गुरुवार, २८ ऑगस्ट, २०१४

धागा - गैरसमजुतीचा - शब्दात विणलेला .

वाचनालयातल्या शांत नि गहनिय वातावरणात विश्वास पाटलांची ' पांगिरा' ह्या कादंबरी विषयक ' आपला मनोगत सांगणारा (पांगिरा कादंबरी कशी घडली , कशी लिहिली गेली ह्याविषयक ) ' लेख ' ' वाचण्यात अगदी गुंग झालो होतो.
हे लेखक वगैरे कसे लिहित असतील न्हाई , एवढ्या मोठ मोठ्या कादंबऱ्या , कथा वगैरे , त्यांचे अनुभव ..
ह्याचं एक प्रकार कुतूहल मनी असतं.
 अन ते पाहण्याची , ऐकण्याची , वाचण्याची उत्सुकता फार शिगेला पोचली असते.
अशातच काही लेख वगैरे हाती आलं तर ते अगदी झपाटून वाचून होतं हि . असाच हा लेख काही मिनिटातच वाचून पूर्ण झाला. अन तेवढ्यात फोन खणाणला .
ओळखीचाच , जवळचाच , जवळच्याच व्यक्तीचा , पण कित्येक दिवसाआड ने उगवलेला . नात्यात रुसवा म्हणतात ता ..तो रुसवा धरून बसलेल्याचा कॉल, क्षणभर हसू आलं.
 म्हटलं , कोण कधी काय गैरसमज करून घेईल सांगता येत नाही.
लिहायचं , बोलायचं एकाबद्दल अन वाटायचं दुसऱ्याला कि हा मलाच म्हणतोय असं...अन मग रुसून बसायचं , न बोलायचं , ना भेटायचं ...बस्स..
माणसं भेटून बोलून एकमेकांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यापेक्षा , आपल्या तर्कानेच आपली शक्कल लढवून अधिक गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करतात अन अधिक अधिक त्यातच गुंतत जातात. अन मग सुरु होतो खेळ , मनातल्या भावनांचा ..गहिऱ्या शब्दसावल्यांचा
सर्वच गोष्टी तर्काने सुटत नाही . अन सर्वच गोष्टी आपण म्हणू तशा असत नाही. त्यामागच सत्य काही और हि असू शकत. पण हे सांगणार कुणाला ?
पण हे हि तितकंच खरे कि तर्काने मांडलेल्या सर्व गोष्टी ह्या चुकीच्याच असतातच असं हि नाही.
पण एकदा सत्य काय आहे ते डोळसपणे पाहायला काय हरकत आहे . उगाच नात्याची चिरफाड कशाला ? आणि का ?आणि का म्हणून ?
जे मनापासून नातं जपतात अन समोरच्या व्यक्तीला आपलं म्हणून मानतात , त्यांच्या मनात त्या व्यक्तीबद्दल प्रेम यत्किंचितही कमी झालेलं नसतं.
पण गैरसमजुतीचे हे धागे मनाला गुंतागुंतीच्या डोहात पार ढकलून देतात. अन गूढ वलयांमध्ये आपण आपलाच आवाज शोधू पाहतो.
मनातले प्रश्न , शंका -कुशंका , एकमेकांबद्दल असलेल्या भावनां जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला कळत नाही . किंव्हा सांगत नाही तोपर्यंत असलेला गैरसमजुतीचा धागा हा सुटा करता येत नाही.
उगाचच शंभर प्रश्नाचा ढिगारा मनात साठविन्यापेक्षा सरळ भेटून बोलून असलेल्या प्रश्नांची , शंकाची उकल केली तर ती गोष्ट वेळेत तर सुटतेच पण नात्याची ती रेशीम गाठ अन त्यातला ओलावा तसाच कायम राहतो.
ज्यांच्या मनात आपल्याबद्दल अन आपल्या मनात त्यांच्याबद्दल प्रेमाचा अन आपुलकीचा  कायम आहे . किंव्हा असतो. 
तिथे गैरसमजुतीचा हा तिढा हि काही क्षणापुरताच असतो. 
 कारण एकाची बाजू खचली तरी दुसरा सावरायला लगेच तत्पर असतो.
अन तेच खर नातं . प्रेमाने जपलेलं.
- संकेत य पाटेकर
२८.०८.२०१४

बुधवार, २७ ऑगस्ट, २०१४

धक्याची दादागिरी - बोले तो भाईगिरी ..

