शुक्रवार, ११ डिसेंबर, २०१५

‘तुला कोणत्या नावाने हाक मारू? ’

‘तुला कोणत्या नावाने हाक मारू? ’
‘संवाद’….हा मग कुठल्या हि नात्यातला असो .तो विशेष प्रिय असतो . 'जेंव्हा ती व्यक्ती हि तितक्याच जिव्हाळ्याची असते,  तेंव्हा '
मग हा संवाद , आठवणीतला असो ...जणू तो आताच घडलायं ...घडतोय, ह्या क्षणी ...इतकं आपण त्यात गुंतले जातो.  कधी कधी ...
अन त्यात जर दोन  मनातला प्रेम संवाद असेल तर ...
त्यात तर मग विशेष लाडीगोडी, रुसवा असतो ,नखरा असतो, खट्याळपण असतं. ओतीव प्रेम असतं ....
असाच हा संवाद ..त्या दोघातला ..
‘गुड मोर्निंग ....’
त्याच्या नेहमीच्याच स्वरील सवयीने त्याने तिला ‘गुड मोर्निग’ केलं.
(दिवस असो वा रात्र ..ह्याचं ‘गुड मोर्निंग’ कायम ठरलेलं . आजची सुरवात देखील अशीच.)
‘गुड मोर्निंग ...’
गुड इविनिंग झाले हं ...!
तिच्या मधाळ आवाजतील हे शब्द्गर त्याच लयीत घुमूघुमू लागले.
‘हम्म ..’’
मग निघालीस ऑफिस मधून ..?
हो ..थोड्या वेळा पूर्वीच .
‘ओके ...’
मग काय केलेस घरी , दिवसभर ? तिने प्रश्न केला ?
फुकट गेला रे दिवस ?
‘अरे’ रे रे , रे ...तिच्या शब्दांचं खट्याळ स्वर उनाडू लागला.
घरी असल्यावर असंच होतं दिवस वाया जातो..काय करणार., त्याने आपलं कारण बोलून दिले.
‘अच्छा... ’
‘हम्म...’
‘मग तुला सुट्टी न्हवती. ?’
ना रे , आम्हाला सुट्टी नसते अशी..
अच्छा...

