सोमवार, २९ जुलै, २०१३

मनाची जडण घडण हि आपल्या विचारांवर अवलंबून असते ..


ह्या २५ तारखेपासून म्हणजेच माझ्या वाढ दिवसापासून अनेकानेकांचे शुभेच्छा आणि त्यांचे अनुभवी विचार एका पाठोपाठ एक मनावर धडाडत आहेत .
एखादी वस्तू बर्थ डे गिफ्ट म्हणून मिळते खरी, ' मित्रांकडून , नातेवाईकन कडून , पण मला ह्यावेळेस शुभेच्छांच आणि विचारांच पुष्प गुच्छच मिळाल ..मिळतंय अजूनही
मनाची जडण घडण हि आपल्या विचारांवर अवलंबून असते . आपण कसे विचार करतो , त्यावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात .
मनास आकार देण्याच काम मात्र , आपल्या समाजातील विविध घटित- अघटीत घटना करत असतात , तसेच आपल्या कुटुंबातील वयामानाने मोठ्या असलेल्या व्यक्ती त्यांचे अनुभवी विचार आपल्या समोर मांडून आपल्या मनाला एक विशिष्ट्य आकार देत असतात . त्यातून आपण घडत असतो .
माझ्या वाढदिवशी मध्य रात्रीपासूनच शुभेच्छांचा वर्षाव झाला .
संध्याकाळी आलेल्या एका call ने मात्र शुभेन्छ्यान सोबत शाब्दिक मारा देखील केला. पण त्या मागे प्रेम दडल होत . आपलेपणाची जाणीव होती . कुठेतरी आपण चुकतोय , वेगळ्या वळणावर पाउल टाकतोय हे त्या मनास उमगून आल होत . आणि त्याच साठी तिने समजुतीचा शाब्दिक मारा चालवला होता (माझी प्रेमळ बहिणी ती ) .
दुसर्या दिवशी सहज रस्त्याने चालत असता एका मित्राशी योगायोगानेच म्हणा भेट घडली ,
आणि बोलता बोलत त्याने त्याचे किमती अनुभव शेअर करण्यास सुरवात केली . रोजच्या ह्या धका धकीच्या जीवनात आपल्याला वेळ तसा मिळतो कुठे? . ऑफिस घर -ऑफिस ह्यातच आठवड्यातले सहा दिवस भुरकन निघून जातात .
घरच्यांना वेळ देण्यात आणि घरातली कामे करण्यातच आलेला रविवार हि तसाच निघून जातो . त्यात मग आपल्या आवडी निवडी जपता येत नाही ,मित्रांसोबत कुठे बाहेर पडता येत नाही , मित्रांशी ओळखी वाढविता येत नाही. जीवन हे सुंदर असून ते सुंदरतेने जगता येत नाही . म्हणून आठवड्यातून दोनदा तरी सुट्टी असावी . जेणेकरून हे जीवन जीवन म्हणून जगता येईल.
दुसरी गोष्ट म्हणजे ''आउट ऑफ बॉक्स विचार करन''
आपण एका कंपनीत ठराविक एकच अस काम दिवसेंदिवस , वर्ष वर्ष करत असतो , त्यामुळे इतर कामे हाताळायची गरजच पडत नाही . आपण एका चौकटीत राहूनच आपली कामे करत असतो .
त्यामुळे तुम्हाला कुणी काहीतरी वेगळ अस एखाद छोट मोठ काम करण्यास सांगितल आणि ते तुम्हाला जमल नाही तर ...
तुला हि गोष्ट येत नाही अस कुणी म्हणायला नको ..
अरे हे काम हाच /हीच करू शकते /शकतो अस म्हणायला हव . प्रत्येक गोष्ट आपणास करता आली पाहिजे .
त्या रात्री सहज मित्राला भेटण्यास म्हणून निघालो . आणि भेट झाल्यावर बोलता बोलता तिथे जवळपास विक्रीसाठी असलेल्या गणेश मूर्ती पाहण्यास म्हणून गेलो , तेंव्हा त्या विक्रेत्या काकांनी बऱ्याच गोष्टी सहजतेणे सांगून टाकल्या . त्यात शिक्षणाच महत्व होत . प्रामाणिकता , विश्वासार्हता अशा हि अनेक गोष्टी होत्या . आपल्या बोलण्यावरच सर्व काही आहे . हे त्यांनी ठामपणे सांगितल . ओळख नसूनही ओळख असल्यासारखं मनसोक्त मनातले भाव ते उलगडत गेले .
आता शनिवार निघून गेला आणि रविवार उजाडला दिवसाची लगभग आरामात सुरु झाली . दुपार होत आली आणि पाउले उल्हास नगरच्या वाटेला निघू लागली . पुन्हा एका प्रिय व्यक्तीच्या भेटीला .
१) आपला आनंद कुणावर Depend ठेवू नये , कुणावर Depend राहू नये .
२) आपल्या मूळे हा प्रकार घडला , अस घडायला नको होत . अस Gilty Feel हि कधी करू नये .
३) जे विधी लिखित आहे ते घडत असत . आपण ते स्वीकारायचं . पुढे जायचं .
४) आपल्या मनाचं संतुलन आपण राखायच .
५) ''नियम'' मधला ''नि' बाजूला काढला कि उरतो तो ''यम'' म्हणून नियमा प्रमाणेच वागावं . नाही तर यम आहेच ...!!
६) आपल्या बोलण्यातूनच आपला स्वभाव आपलं वागण कळत, म्हणून बोलाव, बोलतं व्हाव.
अशा कितीत्तारी चांगल्या गोष्टी चांगले विचारांचं गुच्छ मला मिळाल .
मनातले काही ..
संकेत पाटेकर
२९.०७.२०१३

