नातं तुझं माझं... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नातं तुझं माझं... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

माणूस आहे ...तो चुकणारच ...

माणूस आहे ...तो चुकणारच ...

प्रेमात सगळ 'क्षेम' असतं अस म्हणतात . पण त्यासाठी क्षमाशील वृत्ती मुळात असवी लागते. अन प्रेम आतून असावं लागतं. खरं खुर.. हृदयाच्या सुप्त वाणीतून प्रकट झालेलं. 
तेंव्हा कुठे झाल्या गेल्या क्षणांना किंव्हा दुखावलेल्या आपल्या मनाला पुन्हा शांत करून , पुन्हा सार आपलसं करून . सारं विसरून, नव्याने नातं झुलवता येतं. 
मुळात प्रेम हे 'हृदय' जोडणं शिकवतं ..तोडनं नाही. 
दोन मनं एकत्रित आली कि तडजोड हि आलीच . नातं म्हटलं कि वाद विवाद आलेच ...मग ते शुल्लक कारणावरून असतील ..वा कुठलेही .. 
पण त्या एका कारणासाठी, त्या मागची पार्श्वभूमी न पाहता उमगता ..
तुम्ही जर टोकाची भूमिका घेऊन, एकमेकांपासून दूर जात असाल तर त्याला काही एक अर्थ नाही . त्या नात्याला हि अर्थ उरत नाही .
एका कारणावरून एवढ्या घडामोडी होत असतील .तर पुढचं आयुष्यं एकत्रित काढण अथवा जगण कठीण आहे.
माणूस समजायला अन समजून घ्यायला आयुष्यही अपुरं पडतं. 
जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा अन त्या त्या वेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीचा वा वातारणाचा परिणाम एकंदरीत आपल्या मनावर होत असतो. 
अन त्यातून वेगवेगळ्या भावछटा ना ना रुपी ढंगान प्रकट होत असतात. अन त्यानुसार आपण व्यक्त होत जातो.
स्वभावाचे विविध पैलू ...अश्यावेळी आपलं दर्शन देतात. मग ते आपल्याला अपेक्षित नसलेले स्वभाव गुण असतील वा दोष .. त्यावेळेस समोरच्याने बावरून न जाता . त्या मागची कारणे लक्षात घ्यावी. 
सांभाळून घ्यावं एकमेकांना ...
एका क्षणात नांत तोडण्याची बतावणी कशाला ?
माणूस आहे ...तो चुकणारच ....., तो काही सर्व गुण संपन्न नाही. देव नाही.
आपली चूक मान्य करण्याची वा पुन्हा नात्यात बहर आणण्यची त्यात धमक असेल तर माफ करायला काही हरकत नाही. 
मुळात आपली बाजू समजून माघार घेण वा आपली चूक मान्य करणं हि क्षमाशील मनाची अन सदृढ नात्याची लक्षण आहेत. 
तो सावरतोय मग तुम्ही का नको सावरायला ?
चूक कोणाची हि असली तरी एकाने बाजू सावरायची असते. नात्याची फळी म्हणून तर मजबूत राहते. त्याला पोखरून काढणाऱ्या वाळवीची कीड लागत नाही . ज्याला प्रेम कळलं ..त्याला नातं सांभाळाव लागत नाही ते आपुसकच सांभाळलं जातं.
आपल्या अपेक्षानुसार त्याने वागायलाच हवं किंव्हा असंच वागणं तुझं अपेक्षित आहे हि आपली वृत्ती सोडायला हवी .
समोरच्याच्या अश्या अनपेक्षित वागण्याने हृदयास घाव बसतो हे मान्य ..ती जखम काही वेळा भरून हि येणारी नसते. पण तरीही समोरच्याने आपली चूक मान्य केली ..तर त्याला माफ करायला हवच. 
तेवढेच ते घाव हि विरून जातील. 
प्रेम आहे नं ...मग सांभाळायला हवंच एकमेकांना नाही का ?त्यासाठी नातं का तोडावं ? 
मन तुटलचं तर ते पुन्हा जोडता यायला हवं . 
माणूस आपल्या माणसाशिवाय अन त्याच्या प्रेमाशिवाय जगू शकत नाही. त्याला आपलीच माणसं जवळ लागतात. प्रसंगी त्याला समजून घेणारी प्रसंगी समजून देणारी ...!
इथे मंगेश पाडगावकरांच्या काही ओळी आठवतात . 
प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
नातं तुझं माझं... 
संकेत य पाटेकर 
१२.१०.२०१५
 

बुधवार, २६ ऑगस्ट, २०१५

तुझं प्रेम...

हरलो अगं ! सरते शेवटी हरलोच..
नात्यातील ती रसिकता , तो आपलेपणा , ती शब्दांची मोहकता , त्यातला प्रांजळपणा प्रयत्न करूनही मला पुन्हा मिळविता आला नाही . हरलो मी ....
तुझ्या अविश्वासालाच पात्र , हो ना ?
कितीसा धडपडलो , रडलो , सावरलो , प्रयत्नाची शर्थ केली. पण नाही .
म्हणतात ना , एकदा का कुणाच्या मनातून आपण उतरलो , अविश्वासाच्या पात्र ठरलो ,कि मग पुन्हा जैसे थे स्थिती होणे .कठीणच....
माझा हि असंच झालं आहे बघ . पण मी प्रयत्न केले हा …
मनापासून अगदी ..नाही अस नाही .

मुळात मी कुठे चुकलो ? 
हेच मला अद्याप कळलेलं नाही. अन तू सांगितले हि नाहीस . फक्त इतकं तू म्हणालीस ..
''परिस्थिती माणसाला बदलते रे , मी हि बदलले , तू कुठे चुकला नाहीस'' .
बस्स एवढंच ते वाक्य ...अजूनही मनाची खापरं तोडतंय.

मी कुठेच चुकलो नाही . मग तरीही तू , मला तुझ्यापासून दूर ढकलतेस ? का रे ? कश्यासाठी ? मला हे कळून येत नाही आहे, अग ! सांग ना ..
प्रत्येक भेटीत , किती विश्वासानं तुझ्या कडे पाहतो . कान टवकारतो .
क्षणभरल्या तुझ्या त्या सहवासात.. तुझं प्रेमभरलं एक एक शब्द वेचण्यासाठी ..
पण खर सांगू ..त्या शब्द वलयात 'आपलेपणा' असा गवसलाच नाही कधी, .
ह्या मागील दोन तीन वर्षात ...
तुच लाडीकतेने देऊ केलेलं माझं नावं घे ना ..सारं जग त्या नावाने हाक मारतं आता , पण तू ....नाही . कुठेशी टोचतं हे मनाला , तुला कसं कळणारं ? 
खंर सांग ना , कुठे चुकतोय मी ?
कितीस ओरडून सांगितल तुला , हक्काचं नातं म्हणून भांडलो हि कित्येकदा,
अन रुठावलो हि ....ठाऊक आहे .
एकदा तर रागानेच लालबुंद होवून दिवसभर मोबाईल बंद ठेवून ..वेड्यासारखा भटकत राहिलो होतो.
सकाळी निघालेलो कुणास न विचारता,  ते थेट रात्री घरी परतलेलो .
किती रागावले होते सगळे . . माझी तर हजेरीच घेतली होती साऱ्यांनी .
पण आता क्षणभराच्या माझ्या रागाला मी हळूच थोपवतो अन म्हणतो , 'अरे वेड्या अस रागावून कस चालेल ,आपली आहे ना ती , जिव्हाळ्याची जिवलग   ..बस्स , जरा शांत हो ,
कित्येकदा अशी स्वतःची समजूत घातली .
आज ना उद्या तो एक दिवस उजाडेलच ह्या आशेवरच चालत राहिलो .
दिवस ढकलत राहिलो . कधीतरी तू आपलेपणाने बोलशील ..आपलेपणाने जवळ घेशील . पण नाही ग ..हरलो मी ..
सहजा सहजी कुणाला आपलंस करता येत नाही ..हेच खरं ..
तू तर आपलीच आहे . तरीही मी असा बघ ..,
तो विश्वास मी हरवून बसलोय ..अन आपल्या नात्यातली ती रसिकता हि ..
हरलो मी..........हरलो अगं !
पण अजूनही एक आशेची हलकीशी दीप मनाच्या अंधाऱ्या खोलीत निर्विकारपणे तेवत आहे.
ऐकतेस ना गं !
तुझाच ,
असंच काहीसं डोक्यात घुनघूनलेलं, 
सहज उमटलेलं ...
संकेत पाटेकर 
२५.०८.२०१५


मंगळवार, १४ जुलै, २०१५

नाती ...

