मंगळवार, २३ जानेवारी, २०१८

समज- गैरसमज ...

गुड नाईट ..शुभ रात्री ..!
बोलयला आत्ता कुठे सुरवात केली असतानाच त्याने अचानक
 एक्झिट घेतली. आणि तो तिच्या व्हाट्सअप रिप्लाय ची वाट बघू लागला.
त्याला वाटलं , तिचं हि तेच रिप्लाय येईल . तसंच काहीस, केवळ शुभ रात्री म्हणून ...इतर काहीही न बोलता , पुढे संवाद न वाढू देता,
पण झालं ते उलटंच...
तिचे धडाधड मेसेज येऊ लागले.
''लगेच शुभ रात्री
रागावला आहेस का ?
कि असे काही बोलले , कि आवडत नाही. ?
क्षणभर ते वाचून बरं हि वाटलं ( म्हणजे तिला हि वाटतं तर आपल्याशी बोलावेस .ह्या हेतूने... ) आणि तितकंच लागलं देखील मनाला...(नाहक त्रास दिला म्हणून )
पण त्यावर काय रिप्लाय द्यावं ते सुचत नव्हतं . कळत हि नव्हतं
शेवटी.. 'असं काही नाही''
इतकंच तिच्या त्या प्रश्नाला अधोरेखित करत त्यानं उत्तर धाडलं.
आणि तिथून पुन्हा त्यावर प्रतिक्रिया येऊ लागली .
''ठीक आहे
सॉरी ,
यापुढे काही बोलणार नाही ....''
वेदनेची ठिणगी आता पुन्हा एकदा उडाली.
आपण उगाच तिला त्रास देत आहोत , ह्या भावनेने मन व्यथित होऊ लागलं.
 आणि ते कळवळतच पुन्हा हाका देऊ लागलं.
अगं..
नको काही गैर वगैरे मनात आणू ..
सॉरी..
रागावलीस ...?
बोल ना ....
मला चैन पडणार नाही ग .., रिप्लाय दे
सॉरी......
व्हाट्सअप मेसेज चा रिप्लाय येत न्हवता. मनात धडधड वाढू लागली होती. रात्रीचे साडे बारा वाजले होते . त्या शांत एकप्रहारी रात्री, मन अधीकच वेडावून गेलं होतं. अस्वस्थ अवस्थेत ..
कित्येक दिवस....कित्येक दिवस झाले होते, फोन वर बोलणं न्हवतं. हवा तसा मोकळा संवाद न्हवता . व्हाट्सअप वर अधूनमधूनच कधीतरी जुजबी बोलणं व्हायचं . इतकंच काय ते ..,
बाकी फुल स्टॉप. पूर्णविराम अगदी...
आपण आता पूर्णपणे दुर्लक्षिले जात आहोत...हि भावनाच कुठेतरी , मनास छळ करू लागली होती.
जिच्यावर आपलं मन जडलंय. जिच्यासाठी ते तळमळतंय ...ओढवतंय, तिच्याकडून असे दुलक्षिले जाणे...
ह्याचा फार मोठा परिणाम झाला होता मनावर आणि त्याचंच रूपांतर आज तिच्याशी असं तुटक बोलण्यात झालं होतं. आणि त्यातूनच
सुरवातीची , एखाद दोन वाक्य काय ती वाचून, पुढे काही बोलण्याआधीच , शुभ रात्री असा मसेज त्याने धाडला होता .
त्याचाच तिला राग आला होता. आणि तेच तिच्या मनाला अधिक लागलं होतं .
माणसाला काय हवं असतं बरं ह्या आयुष्याकडून ? आपल्या माणसाकडून ?
आपलेपणा असलेला प्रेम ओलावाच ना , है ना ? सतत नाही , पण मनाला बांधून ठेवणारा , जोडून धरणारा हा संवाद. आणि सहवासाचे एखाद दोन क्षण, इतकंच ना ?
दुर्भाग्यानं तेच मिळत नाही .
इतक्या उण्या पुऱ्या अपेक्षा हि पूर्ण होत नसल्या कि नातं डबघाईला येतं.
तुटतं ते आतून आणि कण्हत कण्हत दूर होत जातं हळुवार, आयुष्याच्या एकाकी वाटेकडे झुकत ...
त्याचंही तेच झालं होतं. मनाचं पोखरणं झुरू झालेलं...