मंगळवार, ९ जुलै, २०१३

अपेक्षा .....


अपेक्षा .....
आपल्या माणसांकडूनच आपण अपेक्षा फार ठेवतो . आणि तेच कारण असतं काहीवेळेस असलेल्या विश्वासाला तडा जाण्याचं..
. त्याच दोष मात्र आपण सर्वस्वी समोरच्याला देऊन मोकळे हि होतो लगेच , पण खरी चूक हि आपलीच असते, कारण अपेक्षा ठेवणारे आपले आपणच असतो .
अपेक्षा ह्या आपल्या माणसांकडूनच नाही कराव्यात तर कुणा कडून कराव्यात हा ? हा प्रश्न देखील लगेच उद्भवणारच ......पण त्या प्रश्नाचं उत्तर देखील तयार असत..
अपेक्षा ह्या असाव्यात ...पण फार नसाव्यात , ज्या आहेत त्या समोरच्याकडून पूर्ण होत नसेल तरी त्याच दुःख नसावं . कारण समोरचा त्याच्या वतीने पूर्णपणे प्रयत्नशील असतो , जर त्याच्या तुमच्यावर अगदी जीवापाड प्रेम असेल. तुमच्यावर विश्वास असेल तर ........
पण प्रत्येक वेळीस त्याच्या प्रयत्नांना यश येइलच असंही नाही .त्यामुळे आपल्या माणसांकडून ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तरी त्याची खंत मनी नसावी . नाहीतर जीवन जगण असह्य होईल .
आपल्या जशा अपेक्षा असतात , तशा समोरील व्यक्ती कडून हि असतात, हे हि लक्षात ठेवावं . पण अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तरी त्याच दुखं नसावं .....अन त्यासाठी कधी कुणाचा विश्वास तोडू नये. कारण तुटलेला विश्व्वास पुन्हा मिळवण , जुळवण खूप अवघड असत.
- संकेत य पाटेकर
०९.०७.२०१३

मुंबईची जीवन वाहिनी ..


कधी कधी एक विचार मनात येउन जातो , कि येन गर्दीच्या वेळी मुंबईसारख्या ठिकाणी लोकल ट्रेन ने प्रवास करणाऱ्या ज्या व्यक्तीमध्ये १५- २० मिनिटाच्या त्या अवधीचा , त्या प्रवासाचा , ' त्रास सहन करून घेण्याची बिलकुलच क्षमता ज्यांच्याकडे नसते . त्या व्यक्ती , त्यांच्या घरी , त्यांच्या ऑफिस मध्ये त्यांच्या मित्रान सोबत कश्या वागत असतील बरे .......?
प्रश्नच पडतो , पण त्या प्रश्नाला काही एक अर्थ नसतो. ज्याच्या त्याच्या जीवनाचा तो प्रश्न ..मला प्रश्न पडून काय तो उपयोग . ? पण असो ,
सांगायचं तात्पर्य कि , मुंबई ची हि लाखो लोकांची जीवनवाहिनी ,आपली लोकल ट्रेन , सर्वात मोठी आणि पहिली गोष्ट शिकवते ती , सहनशीलता, आणि मानवता धर्म.
काही लोकांचा अपवाद वगळता , ह्याच दर्शन नित्य नेहमीच आपणास घडतं. पण ह्याच बरोबर अशा अनेकानेक गोष्टींच जीत जागतं दर्शन हि लोकल ट्रेन करून देते , पण त्यासाठी तशी डोळस वृत्ती हवी आणि संवेदनशील मन . आणि ते सर्वांकडेच असत नाही का . ..
मनातले काही...
संकेत य पाटेकर .
०९.०७.२०१३