ना ना विविध मनाच्या ह्या नाती .
सांभाळण खुप अवघड जातं. ओढाताण होते मनाची काही वेळा , काही प्रसंगी ..
प्रत्येकाचा स्वभाव निराळा ..प्रत्येकाचं मन वेगळ ,प्रत्येकाची विचार करण्याची
पद्धत वेगळी,प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या .., 
कुणी सहज समजून घेतं , चेहऱ्यावर सहजतेच हास्य उमलत , कुणी समजण्यापलीकडे जातं, नाक मुरडतं  ..रागाचा पारा चढवत...!
कुणी हट्टच धरून बसतं , कुणी गृहीतच धरून राहतं.
ओढाताण होते मनाची अश्यावेळी ..., कुठे कुठे लक्ष द्यावं , कुणा कुणाला
सांभाळाव .पण संभाळण भाग असतं... नाती हवी असतात .


कारण आयुष्य खूप सुंदर आहे. अन ते आपल्या अवती भोवती असलेल्या , आपल्या मनाशी
जुळल्या नात्यातील , त्या त्या व्यक्ती अन त्यांच्या आपलेपणाने अधिक सहज
सुंदर होवून जातं.


पण राहून राहून कधी प्रश्न पडतो ..
समजणारे , समजून घेणारे , अन प्रसंगी अगदी प्रेमाने समजून सांगणारे सारेच असले
असते तर ...
पण ह्या 'जर'- तर' ला अर्थच कुठे असतो म्हणा ....
ह्यातूनच मर्यादेची एक रूपरेखा आखली जाते , आपल्या मनाशी ..
कुणाशी किती अंतर राखून राहायचं ..कुणाशी किती बोलायचं ..कुणाच्या किती जवळ
जायचं .
असंच लिहिता लिहिता...
मनातल काही ..
संकेत य पाटेकर
१४.०७.२०१५

शनिवार, २५ एप्रिल, २०१५

' नातं' तुटत नाही , तुटतात ती ' मनं'

'नातं' तुटत नाही , तुटतात ती ' मनं' 
अन ती पुन्हा जुळवायला कधी वेळ हवा असतो तर कधी प्रेमाची हलकीशी थाप , अन आपुलकीचे काही उबदार प्रेमळ शब्द ... 
कितीही वाद विवाद झाले , रुसवे फुगवे झाले तरी प्रेमाचा एक हलकासा शब्द...
एक हलकसा स्पर्श ' मनातला' सारा राग क्षणात विसरून लावतं.  म्हणून प्रेमाशिवाय नातं नाही . 
अन नात्यांशिवाय प्रेम ....
प्रेम जिथे नातं तिथे .... 
 संकेत य पाटेकर 
४.१२.२०१३

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०१४

बंधन प्रेमाचं ..

हे दीदी,
तू मला लाखी बांधणार ?
हो रे माझ्या सोन्या ...
मी पण बांधू तुला लाखी ?
अरे वेड्या , मुल कधी राखी बांधतात का ?
मग ?
बहिण राखी बांधते .......
हा आsssss....
मी तुझी बहिण ना , मग मी तुला राखी बांधणार...,
बहिण भावाचं हा प्रेमसंवाद . मला कल्पनेतल्या दुनियेत नकळत घेऊन गेला ........ वाटलं लहान व्हावं पुन्हा ...अन बहिण भावाच्या प्रेमभरल्या दंग्यात हरवून जावं ..........
ये दीदी तू ,ती छोटा भीम वाली लाखी बांधनाल ना ?
हो रे, ढिशुम धुशुम ...
मग मी तुला काय देनाल ? चोकलेट...
दीदी ..मला पण देशील ना, चोकलेट ?
चल , नाही देणार,
बघ , मग नको बांधू लाखी ....
मला पण हवाय चोकलेट ,
अच्छा बाबा , आपण दोघे खाऊ , ठीकाय ..
हम्म... माझी प्यारी दीदी
असंच लिहिता लिहिता...
- संकेत य पाटेकर

शनिवार, २६ जुलै, २०१४

नात्यातलं मनं....

एखादा कागदाचा बोळा रस्त्यावरून जाता येता अगदी सहजतेने भिरकावून द्यावा.
त्याप्रमाणे हि नाती हि अगदी सहजतेने भिरकावून देता येतात का वो ?
सकाळच पांघरुणातून नाही डोळे उघडले तर असा प्रश्नांनी काहूर माजवलं मनामध्ये ....
खरचं इतक्या सहजतेने नाती तोडता येतात ?
जुळलेल मनं , असलेले प्रेम , आपुलकी इतक्या सहजतेने भिरकावून देता येते ? 
मग अश्या ह्या नात्याला नाव काय द्याव ? काय म्हणावं ?
प्रश्न नि प्रश्नच<<<<<<<<
गरजेपुरतं अन नावापुरतं नातं म्हणून घेणारी, जवळ करणारी लोकं,  आयुष्यात येतात अन मनावर अधिराज्य गाजवून मनापासूनच दूर निघून जातात.  त्यांना आपल्या मनाची ना फिकीर असते . ना कसली चिंता... आपला जीव मात्र त्यामध्ये घुटमळतो .
अन श्वास हि कोंडला जातो. ... कारण माणसं ओळखता येत नाही .
मुखवटा घालून फिरणारी माणसं आपला खरा चेहरा दाखवत नाही.
तो मुखवटा उतरवला जातो तेंव्हा कळत, त्यांच्या मनात आपल्याविषयी काहीच स्थान नाही . ना प्रेम ना आपुलकी .....
कळवळत मन अश्यावेळी ..पण तरीही मनं नावच हे अजब प्रकार , स्वतःचीच पाठ थोपाटतो.
अन म्हणत , जाऊ दे ना यार , तू खंर प्रेम केलेस ना , मग सोड ना..
प्रेम निस्वार्थ असावं, त्यांनी स्वार्थ साधला तू कशाला त्यांच्या वाटेला जातोयस .. .
आज ना उद्या त्यांना प्रेमाची अन व्यक्तीची किंम्मत कळेलच .
ते वेळेवर सोपवून दे ... अन निवांत रहा ...
आयुष्यात खरच प्रेमासारखी दुर्मिळ गोष्ट नाही . हो दुर्मिळच , मी दुर्मिळ म्हटलंय अशाकरिता कारण ' प्रेम '' अन त्यातला आनंद आपल्या जवळ असूनही ते कुणाला निस्वार्थ मनाने देता येत नाही. ज्यांना खरच मायेच्या प्रेमळ स्पर्शाची , आपलेपणाची ..नितांत गरज असते.
एखाद्यावर निस्वार्थपणे प्रेम करायला ,सयंमी मनाची अन सार काही सहन करण्याची कला मनी अवगत असावी लागते. किंव्हा ती भिनवावी लागते.
कारण इथे मायेच्या स्पर्शासाठी अन प्रेमासाठी क्षण क्षण धडपडणारे खूप जण आहेत.
त्यांना गरज आहे ती आपली , आपलेपणाची .....दोन गोड शब्दांची .... आपल्या सहवासाची ...
पैसा सर्व काही विकत घेऊ शकत नाही. प्रेम तर मुळीच नाही.
माझ्या मनाला मी घडवतोय ....आकार देतोय.
कारण रस्त्याने जाता येता , प्रवासात , किंव्हा आपल्याच माणसांत ते चित्र डोळ्यसमोर हमखास दिसतं . .... मला जगायचं ते अश्याच प्रेमासाठी......अश्याच लोकांसाठी.
संकेत य पाटेकर
मनातले काही ...
२६.०७.२०१४