हं ...
तर.... तू मला कोणत्या नावाने हाक मारशील ?
काल परवाच झालेल्या दोघांमधल्या संवादातला, ‘ तोच मुद्दा आज, तिने पुन्हा उपस्थित केला. अगदी लाडीकतेने.., शब्दांना आलाप देतं.
कोणत्या नावाने हाक मारू ?
तू ठरवले असशील ना काही ?
थोडसं विचारात डोकावल्या सारखं करतं (खर तर त्याला, तिचे जे नाव आहे , तेच अधिक पसंत.. पण तरीही )
‘’ वेडू ,वेडे हे कसं वाटतं ?’’
‘ना...........’
मग ...हृदया कसं आहे ?
‘काय’ ? अचंबित झाल्याप्रमाणे तिचा स्वर उंचावला गेला .
‘हृदया’ ...........हे काय नाव आहे का ?
‘हो.’.त्याने उत्तर दिलं .
कोणाचं नाव आहे ?
हृदयाचं , हृदय असतं नां , आपलं हृदय.. त्याचंच हृदया. ‘ त्याने खुलासा केला.
राहू दे .. .माझं सखीच छान आहे .
हम्म , छान आहे .
कारण ते माझं नावं आहे.
‘हो..’ .त्याने हि तिला दुजोरा दिला .
अन मला ते आवडतं , ‘ तिने स्वतःच्या नावाची अशी अभिमानी पसंती दर्शवली .
मला हि ..
तुला कशाला ?
असंच , ‘त्याने घुमजाव करत ऊतर दिलं.
असंच...पण कशाला , काहीतरी कारण असेल ना , हं ? जरा नकट्या आवाजातला स्वर ओढत तिने म्हटलं ?
कारण ते तुझं नाव आहे नां ..गोड- मधाळ असं ..!
‘अच्छा... ’
‘हम्म ... ’
’हे ना ’ ? तिचा हा नेहमीचाच खट्याळ अन वेडावणारा शब्द...तिने पुटपुटला , खास त्याच्यासाठीच .
बरेच दिवसाने आज ..’हे ना’ म्हटलेस ..
‘हा ...’
मग , माझी आठवण काढत असशील ना ?
‘हो...’
किती ? अगदी निरागस बाळासारखं कुतूहलाने तिने प्रश्न केला .
किती म्हणजे ? हे सांगू शकतो का ? किती प्रेम आहे?किती आठवण काढतो ते ?.
‘शब्दात वर्णन करू शकतोस ना ..? तिने अल्पशा रागातच जरा हेकटले .
नाही सांगता येणार ..वेडे , ते विस्तारलेल्या आकाशासारख असतं. त्याला मर्यादा रे कसली ? तो उत्तरला .
‘हम्म...'
बाकी , कसं चाललय सगळ , घरातले वगैरे ..? त्याने खुशालकी विचारली.
ठीक आहेत , ‘ मी घरात सगळ्यांशी मिळून मिसळून असते . पण एक मात्र आहे , माझ्या घरी माझाच जास्त दबदबा असतो .’
अच्छा..., दबदबा ..गुड ...!
‘हा....’
पण असंच मिळून मिसळून अन आपलेपणानं राहावं ....सर्वांशी ! तो उत्तरला.
‘हम्म..’
‘अरे ऐक ना, ‘माझ्या ऑफिस मध्ये ना , एक नवीन मुलगा Join झाला आहे .
तर तो नां माझ्याशी सगळ काही शेअर करत होता. घरापासून ते त्यांच्या गर्ल फ्रेंड बद्दल आदी सगळ मोकळेपणने..
‘अरे, वा ..छानच कि ..’
कसं असतं सखे,’ एकदा विश्वास जडला ना , कि माणसं अगदी स्वताहून , त्यांच्या सुख दुखाशी निगडीत असलेले क्षण आपल्याशी शेअर करतात. अन मोकळे होतात. हलकं वाटतं त्यांना ..
‘हो...’
तो जो विश्वास असतो ना , तो महत्वाचा असतो. तो मिळवला कि माणसं आपलीशी होतात . आपल्यात मिसळतात .
‘अच्छा ....मग तुझं माझ्यावर आहे ? तिने प्रश्न केला.
काय ? त्याने प्रती प्रश्न केला.
‘विश्वास ..’
कोणावर ?
‘माझ्या....वर ................’
माझ्या आणि मग वर.. हयातल्या पहिल्या शब्दावर जोर देत अन मग पुढे अंतर ताणत.. हा शब्द, तिने असं काही उच्चारला (ते हि दोन वेळा ) कि त्यातले ते नखरे अन त्यातली ती जादुई लय अजूनही त्याच्या मनावर रोमांच उमटवून जाते.
आज हि तो असाच त्या नशेत धुंदमुंद झाला होता . त्याच्या मुखी तिचं नावं हळूंच उमटलं जातं होतं . ...सखे..........वेडी सखे ! 
आठवणीतला हा संवाद .त्याला निसटलेल्या त्या काळात फरफटुन घेऊन जात होते.
उरलंच काय होतं म्हणा आता....आठवणीतले हे अनमोल क्षणचं..
सांजवेळच्या ह्या भरगर्दीत हि ....सागरी किनारी .. एकटक बसून ....तो हे सारे क्षण, ‘ पुन्हा अनुभवत बसला होता.’ भरीव हसऱ्या अश्या आठवणीच्या संगे ....’
आसपासच्या धावत्या जगाचं हि त्याला भानं उरलं न्हवतं .

प्रेम हे असंच असतं. 'स्व' ला विसरायं लावणारं...
इथे प्रत्येक क्षणाच्या आठवणी होतात . अन तो ठेवा आपल्याला हवा तेंव्हा उलगडता येतो.
पण ..त्या आठवणीतलं ते पात्र ..आपल्या सोबत असेलच अस नाही.
तुटलेल्या न दुरावलेल्या मनाची हि कळ त्याला ही अशीच स्वस्थ जगू देत नव्हती.
पण तरीही तो हसत होता . आठवणीतल्या तिच्या संगे......, नव्या आशेसह .....!
हृदया - एक स्वप्नं सखी..
- संकेत पाटेकर
१०.१२.२०१५
 


हृदया - एक स्वप्नं सखी..