आणि नकळत त्यातून , तिला हि ठेच पोचली होती. जे actually त्याला नको हवं होतं .
'' सॉरी ,
यापुढे काही बोलणार नाही ....''
तिच्या ह्या बोलण्यावर त्याने आपला मनाचा हळुवार काठ ठेवला.
अगं ...
नको काही असं गैर वगैरे मनात आणू .
रागावलीस ...?
बोल ना ....
मला चैन पडणार नाही अगं .., रिप्लाय दे
सॉरी......न ,
मागोमाग एक एक मेसेज तो धाडत गेला. बस्स , तिचं रिप्लाय येणं केवळ आता बाकी होतं . त्याचीच तो वाट बघत होता.
तेवढ्यात....
'' बोल,
रागावले नाही . ''
पण तू रागावला आहेस किंव्हा काय झाले ते माहित नाही .
मनात काही ठेवू नकोस. बिंदास बोल.
मला राग येणार नाही.
थोड्यावेळाने त्यावर तिची हि प्रतिक्रिया उमटली आणि वाहता मनमोकळा संवाद दोघात सुरु झाला.
जे मनात होतं ते उघड उघडपणे बोलणं होंऊ लागलं. संवादाची मनमोकळी देवाणघेवाण होऊ लागली.
स्वतःच्या प्रश्न संचासोबत ,
तिच्या आयुष्यातील घडामोडींची , परिस्थितीची , आणि तिच्या एकंदरीत झुलत्या अस्थिर मनाची हि जाण झाली.
ज्याची पुसटशीही कल्पना न्हवती.
'' मलाच आतल्या आत घुसमटायला होतंय रे , कुणाला ते सांगता हि येतं नाही नि बोलता हि येतं नाही , आणि मी ते माझ्या फेसवरून (चेहऱ्यावरून ) कधी जाणवू हि देत नाही .
अशी आनंदी दिसत असले नेहमी तरीही , मनात कुठेशी ती 'दुखरी कढ' असते . सळणारी , वेदनादायी , मला माझंच ते माहित आहे.
खूप काही घडत रे , आपल्या अवतीभोवती , आपल्या घरात ..घरा बाहेर , ज्याचा त्रास होतो. त्याने कुठे लक्ष लागेनासं होतं बस्स...
आज मी तुझ्यापुढे एवढी मोकळी झालेय.... जे आहे ते सगळं मांडलंय.
तू मनात असं काही वेडंवाकडं आणू नकोस.
मी आहे तिचं आहे. तुझी .... बस्स थोडं ....
मना आत कोंडून ठेवलेल्या त्या असंख्य भावनांना तिने आज मोकळीक देऊ केली. नि आपलं मन थोडं हलकं फुलकं करून घेतलं.
वर वर हास्यतेजानं पुलकित दिसलेल्या , ह्या चेहऱ्यामागची हि अज्ञात बाजू आज नेमकी कळून आली. उमगली
त्याने त्याचं मन हि थोडं स्थिरावलं. विचार ध्यान झालं .
आपण नेहमी एकपात्रीच विचार करत असतो . मनाची दुसरी बाजू मात्र काळोख्यात राहते. त्याचा विचार होतं नाही. विचार झाला तरीही तो तर्क वितर्कने केवळ ...त्याला सत्याचा आधार असा नसतो . प्रति संवादाची जोड अशी नसते. आणि म्हणून ते फसतं. आणि त्याचंच उलटवार होतो .
आपल्यावर ..आपल्या ह्या मनावर ..आणि आपल्या हसऱ्या गोजिऱ्या ह्या नात्यावरही ..
थँक्स, छान वाटलं बोलून ..
शुभ रात्री , बोलू उद्या ...
मनमोकळेपणाने बोलून झाल्यावर ....तिने शुभरात्रीची घडी मोडली.
त्यावर त्याने हि आपलं प्रतिउउतर दिल.
मला हि खूप हलकं वाटलं ...थँक्स,
शुभ रात्री ...
लॅब्यू ..xxxxxx
लॅब्यू ..टू...
हलक्या मोकळ्या स्माईल निशी रात्र पुढे , हळुवार सरत गेली.
- संकेत पाटेकर
२३.०१.२०१८

