शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

Love marriage कि Arrange marriage हा एकच मोठा सवाल आहे...

Love marriage कि Arrange marriage हा एकच मोठा सवाल आहे... 
हे करुणाकरा ऐकतोयस ना ?
जिच्यासोबत भावी स्वप्नांचं चित्र चितारलं त्या माझ्या प्रिय सखेशी कि अजूनही माझ्या आयुष्यात पदार्पण न केलेल्या त्या अनोळखीशी , कोणाशी नक्की सुत जुळवनार आहेस रे ? हे एकदा ठामपणे सांगून टाक , आणि मोकळं कर रे मला , ह्या अविवाहा तांच्या जगण्यातून ..
अजून किती रे , हे असं असह्य जगणं मी जगायचं ? सांग तरी ? 
विरहाच्या अपार वेदनेने कष्टीलेल्या, ह्या माझ्याच मनाची ...हि ढासळलेली प्रतिमा मलाच पाहवत नाही रे , तुला तरी हे कसं पाहवतयं. ? हा ?
अरे , जिच्या ओढीने अद्यापही हे मन वेडावलं जातं. जिच्या नुसत्या नावाने , सर्वांग शहारून मन फुल पाखरावानी मोकळी झेप घेतं , जिच्या विचारातच दिवस रात्रीचा क्रम स्वप्नील कथेप्रमाणे बदलत जातं. अरे तिच्या मनात तरी प्रेमाचे कारंजे उमलू दे रे ... 
प्रेम गंधाने शहारलेलं अत्तर पुन्हा एकदा घमघमू दे रे ...
हे करुणाकरा …
 ऐकतोयस ना ..ऐकतोयस ना काळजाने तुटलेल्या ह्या मनाच्या वेद्नेंची हि लक्तरं.. 
अरे ...प्रेम मनाचं हा सेतू , कधी हि न तुटणाऱ्या विश्वासाच्या दोरीने जुळू दे रे एकदा...

मान्य आहे मी चुकलो. 
चुकलो मी त्या एका क्षणी, संयमीमनाचा हा बांध , मला योग्य त्या समयी रोखता आला नाही . म्हणून का त्या एका चुकीसाठी एवढी मोठी सजा , का रे ? माणूस आहे तो चुकणारच ना ?
हे विधात्या...
तू सर्व व्यापी अन जाणता आहेस , मग तरीही माझ्या बाबतीतच इतका कठोर का झालास ? 
घडून गेलेल्या गोष्टीचं प्रायच्छित करून देखील ,माझ्या ओंजळीत हेच का ? 
नकाराच्या स्वरसुराने छिद्र पडलेल्या ह्या हृदयी मनाची वेदना किती , हे तू जाणूनी आहेस नां? तरीदेखील हे असं ? 
विस्कटलेल्या ह्या मनाची घडी अद्यापही मी सावरतोय रे ..
पण तिच्यावाचून ते शक्य नाही ..अन हि वेळ हि न्याय देत नाही.
एकाबाजूस, कधीही कुणासाठी न थांबनारया , ह्या वेळेची दहशत तर एका बाजूस न उलगडलेल्या तिच्या मनाचे कोडे आणि सोबत हे अनोळखीचे दोरे , हे विधात्या शेवटी तूच काय करावं ते सांग ?
लग्न करावे कि नाही हा एकच सवाल आहे ?
कुणी लग्न जुळवून देत का रे , लग्न ? तिच्याशीच …
असंच काही ..डोक्यात घुमलेलं आणि लिहिलेलं 
- संकेत पाटेकर 
२९.०१.२०१६


गुरुवार, १४ जानेवारी, २०१६

काही सांगायचं आहे तुला...