हृदया - एक स्वप्नं सखी..
(एक छोटासा प्रयत्न पुन्हा एकदा ....) 
मावळत्या पिवळ्या धमक अन केशरीवर्णीय रंगछटांनी क्षितीज सजले होते. 
सूर्य नारायण नित्य नेहमीच्या आपल्या रिवाजा प्रमाणे ह्या अथांग बाहू पसरल्या सागरात आस्ते आस्ते विलीन होत साऱ्या जीव सृष्टीला निरोप देत होते . 
आजचा दिवस म्हणवा तर तसा कलंडला होता . कालोख्याचा साम्राज्य हळूहळू विस्तार घेऊ लागलं होतं. 
तो मात्र अजूनही एकटक नजरेने त्या उसळत्या फेसाळ लाटाकडे पाहत , भान हरपून गेला होता. 
मनात असंख्य विचारांचं तसं काहूरच माजलं होतं. 
गेले कित्येक दिवस तो तिच्याच विचारात तासनतास बसून राही. 
वेळेच भान उरत न्हवतं . कि कुठेशी लक्ष लागतं न्हवतं . वेडावला होता तो..

त्या आठवणी ते क्षण त्याचा पिच्छा सोडत न्हवते . जिथे जाऊ जिथे विसावू तिथे तिथे ते क्षण त्याच्या नजरेसमोरुन चालायचे , बोलायचे , हसायचे , हसवायचे , अन पुन्हा शेवटी उदासीत ढकलून द्यायचे . 
चेहऱ्याशी अस एकाकी हास्य फुलून मन पुन्हा एकाकीपणात वेढायचं. 
आपली एक चूक ...आपल्या नात्यात अशी फुट पाडेल, किंव्हा त्यानं विपरीत अस काही घडेल हे त्याच्या ध्यानी मनी न्हवतं . 
पण ते घडलं होतं , नियतीने घडवलं होतं . . 
जे होणार आहे ते होणार आहे त्याला कुणी टाळू शकत नाही ? का ? 
ते त्या नियतीलाच ठाऊक ? 
आपल्या प्रवास वाटे काय काय येणार आहे हे नियतीने आधीच आखून ठेवलेलं असतं अस म्हणतात. पण त्याचा आपल्याला काही मागमूस नसतो. जे वाटयला येईल ते आपण जगायचं . त्यातून काय ते घेत जायचं . अनुभवाने शिकायचं ..अन शिकत शिकता चालायचं . हेच त्या नियतीच नियम असावं . 

काही दिवसापूर्वी घडलेल्या प्रसंगातुनी त्याने असाच काहीसा धडा घेतला होता . 
त्या प्रसंगात मात्र दोन मनं तुटली होती . हृदय प्रेम संगीत कुठेसं हरपलं होतं. पण त्याचा स्वर अजूनही आलाप देत होता.
मनातली आशा अजूनही कुठेशी पल्लवित होत होती. . . त्याने तो काहीसा सुखावला होता. 
अन म्हणूनच गोड आठवणीच्या त्या सुरांमध्ये आज त्याचं भान हरपलं होतं. रात्र पांघुरली होती . तरी त्याचं काही गम्य नव्हतं. 
अर्धवलयाकार मरीन ड्राईव्ह च्या त्या कठड्यावर कित्येक जोड्या एकमेकांना खेटून गप्पांत दंगले होते .त्यांच्याकडे पाहून तो स्वतः हसे अन पुन्हा आठवणीत गुडूप होई. 

प्रेम , हे कधी कुणावर जडेल ते सांगता येत नाही. व्यक्ती व्यक्तीनुरूपे त्याची रूप रेखा बदलत जाते. पण ते जात पात बघत नाही . रंग रूप पाहत नाही. 
ते फक्त आपलेपणाच ओलावापण जाणतं . अन तिथेच ते रमतं. अन बहरतं.

माणसाला निसटून गेलेले ते क्षण पुन्हा पुन्हा हवे हवेसे वाटतात. त्यातला जगलेला आनंद त्याला पुन्हा पुन्हा जगावासा वाटतो.  म्हणून झाल्या गेल्या गोष्टींची तो पुन्हा उजळणी करत राहतो. , 
कधी जुन्या एखाद अल्बम मधून फोटो काढून , त्यावरून हात फिरवून , कधी नजरेसमोर त्या क्षणांना उजाळा देऊन ..कधी आठवणीचा लेप चढवलेल्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन, 
कधी त्या व्यक्तीशी व्यक्तीशा भेट घेऊन त्यातला आनंद तो उपभोगत असतो.