गुरुवार, १९ जून, २०१४

नातं बहिण भावाचं - नातं प्रेमाचं

सर्वच नाती काही रक्ताची नसतात . काही नाती मनानं जुळली जातात .
आयुष्याच्या पायवाटेवर निवांतपणे कधी धावत पळत असता...
त्यात बहिण भावाच्या ह्या अनमोल रत्नाचं हि समावेश असतो .
भावाचं निरागस 'प्रेम' अन बहिणीची अफाट 'माया' हे सर्वांच्या भाग्योदयी नसतं.  अन म्हणूनच मनाला एक आस लागून राहते . कायम ...
आपल्यालाही एखादी नाजुकशी फुलसुंदर भोळीभाबडी, सुंदर कोमल मनाची लाडी वाडी करणारी , खट्याळ-खेळकर अशी बहिण असावी.
किंव्हा सदैव साथ न सोडणारा , अडचणीत नेहमीच आपल्यासोबत असणारा , समजुददार प्रेमळ असा भाऊ असावा . अस सतत वाटत राहतं.
आणि आपण जे मनापासून इच्छितो ते बहुदा पूर्ण हि होतं.
जन्मतःच आपल्याला सर्व काही मिळत नाही . काही गोष्टी आपल्याला आयुष्याची झगडताना मिळवायच्या असतात तर काही ' अनमोल नात्यांसारख्या ' गोष्टी ईश्वर योग्य त्या वेळेत ' भेटी-गाठींचा कार्यक्रम आखून ' ते जुळवून देत असतो.
मग अशातच कुणाला बहिणीचं प्रेम मिळालं नसेल . कुणाला बहिण नसेल तर त्याला एखाद्या वळणावर तो तोची भेट घडवून देतो. भले ते नातं रक्ताचं नसो. पण त्या व्यक्तीत ते नातं अन नात्यातलं ते निरागस प्रेम आपल्या नजरेच्या कक्षेत बागडू लागतं. खेळकर क्षणांना सोबत करून .
बहिणीची किंमत अन तीच प्रेम तिची माया काय असते ह्याची जाण असतेच आपल्याला .
 भले हि सख्खी बहिण नसली तरीहि ...कारण त्या प्रेमासाठी आपण आसुसलेलो असतो गेली कित्येक वर्ष . पण ते प्रेम आपण इत्क्यावेळेस फक्त आपल्या नजरेनी पाहत असतो. इतर कुटुंबातील त्या भावा- बहिणीच्या जोडी कडे पाहून ....बस्स
पण कधी ना कधी आपल्याला आपल्या मनातील ती व्यक्ती प्रत्यक्ष भेटते. एका वळणावर , अन नात जुळलं जातं विश्वासाचं .
बहिणीचं ते कृपाळू प्रेम मिळू लागतं . तोच हट्टीपणा तोच बहिण भावातला खेळकरपणा . तीच लाडी गोडी . तेच गोंडस प्रेम . क्षण अगदी फुलू लागतात . नव्याने हसऱ्या मार्गाने आनंदाचा सुगंधी द्रव्य दाही दिशांना पसरवून .. ज्या प्रेमासाठी आपण इतके वर्ष आसुसलेलो असतो. ते प्रेम आता मिळतं असतं . मिळू लागतं . त्यामुळे चैतन्याचा नवा सागरच जणू आपल्यात संचारलेला असतो.
अशा बहिणी तुम्हा आम्हाला लाभलेल्या असतात . किंव्हा एखाद्या बहिणीला आपल्यासारखा भाऊ लाभलेला असतो.
हे नातं जरी रक्ताचं नसलं तरी ..प्रेमाचं , विश्वासाचं अन मना मनाचं असतं. अन ते कायम तसंच राहावं हीच आपली प्रामाणिक इच्छा अन प्रार्थना असते भगवंताजवळ . माझी हि अशीच प्रामाणिक इच्छा अन प्रार्थना आहे . देवा ऐकतोयस नारे ...;););)
नातं बहिण भावाचं - नातं प्रेमाचं
आपलाच ,
संकेत य पाटेकर (संकेत उर्फ संकु )
१९.०६.२०१४

शनिवार, १७ मे, २०१४

'" Sometimes your heart needs more time to accept what your mind already knows."