शनिवार, २० जानेवारी, २०१८

'दिलखुलास' व्यक्तिमत्वं आणि संवाद ..

  साऱ्यांनाच प्रेमात पाडतं. आपलंसं करून घेतं ते.. लगेचच.
हॉस्पिटल मधल्या साफसफाई करण्याऱया त्या मावशी..
लगबगीने पुढे होत बोलू लागल्या.
" ती कालची  माणसं होती ना, तुमच्या बाबांच्या शेजारी, त्या पलीकडं , खूप चांगली होती हा...
त्यांचा तो मुलगा,
(त्यांच्याकडे  पाहत...मी  ) ...हं, ते बहीण भाऊ असलेलं दोघे ना, त्यांच्या वडिलांच्या शेजारी  बसलेले ते ....मी  त्यांना ईचारल.
व्हय..तेच,
हॉस्पिटलात आल्या आल्या ईचारायचे,
''काय मावशी, आलात का ?''
 ''या, या ...''
''गुड मोर्निंग, गुड मोर्निंग...''
''आज लवकर...आलात. ? ''
 ''चहा नाशता घेतलात ना  ? ''
माझी सुरवात ह्यांच्या ह्या अश्या गोडं  बोलण्याने व्हायची.

सकाळी सातला हॉस्पिटला रुजू झाले कि ह्यांचा आवाज..

 मावाशीsssss.. मावशीssssss ..
मावाशीssssss.. मावशीssssss...

कशी अगदी मोकळ्या मनाची होती.
रोज काय ना काय विषय निघायचा. बोलती असायची.
कालच डिसचार्ज मिळालं त्यांना, निघून गेली. पण मनात जागा करून...


मावशीच ते बोलणं ऐकत होतो.
जनरल वॉर्ड मधला आमचा एक पलंग आणि आमचं पेशंट (बाबा)  सोडल्यास,  इतर सगळी आता  .
आपल्या घरी योग्य तो ईलाज घेऊन परतली होती.
रिकाम्या, आठ 'रुग्ण' राहतील , इतक्या ह्या प्रशस्त खोलीत मात्र,
आता .. गत आठवणींचा एकांत तेवढा कुजबुज करून राहिला  होता.
आणि ह्या अश्या  एकांतातही...
आपणहून नि आपलेपणाने साधला गेलेला तो  स्वर' , ती वाक्य , ते हसू ते मोकळपण..  मावशी चौफेर नजरेनं  शोधत राही.

अवघ्या काही दिवसाची  ती ओळख , त्यांच्यासोबत असलेली.  ती दोघं बहीण भाऊ..
हॉस्पिटल मध्ये वडलांना उपचारासाठी म्हणून आणले असताना त्यांना सोबत म्हणून केवळ  इथं  राहिलेले .  ते हि जास्तीत जास्त किती ..तर आठवडा भर ...बस्स.
पण तरीही ... ह्या मावशीवर...
केवळ सफाई कामगार म्हणून,  रुजू असलेल्या ह्या इथल्या बाईवर...
काय जादू करून गेले कुणास ठाऊक , जीव अडकून राहिलाय  त्या दोघात.
नजर म्हणुनच भिरभिरतेयं...
नाहीतर इथं  कोण कुणाला इचारतंय.  कुणीबी नाही .
मावशीच्या चेहर्यावरून आणि बोलण्यावरून  त्यांचा मनातले भाव कळून येत होते.
कुणीतरी आपलं , आपल्यापासून  दूर निघून जावं . मनाला हुरहूर लावून , एकटं टाकून , असं  काहीसं त्यांना जाणवत असावं.
म्हणूनच आज त्यांचं मन कश्यात लागत न्हवतं.  
ओढवलं जातं होतं ते , केवळ त्याच त्याच आठवणींमध्ये..पुन्हा पुन्हा...
स्वतःला ( म्हणजे त्याना ) माझ्यापुढं असं बोलतं करून देत.