काही दिवसापूर्वी तिच्यासोबत झालेलं मोबाईलवरील संभाषण आज तो असाच पुन्हा ऐकत बसला होता. ते लाडिक बोल पुन्हा पुन्हा ऐकताना , त्याचा चेहरा एकाकी खुलून जाई. .एकाकी हसू हि अनावर होई. अन हसता हसता स्वप्नील दुनियेत तो आपल्या भावी क्षणाचे रंग उधळून देई. असे कितीतरी रंग त्याने आनंद वलयात मुक्तपणे उधळून दिले होते . 
हवी तशी 'नटखट' अन 'खट्याळ' स्वभावाची सखी जी त्याच्या आयुष्यात चालून आली होती. 
उशिरा का होईना , प्रेमाचे दार खुले झाले होते. त्यात त्याने निर्धास्त प्रवेश केला होता. 
पण अजूनही सप्तपदी साठी किंव्हा लग्नाच्या बेडीत साठी म्हणा निर्णयाची गाठ बांधणे तिच्याकडून बाकी होते. पण त्याधीच दोघांमध्ये एक खटका उडाला. ज्याचा घाव त्याच्या जिव्हारी बसला होता. 
माणूस चुकतो , नाही अस नाही . माणूस आहे तो चुकणारच ., 
त्याच्याकडूनही अशीच एक चूक घडली. मुळात एखादी भावना अनावर झाली कि चूक हि घडतेच. 
किंव्हा एखाद कुठला प्रसंग घडतोच जो समोरच्याला अनपेक्षित असतो. 
पण त्या घडण्यामागे हि त्या आधीचे काही क्षण जबाबदार असतात. ते समोरचा गृहीत धरून चालत नाही . अन म्हणून , एकाकी हा असा का वागला ? असे प्रश्न त्यांच्या मनात वारेमाप उधळू लागतात.
 
अन त्याने त्याचं मन ढासळतं. कळवळतं . तिच्या बाबतीत हि असंच काहीस झालं. 
अन त्यानंतर....
क्रमश :- 
हृदया - एक स्वप्नं सखी.. 
- संकेत य पाटेकर 
१६.१०.२०१५ 

सोमवार, ७ डिसेंबर, २०१५

आठवणींच्या भावगर्दीत ..

किती हसरे असतात एकेक 'क्षण' न्हाई ....नजरेच्या आकंठ साठलेल्या भाव सागरात अन हृदयाच्या ध्यानस्थ मंदिरात , तिच्या व त्याच्या सहवासाने गंधित झालेले ते हसरे क्षण, एकदा का प्रवेश करते झाले कि 
ते अधून मधून मनाच्या तळघरात मिश्र भावनांचा, ' एकच हळवा तवंग निर्माण करतात . 

आठवणीच्या साच्याने , ' ज्यात आपण पुरतं आपलं देहभान हरपून जातो '.
तो जुन्या आठवणीतला अत्तरी रंग , सुगंधासह असा काही उधळला जातो कि डोळ्यातून क्षणभर अश्रू हि घळाळू लागतात .
काय काय घडतं. ह्या क्षणानुसार ......

हि वेळ पुढे सरत जाते . बदलाचे वारे वाहत जातात. माणसं माणसं बदलत जातात . 
अनुभवाने सिद्ध होतात. कुणी आधीपेक्षा अधिक कठोर तर कुणी हळवी अजून हळवी झालेली असतात. 
कुणी दूर तर कुणी हृदयाशी अजूनही जवळीक साधून असतात. . 
काहींच अजूनही त्याच शैलीतलं दिलखुलास बोलण असतं भेटन असतं . काहींच्या विचारांना अहंकारी लेप चढलेली असते. किंव्हा कुणाला आता आपणंच नकोस झालेलं असतो .
सांर चित्र पालटलेलं असतं. काही मात्र अजूनही तेच पुर्वीसारख भासतं .

पण हसऱ्या क्षणांचा आठवणीचा तो ठेवा , मात्र अजुनी तसाच टवटवीत, अन प्रसन्नतेने सदा बहारलेला असतो. तो क्षणभर कवटाळून घ्यावा , किंव्हा घटाघटाने पियुनी घ्यावा अस मनोमन वाटून जातं. अन त्यातच शब्दांचा फुलोरा ओठावर स्थिरावला जातो.
किती हसरे क्षण होते ते ...जुन्या मैफलीतले ...., तो मोकळा संवाद , तो हवासा सहवास ..ती संस्मरणीय भेट ! निसटले सगळे ......, आठवणीचा गंधित दर्प लेऊन ..!