सकाळची वेळ , रम्य अन मनं मोकळ वातावरण...
नेहमीच्याच आपल्या रुटीन प्रमाणे ऑफिस साठी घर सोडलं .  पंधरा एक मिनिटाच्या पायपिटी नंतर स्टेशन परिसरात दाखल झालो.  अन नेहमीच्या त्याच गर्दीत त्याच असंख्य हसऱ्या दुखऱ्या चेहऱ्यात मिसळून गेलो.
क्षण त्याच गतीत काहीसे पुढे सरले .
अन आयुष्याचं जीवनसार कथन करणारी मुंबईची ' ती ' जीवन वाहिनी ' लोकल ट्रेन आपल्याच लयात अगदी संगीत तालानिशी फलाट क्रमांक १ वर दाखल झाली. अन लोकांची एकच झुंबड उडाली उतरनार्यांच्या आधीच चढणारे आप आपल्या सीट पडकून निवांत झाले.
सीट मिळण्याचा आनंद किती और असतो ते मुंबईतल्या लोकल मधून प्रवास करणाऱ्या लोकांकडून शिकावं .
मी हि त्याच गर्दीतला एक प्रवासी...
मलाही सीट मिळाली. अन काही मिनिटाच्या अवधी नंतर टिंग टिंग अश्या घंटानादाने गाडी धीम्या गतीने पुढे धावू लागली. ठाणे - घाटकोपर प्रवास आतासा सुरु झाला .
वीस मिनिटाचा रिकामा वेळ हाती होता . हाती असलेल्या मोबाईलची Battery पूर्णतः डाऊन दिशेने गेल्यामुळे त्यात लक्ष घालायला वावच न्हवता . त्यामुळे जवळ असलेलं पुस्तक चाळाव अस मनानं मनालाच सुचित केलं . अन मग अद्भुताच्या शोधात मन गढून गेलं .
उल्हास राणे लिखित 'अद्भुताच्या शोधात' हि एक सुंदर कादंबरी काही दिवसापूर्वी हाती आली होती. फुलपाखरांच्या अद्भुत जगात नेणारी हि कादंबरी आपणास अरुणाचल प्रदेश, नागालँड , मणिपूर अंदमानची संशोधनात्मक सैर करून आणते. शब्दांची गुंफण इतकी रसाळ केली आहे लेखकाने कि त्यात मन हरखून जातं. कृष्मयुरीचं (फुलपाखरूच ) तर ते लावण्यमय वर्णन हृदयास भिडून जातं.
गेले तीन एक दिवस वेळ मिळेल त्या प्रमाणे मी त्या 'अद्भुताच्या शोधात' स्वतःला वाहून घेत. आजही असंच मन त्या अद्भुत जगात गढून गेल होतं.
ट्रेन आपल्याच लयात पुढे सरकत होती. एक एक स्टेशन मागे टाकत. अशातच वायू वेगाने एक ' शिवी ' कानावर आदळली. अन मनाची ती तंद्रीच साफ बिघडली. सारं लक्ष त्या कानपटी दुषित करणाऱ्या शिव्याकडे वळल. अन ते दृश अन वायफळ शब्द मनाच्या साच्यात बंदिस्त होऊ लागली.
हल्ली शिव्यांच म्हणा एक fashion झालंय म्हणा . प्रत्येक वाक्यात , नाही नाही .. वाक्याभर एखाद कुठला ' सभ्य' शब्द सोडून शिव्यांचाच पुरां शब्द्कोष असतो.
 मग ते सार्वजनीक ठिकाण असो वा इतर कुठे हि. अभिमान बाळगावा अश्या तर्हेने जो तो आई - बहिणीवरून अगदी हसत हसत शिवीगाळ करतो. मग सोबत आई - बहिण असली तरी ..त्यांना काहीच नाही. ...कसली आली आहे मनाची लाज .....?
तर असो.
साऱ्यांच सार लक्ष माझ्यासकट अगदी त्यां शिव्यांच्या दिशेने .
हातघाई वर आलेल्या त्या दोघां इसमांकडे . धक्का बुक्कीच साधासच अन नेहमीचच कारण ते . 
बस्स त्यावरून त्या दोघा मनाची तीढी भरकटली होती... शिव्यांची लाखोली वाहत..एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतं.
पुढे ते प्रकरण इतकं चिघळलं कि त्या एकाने( हट्ट्या कट्ट्या व्यक्तीने , पुढे कळलं कि तो खाकीवर्दी वाला होता )समोरच्या कानफाडात मारायला सुरवात केली.  अन दोघात हि झुंबड उडली.
दोघेही कुणा ग्रुपचे नसल्याने बसलेल्यांपैकी कुणा एकाची बाजू घेण्याचा प्रश्नच न्हवता .
 जो  तो पाहत ...ऐकत.
 हेल्लो कंट्रोल रूम , एक आतंकवादी सापडलाय. ? आणतो पकडून . .साल्याला..
 पुढे शिव्या अन शिव्याच ..( भासवण्यापुरताच काय ते कंट्रोल रूम ,,,ते कळायला सार्याना वेळ लागला नाही . ) खाकी वर्दिवाला मोठ्या फुशार्कीत समोरच्याला हासडत होता.
कानाखाली एक एक लगावत .
 समोरचा मात्र तो पोलिस आहे कळून चुकल्या पासून नमतं घेत मार खाई .
हे बघा , माहिती आहे तुम्ही पोलिस आहे ते , माझे हि नातेवाईक पोलिस आहेत समजलं.
समोरचा अगदी रडकुंडीला येउन बोलत होता.
पण वर्दी वाल्याची मिजास वाढत चालली होती. हात उगारत त्यावर शिव्यांची बरसात चालूच होती.
हे पाहून डब्यातले सारे एकदम खवळले ..
अन एकच गोंगाट सुरु झाला . पकडा त्या पोलिसालाच ...हाणां त्याला ..हाणा ...
तेवढ्यात बरोबर लोकलचा पुढचा स्टोप आला . लोकल थांबली . अन ते दोघे हि कुठल्या कुठे पसार झाले . ते कळलंच नाही .
एक मात्र नक्की उपस्थित प्रवाशांना योग्य तो न्याय कुणाला द्यायचा ते अगदी बरोबर कळून आलं .
अजून काही वेळ असता तर नक्कीच त्या वर्दी वाल्याची सामूहाईक धुलाई झाली असती.
चुकी नक्की कुणाची हे कोणाला कळणारच न्हवतं. पण उगाच समोरच्याने नमतं घेतलं तरीहि सुरु असलेली त्या दुसऱ्याची मिजास मात्र वाढत चालली होती.  अन त्यासाठीच इथे पब्लिक न्याय झाला होता.
धक्याची दादागिरी - बोले तो भाईगिरी ..वर ..
एक मात्र आहे . अस काही घडत तेंव्हा माझी नजर माझ्याच शरीरयष्टीकडे वळते.
मनालाच समजावत , बाबू वापस Gym जोइन करले, असा प्रसंग तुझ्या बाबतीत हि कधी घडायचा .
- संकेत य पाटेकर
२७.०८.२०१४

