शनिवार, २६ जुलै, २०१४

नात्यातलं मनं....

एखादा कागदाचा बोळा रस्त्यावरून जाता येता अगदी सहजतेने भिरकावून द्यावा.
त्याप्रमाणे हि नाती हि अगदी सहजतेने भिरकावून देता येतात का वो ?
सकाळच पांघरुणातून नाही डोळे उघडले तर असा प्रश्नांनी काहूर माजवलं मनामध्ये ....
खरचं इतक्या सहजतेने नाती तोडता येतात ?
जुळलेल मनं , असलेले प्रेम , आपुलकी इतक्या सहजतेने भिरकावून देता येते ? 
मग अश्या ह्या नात्याला नाव काय द्याव ? काय म्हणावं ?
प्रश्न नि प्रश्नच<<<<<<<<
गरजेपुरतं अन नावापुरतं नातं म्हणून घेणारी, जवळ करणारी लोकं,  आयुष्यात येतात अन मनावर अधिराज्य गाजवून मनापासूनच दूर निघून जातात.  त्यांना आपल्या मनाची ना फिकीर असते . ना कसली चिंता... आपला जीव मात्र त्यामध्ये घुटमळतो .
अन श्वास हि कोंडला जातो. ... कारण माणसं ओळखता येत नाही .
मुखवटा घालून फिरणारी माणसं आपला खरा चेहरा दाखवत नाही.
तो मुखवटा उतरवला जातो तेंव्हा कळत, त्यांच्या मनात आपल्याविषयी काहीच स्थान नाही . ना प्रेम ना आपुलकी .....
कळवळत मन अश्यावेळी ..पण तरीही मनं नावच हे अजब प्रकार , स्वतःचीच पाठ थोपाटतो.
अन म्हणत , जाऊ दे ना यार , तू खंर प्रेम केलेस ना , मग सोड ना..
प्रेम निस्वार्थ असावं, त्यांनी स्वार्थ साधला तू कशाला त्यांच्या वाटेला जातोयस .. .
आज ना उद्या त्यांना प्रेमाची अन व्यक्तीची किंम्मत कळेलच .
ते वेळेवर सोपवून दे ... अन निवांत रहा ...
आयुष्यात खरच प्रेमासारखी दुर्मिळ गोष्ट नाही . हो दुर्मिळच , मी दुर्मिळ म्हटलंय अशाकरिता कारण ' प्रेम '' अन त्यातला आनंद आपल्या जवळ असूनही ते कुणाला निस्वार्थ मनाने देता येत नाही. ज्यांना खरच मायेच्या प्रेमळ स्पर्शाची , आपलेपणाची ..नितांत गरज असते.
एखाद्यावर निस्वार्थपणे प्रेम करायला ,सयंमी मनाची अन सार काही सहन करण्याची कला मनी अवगत असावी लागते. किंव्हा ती भिनवावी लागते.
कारण इथे मायेच्या स्पर्शासाठी अन प्रेमासाठी क्षण क्षण धडपडणारे खूप जण आहेत.
त्यांना गरज आहे ती आपली , आपलेपणाची .....दोन गोड शब्दांची .... आपल्या सहवासाची ...
पैसा सर्व काही विकत घेऊ शकत नाही. प्रेम तर मुळीच नाही.
माझ्या मनाला मी घडवतोय ....आकार देतोय.
कारण रस्त्याने जाता येता , प्रवासात , किंव्हा आपल्याच माणसांत ते चित्र डोळ्यसमोर हमखास दिसतं . .... मला जगायचं ते अश्याच प्रेमासाठी......अश्याच लोकांसाठी.
संकेत य पाटेकर
मनातले काही ...
२६.०७.२०१४

बुधवार, २३ जुलै, २०१४

' आठवणीतला एक दिवस ...आपला वाढदिवस '