मन हि मन में...
'" Sometimes your heart needs more time to accept what your mind already knows."
बरंच काही लिहायचं आहे आज ...पण कसं लिहू ?
कुठून सुरवात करू? काही कळत नाही .
"मन" नावाचा हा प्रकारच खूप अजब आहे . विचार विचार आणि फक्त विचार ..अगदी भेडसावून सोडतात . एखाद्या भुताटकीसारखं ...पिच्छा सोडत नाही
जगात सर्वात गतीवान काय असेल तर मी म्हणेन हे आपले विचार ....सतत धावत असतात सतत .
ह्यांच्या वेगाचा मोजमापाच नाही . करताच येणार नाही . करणार तरी कसं ते ...शक्य आहे का ?
दर सेकांद्ला मिनिटाला कित्येक विचार बाहेर पडतात . ते कुठून कसे येतात? कुठे जातात काही माहित नाही . त्या त्या परिस्थितीनुसार , वेळेनुसार सार घडतं . अशावेळी विचारांची संख्या हि अगणिक असते.
कधी हेच विचार मनाला पार खचून टाकतात . आपल्या दुबळेपनाच कारण ठरतात .
तर कधी तेच मनाला बळकटी प्राप्त करून देतात काल अशीच एक घटना घडली.
सकाळपासून विचारांनी अगदी हैराण करून सोडलं होतं. मनात अनेक प्रश्नांनी थैमान घातले होते.
असलेल्या प्रश्नाची उकल होत न्हवती .
शेवटी मनाचा निर्णय घेऊन ती उकल करण्यास काहीसा (पूर्णपणे नाही ) सफल झालो. मनाचा थोडा भार कमी झाला . प्रश्नाचं उत्तर मिळालं . मात्र ह्याचा त्रास समोरच्याला झाला . नाईलाज होता. अन तो होणारच होता. त्यासाठी माफी मागतो .
माफ कर, ...करशील का ? प्लीज
तसं दर वेळेसच आहे हे माझं . चुका करायच्या अन नंतर माफी मागायची.
 पण त्या मागे हि कारण होत. एका उत्तरासाठी धडपडत होतो . ते मिळत न्हवतं .कित्येक दिवस..
ते आज मिळालं . मनात अस काही नाही . तुला त्रास वगैरे देणं , त्रास द्यावा हा मुळीच हेतू नाही .
 आपल्या आवडत्या जिवलग अश्या व्यक्तीला त्रास देण कुणाला आवडेल का ? नाही , अजिबात नाही .
उलट कितीही काही झालं तरी त्या भगवंताजवळ एकच प्रार्थना असते नेहमी .
हे देवा ,भगवंता ' माझ्या त्या लाडक्या व्यक्तीला सदा आंनदी अन सुखी ठेव . तिच्या चेहऱ्यावरचे हास्यतरंग नेहमीच बहरू दे प्रसन्नतेच्या वाटेवर सदा ..न सदा ..
दु:खाची जर देवाण घेवाण करता आली असती तर , नक्कीच तीच दु:ख, तिच्या मनाला पिडणार्या वेदना मी हसत हसत माझ्याकडे घेतल्या असत्या . पण त्या कर्त्याने असा काही नियम लागू केला नाही .
अशी सूट दिली नाही . ज्याचं त्याचं दु:ख ज्याने त्यानेच भोगावं . हा नियम त्याने लागू केला . अन त्या नियामा प्रमाणेच आपण आता सारं सहन करतोय . त्यातून घडतोय .
आयुष्यात मला एक ' चांगला माणूस' म्हणून नाव कमवायचं आहे .
एक चांगला माणूस व्हायचं आहे आहे .
 माझ्या भाऊ- बहिणींचा एक ' चांगला भाऊ' . माझ्या वाहिनीचा चांगला दीर , माझ्या आई वडलांचा चांगला मुलगा , माझ्या पुतण्या - भाच्यान्चां एक चांगला काका - मामा , माझ्या मित्रांचा एक चांगला मित्र .
अन पुढे भविष्यात माझ्या पत्नीचा एक चांगला पती . बस्स प्रयत्नाची कसर चालू आहे .
त्यात अजून तरी सफल झालो नाही. पण शेवटपर्यंत प्रयत्न चालू राहतील .
जुळलेल नातं कधी तोडणार नाही . ह्या मताचा मी आहे.
नात्यांच्या ह्या असंख्य धाग्यातूनच हे जीवन गुंफल आहे . वेगवेगळ्या रंगाचे स्वभावाचे हे धागे आपलं जीवन खरया अर्थाने समृद्ध करतात . जीवनाची व्याख्या अश्या विविध धाग्यातूनच तर मिळते .
कुठेतरी कधी एक धागा सैल होतो शब्दांच्या धारेने , कधी मूकपणाने ...तेंव्हा मनाची फरफराट उडते .
बस्स हे शब्द बोचू लागतात . मग सार निरर्थक वाटू लागतं.
कितीही चांगलं वागलं ..तरी कुठेतरी काहीतरी खटकत समोरच्याला .
ते आपणास कळत नाही . मग हेटाळणी सूर होते. कुणी मूकपणाने दूर जावू लागतं....
कुणी त्वेषाने बघू लागतं . कुणी दुर्लक्ष करू लागतं .
हे जाणून हि आपल्याशिवाय ती व्यक्ती जगू शकत नाही . तर कुणी मुकपनाचं शाब्दिक घाव देतं.
चुकी कुणाची हि असेना ते महत्वाच नसतं .
अश्यावेळी आपण एकमेकांना समजून कसं घेतो हे महत्वाच ..पण ...घडतं वेगळंच . तेंव्हा वाटू लागतं .....
आयुष्यात एकच असा दिवस आहे . जिथे आपले शत्रू पक्ष हि , जीवापाड प्रेम असूनही आपल्या पासून दुरावलेले...आपली हेटालनी करणारे एक चांगली गोष्ट बोलून जातात.
अगदी मनापासून, ते म्हणजे ' तो खरचं खूप चांगला होता '
असा दिवस एकदाच येतो .पण तो कधी येईल तो सांगता येत नाही .त्याचा नेम नाही .
पण आलच तर सर्वांना एकत्रित आणतो हे खरे,  तो दिवस म्हणजे आपला ' मृत्यू' शेवटची घटका. 
 हा मृत्यू हि कधी फार जवळून बघता येतो .
स्वतःच्या डोळ्यांनी ..स्वतःचाच मृत्यू . विश्वास बसत नाही आहे ना? पण येतो पाहता..
स्वतःच्या डोळ्यांनी .....जिवंतपणी .
मी तरी पाहतो ...
कोण कोण आणि कितीजण बरं अश्रू वाहतील आपल्यासाठी .
कोण येईल सर्वप्रथम ?
 त्यांच्या मनातल्या भावना काय असतील अश्यावेळी?
 आपली आवडती जिवलग व्यक्ती येईल का ?
तिच्या भावना काय असतील अश्यावेळी ? गणिताची अशी आकडेमोड सुरु होते .

पण हे सारं निरर्थक . जागेपणीच हे दृश्य मनाला ..मात्र पुन्हा चांगल्या मार्गाकडे वळवत.
तुला अजून खूप काही कमवायचं आहे . माणसं जुळवायची आहेत . हे नातं फुलवायचं आहे,  टिकवायचं आहे .
हे जीवन जगतानाच अस जगायचं आहे कि त्याचं जिवंतपणीचं सार्थक झाल पाहिजे .
मृत्यूनंतर हि प्रत्येकाच्या ओठी आपलं नाव उमटलं पाहिजे .
बस्स..जीवन असाच जगायचं आहे .
काही प्रश्नाची उत्तर हि आपल्याकडेच असतात . जुळलेल्या नात्याची , समोरच्याशी संबंधित अशी ...
पण ती उत्तर देताना मनाची तारांबळ उडते . जेंव्हा समोरील व्यक्ती अशा प्रश्नाचं सतत पाठपुरावा करत राहते . तेंव्हा खूप अवघड जातं . मनातले भाव बोलून दाखवणे . ते व्यक्त करणे . तेंव्हा शब्द बोलतात ते मूकपणाचे ....
कुठून तरी आलेले ..पण अंतरीचे ... मी हि असाच पाठपुरावा करत राहिलो तेंव्हा हे एक इंग्रजी वाक्य नजरेस पडलं.
'" Sometimes your heart needs more time to accept what your mind already knows."
काही प्रश्नांची उत्तर तयार असतात आपल्या मनात. हे असच का , ते तसच का ? तर्क वितर्कावर आपण बरेच निष्कर्ष काढतो हि . पण साऱ्यांच गोष्टी तर्क वितर्कावर सोडवल्या जात नाहीत.
त्यास खरेपणाची पृष्टी मिळावी लागते. त्यासाठी इतर मनाचा त्या व्यक्तीच्या अंतरीचा वेध घ्यावा लागतो. पण कळूनही काही गोष्टी स्वीकारण्याची आपल्या मनाची तयारी होत नसते .
एक तर आपलं खूप जीव असतो अश्या गोष्टींवर अशा व्यक्तींवर ... अन अशापासून स्वतःला दूर करण , बाजूला सारण फारच अवघड जातं . वाटते तितकी सोपी गोष्टी नसते ती .
एक घट्ट धागा विणलेला असतो नात्याचा . तो सहजा सहजी सोडता सोडवता येत नाही.
मन हि मन में...
असंच लिहिता लिहिता ...
नातं तुझं माझं..
संकेत य पाटेकर
१९.०३.२०१४

" अन म्हणून हवा तसा हट्ट करता येत नाही...