काही सांगायचं आहे तुला...
ऐकशील ..?
मला माहित आहे , माझ्यावरचा राग अजूनही तुझा ओसरला नाही. तो ओसरला नसेलच. पण तरीही ..सखे ...काही सांगायचं आहे मला.
ऐक ?रागावू नकोस रे ..
तसं मनातल्या मनात तू म्हणत असशीलच ? का हा असा, सारखा त्रास देतोय ?का असा छळतोय ?
मी एकदा नाही म्हटले ना , तरी हि पुन्हा पुन्हा तोच प्रश्न ...का ? हो ना ?
वेडावून त्रस्त होत असशील तू .. नाही का ? तुझ्या शब्दात म्हणायचं तर डोक्याचा भुगा होतोय ? हे ना ?
पण काय करू सखे , माझ्या बाबतीत हि असचं आहे बघ , मला हि ह्या साऱ्यांचा खूप त्रास होतोय. पण तुला रे कसं कळणार ?
आणि कळलच तरी तू , तुझं मन ....माझ्यापुढे मोकळ करणार आहेस का ?
ह्या प्रश्नाच उत्तर तसं नाहीच मिळणार , हो ना ? मला हि ह्याबद्दल काही बोलायचं नाही आहे.
पण सखे , मला त्रास होतोय म्हणून मी तुला असा त्रास देत आहे . असा विचार मात्र तू मनी धरू नकोस.
तेवढा मी असभ्य अन वाईट वर्तनाचा मुळीच नाही हा ..
खर म्हणावं तर माणसाला गैरसमजूतिचे हे धागेच खूप अधिक त्रास देतात. गुंडाळून ठेवतात. अकारण ..शंका कुशांकाच्या अंधाऱ्या झोळीत ...
मला वाटतं आपल्या दुभंगलेल्या मनाचं अन तुटलेल्या ह्या नात्याचं हि हेच कारण आहे.
तो गुंता आपण काही सोडवला नाहीच. पण तो गुंता न सोडवताच , एकमेकांपासून मात्र असे दूर निघून गेलो.
म्हणावं तर अगदी जवळ आहोत आपण ..अगदी हाकेच्या अंतरावर ...पण तरीही मनातून मात्र दूर असे...
कधी आठवण येते का रे , तुला माझी ?
नाही आपलं सहजच म्हटल.
तसं मनात घर केलेली माणस , सहजा सहजी विसरता कुठे येतात रे ... न्हाई का ?
राहू दे ..नको सांगू ..
माझ्याकडे तुझ्या आठवणीची मात्र उजळनीच सुरु असते रोज..
किती सुखद अश्या आठवणी आहेत रे त्या , सुखद आहेत म्हणूनच निसटून गेल्याचा त्रास..
काय गम्मत आहे बघ ना,
ह्या क्षणांना पकडता येतं , बांधून ठेवता येतं , आठवणी स्वरुपात , पण व्यक्ती ....
त्यानां नाही धरून ठेवता येत रे ... त्या निघून जातात..आल्या वाटे , तू हि अशीच निघालीस , न्हाई ?
मला एकाकी करून ...जे घडायचंच ते घडलं . रंगवलेले सारे स्वप्न हि अपुरेच राहिले .
असो , मला माझ रडगाणं गायचं नाही आहे .
एक मात्र सांगायचं आहे सखे ,
एकेमांपासून दूर झाल्यावर , तुझं अस अबोल, एकाकी नि शांत राहण , मला स्वस्त बसू देत नाही रे,
तुला त्रास देण्याचा तसा काहीही हक्क नाही आहे मला ...
हे नातंच जेंव्हा आतून तुटलं. आतून म्हणजे काळजातून ..तेंव्हाच तो हक्क मी गमावून बसलो.
म्हणायला तसं आपल्या मैत्रीच्या नात्यातला अर्क अजूनही शाबूत आहे हा..
म्हणूनच त्या हक्काने ह्या शब्दांची हि केविलवाणी धडपड ...
सखे , अशी दूर नको ठेवू स्वतःला ? एकाकीपणात अशी नको रे बांधून घेऊ?
मनाचे सारे कवाड बंद करून , निशब्दाचे तुझे हे गहिरे बोल ...खूप खोलवर रुजतात रे ह्या काळीजास ..त्यानेच चर्र होतंय बघ ..
त्रास होतो रे ..तुला नाही कळायचं ते.
भावनांची ओढ हि अजूनही तशीच आहे अगदी.., भलेही आपल्यात संवाद होत नसेल. भेटी गाठी होत नसतील . पण प्रेमाचं हे चीटपाखरू पंख पसरून अजूनही भिरभिरतंय रे तुझ्याच अवतीभोवती..
तुझीच खूप काळजी वाटतेय ..तुझ्या ह्या अबोलपणाची , तुझ्या तब्येतीची ..
ठीक आहेस ना ?
एकाकी अशी का रे गुंतवून ठेवतेयेस स्वतःला ?
जरा बाहेर ये ह्यातून ..
तुझ्या चेहऱ्यावरती हास्य रेषेची ती सोनेरी खळ ...मला पुन्हा उजळलेली पहायची आहे .
माझ्यासाठी नाही रे , पण तुझ्या स्वतःसाठी..
हे एवढ करशील का रे ....
तुला हसताना सदैव पहायचं आहे . बाकी काही नाही .
म्हणूनच हा अट्टाहास ...सखे .. :) 
तुझाच ..
असच लिहिता लिहिता...
- संकेत य पाटेकर
१३.०१.२०१५