वर्षभरतला एकच असा दिवस असतो.
जिथे हृदयात घर केलेले , मनाने खूपच जवळ असलेले , पण जवळ असूनही अंतर राखून असलेले ,
वर्षभरात कधीही न भेटणारे , न बोलणारे , आपल्यावर नजर राखून चुपचाप राहणारे ,
मनात आठवण काढूनही संवाद न साधणारे , ओळखीचे , अनोळखीचे...नेहमीच सहवासात असणारे , सतत बोलणारे , दूर असूनही संवाद साधणारे ,मनाला ओढ लावणारे , प्रेमाने राहणारे...
आपली आवर्जून आठवण काढतात .  आपल्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी.....शुभाशिर्वादांसाठी ...
एखाद SMS करून , किंव्हा फोनवर संवाद साधून किंव्हा प्रत्यक्ष भेटून ...बोलून..
तो शुभदिन म्हणजे आपला वाढदिवस .  खरंच अश्यावेळी मन भरून येतं. ...भरल्या आभाळागत ...!
किती हे प्रेम !
 सरत्या पावसाच्या सरींसारखं तन-मन अगदी भिजून जातं ह्या प्रेमाच्या वर्षावात .
नव्या आश्या , नव चेतना पल्लवित करतं. खरंच धन्यता वाटते मनाला ....एक दिलासा मिळतो एकप्रकारे .
तरीही त्यातल्या त्यात कुणी जिवाभावाचं राहीलच एखादं...तर मन खट्टू होतं. हे काही वेगळा सांगायला नको.
वाढदिवसाच्या आधीच पासूनच काहीएक दिवस एक चित्र डोळ्यसमोर उभं राहतं.
किंव्हा आपण ते रंगवलेले असत . अमुक अमुक अस असं होऊ शकतं .
किंव्हा व्हायला हवं. अन त्यानुसार आपण आनंदाच्या विविधरंगीत छटा आपल्या अंगा खांद्यावर खेळवत , इकडून तिकडे सैरवैर बागडत असतो.
वाढदिवसाच्या वेळी अश्या ह्या प्रेमळ शुभेच्छांचा वर्षाव होत असताना मन आनंदाच्या लहरी सुगंधामधे   स्व:तहा हरवून जातं .  कारण वर म्हटल्या प्रमाणे ........
कधीही न बोलणारे , न भेटणारे , आपलेच जीवाभावाचे, आपली वर्षभरातुन एकदा का होईना आपली आवर्जून आठवण काढतात . हीच बाबा मनाला स्पर्शून जाते .
आयुष्यात दुसरं तिसरं अजून काय हवं असंत. प्रेमाचा एक चतकोर हि आनंद फुलवण्यास पुरेसा असतो.
असा हा आनंदाचा दिवस ....वर्षभरातून एकदाच येतो ...आठवणीचा अन शुभेच्छांचा वर्षाव करत ...
आपल्या आई वडलांची हि एक मोठी देणगीच आहे. त्यांचेच सर्वप्रथम चरण स्पर्श करत.
असंच लिहिता लिहिता..
आपलाच ,
संकेत य पाटेकर
२३.०७.२०१४

शनिवार, १९ जुलै, २०१४

स्वच्छंदी मनं पाखरू ..