" अन म्हणून हवा तसा हट्ट करता येत नाही .
 "आपल्याच व्यक्तीकडून ....आपल्याच स्वकियांकडून "
हे लहाणपण एक बरं असतं.. एखादी गोष्ट नाही मिळाली तर निदान हट्ट तरी करता येतो.
आपल्या स्वकीयांसमोर...

त्यासाठी अश्रुंचा बांध फोडता येतो .रागाने हात पाय झटकता येतात.
घरभर गोंधळ घालता येतो . हवा तसा आक्रोश हि करता येतो .
पण हवी असलेली ती गोष्ट मिळविता येते. कसे हि काहीही करून.
त्यात आपला आंनद जो सामावला असतो. आपल्याला जे हवं असत ते हवंच असतं ...
बस्स आणि ते मिळवतो हि ...
त्यावेळेस फारस कळत नसतं समजत नसतं उमगत नसतं . इतर मनाचा अंदाज घेता येत नसतो.
 कुणा मनाला आपल्यामूळे किती कष्ट सोसावे लागत आहे .
किती त्रास सहन करावा लागत आहे ह्याचा हि विचार आपल्या मनाला शिवत नसतो .
आपल्याला जे हवं असतं ते बिन्धिक्तपणे आपण बोलून टाकतो .
इतर मनाचा विचार न करता . आणि ते आपलं हट्ट पुरवलं हि जातं. आपल्या मनाचा विचार करून ..
ते करावंच लागतं त्यांना...
इथे मोठ्यापणी मात्र तसं नसत. कारण अकलेचे अन समजुददारपणाचे नवे अंकुर आपल्या मनात फुललेले असतात. त्यामुळे इथे हट्ट करता येत नाही.
अश्रुंचा बांध फोडता येत नाही . रागाने हात पाय झटकता येत नाही.
हवा तसा आक्रोश हि करता येत नाही .मनातल्या मनातच कित्येक गोष्टी तश्याच दडून राहतात .
मनातल्या मनातच अश्रुंचा बांध आटुन जातो. शब्द निशब्द होवून जातात . विचारांच्या भाउक गर्दीत मन हरवून जातं.
कारण काळजी असते , थोडी भीती असते .. 
समोरील व्यक्तीची , तिच्या संवेदनशील मनाची . तिला होणारया त्रासाची.
त्यामुळे जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती गोष्ट आपल्या मनातच राहते.
त्याची पूर्तता होत नाही . काही वेळा ..., काही वेळा मात्र होऊन जाते .

मोठेपण जे लाभलेलं असतं आपल्याला,  अन म्हणूनच हवा तसा हट्ट करता येत नाही .
आपल्याच व्यक्तीकडून ....आपल्याच स्वकियांकडून .. म्हणून लहाणपण एक बरं असतं.. नाही का ?
असाच लिहिता लिहिता..
मनातलं काही...
नातं तुझं माझं...
संकेत य पाटेकर
२४.०२.२०१४

बुधवार, १४ मे, २०१४

नातं तुझं माझं ..

ज्या व्यक्तीवर मनापासुन प्रेम अन जिव्हाळा असतो.
त्या व्यक्तीच्या सहवासासाठी आपल 'मन' प्रत्येक क्षणी धडपडत राहत.

कधी फोन वर , तर कधी SMS ने,  तर कधी प्रत्यक्ष भेटून वगैरे , आपण त्या व्यक्ती पर्यंत पोहचण्याचा तिच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्नात असतो .
काही कारणास्तव जर त्या नात्यात दुरावा वाढला असता , संपर्क तुटला असता
 'भेटीची ती ओढ'' अधिकच प्रमाणात वाढते , अन ज्यावेळेस अप्रत्यक्षरीत्या जेव्हा तिची जेव्हा भेट घडते.
तेंव्हाचा तो आनंद काही औरच असतो , जो शब्दात वर्णन करता येणार नाही .
त्या भेटीत तो इतक्या दिवसाचा मनात असलेला राग ..क्षणात कुठे पळून जातो.
कुणास ठाऊक , शब्द हि ओठावरच अडले जातात.
मुके होतात जणू,.
कान टवरले जातात ते फक्त तिच्या एक एक प्रेमळ शब्दांची गुंफण ऐकण्यास....
नजर हि गुंतली जाते ते तिच्या आपल्याबद्दल असणार्या प्रेमळ भावना टिपण्यास ..............
पण वेळ मात्र नेहमीच्याच तिच्या स्वभावाप्रमाणे पुढे निघून जाते , ते क्षण मागे टाकून...
असलेल्या गैरसमजुतीचे निरासन करून ...नात्यातले रुसवे तोडून ...
मनातले काही ..
नातं तुझं माझं
संकेत य पाटेकर

















Hiiiii.... मला आज भेटायचं , भेटशील??
तिच्याकडून ऊतर मिळेल ह्याची शाश्वती न्हवतीच , तरी सुद्धा whatsapp वर आज तिला मेसेज केला.