'संवादाची' हीच तर खरी ताकद आहे.
कुणाला हि..अगदी  कुणालाही ...मग तो कुणी, अनोळखा  हि का असेना , क्षणात पुढे असा उभा राहिलेला हि , त्याला आपलंस करून घेण्याची  आणि सामावून घेण्याची हि  ताकद ..  ह्या 'संवादाचीच', ह्या 'शब्दसख्यांची'..
मनाची ‘सात्त्विकता’ नि ‘आपलेपणाचा’ कोवळा हसरा अर्क ...तेवढा त्यात असला म्हणजे झालं.
मग कुठल्या हि नात्याला 'नाव - गाव' ची गरज भासत नाही. पूर्व ओळखीची गरज लागत नाही .
ते आपलेपणानं , स्नेहगोडीनं मनाशी जोडलं जातं. फुलपाखरावाणी क्षणभर आपल्याशी विसावलं जातं, मुग्ध आनंद देऊन..  
अजून काय लिहू..
नात्यातला   'दुवा' म्हणजेच हा  ‘संवाद  आपण तो योग्य पद्धीतीने  कसा साधतो , त्यावरच  नात्याची वीण हि जुळली जाते.
सांगायचंय काय ...
संवाद असू द्यावा...पण आत्मप्रेमळ .. :) सहज असा ...
 - संकेत पाटेकर

२०/०१/२०१८

शनिवार, ६ जानेवारी, २०१८

''संवाद ...''

अगदी म्हणावं तर घसा कोरडा होईपर्यंत मला केकटून  ओरडावं लागतं. प्रत्येकवेळी.. 
 ''अरे बाबा.., अगं बाई .''
आहेस का जिवंत ? कि गेलात ? हा ?
एक साधा कॉल नाही करू शकत , म्हणजे कमाल आहे यार  ? विसरलात ना ? 
तेंव्हा समोरून प्रतिउत्तर  येतं. 
जरा माफीच्या स्वरात....नमत्या अदबीनं ..
''सॉरी सॉरी ... ''
आहे रे , आहे इथेच आहे. 
नाही सोडून जाणार इतक्यात..,  थोडं..... 
मग नेहमीचच  त्यांचं 'कारणे द्या'' सत्र सुरु होतं. कधी तास भर , तर कधी काही मिनिटं ,गप्पांच्या   गुणगुणत्या ओघात  आणि ते मी सगळं  निमूटपणे ऐकून घेतो. (घ्यावं लागतंच म्हणा...पर्यात नसतो नं  )    ''पनीर चिली आणि भेटीच्या शर्थीवर ...  '' 
असो, तर सांगायचं काय आहे  , 
संवाद हा नात्यांचा 'मूळ' ..म्हणावा तर 'दुवा' 
मनं बांधून ठेवणारा. जोडणारा . 
तो असा 'जागता' ठेवावा लागतो. भलेही  ''जिवाभावाची'' स्नेहगोडीने , ममत्वेने जोडली गेलेली हि  कार्टी आप आपल्या संसारात , दुनियेत कितीही व्यस्त आणि धावपळत असली तरीही ... 
शेवटी 'आयुष्य' हे अश्या नात्यांच्या सहवासातच ( क्षणांच्या  विविध अंगाने ) झुलत असतं , न्हाई का ? 
म्हणूनच कधीतरी,  साधावा संवाद .  आपल्या ह्या  मनाला सांभाळून ..थोपवून आणि घ्याव्यात अवचित भेटी गाठी. नात्यांची  वीण पुन्हा घट्ट रोवत. 
जगण्यातला गोडवा वाढवत…
तुमचाच ..
- संकेत पाटेकर 
०६ /०१/२०१८