कसल्याश्या आवाजाने रात्रीची झोप पूर्ण झाली , डोळे सताड उघडले .
घराबाहेर एक नजर टाकली .
काळोख्याचा केंव्हाच अस्त झाला होता .
सुर्य नारायण हि उगवनिला आला होता . पण रिमझिमती पाउसाची सर , अन काळेदाट मेघ त्यास जणू क्षितिजाच्या पंखावरती झुळन्यास आज सक्त मनाई आहे हे सांगू पाहत होते.
हे सर्व पाहत असता तन- मन- अन पाउलं अंगावरल पांघरून तसंच एकीकडे लोटत, घराबाहेरील चौकटीत दाखल झालं.
येथून ते भरल्या पावसाचं मायेनं भरलं रूप नजरेच्या पटलावर हळुवार तरंगू लागलं.
पक्षी पाखरांची त्या रिमझिमत्या सरीनं मधून इकडून तिकडून सुरु असणारी नाच गाणी , मनात चैतन्याचा नवा स्वर उमटवू लागली.
त्यातच पाउसाचा वेग वाढू लागला. अन सर्वांचीच धांदल उडाली.
जो तो आडोसा शोधण्यासठी सैर वैर पळू लागला. कुणी पिंपळाच्या असंख्य गर्दी केलेल्या पानांफांदी मध्ये दडून बसलं.  तर कुणी कुठल्या छपराखाली आसरा घेतला.
आसमंत फक्त नि फक्त आता टपोर्या सरींनी अन काळ्या दाट मेघानीच तेवढ सजल होतं .
पक्षी पाखरांची रेल्चाल हि एव्हांना कमी झाली होती.
आकाशी झेप घेणाऱ्या इमारती पावसाच्या सरींनी न्हाऊन अगदी उठून दिसत होत्या . दाटी दाटीने उभे राहिलेल्या चाळी अन त्यावरील छप्पर आता चकाकू लागली होती. अगदी धुतल्या दळासारखी ..
चौकस नजर प्रत्येक क्षण अस टिपू पाहत होती.
मनाला नव चैतन्याचं , नवं विचारांचं पाठबळ बहाल करत . अशातच एका इवल्याश्या पक्षाचा थवा मुसळधार सरींमधून देखील अगदी मुक्तपणे विहार करताना दिसला . इकडून तिकडून त्याचं ठिकाणी तो चकरा मारत , घिरट्या घेत .
जोडीने पुन्हा त्याचं ठिकाणी येत . पुन्हा इकडून तिकडून फिरकत .
 जणू त्यांच्या जीवनातला तो सर्वोच्च क्षण असावा . किती मुक्तपणे ते आनंद घेत होते त्या क्षणाचा.
त्या मोकळ्या सरत्या नभात ...
इतर कोणते हि पक्षी ..त्या मुसळधार पाउसात पुढे येण्यास धजत न्हवते.
भीती असावी बहुदा ओलेचिंब होण्याची ... पण ह्यांना कसली तमा .
ते अगदी मुक्तपणे विहार करत होते. आनंद लुटत होते.. त्या क्षणाचा अन ते सर्व क्षण मी मनाच्या चौकटीतून अगदी तन्मयतेने न्ह्याहाळत होतो.
आयुष्यातील हर एक क्षण कुठली तमा न बाळगता असंच अगदी मुक्तपणे जगावं . नाही का ?
आपलाच
- संकेत य पाटेकर
१८.०७.२०१४

गुरुवार, १७ जुलै, २०१४

टप्परवेअर चा गोल डब्बा...

अहो, बघा तुमच्या दुकानातच असतील ? शोधा पाहू पुन्हा एकदा ?
घरभर सर्वत्र शोधलं. नाहीच कुठे , तुमच्या दुकानातच असलं पाहिजे ? 
 नेहमीचच आहे हे तुमचं , डब्बा दुकानातच विसरायचं . आठवण देऊनही , आठवण करून देऊनही अशी स्थिती ...आता काय म्हणू मी ह्या पुढे ?
वहिनीची आज जरा चीडचिड सुरु होती. ते स्वाभाविकच होतं म्हणा.
नेहमीची सकाळी उठल्यावर होणारी धावपळ , घाई , अन त्यात दोन दिवसापासून न सापडणारे हे टप्परवेअरचे डबे , त्यामुळे डब्याचा एक मोठा प्रश्नच निर्माण झाला होता ?
खास आम्हा दोघांसाठी म्हणजेच माझा भाऊ अन मी ' आमच्यासाठी वहिनीने खास टप्परवेअर चे महागडे डबे विकत घेतले होते . अन ते आता मिळत न्हवते.
 कुणीतरी कुठेतरी विसरले असणार हे नक्कीच , हे जाणून वहिनीने आपल्या हक्काच्या पतीवर म्हणजेच माझ्या भावावर शब्दांची तोफ डागली होती .
 मी मात्र त्यातून निसटलो होतो. वहिनी सहसा कधी मला बोलत नाही.  त्यामुळे जे काही बोल आहे ते माझ्या भावालाच ऐकावे लागे.
आज हि तसेच ते बोल ऐकून भाऊ म्हणला , 'अग नाही आहे , शोधलं सर्वत्र , नाही सापडत.

