण भावाच्या ह्या अनमोल रत्नाचं हि समावेश असतो .
भावाचं निरागस 'प्रेम' अन बहिणीची अफाट 'माया' हे सर्वांच्या भाग्योदयी नसतं.  अन म्हणूनच मनाला एक आस लागून राहते . कायम ...
आपल्यालाही एखादी नाजुकशी फुलसुंदर भोळीभाबडी, सुंदर कोमल मनाची लाडी वाडी करणारी , खट्याळ-खेळकर अशी बहिण असावी.
किंव्हा सदैव साथ न सोडणारा , अडचणीत नेहमीच आपल्यासोबत असणारा , समजुददार प्रेमळ असा भाऊ असावा . अस सतत वाटत राहतं.
आणि आपण जे मनापासून इच्छितो ते बहुदा पूर्ण हि होतं.
जन्मतःच आपल्याला सर्व काही मिळत नाही . काही गोष्टी आपल्याला आयुष्याची झगडताना मिळवायच्या असतात तर काही ' अनमोल नात्यांसारख्या ' गोष्टी ईश्वर योग्य त्या वेळेत ' भेटी-गाठींचा कार्यक्रम आखून ' ते जुळवून देत असतो.
मग अशातच कुणाला बहिणीचं प्रेम मिळालं नसेल . कुणाला बहिण नसेल तर त्याला एखाद्या वळणावर तो तोची भेट घडवून देतो. भले ते नातं रक्ताचं नसो. पण त्या व्यक्तीत ते नातं अन नात्यातलं ते निरागस प्रेम आपल्या नजरेच्या कक्षेत बागडू लागतं. खेळकर क्षणांना सोबत करून .
बहिणीची किंमत अन तीच प्रेम तिची माया काय असते ह्याची जाण असतेच आपल्याला .
 भले हि सख्खी बहिण नसली तरीहि ...कारण त्या प्रेमासाठी आपण आसुसलेलो असतो गेली कित्येक वर्ष . पण ते प्रेम आपण इत्क्यावेळेस फक्त आपल्या नजरेनी पाहत असतो. इतर कुटुंबातील त्या भावा- बहिणीच्या जोडी कडे पाहून ....बस्स
पण कधी ना कधी आपल्याला आपल्या मनातील ती व्यक्ती प्रत्यक्ष भेटते. एका वळणावर , अन नात जुळलं जातं विश्वासाचं .
बहिणीचं ते कृपाळू प्रेम मिळू लागतं . तोच हट्टीपणा तोच बहिण भावातला खेळकरपणा . तीच लाडी गोडी . तेच गोंडस प्रेम . क्षण अगदी फुलू लागतात . नव्याने हसऱ्या मार्गाने आनंदाचा सुगंधी द्रव्य दाही दिशांना पसरवून .. ज्या प्रेमासाठी आपण इतके वर्ष आसुसलेलो असतो. ते प्रेम आता मिळतं असतं . मिळू लागतं . त्यामुळे चैतन्याचा नवा सागरच जणू आपल्यात संचारलेला असतो.
अशा बहिणी तुम्हा आम्हाला लाभलेल्या असतात . किंव्हा एखाद्या बहिणीला आपल्यासारखा भाऊ लाभलेला असतो.
हे नातं जरी रक्ताचं नसलं तरी ..प्रेमाचं , विश्वासाचं अन मना मनाचं असतं. अन ते कायम तसंच राहावं हीच आपली प्रामाणिक इच्छा अन प्रार्थना असते भगवंताजवळ . माझी हि अशीच प्रामाणिक इच्छा अन प्रार्थना आहे . देवा ऐकतोयस नारे ...;););)
नातं बहिण भावाचं - नातं प्रेमाचं
आपलाच ,
संकेत य पाटेकर (संकेत उर्फ संकु )
१९.०६.२०१४

सोमवार, ९ जून, २०१४

विवधरंगी जड- अवजड मनाची हि नाती '

मानवी मनासारखा तो कधी भावनेशी खेळत नाही .
अन म्हणून मन दुखावण्याचा प्रश्नच उभा ठाकत नाही . अन म्हणून
कधी कधी वाटतं ' विवधरंगी जड- अवजड मनाची हि नाती ' जपण्यापेक्षा निसर्गाच्या उबदार मायेने भरलेल्या कुशीत शांत पडून रहावं. त्याच्याशीच मनमोकळेपणाने काय तो संवाद साधावा . 
तृप्त नजरेने निसर्गाच्या विवध घटकांकडे नुसतंच पाहत राहावं. 

अन त्यातून उतू जाणारा आनंद घटका घटकाने गिळंकृत करावा .
बस्स..
- संकेत य पाटेकर
 ०९.०६.२०१४

जगण्याला एक वेगळ रूपं देत ' प्रेमं.'

प्रेम हे शब्दात व्यक्त करू नये असं म्हणतात .. पण ज्यांना ते आपल्या सहवासातून कळत नाही . 
किंबहुना कळत असूनही त्याबद्दल हवीतशी प्रतिक्रिया त्यांसकडून मिळत नाही . 
तेंव्हा मात्र मनातल्या भावनेला ' शब्दात' च गुंफाव लागतं.
काही वेळा ओरडून सांगाव लागतं. अग वेडे ..प्रेम आहे तुझ्यावर ...जीवापाड ..ऐकतेसं ना ?
तर काही वेळा ओरडून हि हवा तो प्रतिसाद न मिळाल्यास निशब्द राहून ...
फक्त योग्य त्या क्षणाची वाट पहावी लागते.

प्रेम मिळेल न मिळेल हे कधीच सांगता येत नाही .
कारण  दुसऱ्या  मनाचा अचूक धागा कधीच पकडता येत नाही .
अपेक्षा तर नक्कीच असते आपली त्यांच्याकडून ते निर्मळपणानं मिळाव म्हणून ..
पण अपेक्षापूर्ती न होवूनही जिथे प्रेम केले जाते ते खरे प्रेमं ...
हव्या त्या व्यक्तीचं प्रेमं मिळालं तर हे जग स्वर्गाहून हि सुंदर भासतं. 
पण तेच जर नाही मिळालं तर खूप त्रास सहन करावा लागतो. सहन करण्याची तशी तयारी हि ठेवावी लागते.
पण एक मात्र नक्की ,ह्या सर्वांतून आपण हळूहळू का होईना प्रेमाचे धडे गिरवत जातो .
प्रेमा बद्दलची व्याख्या आपल्या मनी तयार होत जाते .
प्रेम मिळालं अन नाही मिळालं तरी..जगण्याला एक वेगळ रूपं देत प्रेमं.
खऱ्या अर्थानं नवी दिशा नवा ध्यास देत प्रेमं ..
मनातले काही ..
संकेत य पाटेकर
०९.०६.२०१४
खालील इमेज हि नेट वरून घेतलेली आहे .