असंच काही मनात आलेलं...अन न राहून लिहिलेलं 
संकेत य पाटेकर 
०६.१२.२०१५


मनाचे आर्जव...

ह्या मनाचे देखील किती हे ..आर्जव... 

नको नको म्हणतो , तरी देखील स्वतलाच सावरतं , विश्वास देत ते म्हणतं ..बघ रे , 
पुन्हा एकदा प्रयत्न करून ....वातावरण काहीसं निवळल असेल आता...
बरेच दिवस झाले रे....बोललो नाही. 
भेटलो नाही , कुठलाच संवाद नाही. हा नाही कि हु नाही .
निशब्दी मनाचे गहिरे अन दाह उसवणारे वारे फक्त वाह्तायेत. 
त्याचाच हा परिणाम अन होणारा त्रास ... म्हणूनच रुकरुक लागले रे, शांत राहवत नाही. 
चीड चीड होतेय नुसती मनाची ,संयम हि तुटू जातोय. तरीही स्वतःला सावरत मी पुन्हा प्रयत्न करतोय.....

नातं अन दुरावलेलं मन जर आपल्या पुढाकारानेच , पुन्हा जुळत असेल किंव्हा जुळणार असेल तर, प्रयत्न करायला काय हरकत आहे. हे ना ? 
अस स्वतःला बजावत मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो, पण किती वेळ रे , कितीदा ? मर्यादा नावाची देखील रूपरेखा असते कि नाही? 

कधी कधी खरच प्रश्न पडतो कि ज्याच्यावर जीव ओवाळाव . प्रेम करावं , ते इतके भावनाशुन्य , भावना कठोर कसे काय होतात ? 

कधी काळी आपल्याशीच मनमोकळे पणाने वावरणारी , न राहवून स्वत:हून संवाद साधणारी ,आपल्या काळजीत वेडीपीसी होणारी अन वचन बद्ध असणारी अन आपलीच म्हणून जवळ केलेली आपली हि लोकं , अशी कशी बऱ वागू शकतात ? प्रश्नावर प्रश्नांचे एक एक इमले रचले जातात . 

उत्तर मात्र असूनही नसल्यासारखं अन नकोसच वाटतं.
किती रे उरलो आपण त्यांच्या जीवनात , काय उरलेय किंम्मत आपली ? 
आणि नेमकं असं काय घडलंय इतकं कि ज्याने आपल्याला साफ दूर्लक्षिलं जातंय ? का ? 
ते नक्की कळत नाही . समोरून कोणताच प्रतिसाद मिळत नाही . 

पण आपली धडपड एकतर्फी चालू असते ... आज ना उद्या .......काहीतरी घडेलच , मनासारखं .., ह्या आशेवरच...
पण प्रयत्न करूनही पुन्हा पुन्हा मन निराशेच्या डोहात ढकलल जातं . 

अन वेदनेला नवां अंकुर फुटत जातो. हताश होवून जातो आपण .., डोळ्यावर एकाकी अंधारी यावी तसा काहीसा अंधार पसरतो .
दोष तरी कोणाला द्यावा , न्हाई ?

समोरच्याला कि स्वतःला , कि बदलेल्या ह्या परिस्थितीला , कि नशिबाला ? कळत नाही. 
तरीही आपण म्हणतो दोष नकोच ना कुणाला द्यायला . का द्यावा ?
पण कुठेतरी शेवट मात्र असतोच . पूर्णविराम द्यावा लागतो . 
जर हे असंच चालू राहील तर .....
कारण संयमाला देखील मर्यादा असतात. आपल्या उदारत्या प्रेमाला नसल्या तरी .., कारण प्रेम हे आजीवन असतं . त्याला मरण नाही. अंत नाही . संयमाच मात्र तसं नाही. त्याला हवा तो प्रतिसाद मिळाला तर तो टिकून , अन्यथा ते लुडबुड करतं...

अन शेवटी मनाला गुण गुणाय लावतं. 
अपनी अपनी जिंदगी है भाई , अपने अपने रास्ते..और अपनी अपनी मंजिले ! 
- संकेत य. पाटेकर 
०५.१२.२०१५