शुक्रवार, ८ जानेवारी, २०१६

निर्दयी मन...

 ‘’अरे बाबा , अंदर  खडे रेहने के लिये जगह नही है  ..’’
‘और तुम ये हे बच्चा  लेके ..., ‘ ना ना , पीछे और एक गाडी हे ..उससे आ जावं.’ 
कंडक्टर ने जरा हेकाटा देतंच म्हटले .
तरीही ती बाई काही ऐकेना...
चलेगा .. अस म्हणत ती शेवटी लगबगीने  आत शिरलीच.
कडेवर  दोन तीन वर्षाचं  तिचं पोर  अन मागोमाग  सत्तरीच्या पुढे असलेली ती म्हातारी (बहुदा आई असावी )दोघीही  एसटीत कसेबसे चढले. तसे  कंडक्टर ने एसटीच दार थाड करून  ओढून घेतले. अन एसटी पुन्हा मुंबई दिशेने धावू  लागली.

खेड  डेपोतून निघून आताशा एखाद तास  झाला होता.
पन्हाळे- मुंबई मार्गे असणारी हि एसटी रविवार असल्यामुळे जरा भरगच्चच भरली  होती.
आसनस्थ होण्यास हि  जागा उरली न्हवती. त्यात प्रत्येक एका व्यक्ती मागे त्याच्या ३ -४ पट असलेलं सामान. ते  सांभाळता सांभाळता त्यांनाच नाकी नऊ येत होते. 
आम्ही खेड वरूनच एसटी पकडली असल्याने बसण्यास तेवढी काय ती जागा मिळाली.
३ दिवसात ३ किल्ले  सर करून थकले भागलेले हे शरीर आता घरच्या  ओढीने,  बसल्या जागी निवांत पहुडल होतं.
दाराच्या उजवीकडच्या  बाजूलाच म्हणजे वाहन चालकाच्या रांगेत असलेली ,  पुढील एक सीट सोडून मागील दोन सीट वर आमचे तिघे मित्र ऐसपैस बसले होते.
कुणाचं आरक्षण नसल्यामुळे कसलीच चिंता न्हवती. पण चौथी सीट म्हणजे पाच नंबरची सीट तेवढी आरक्षित होती.
खेडच्याच असलेल्या गावाच्या एक काकू कितीतरी बोचकी सोबत घेऊन मुंबईला निघाले होते . कुणा नातेवाईकाकडे  त्यांची ती सीट...
तश्या त्या  एकट्याच होत्या पण त्याचं  सामान म्हणजे  दोन तीन जणांच बिऱ्हाड असेल एवढ.  .
ते सामान एसटीत पोहोचवण्यासाठी कुणी एक माणूस त्यांच्या  सोबत आलं  होतं. .  ते  सामान  त्यांनी एसटीत  तेवढ चढवून  दिलं . अन ते निघून गेले .
पण त्या सामानाची आवरा- आवर करता करता , व्यवस्थित जागी  ठेवता ठेवता , त्या काकूंची पार धांदल उडाली.
कंडक्टर हि नेमका त्याचवेळेस तिकिटासाठी उभा राहिल्याने , ऐनवेळी तिकीट हि मिळेना अशी त्यांची  अवस्था...
शेवटी इकडे तिकडे शोधा शोध करत  एकदाची काय ती तिकीट गवसली .
अन त्या काकू सामान आवरून ,  स्वतःला सावरून ,  चौथ्या सीटवर आपल्या जागी  निवांत बसल्या .
आमच्या मित्रांनीही त्यांना सामान आवरण्यास हवी   ती मदत केली.