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०१४

बंधन प्रेमाचं ..

हे दीदी,
तू मला लाखी बांधणार ?
हो रे माझ्या सोन्या ...
मी पण बांधू तुला लाखी ?
अरे वेड्या , मुल कधी राखी बांधतात का ?
मग ?
बहिण राखी बांधते .......
हा आsssss....
मी तुझी बहिण ना , मग मी तुला राखी बांधणार...,
बहिण भावाचं हा प्रेमसंवाद . मला कल्पनेतल्या दुनियेत नकळत घेऊन गेला ........ वाटलं लहान व्हावं पुन्हा ...अन बहिण भावाच्या प्रेमभरल्या दंग्यात हरवून जावं ..........
ये दीदी तू ,ती छोटा भीम वाली लाखी बांधनाल ना ?
हो रे, ढिशुम धुशुम ...
मग मी तुला काय देनाल ? चोकलेट...
दीदी ..मला पण देशील ना, चोकलेट ?
चल , नाही देणार,
बघ , मग नको बांधू लाखी ....
मला पण हवाय चोकलेट ,
अच्छा बाबा , आपण दोघे खाऊ , ठीकाय ..
हम्म... माझी प्यारी दीदी
असंच लिहिता लिहिता...
- संकेत य पाटेकर

बुधवार, २० ऑगस्ट, २०१४

नकळत पिकलेला हशा ....


