बुधवार, २९ जुलै, २०१५

आपलं म्हणणारं आपलं..ही कुणी आहे...

आपलं म्हणणारं आपलही कुणी आहे . ह्यातच किती सौख्य आहे . .....
बळजबरीने कुणाला हि आपलंस करता येत नाही वा कुणाचं मन जिंकता येत नाही .
वाटतं तितकं सोपं नसतंच कधी ... कुणाला आपलंस करनं...., आपल्यात सामावून
घेणं... 
काही वेळा सहज जुळून येतं सगळ ... काही वेळा प्रयत्नांची पराकाष्टा करावी
लागते.
तरीही कसली शाश्वती नसते ............शेवटी उरतो तो नशिबाचा भाग .....

काही नाती जुळतात , काही नाही . काही नाती जुळल्या तरी त्यात प्रेमाचा अंश
टिकेलच अस नाही .
हि परिस्तिथी कोणता लंपडाव खेळेल ह्याचा ही नेम नाही .
खर सांगू ..प्रेमासारखी दुर्लभ गोष्ट नाही .
कणकण कुणी त्यासाठी तडफडतं ....कुणी त्यासाठी आपलं अनमोल जीवन कवटाळतं .
कुणास सहज मिळून जातं हो ...एखाद्याचं प्रेम ....
कुणी वाट पाहतं बसतं , कुणी वाटेला लागतं. कुणी व्याकूळतेने आतून ओक्साबोक्शी
रडत राहतं ...
क्षणभराचा सहवास हा .. कुणा एखाद्याचं जीवन आनंदाने फुलवू शकतो ...
आपलेपणाचा शब्द हि कुणा मनाला फार मोठा आधार होवू शकतो .
प्रेमाच्या स्पर्शाची जादूच न्यारी ......त्याबद्दल काय बोलावं.
नात्यानुसार त्या स्पर्शाची उब निराळी असते हो . . एखाद्याच जीवन त्यानं
सार्थकी लागू शकतं.
आपलं म्हणणारं आपलही कुणी आहे . ह्यातच किती सौख्य आहे .
जीवनात अनमोल एकच आहे ते म्हणजे प्रेम ....
कुणी त्यापासून वंचित असेल तर ते त्यास द्या ..........निर्मळ मनानं.. 
आनंद मिळेल ..त्यासही आपणासही....
मनातलं काही ..
संकेत य पाटेकर
२९.०७.२०१५


सरप्राईझ पार्टी ..

आयुष्यात चांगल्या मित्रांची साथ संगत लाभनं हे नशिबातच म्हणावं लागेल.
असे मित्र मला लाभलेत ह्यातच माझं अर्ध अधिकी जीवन सार्थकी झाल्याचं मी समजतो. 

हे मित्र लाभनं जस भग्यातलं समजावं तसं त्यांच्या शिवाय हे जीवनं जगण देखील
व्यर्थच म्हणावं लागेल.
नेहमीच कुठल्याही प्रसंगी तत्पर असणारे .
न बोलता , न सांगता, कधीही कुठे हि, कसेही , टपकणारे हे मित्र .
म्हणजे आपला एक परिवारच ....एक इवलंस पण मोठ्या मनाचं , मोठालं कुटुंब...
आपल्या सुख द्खाचा वाटा स्वताहून हिसकावून घेणारे ... हे मित्र ,
आपला मूड असो वा नसो ...पण नेहमीच आपली सोबत करणारे ..हे मित्र ,
कधी सगळ्यां समोर आपली टर्र उडवणारे , कधी हसवून खिदळवनारे , कधी योग्य तो
मार्ग दाखवून ,मार्गीस्थ लावणारे , छोट्या छोट्या गोष्टींवरूनही पार्टी
मागणारे... हे मित्र ,

खिशात दमडी नसतानाही , स्वताहून आपले पैसे भरणारे ....,राहू दे रे, ' घेईन
नंतर व्याजासकट अस मुद्दामहून म्हणनारे , पण दमडी हि न घेणारे.. हे मित्र ,
कधी चित्रपट पाहण्यास चल म्हणणारे, नाही म्हणताच ओढवून घेऊन जाणारे ,म्हस्का
मारणारे , अन CCD त कॉफ्फी पाजणारे हे मित्र ..