चिडूनच जरा...ह्या संक्या (संक्या म्हणजेच मी, घरी मला संक्या नावाने संबोधतात ) कडेच असतील.
भाऊची नजर अन बोल माझ्याकडे फिरले , तेंव्हा मी हि उत्तर दिले .
माझ्याकडे नाही आहे. मी त्याला ऑफिस ची Bag दाखवली , बघ नाही आहे .
तुझ्या ऑफिस मध्ये विसरला असणार , बघ गेल्यावर ...

काहीच न बोलता , हो ह्या अर्थी मान डोलावत मी ऑफिस ला निघू लागलो.
त्यांनतर असे कित्येक दिवस ओलांडले . डब्याचा कुठेच पत्ता नाही .
अचानक हे डबे गेले कुठे ? काही कळेना ? कळण्यास मार्ग नाही. कधी कधी एखादा कुणी घरी येई तेंव्हा तो विषय आपणहून निघे , तेंव्हा कुठे त्या डब्याची आठवण होई.
असंच एकदा नेहमीप्रमाणे ऑफिस ला होतो. निघायची वेळ झाली होती .
त्यामुळे पटपट ऑफिस मध्ये डेस्क वर मांडलेला सारा पसारा उरकून घेतला . अन बाहेर पडायला लागलो. तोच समोर ऑफिस प्यून येउन ठेपला .
अरे , तुझा डबा राहिला आहे का ? इथे केंव्हापासून एक डबा आहे , तुझा आहे का बघ ?
त्या बोलाने मी काही क्षण जरा भूतकाळातच गढून गेलो . घरात घडलेला तो सारा प्रसंग , वहिनीचे बोल कानी भिनू लागले.
डब्बा आपलाच असला म्हणजे?  मी त्या पाठो पाठ pantry मध्ये गेलो .
त्याने कित्येक दिवसाचा धूळ खात पडलेला , तो गोल डब्बा डोळ्यासमोर आणला.
 तेंव्हा आज घरी हशा पिकणार हे पक्क झालं.
कित्येक दिवस न सापडलेला टप्परवेअरचा तो गोल डब्बा.
माझ्याच ऑफिस मध्ये कित्येक दिवस धूळ खात पडला होता . अन मी निर्दोष आहे.
माझ्याकडे डबा नाही आहे ह्या भावनेने तेंव्हा त्यातून सुखरूप निसटलो होतो.
पण आता मात्र माझा अपराध मला स्वीकारावा लागणार होता . नकळत कित्येक दिवस धूळ खात पडला तो डबा ...आज घरी हशा पिकवणार हे अगदी नक्की होतं.
असेच आयुष्यात येणारे काही क्षण आपल्या जीवनात आनंद घेऊ येतात . मग त्या आनंदाला कोणतही निमित्त पुरेस असतं.
आज टप्परवेअर चा डब्बा हा त्या आनंदाचा एक निमित्त झाला.
वर लिहिलेल्या गोष्टी ह्या गमतीशीर आहेत , रागावलेले क्षण हे तेवढ्यापुरत आहे , त्यातही मधुरता आहे. रागात हि मधुरता आली म्हणजे नातं अधिक बहरतं .
- संकेत पाटेकर
असंच लिहिता लिहिता...
१७.०७.२०१४ हा फोटो आंतरजाळातून घेतला आहे.

शनिवार, १२ जुलै, २०१४

छत्री पेक्षा रेनकोट बरा ..