आपल्या रोजच्या ह्या जीवनात , कधी चालता बोलता , कधी, कुठे प्रवासा दरम्यान , कधी आपल्याच हातून काही गोष्टी नकळत घडतात.
ज्या गालातल्या गालात तर कधी खळखळून हशा फुलवतात.
आपल्या चेहऱ्यावर हि ...अन कधी उपस्थित असलेल्या आसपासच्या जनामनावर हि.....
कालचीच अशीच एक घटना , एक हास्य प्रसंग...
ऑफिसच्या रोजच्या वेळेनुसार ठीक ६ वाजता ऑफिस मधून बाहेर पडलो . अन मेट्रोने घाटकोपरला येण्यासाठी म्हणून अंधेरी चकाला मेट्रो स्थानकात दाखल झालो.
नेहमीप्रमाणे ' स्मार्ट कार्ड ' त्या ' पैसा कट' मशीन ला चिटकवून ..आत प्रवेश केला. . अन सरकत्या जिन्याने फलाटावर दाखल होत . पुढे धावत पळत , उभ्या असलेल्या मेट्रो मध्ये शिरकाव केलं.
मित्रासंगे इकडच्या तिकडच्या गप्पा रंगवल्या अन काही मिनिटातच घाटकोपर मेट्रो स्थानकात हि पोहचते झालो. मग पुन्हा स्थानकाच्या बाहेर पडण्यासाठी म्हणून नव्या चेहर्यासंगे ' पैसा कट' मशीन च्या रांगेत उभा राहिलो.
काही क्षणांतच माझा नंबर हि आला.
शर्टाच्या खिशात ठेवलेलं ते कार्ड मी पटकन काढलं. अन मशीन ला दाखवलं .
पण मशीन काही ऐकेना . दार उघडेना , जाऊ देईना . पुन्हा एकवार तेच केलं .
पण तरी हि नाही.
काही दिवस अगोदरच तर कार्ड रिफील केलं होतं. त्यामुळे नेमका काय प्रोब्लेम आहे ते कळेना . त्यातच मागची रांग खोळंबली होती. त्यामुळे मी थोडा बाजूला झालो.
अन मागचा पुढे होवून चालता झाला . ते एक वाक्य म्हणून....
'' ऐसा वैसा कार्ड दिखावोगे तो मशीन तो चकरा हि जायेगी ना " त्या वाक्याचा अर्थ कळायला वेळ लागला नाही.
हाती असलेल्या कार्ड वर नजर गेली. तेंव्हा हसू आवरेना . .
गालातल्या गालात हसू साठू लागलं . कारण मेट्रो च्या स्मार्ट कार्ड ऐवजी.....

बँकेच ATM कार्ड हाती होतं .
संकेत य पाटेकर
२०.०८.२०१४

शनिवार, ९ ऑगस्ट, २०१४

हेच का ते तुझं निस्वार्थ प्रेम...?

हेच का ते तुझं निस्वार्थ प्रेम...?
खूप म्हणायचासं ना...प्रेम हे निस्वार्थ असावं ? 
निर्मळ मनानं प्रेम करावं म्हणून ? 
कुठ गेलं ते सर्व आता ? कुठे गेले तुझे बोल ?
तुझे विचार ? सांग, बोल ना  हेच का रे तूझं निस्वार्थ मनं  ?
नुकतंच कुठे त्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंदाचा निर्मळ झरा खळखळू लागला आहे. अन त्यात तू असं चिखल माती- धोंड्यांनी तो   झरा  दुषित करू पाहतोयस  ?
अडवू पाहतोयस , का ? स्वतःच्या स्वार्थासाठी ?
मिळालेले ते क्षण पुरे नाहीत का ?
आनंदाचा एक क्षण हि 'सर्वांग' अगदी चैतन्याने भारून टाकतो.  तुझ्याकडे तर असे कित्येक आनंदी क्षण आहेत रे,  ते हि त्या व्यक्तीच्या सहवासातून मिळालेले ...लाभलेले... मग तरीही असं ?का ?
दुसऱ्याच्या  आनंदात  नेहमी स्वतःचा आनंद पाहणारा तू,
आज समोरच्या मनाचा साधा विचार हि करत नाहीस  ?  कमाल आहे,
त्यांच्या आनंदात मिसळून जाण्याऐवजी , त्या मनाचा आनंदच हिसकावून घेतोयसच
वेदानात्मक शब्दांच घाव घालुंन ? का ? का बर ?

कालच्या सर्व घडामोडी मी ऐकल्या आहेत.
मी नको म्हणत होतो , आवर स्वतःला, पण नाही ...
'आपल्याला चांगल्यापेक्षा वाईटच अधिक जवळच वाटत ना' .