प्रत्येक वेळेस काही विचारला असता तिच्या कडून कसलाही प्रतिसाद मिळत नसे.
असे कित्येक दिवस ओलांडले ,महिनो महिने उलटले , एक वर्ष उलटल हे असंच चालू आहे .
 ना फोन , ना मेजेस , ना भेट , ना बोलनं. नात्याची ती रेशीम गाठ जणू ढिली होत चालले .
संवाद हा नात्यातला महत्वाचा दुवा , तोच इथे नाही , मग हे असच होणार. ..
मन विचारांच्या असंख्य गर्दीत हरवणारच ..
माणूस हा स्वतहा पेक्षा दुसर्यांच्याच विचारांमध्येच अधिक गुंतलेला असतो, रममान असतो.
आणि म्हणून नात्यात जिथे प्रेम अधिक दृढ ..खोलवर रुजलेल असतं. तिथे त्या व्यक्तीशिवाय इतर विचार मनात शिवत हि नाहीत.
' प्रेमासारखी अजब गोष्ट ह्या दुनियेत नाहीच ' .
प्रेम अन नातं , नातं अन प्रेम , ह्या शिवाय दुसरा विषयच माझ्या मनात तसा फिरकत नाही.
का ? का कुणास ठाऊक ..नातं अन अन प्रेम ह्या विषयक इतकी आपुलकी कशी निर्माण झाली.
असो छानच आहे , देवाने दिलेली ती देणगी आहे आणि ती सांभाळायला हवीच.
 पण ते सांभाळता वेळ अन परिस्थितीशी सांगड घालावी लागते आणि त्यात आपलं अनमोल नातं अन त्यातल निरागस निर्मल प्रेम जपाव लागतं.
माणसं बदलतात अस म्हणतात , 'तू फारच बदललाय स रे ? तू फार बदललीस गं ?
असे प्रश्न एखाद्य्ला आपण विचारतोच ..कधी ना कधी..
कारण सुरवातीचे त्याच्या सोबत तिच्या सोबत घालावालेले ते क्षण आणि आताचे हे क्षण ह्या मध्ये बराच फरक , बदल आपल्याला जाणवायला लागतो , दिसतो प्रत्यक्ष , आणि म्हणून आपण त्याना बोलून जातो.
तसे काही बदल आपल्या अपेक्षानुसार असतात, घडायला हवे असे आपण मानत असतो.
 पण काही अपेक्षा नसताना घडतात , तेंव्हा मात्र मनाला चटके बसतात.
माणूस परिस्थितीशी झुंजता झुंजता स्व:तहा झिजून निघतो...आणि ते आपल्यला बघवत नाही.
आणि त्यात आपली जिवाभावाची व्यक्ती असेल तर मग मन बैचेन झाल्यावाचून राहतच नाही.
 ती तिथे दुखाने पोळली असता, आपण अस आनंदाच्या लहरींमध्ये तरंगायचं ?
अस कस हा विचार मनाला शिवून जातो. नि आपण काय करू शकतो जे केल्याने ती व्यक्ती ह्यातून बाहेर पडेल ? ह्याच्या विचारात गुंततो.
काही वेळा मार्ग दिसतो , काही वेळा नाही . सर्वच गोष्टी तश्या आपल्या हाती नसतात.
जे समोर आहे ते स्वीकारल्याशिवाय पर्याय नसतो.
काहीवेळा आपल्याला बघ्याची भूमिकाच स्वीकारावी लागते. पण अशावेळी मन मात्र आपल धडपडत , तळमळत .......केवीळवान होत .
मनातले काही
नातं .....तुझं माझं
संकेत य पाटेकर
२२.०१.२०१३
 ______________________________________________________________________ ______________________________________________________________________
सहज रस्त्याने चालत होतो. रात्रीचे ९ वाजले होते. रस्त्यावर फार तशी रहदारी हि न्हवती.
पाउस हि आताशी कुठे निवांत झाला होता . दोघे हि तसे शांत मनाने एक एक पाउलं हळूच पुढ टाकत होतो ,पण तिच्या मनात मात्र विचारांच्या गतीने अधिक वेग घेतला होता. चेहर्या वरून तिच्या ते स्पष्ट दिसून येत होत.
जवळचीच , पण विश्वासातील कुणी व्यक्ती सोबत असल्यास ,मनात सळनारया मनातल्या गोष्टी मनात राहत नाही , त्यांना एक मोकळी वाट मिळते, त्यांचा मार्ग खुला होतो . समोर तशी व्यक्ती असल्यास .
संकेत , खूप कंटाळले रे ,
अस वाटतं दूर जाव कुठे तरी ..........
चालता चालता तिच्या मनातल्या विचारांचे बंदिस्त दार तिने आता उघडायला सुरवात केली होती . एखाद्यावर दृढ विश्वास असेल तर मनातल्या अगदी संवेदनशील भावना हि आपण समोरील व्यक्ती कडे व्यक्त करून टाकतो , मन मोकळ करून टाकतो तसं तिनेही केल . तीच मन मोकळे करायला .
संकेत , खरच खूप कंटाळले रे ,
लग्न होत नाही अजून ?
बघ ना कुणी असेल तर ? तिच्या कडे पाहून मी स्मित हास्य केल .
अन म्हणलो होईल ग , भेटल भेटल .. पण कधी ?
प्रत्येकाची एक वेळ ठरलेली असते ग , त्या त्या वेळी भेटी गाठी घडत असतात.
नाती जुळत असतात. त्यामुळे बिनधास्त रहा . सर्व काही सुरळीत होईल . समजावण्याच्या हेतूने मी तिला म्हणालो .
मम्मी - पप्पा ना हि उगाच त्रास ना , पप्पा असे काही बोलत नाही ,पण त्यांच्या हि मनात माझ्या लग्ना बद्दलचा विषय चालूच असतो . स्थळ येत आहेत रे , पण मुलगा वयाने माझ्या पेक्षाही ६ - ६ वर्षाने मोठा, अस , मला ते पसंद पडत नाही, मी नाकारते मग आलेलं स्थळ . मम्मी मग त्यावर बडबडते , नाराज होते.
त्या दिवशी खूपच त्रास झाला होता रे ह्या सगळ्याचा , मी मनातलं सर्व भाव लिहून काढायला सुरवात केली होती , एका कागदावर , अन लिहून हि काढलं. त्यावेळेस अस वाटत होत कि स्वतःचच काहीतरी बर ...
अग वेडी आहेस का ? मी तिचे वाक्य पूर्ण होऊ न देता तिला दटावूनच म्हणलो .
अस भलत सलत काही करायचं नाही , मनात अस आणायचं हि नाही . कळल. जीवन एकदाच मिळत ..आणि ते जगावं, भले ते किती हि दुखाने व्यापलेले का असो,
तुला माहित आहे . माझी एक मैत्रीण आहे . ती ने असंच एकदा मला एक हादरा दिला होता .
अचानक बोलून कि , मला जीवनाचा कंटाळा आला आहे , मी जीवन संपवीत आहे . तिच्या त्या बोलण्याने मी गोंधळून गेलो होतो तेंव्हा , काय कराव ते हि कळत न्हवत.
माझे फोन calls हि उचलत न्हवती , तेंव्हा मनाने मी अगदी सैर वैर झालो होतो . . पण नंतर मात्र तिने call उचलला तेंव्हा मी तिच्याशी जे काही बोललो , ते तिने अगदी मनाने ऐकल .
तिच्या घरी हि सेम प्रोब्लेम , पण सोबत जॉब , तीच करिअर, अशा अनेकानेक गोष्टी तिला त्रास दायक ठरत होत्या. त्यानेच तिची मनस्थिती ढासळली होती . तशात तिने तो निणर्य घेतला होता.
माणसाने आलेल्या परिस्थितीशी झुंजायचं असत . तिला शरण जायचं नसत . शरण जाणे म्हणजे हार पत्करणे.
त्यावेळेस तिने माझे हे बोल , शब्द ना शब्द अगदी मनापसून ऐकले . एवढ बोलून मी जरा शांत राहिलो.
,निशब्द झालेल्या माझ्या चेहऱ्याकडे पाहून , तिने बोलायला सुरवात केली . खरच यार , मला वाटत होत कि माझंच दुख फार मोठ आहे. पण माझ्या पेक्षा हि कुणी अधिक दुखी आहे . ह्याची मला कल्पना न्हवती . तिच्या ह्या वाक्याने मात्र मला माझ्या आवडत्या लेखकाची वपुंची आठवण झाली .
त्यांच्या कथा कथानातील अनामिक ह्या पात्राची.......
- संकेत पाटेकर
मनतले काही ..
नात तुझ माझ

मंगळवार, १५ एप्रिल, २०१४

नात्यातील वाद विवाद..

नातं कुठलही असो त्यात वाद -विवाद हे होतंच असतात . रुसवे फुगवे होतच राहतात .
पण इतकं असूनही नात्यातली असलेली ती गोडी काही कमी होत नाही . एकमेकांच एकमेकांवर असलेलं प्रेम काही कमी होत नाही.  बस्स मन तुटली जातात काही वेळा पुरत . तेंव्हापुरतं  सार काही दुरावतं.
तेंव्हा मात्र थोडा अवधी हवा असतो आपल्याला अन समोरच्याला हि सर्वकाही शांत होण्यासाठी, पुन्हा सर्वसुरळीत होण्यासाठी ...तो एकदा दिला, एकमेकांना कि ..बस्स...
पुढेचे क्षण आपलेच असतात .. त्याच गोडीचे ..त्याच हसऱ्या मनाचे ...प्रेमाचे ...आनंदाचे !
असंच लिहिता लिहिता..
-संकेत य पाटेकर
१५.०४.२०१४
 __________________________________________________________________
ज्या व्यक्तीवर आपलं भरभरून अन जीवापाड प्रेम असतं.
 त्या व्यक्तीला विनाकरण त्रास देण्याचं , तसा विचारच आपल्या मनास कधी शिवत नाही .
 उलट ती व्यक्ती नित्य नेहमी हास्य आनंदात बहरली जावी ह्या साठीच , ह्या कडेच आपल्या मनाचा सर्व कल असतो . आणि त्या साठीच सदा सर्वदा त्या ईश्वराकडे एकच मनोभावे प्रार्थना केली जाते ......

