गुरुवार, ७ जून, २०१२

जीवन हे खूप गुंतागुंतीच आहे

मित्रहो, 
जीवन हे खूप गुंतागुंतीच आहे ...तो गुंता सोडवता सोडवता आपण आपल्या जीवनातला आंनदच गमावून बसतो . ......अन दुखाला कवटाळून राहतो . आनंद म्हणजे नक्की काय असत ह्याचा आपणास विसरच पडतो. 
आयुष्य हे एकदांच मिळत .........म्हणून जीवनातला प्रत्येक क्षण हा शक्यतो हसत खेळत काढावा . नेहमी हसत राहावं . हसत ...हसत प्रेमाने बोलाव , कधीही कुणावर उगाच चिडू नये , द्वेषाने बोलू नये , द्वेषाचे बोल ते शब्द खूप आघात करतात एखाद्यावर. 
जीवनातला प्रत्येक क्षण हा खूप महत्वाचा आहे . .... गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही . 
म्हणून हसत रहा...आनंदात रहा , प्रेमाने बोला प्रेमाने चला 

संकेत य पाटेकर 
३०.०५.२०१२

मन ..

मनं ...........
कधी म्हणतं तिच्याशी खूप भांडाव , रागवाव.... पण रागाच्या भरात नको ते शब्द भराभरा निघतात आणि मग समोरील व्यक्तीच्या मनावर आघात करतात ...नंतर आपणासही पच्छांताप होऊ लागतो त्या गोष्टीचा.......
समोरील व्यक्तीच वागण कधी कधी अचानक बदलत...ते कां बदलत ह्याच कारण काही केल्या आपणास मिळत नाही.
जोपर्यंत ती व्यक्ती स्वताहा ते सांगत नाही , खर काय आहे ते कळत नाही तोपर्यंत आपण मात्र वेगळ्याच गैरसमजुतीन जात असतो. मनात येत कि हि जाणून बुजून अस करते आहे , भेटण बोलन वगैरे सार टाळते आहे.
...पण खरी परिस्थिती वेगळी असते , असू शकते ....पण आपण मात्र .....त्याच लयात राहतो, मनाचा ताण अधिक वाढवत जातो .
- संकेत