मी मात्र ह्या सर्वांपासून जरा दूरच बसलो होतो. ते सगळ पाहत होतो.
पाच नंबरच्या त्या चौथ्या सीटवर त्या काकू आल्यामुळे मला दुसऱ्या एका  सीटवर बसण भाग होतं. मित्रांपासून  म्हणून जरा विलगलो गेलो होतो  .
कंडक्टरच्या रांगेत अगदी दुसरी  सीट सोडून तिसऱ्या सीट वर मला जागा मिळाली.

मी  तिथे निवांत पहुडलो.    आम्हा चौघा मित्रांच्या , तीन  दिवसाच्या ,सह्याद्रीतल्या  कॅमेरात टिपलेल्या त्या आठवणी पाहत...कधी सभोवताली हळूच डोकवतं.    

एसटी तले सर्वच तसे त्यांच्या त्यांच्या दुनियेत गाढ झाले होते. 
एसटी हि तिच्या गतीनं  वळण घेत धावत होती.

दुपारचं  उन्हं  पसरलं होतं.
दोनच्या आसपास खेडवरून निघालेली हि  पन्हाळे मार्गे मुंबई एसटी , वाशी ला पोहचेपर्यंत रात्रीचे चांगलेच  आठ ते साडे आठ वाजणारे होते . अन  खेड सोडून आताशा  फक्त  एक  तासाच  झाला होता . अजून  बराच  अवधी तसा बाकी  होता.
खेड ते मुंबई  ह्या धावत्या प्रवासात ,ह्या कोकण मुंबई प्रवासात  .. ना ना चेहऱ्यांची,  ना ना स्वभावाची माणसं  भेटत होती. 
अनोळख्यांची स्वभाव शैली दुरूनच ओळखून येत होती,  नवं नवीन शब्दावली कानावरून  अधोरेखित होत होती,  तसेच खिडकीच्या चौकटीतून  सृष्टी सौंदर्याच  विहिन्ग्मय दृश्य  हि नजरेस पडत होतं .

हे आयुष्य म्हणजेच हा एक प्रवास आहे .  जन्म अन  मृत्यु मधला संघर्षमय अन तितकाच रोमहर्षक असा प्रवास. ह्या प्रवासात आनंदी लहरी आहेत , शरीरमनाला उजळू देणारे , चैतन्य सुख देणारे  तसेच दुःखाचं भवसागर हि आहे  ..शरीर मनाला पार जखडून टाकणारं ...वेदना देणारे ..

मानवी भावनांचे कितीतरी पैलू इथे अनुभवयास मिळतात आपल्याला, सर्र्रास रोजच्या रोज अगदी ..
कधी हासू , कधी अश्रू , कधी राग कधी लोभ , कधी ओढ कधी विरह ...कधी एकांत कधी एकाकीपण.....
भावनांची किती हि उथळ खोली . त्याचं माप घेता येत का ?
क्षणा क्षणाचे हे नवं नवे अनुभव घेत , नव्या विचारांची सकारात्मक उजळणी करत, आल्यावाटे  मार्गीस्थ होत,  हे आयुष्याचं प्रवासी पुस्तक  आपल्याला रंगवायच असतं, रेखाटायचं असतं .
 ह्यातून आपण  जगण्याला अन ह्या  जीवनाला अनुरूप असे एक वळण  देत असतो.
एसटीतला  हा आमचा आजचा प्रवास देखील त्यातलाच एक भाग.