तू हि तेच केलेस ? शब्दांच घाव देऊ केलेस , त्या नाजुकश्या  मनावर ...
किती वाईट वाटलं असेल रे,   तिला ? ह्या गोष्टीचा  कधी विचार केलास  ?
ती आता कोणत्या प्रसंगातून जात आहे, तिच्यावर कोणता प्रसंग ओढवला आहे ?
ती अशी का वागते ?
ह्याची शहनिशा न करता..  बस्स. बोलायचं  अन बोलायचं ...वाट्टेल तसं ...
काय अर्थ उरला रे ....
शब्दांची धार हि तलवारीपेक्षा अधिक खोलवर जखम करते . अन ती शक्यतो  भरून येत नाही हे   ठाऊक आहे ना तुला..... पण तरीही...
नातं....समजलास नाही रे  अजून ...

 मना - मनाचं अस स्वतःशीच  शीत युद्ध जुंपल होतं....समजवण्या हेतूने  ...

ना रंग.. ना रूपं...  ना ,  आकार ऊकार,  ना   गंध...  ,पण  तरीही हे मनं अस्वस्थ करून जातं कधी..
मानले तर मनाचे दोन प्रकार ..
एक चांगल ...एक वाईट..
एक नेहमीच सावरणारं, सकारात्मक विचारांकडे  नेणारं  अन दुसंर  दु:खाच्या डोहात हळूच बुडवणारं... नकारात्मक विचारंकडे वाहून नेणारं.
ह्यात  माणसाला चांगल्यापेक्षा वाईटच अधिक जवळच वाटतं .
किंव्हा नकळत आपण  ओढले जातो ...त्याकडे ..

रागा भरात निघालेले   , आपलेच शब्द आपल्याच  हृदयी घाव करून जातात.
अन  त्याचा  परिणाम   पुढे होणारा  तो होतोच .  स्वतःला हि अन समोरच्यालाही ..
तेंव्हा मग पश्चाताप शिवाय दुसरा मार्ग नसतो.

पहिल्या  मनाचं  सांर बोलण  निमुटपने   ऐकून घेणारं दुसरं मन आता  बोलू लागतं.
झालं बोलून...आता माझंही म्हणण ऐक ?

'' उगाच नाही रागा धरत, ना शब्दांचे घाव देऊन समोरील मनाचा रोष ओढवून घेत मी ..
त्यामागे कारण असतं.''  अन कारणाशिवाय उगाच कुणी अस बोलत नाही.

 कारण असतं हे मान्य रे.., पण त्यामागची व्यथा तू समजून घेतोस का ?
दुसऱ्या मनाचा हि विचार  करतोस का ?

हे बघ,  व्यथा वगैरे समजून घेण्याच्या भानगडीत मी पडत नाही.
जे दिसलं जे जाणलं त्यावर माझा जोर असतो.

इथेच चुकत रे तुझं , समजून घेण्याची मुळात वृत्तीच  तुझी नाही.
 माणसं प्रेमानं जोडायची कशी , नाती टिकवायची कशी ? फुलवायची कशी ? ते तुझ्या आवाक्यातच नाही.
बर बोललासं रे.....
हे सगळं  माझ्या आवाक्यात नाही. पण प्रेमानं अन विश्वासानं जोडलेली माणसं  एक दिवस आपल्या विश्वासालाच तडा देतात ,  त्याच काय ? 
आपल्या प्रती त्यांच्या मनात असलेल प्रेम , आपुलकी , आपलेपणाची भावना अचानक कुठे निघून जाते ?
आहे उत्तर ह्याचं ? 
ह्याच गोष्टी खूप जिव्हारी लागतात रे , ह्याच गोष्टीचा  खूप राग येतो.
अन त्या रागाभरात  नको ते धारदार  शब्द बाहेर  निघतात .

अरे पण तो, क्षणाचाच राग रे...
वादळा सारखा उफाळलेला.  सांर काही नासधूस करून देतं .
त्याच काय ?
विश्वासाला तडा जाऊ न  देता . जे नांत आपण जोडलंय ते निर्मळ मनानं ,   जपण, प्रेमानं गोंजारत राहण , हे आपलं इति कर्तव्य ...मित्रा . ;)
ठीक आहे रे ,कर्तव्य हे ते ,  बोलायला अगदी सोपं आहे.
पण वेदनेचे घाव झेलावे लागतात , त्याच काय ?
ते सहन कस करायचं ?
काही गोष्टी सहन कराव्या लागतात रे..
इतर मनाचा विचार करून .. नाती जोडतो ना आपण , मग त्यातला सुगंधीतपणा हि आपल्यालाच जपायला हवा  ना ? कुणा एकाला तरी  त्याग करावा लागतो रे..
शेवटी हे जीवन चंदनासारख असावं  रे...
स्व:ताहा झिजता ..झिजता ..सुगंध देणार . ..नाही का ?
संकेत पाटेकर
०९.०८.२०१४