ती हि कि तिला सुखी ठेव ....आनंदी ठेव ..भरभरून प्रेम दे !!!
दूर राहूनही ती व्यक्ती मनाच्या अन हृदयाच्या खूप खूप जवळ असते , अन त्याची जाणीव प्रत्येक क्षणी आपणास होत राहते . 
हेच ते प्रेम असत. .... हेच एक अनमोल नातं असतं...
मनातले काही ..
- संकेत
 ०२-०५-२०१३
हा फोटो नेट वरून घेतलेला आहे

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१३

एक '' क्षण '' हसरा अन .... !!


आज २१ नोवेंबर , हि तारीख मी कधी विसरणार नाही.
एकीकडे त्या मांगल्य ' क्षणाचा' आनंद तर दुसरीकडे आपल्यापासून ती '' काही महिन्यांपासून योगायोगाने भेट घडलेली अन पुढे हळुवार प्रेमाचा परिश स्पर्श करून मायेने आपलंस करणारी, गोड शब्दांनी ' क्षणांनाही ' अन मनालाही हि फुलवणारी , ती खास जिवलग व्यक्ती आपल्यापासून आता दुरावणार हि भावना मनाला स्वस्थ बसू देत न्हवती . त्यामुळे डोळे हि अशा जड अंतकरणाने भरून आले होते. 
हे नातंच तसं होतं नि आहे . 
एका अनमोल रत्नाच बहिण - भावाचं.
जी गोष्ट आपल्या जवळ नसते . त्याची किंमत माणसाला कळून येतेच . अन त्याच महत्व हि तो जाणून असतो . मग ती वस्तू असो वा व्यक्ती वा तीच प्रेम अन सहवास ते मिळविण्यासाठी तो सतत धडपडत राहतो.
माझ्या बाबतीत हि असचं होत . लहानपणापासून एक आपली हक्काची बहिण असावी अस नेहमी वाटायचं. तिच्यासोबत लाडी बोलीन भांडाव , खेळ - मस्तीत दोघांनी हि रमावं. रक्षाबंधन , भाऊबीज ला तिने मनोभावे ओवाळाव अस मनापासून वाटायचं . पण नुसतं वाटून काय उपयोग .
 योग्य वेळी योग्य तेच द्यायचं हा त्या उपरवाल्याचा शिरस्ता.
त्यामुळे सख्खी बहिण जरी नसली तरी , योगा योगाने तो दिवस जवळ आलाच नि भेट घडून दिली त्याने एका मनमिळावू प्रेमळ बहिणीशी . मनाची शांती झाली . कारण हवी तशी बहिण मिळाली .
तिच्या सहवासातला एक एक दिवस आनंदाने हर्षाने कंठू लागला . नि तोच एक दिवस '' तिचे शब्द कानी पडले '' संकु ' माझ लग्न ठरलंय''
तिचे हे वाक्य इतकं मनाला भिडलं कि डोळे आसवांनी भरून आले . भावना हि हळव्या झाल्या .
आवाज हि कापरा झाला . काय बोलाव ते सुचेना . तरीही शब्द फुटले '' तू मला विसरणार तर नाही ना ?
नाही रे अजिबात नाही !
तू माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग आहेस तुला कस मी विसरणार , समोरून उत्तर आल नि मनाला एक दिलासा मिळाला .
त्या क्षणी आनंद न्हवता असे न्हवे आनंद होताच , कारण मुलींच्या अन मुलाच्या आयुष्यातला तो एक मोठा सोनेरी क्षण , कुणाचं आयुष्याचं त्याने सोन होतं तर कुणाच्या आयुष्याचं मातीमोल . ( अर्थात ते सार एकमेकांना ते कसे समजून घेतात त्यावर अवलंबून असत.)
बहिणीच लग्न होणार होत . त्यामुळे दुरत्वेच्या त्या भावनेने माझ मन मात्र थोडं दुखावलं गेल होत .
 काही दिवसांपूर्वीच तिची भेट घडावी अन एक दोन दिवस तिच्या सहवासात जाताच तोच तीच लग्न ठराव . काय म्हणावं ह्याला ....!
कसं नशीब असत एकेकाचं..न्हाई ! काही गोष्टी मिळतात ते हि क्षणासाठी क्षणभराचा आनंद फक्त , क्षणभराचा सहवास नि प्रेम ....पण तोच पुरतो आयुष्यभर ..!
लग्न हे मुलींच्या आयुष्यातला तसा दुसरा पर्व , दुसरा जन्म ! माहेरील व्यक्तींना सोडून सासरच्या नव्या घरी जाताना तिथल्या लोकांसमवेत सार काही सांभाळताना त्यांच्या मनाची सतत धडपड सुरु असते . अशातच एक एक दिवस निघून जातात . अन आपल्या लोकांनाच वेळ द्यायला त्यांज्याजवळ वेळ पुरत नाही .
लग्ना नंतर तसं एकमेव नातं उरत ते म्हणजे '' नवरा अन बायकोच '' अस माझ प्रामाणिक मत . इतर नाती हि असतातच पण लग्नाआधीचे अन लग्ना नंतरचे दिवस ह्यात फार फरक पडलेला असतो. नाती सर्व तीच असतात . पण बहरलेले ते दिवस पुन्हा येतातच असे न्हवे ...असो शेवटी प्रेम हे प्रेम असत ... त्याला मरण नसतं ते हृदयात नेहमी तेवत असतं ..!!
तुझं ह्या भावावर असलेले प्रेम असंच तेवत रहो ..सदान सदा !!
माझ्या गोड प्रेमळ बहिणीला तिच्या लग्नाच्या वाढ दिवसा बद्दल खूप सार्या हर्षित शुभेच्छा.. !! तुमचं जीवन हास्याने आनंदाच्या सुवर्ण क्षणांनी सदा उजळून निघोत ..हीच त्या परमेश्वरा जवळ प्रार्थना ..!!
संकेत उर्फ संकु ..!!
२१.११.२०१३ गुरवार

सोमवार, १६ सप्टेंबर, २०१३

नाती मनाची प्रेमाची अन विश्वासाची

नाती मनाची प्रेमाची अन विश्वासाची
काही नाती हि फक्त दोन अक्षांरा पुरतीच मर्यादित असतात . त्यात आपलेपण हा नसतोच . साध्या - छोट्या अपेक्षा हि जिथे पूर्ण करता येत नाहीत ते नातं कसल ते असूनही मृत असल्यासारखंच .
खर तर अपेक्षा ह्या करूच नये , पण पण साध्या छोट्या अपेक्षा हि करू नये का ? बर ह्या अपेक्षा हि कुणाकडून हि नसतात , त्या आपल्याच माणसांकडून असतात . पण त्या हि काही वेळा पूर्ण होत नाही . अशा वेळेस थोडस निराशपण येतंच , पण म्हणून त्या व्यक्तीला दोष देण हि योग्य नाही . जे नशिबात आहे ते आहे . पण तरी हि ...
काही सेकंदासाठी का होईना , आपल्या व्यक्ती साठी आपल्या बिझी शेड्युल्ड मधून थोडा वेळ हा काढावा. ५ मिनिट का होईना थोडं बोलाव , कधीतरी भेटाव ..., मी म्हणत नाही वारंवार फोनवरच राहावं , प्रत्येकवेळी भेटाव - भेटत राहावं ...पण कधी तरी ..केव्हातरी ... या इवल्याश्या मनाला दिलासा ...
खर तर ...
एकमेकांच एकमेकांवर मनापासून प्रेम असेल , एकमेकांविषयी ''आपलेपणाची'' भावना दृढ असेल, आणि जिथे सामंज्यस पणाची जाणीव असेल तेच नातं खरया अर्थानं ''विश्वासाचं नातं' असत . आणि त्या नात्यात प्रसन्नतेच तेज कायम झळाळत राहत.
अहो , नाती आहेत म्हणून आपण आहोत , आपण आहोत म्हणून आपलेपण आहे , एकमेकांवर प्रेम आहे .
मनातले काही ..
नातं तुझं माझं
संकेत य पाटेकर
१६.०९.२०१३