काल ऑफिस मध्ये असता फोन खणाणला.  घरातूनच होता , मोठ्या भावाचा ..
हेलो , मी रेनकोट घेतोय. सातशे ला आहे , तुझ्यासाठी हि घेऊ का , अजून एक ?
मी म्हटलं ? नको , तू घेतो आहेस ना तुझ्यासाठी ? तोच वापरेन ..
मला कुठे जास्त गरज आहे.
ट्रेकिंग ला जाताना लागेल तोच ...इतर वेळी छत्री आहेच .
भाऊ मात्र थोडा रागावूनच (असच गंमतीने हो ) म्हणाला .
' माझा रेनकोट मी देणार नाही, माझी कामे असतात अन मला बाहेर जाव लागतं रविवार हि , गाडी घेऊन (आमची दुचाकी), .. मी म्हटलं बर ..ठीक आहे . घे मग माझ्यासाठी हि एक ..
ऑफिस मधून सुटलो अन नेहमीच्या नित्य क्रमानुसार ग्रंथालयात जावून बसलो .
थोडं इकडचं तिकडच वाचन केलं अन भावाच्या दुकानासमोर (संगणक दुरुश्तीच आमचं छोटस दुकान आहे ) हजर झालो. मनात त्या घेतलेल्या गोष्टीबद्दल उत्सुकता तर होतीच .
कारण ज्या ज्या वेळी मी ह्याला काही विकत घ्यायला सांगतो माझ्यासाठी म्हणून तेंव्हा ती घेतलेली वस्तू मला मुळीच पसंद पडत नाही .
मात्र घेतलेल्या वस्तू चा दर्जा तो कापड वगैरे महागडं असतं. हे खर ...
' सस्ती चीजो का हम शौख नही रखते' ,हा दुनियादारी मधला डाईलॉग अशावेळी कधीतरी आठवून जातो.
तर असो , प्रत्येकवेळी अस घडत नाही , काही वस्तू नक्कीच पसंद पडतात . कारण त्या प्रत्येकामागे प्रेमभावना असते . ह्या वेळेस घेतलेल ते नवं कोर रेनकोट पसंदीत आलं.
बाहेर पाउसाची रिमझिम सुरूच होती. त्यामुळे अंगात ते रेनकोट चढवलं .
अन टपोरया थेंबाचा आनंद लुटू लागलो. टप टप असा आवाज करत ' सरींचा' तो टपोरा स्पर्श अन त्यातून अंगभर संचारलेली रोमांचित वलय मला , नसलेल्या पण असायला हवी असलेल्या प्रेयशिचि आठवण करू देत होते.
त्यातच छत्री पेक्षा रेनकोटच बरा ..असा एक विचार त्यावेळेस मनावर उमटून गेला .
रिमझिमत्या पाउसात मनसोक्त भिजायची फार इच्छा असते. पण भिजता येत नाही . 
अशावेळी रेनकोट अंगात असला म्हणजे रिमझिमत्या त्या पाउसाचा स्पर्श अनुभवता येतो. 
तो टपोरा थेंब अंगा खांद्यावर अलगद झेलता येतो. मनभर नाचता येत बागडता येत. 
भिजून हि न भिजण्याचा एक वेगळा आनंद मिळत असतो त्यातून .. जो छत्री बाळगून मिळत नाही.
असंच लिहिता लिहिता ..
- संकेत पाटेकर
१२.०७.२०१४

गुरुवार, ३ जुलै, २०१४

खाऊ दे नाहीतर पैसे दे .

खाऊ दे नाहीतर पैसे दे ...
काल ट्रेक दरम्यान एका पायवाटेवरती ' त्या कोवळ्या चिमुरड्यांच हे वाक्य अजूनहि त्या स्वरानिशी कानाशी गुंजतंय ..आयुष्याच्या व्याख्या ची पुन्हा नव्याने उजळणी करत .
त्यावेळेस मनालाच ते वाक्य इतकं सरकन घासून गेलं कि खोल जखम व्हावी इतपत ...
त्यावेळेस हाती जे होतं ते देऊ केलं पण त्याने मन काही समाधानी झालं नाही .
 कुठेतरी ते चित्र अन ते वाक्य मनात सळ करून राहिलंय.
कळसुबाईची ती छोटी ताई असो .
पोटाच्या खळगीसाठी म्हणून भर उन्हा तान्हात झाडाचा आडोशा पकडून , 'दादाss दादाss ताक घ्याना ?
अस म्हणत मोठ्या आशेने बघणारी .
नको म्हणताच मागे मागे पळत येउन केविलवाण्या स्वराने ' दादा काही खायला द्याना ?
म्हणत काळजाच पाणी पाणी करणारी ..वा खाऊ दे नाहीतर पैसे दे ...म्हणणारी हि चिमुरडी .....
मनाला एक विचार देतात . 
अजूनही कुणाला कुणाची तरी गरज आहे . प्रेमाची गरज आहे. 
मायेच्या स्पर्शाची गरज आहे. मदतीची गरज आहे. आपलेपणाची गरज आहे.
- संकेत