कधी टपरीवरचा चहाचा घोट घेता घेता तासनतास गप्पात रंगणारे ,
कधी मुंबईतल्याच सागरी किनारी सांजवेळी एकांतात हरवणारे हे मित्र ,

कधी सह्याद्रीच्या माथ्यावरून ओसंडलेल निसर्ग सौदंर्य न्याहाळत ,सृष्टीचं
गुणगान गाणारे हे मित्र ,
कधी प्रेमा सारख्या हळव्या विषयावरून ..बोलून टाक रे , आता तरी वेळ दवडू नकोस
, अस वेळेच गणित मांडून समजावून सांगणारे हे मित्र ,

बिनधास्तपणा राहणारे , बिनधास्तपणातच जगणारे अन जगण्यास शिकवणारे असे हे
टवाळ खोर (मुदाद्मुहून हा शब्द टाकतोय हा )मित्र ...

हे मित्र म्हणजे आपल्या जीवनातील सुखाची हर्षगुणी लाटच जणू .. ती लाट स्वतः
बरोबर, काही ना ना काही भरभरून घेऊनच येत असते . अन आपण त्यात थुई थुईनि
हर्षमुख होवून जीवनगाण गात असतो .

असेच काही माझे मित्र ..अन त्यांनी दिलेली हि सरप्राईझ पार्टी ..

रात्री साडे बारेचा ठोका , दरवाज्यावर ठकठकल्याचा आवाज आला .
इतक्या रात्री कोण असणार ? म्हणून मनात ना ना विचारांचा फडश्या पडला.
वाढदिवसाचा दिवस नुकताच टळून गेला होता.

रविवारची मध्यरात्र सुरु झालेली ..., रातकिड्यांची संगीतमय स्पर्धा सुरु झाली
होती. त्यांची किर्र किर्र सुरु होती. 
गावी असल्याने ..साहजिकच रात्री १० च्या आधीच सगळेच सामसूम असतं. (मी हि
होतो ) संपूर्ण गाव निद्रास्त असतं अश्यावेळी . अन अश्यावेळीच नेमकी ठक ठक ..ठक ठक
.....
सावध पाउलनिशिच हळूच दरवजा उघडला . बाहेर डोकावून पाहिलं .
अंधाराशिवाय काही दिसत न्हवतं .पण क्षणात 'हैप्पी बर्थ डे' चा नारा देत एका
पाठोपाठ एक मित्र हजर झाले. अन एकाकी आश्यर्यचा सुखद धक्का मिळाला.
रात्री साडे बारा ते एक दरम्यान 'बर्थ डे सेलेब्रेशन' सुरु झालं. फोटोशेशन चा
कार्यक्रम हि उरकला . अन त्यानंतर अडीच तीन पर्यंत गावाबाहेर ,काळोख्या
रस्त्यावरून ..भूता सारखे आम्ही भटकत राहिलो. भूत खोताच्याच गोष्टी करत ...
अशी हि मित्र मंडळी ...
दुसर्या दिवशी ...अथांग तळ्यात मनसोक्त पोहणं काय , नि शहरी पुन्हा येता
येता ...पवित्र भूमी उंबरखिंड चे दर्शन घेतो काय अन निसर्ग सौंदर्याची लयलुट
तृप्त भारल्या नजरेनेच लुटतो काय ...सारच न्यारं...मदहोश करणार ..
पण इतक असूनही एक ठिणगी मनाच्या तळ कोपर्यात तांडव करत होती. त्याने मनं
काहीसं ढासलेलं. एक जिवाभावाची जिवलग व्यक्ती आपला वाढदिवस, विसरतेच कशी?
ह्याचं शल्य मनास लागून होतं . अद्याप हि ..

भले हि आपण लहानच किती हि मोठे झालो तरी हे लहानपणातलं हट्टीपण काही मिटत नाही
हो . अन ते माझ्यात आताही आहेच .... ...त्यासाठी राग अनावर झालेला . 
पण तो आता हळूहळू ओसरतोय ....
कारण हक्काने भांडायला अशीच संधी लाभावी लागते . तीसोडायची नसते. अन ती मी घेतलेय .

मध्यंतरी (वाढ दिवसाच्या दिवशी ) मी काही वेळ मोबाईल बंद ठेवला होता .
त्यासाठी क्षमस्व ....

काहींचा फोन रिसीव्ह करता आला नाही . काही call करत होते पण तो लागला नाही .
काही मित्र नक्कीच रागावलेत . हे माहित आहे .