गाडी एका थांब्यावर थांबली .   तसा कंडक्टरचा आवाज कानी गुंजला .
‘’अरे बाबा , अंदर  खडे रेहने के लिये जगह नही है  ..’’
‘और तुम ये हे बच्चा  लेके ..., ‘ ना ना , पीछे और एक गाडी हे ..उससे आ जावं  ‘
त्या आवाजाने  माझी  नजर अन कान दोन्ही त्या दरवाजाकडे अन त्या बाईकडे एकवटले . 
ती बाई , त्या कंडक्टरच्या ओरडण्याला न  जुमानता बिगीबिगी आत शिरली.  
अन तिच्या मागोमाग सत्तरच्या आसपासची, वयोमानानुसार सुरकुत्या पसरलेली अन थरथरत्या अंगाची म्हातारी  हि ..

दोघेही जागा पाहू लागल्या.एसटी तशी भरगच्च होती.  बैसन्यास अशी जागा नव्हतीच. पण   
तितक्याच एक प्रवासी , माझ्या पुढच्या सीटवरला  जागेवरून उठला अन 
त्या सीटवर ,  त्या तरण्याकाठ्या   बाईस लगेचच  जागा मिळाली. 

हाती एकुलतं  एक पोर सांभाळत तिने महाड ची दोन तिकीट घेतली.  अन निवांतपाने ऐटीत बसली.
आपल्या सोबत कुणी एक म्हतारं माणूस देखील आहे . ह्याची तिला पर्वा नसावी .
हे  उघड उघड दिसत होतं. 
तिच्यासोबत असलेली ती म्हातारी  धावत्या ह्या एसटीत स्वतःच तोल सांभाळत कशीबशी उभी होती.
नजरेनेच  विनवत होती , ‘ अरे बाबा , कुणी ह्या म्हातारीला  बसायला जागा देत का रे ? जागा ? ‘
वय झालं रे बाबा , नाही उभ राहता येत . दया करा रे कुणी  , असच जणू सांगत होती. 
तिच्या एकुलता एक पोरीला देखील  तिची कीव येईना.  साधं ढुंकूनही  तिच्याकडे पाहण्याचे कष्ट ती घेत नव्हती .  इतकी निर्लज्ज ., इतकी कठोर ..इतकी निर्दयी ..

कशी कशी लोकं असतात एक एक ,  ज्या  पालकांनी  अपार कष्ट करून  लहानाचं  मोठ केलं ,  त्या पालकांवर अश्या अवस्थेत हि सजा . अरे कुठे फेडणार हे पाप सगळ, इथेच ना .., थोडी लाज अन  भय बाळगा .

त्या म्हातारीची  अवस्था पाहवत न्हवती. दूरचा पल्ला असल्याने कुणीही बसल्या जागेवरून उठायला तयार न्हवते.
शेवटी   राहवलं नाही .  मी जागेवरचा उठलो. म्हटलं , आजी निवांत होवून बसा अगदी…
त्यांना थोड आधार देत . त्यांचा  हात धरत , माझ्या जागी त्यांना बसवलं. अन त्या निवांत झाल्या.
त्यांना निवांत झालेलं पाहून मला हि बर वाटलं.   
जीवनात तसा प्रत्येकाला आधार हवा असतो .  ती आधार धारी व्यक्ती मग कोणतीही असो तिला वयाची अट नसते . असते ती प्रेम भरल्या मायेची अन  मानसिक आधाराची फक्त गरज . 
प्रसंगी कुणासाठी तो  आधार आपण हि कधी व्हावं. जगण्यासठी अन लढून जगण्यासाग्ठी हे बळ पुरेसं  असतं. विचारांचं चक्र अस वाहत होतं.
तिच्या मुलीवरचा राग मात्र अधिकतेने  वाढत होता. दोन तीन शब्दांचे डोस तिलाही द्यावेत   अस वाटू लागलं.
पण ते काही मी केलं नाही . पण मनात विचारांचे  चक्र तेजाने फिरू लागले.
अरे आपल्या आई बाबांची  काळजी घ्या रे...
आई बाबांचीच कशाला ..जे कुणी आपल्या आयुष्यात येत ..त्यांची काळजी घ्या . प्रेम द्या प्रेमाने रहा.
जितकं  प्रेम द्याल तितकं अर्थपूर्ण जीवन जगालं.
- संकेत य पाटेकर
०८.०१.२०१६