सोमवार, १९ ऑगस्ट, २०१३

I have done Big mistake in my life''


''I have done Big mistake in my life''
सकाळ्च मोबाईलची रिंग खणखणू लागली.
इतक्या सकाळच कुणाचं call म्हणून मोबाईलकडे सहज नजर फिरवली , नंबर ओळखीचाच होता. आलेला call रिसीव्ह केला . आणि बोलण्यास सुरवात केली .
नित्य नेहमीचाच आवाज सुरवातीला वाटला , पण हळू हळू शब्दातली गंभीर भावमुद्रा मनावर उमटू लागली .
पुढे शब्दांसोबत अश्रूंचाही बांध फुटू लागला . तसं तसं चेहर्यावर प्रश्नार्थी भाव उमटू लागले.
'' संकेत मी आयुष्यात फार मोठी चूक केलेय.
'I have done Big mistake in my life, feeling guilty n upset ''
तिच्या ह्या एकएक शब्दांसोबत अश्रुथेंब हि वाहत होते . तुटक तुटक शब्दात ती बोलत होती.
'' संकेत, कुणासाठी खरचं compramise करू नकोस , sacrifice करू नकोस , त्यांना त्याची काहीच किंमत नसते .
तिच्या ह्या वाक्यात मात्र सत्यता होती . आयुष्यात कधी अशी एखादी व्यक्ती येते . जिच्यावर आपला जीव जडला जातो. एक घट्ट नातं जुळल जातं. ज्या साठी आपण बऱ्याच गोष्टी सर्वस्वी पणाला लावतो . पण शेवटी त्या व्यक्तीला आपल्या ह्या साऱ्याची काहीच किंमत नसते . अस जेंव्हा कळत तेंव्हा मनाचं संतुलन साहजिकच बिथरत .
अशा वेळेस झालं ते विसरून , काय तो त्यातून बोध घेऊन आपल्या पाउल वाटेने पुढे निघत जायचं. आयुष्याचा एक तो भाग होता अस समजून पुढे निघायचं. बस हेच हाती असत .
आयुष्य असंच अनेकानेक चांगल्या वाईट घटनांनी भरलेलं आहे . त्यात अडकून न राहता हसत खेळत पुढे चालत राहण आणि इतरना हसवत राहण हेच जीवन आहे .
मनातले काही ...
नातं तुझं माझं
संकेत पाटेकर
१२.०८.२०१३

सोमवार, २ जुलै, २०१२

''साद - प्रतिसाद'' ............



नाते संबंधात अधिक जवळीकता आणणारे हे दोन शब्द...!!
नात्यातला गोडवा जशाचा तसा ठेवणारे हे दोन शब्द .... खूप मोल आहे ह्या दोन शब्दांना .........
आपल्या सादेला जोपर्यंत समोरच्याचा प्रतिसाद मिळत राहतो ...तोपर्यंत सर्व काही ठीक असत , पण समोरून प्रतिसाद मिळनचं बंद झाल तर साद देण्याचा उपयोग तरी काय ?
मन निराशेच्या छायेखाली अशा वेळी वाहत ..वाहत राहतं ...अन मग नात्यातली ती अतूट गाठ हळू हळू सैल होऊ लागते.
एखाद्या इको पोईन्ट असेल ...तर तिथे आपण गळा काढून एखादी हाक मारतो , जोरात ओरडतो ....कुणाच्या तरी नावाने किंवा कसेही ...पण ओरडतो, का ?तर, आपलाच ध्वनी ..प्रतीध्वनिच्या स्वरूपात ..आपल्यास पुन्हा येऊन मिळतो . तेंव्हा आनंदाला सीमा उरत नाही आपण अधिक उत्साहाने , आनंदाने पुन्हा पुन्हा साद घालतो ....
नात्यात सुद्धा असंच आहे. जोपर्यंत तुम्ही नात्यातील कोणत्याही व्यक्तीला ..तिला, तिच्या सादेला प्रतिसाद दिला नाही तर त्या व्यक्तीचा तुम्हावरील विश्वास हळू हळू कमी होत जाईल . आणि नात्यात एक दूरत्व निर्माण होईल .
नात्यात ..साद - प्रतिसाद , विश्वासाला खूप मोठी किंमत आहे ...!!
त्यानेच नातंबहरतं ..नव्या उमेदीत , नव्या उत्साहात , सुख दुखाच्या खळखळत्या प्रवाहात..एकरूपाने , एकजुटीने !

- संकेत

बुधवार, ३० मे, २०१२

आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती सोडून का जाते रे ?

आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती सोडून का जाते रे ?
काल सायंकाळी ऑफिस मधून घरी परतत असताना ... एक मेसेज आला मोबाईल वर जवळच्याच एका व्यक्तीचा .. त्यात तिने प्रश्न केला होता ...
आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती सोडून का जाते रे ?
काही क्षण त्या प्रश्नाकडे नजर माझी स्थिरावली गेली. अन क्षणात वाऱ्या गतीने मनात विचारांचे चक्र गरगर फिरू लागले . भूतकाळाच्या आठवणीत मनं कस गढून गेल.
का दुरावते ती व्यक्ती जिच्यावर आपण मनापासून प्रेम कराव ? का होत अस ? काय चुकतं आपलं ?
पहिली गोष्ट : आपण त्या व्यक्तीशी कसं बोलतो कस वागतो कस आचरण करतो ? त्यावरून तिच्या मनात आपल्या विषयीक प्रेम भावना व आदर निर्माण होत असतो.
व त्याप्रमाणेच तिचं आपल्याशी बोलणं वगैरे होत असतं.
दुसरी गोष्ट : काही वेळा ...वेळे अभावी ...व परिस्थितीच्या कचाट्यात सापडल्यामुळे त्या व्यक्तीला आपणास वेळ देता येत नाही .
भेटता येत नाही ..नि बोलता हि येत नाही . हे खर असत पण ते आपणास खोट वाटू लागत .. ती व्यक्ती जाणून बुजून आपल्याशी अस वागत आहे ह्याच तंद्रीत आपण राहतो . त्यामुळे कधी कधी अस वाटून जात . कि ती व्यक्ती आपणा पासून दुरावत चालली आहे .
तिसरी गोष्ट : आपल इतक प्रेम असत त्या व्यक्तीवर .. कि सतत आपण त्या व्यक्तीचाच रात्रंदिवस विचार करत राहतो तिच्याविना आपणास दुसर काही दिसत नाही किंवा काही सुचतच नाही . अशा वेळी समोरील व्यक्ती जीवन काय आहे , आपल ध्येय काय आहे . .. प्रेमा पलीकडे सुद्धा एक जग आहे . हे दाखवून देण्यासाठी आपणापासून काही अवधीसाठी स्वताहाच्या मनावर दबाव टाकून दूर राहते . आपल्या हितासाठी आपल्या भल्यासाठीच ..!!
बघा माझं म्हणणं पटत का ते तुम्हाला ...
संकेत य पाटेकर २४.०५.२०१२
गुरुवार