तुम्ही बिनधास्त भांडू शकता . हक्क आहे तो तुमचा ...
माझ्या सर्व मित्रांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद ....वाढ दिवसाच्या
प्रेममयी शुभेच्छांसाठी ..असंच प्रेम बहरू द्या ...दरवळत राहू द्या .
आपलाच ,
संकेत उर्फ संकु ..
२८.०७.२०१५
फोटो - संदेश कोयंडे

मंगळवार, १४ जुलै, २०१५

असंच काहीस मनातलं...

हा अमर्याद असा , विस्तारलेला निळाभोर आकाश , अन त्यावर , ना- ना विविध चित्रमय आकाराने नटाटलेली हि शुभ्रधवल गालिचं (पांढुरके ढग ) पाहून मनोमनं वाटतं . 
कधी टुणूक टुणूक , आपणही इकडून तिकडून उड्या घेत सर्वत्र हिंदडावं तर कधी , ती शाल पांढीरकी हळूच अंगा खांद्याशी लपेटून घेत निवांत पहुडावं .  

कधी कल्पनेचे गरुडपंख लावून ह्या भूतलाचे विहिन्ग्मय दृश्य डोळ्यात साठवून घेत मनास तृप्त करावं तर कधी बरसणाऱ्या त्या पावसाच्या सरींमध्ये , त्या उनाड वेड्या वार्यासंगे मुक्तपणे विहार करावं.
कधी अवचित फुलणाऱ्या त्या इंद्रधनु सोबत आपणाहून रंगाची मुक्तहस्ते उधळण करावी . तर कुठे स्वर गायनाचे सुरेल गीत गात पक्षी पाखरांसंगे आपणही लयबद्ध सोबत करावी.

ह्या सह्याद्रीच्या कड्या कपर्यातुनी धो धो कोसळणारा जल प्रपातांचा तो अविष्कार अगदी जवळून न्याहाळावा तर त्या टपोऱ्या थेंबे थेंबाचा शिडकावा अंगा खांद्याशी शीरशिरून घ्यावा .
असंच काहीस मनातलं...
संकेत पाटेकर
फोटो क्रेडीट - अनुराग उर्फ अन्या
ठिकाण - Sankashi किल्ला



नाती ...

ना ना विविध मनाच्या ह्या नाती .
सांभाळण खुप अवघड जातं. ओढाताण होते मनाची काही वेळा , काही प्रसंगी ..
प्रत्येकाचा स्वभाव निराळा ..प्रत्येकाचं मन वेगळ ,प्रत्येकाची विचार करण्याची
पद्धत वेगळी,प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या .., 
कुणी सहज समजून घेतं , चेहऱ्यावर सहजतेच हास्य उमलत , कुणी समजण्यापलीकडे जातं, नाक मुरडतं  ..रागाचा पारा चढवत...!
कुणी हट्टच धरून बसतं , कुणी गृहीतच धरून राहतं.
ओढाताण होते मनाची अश्यावेळी ..., कुठे कुठे लक्ष द्यावं , कुणा कुणाला
सांभाळाव .पण संभाळण भाग असतं... नाती हवी असतात .


कारण आयुष्य खूप सुंदर आहे. अन ते आपल्या अवती भोवती असलेल्या , आपल्या मनाशी
जुळल्या नात्यातील , त्या त्या व्यक्ती अन त्यांच्या आपलेपणाने अधिक सहज
सुंदर होवून जातं.


पण राहून राहून कधी प्रश्न पडतो ..
समजणारे , समजून घेणारे , अन प्रसंगी अगदी प्रेमाने समजून सांगणारे सारेच असले
असते तर ...
पण ह्या 'जर'- तर' ला अर्थच कुठे असतो म्हणा ....
ह्यातूनच मर्यादेची एक रूपरेखा आखली जाते , आपल्या मनाशी ..
कुणाशी किती अंतर राखून राहायचं ..कुणाशी किती बोलायचं ..कुणाच्या किती जवळ
जायचं .
असंच लिहिता लिहिता...
मनातल काही ..
संकेत य पाटेकर
१४.०७.२०१५

बुधवार, ८ जुलै, २०१५

निसर्ग आणि प्रेमं ..

ह्या निसर्गाचं एक वेगळंचं रूप आहे. अनेक गोष्टींनी तो अगदी स्वयंपूर्ण आहे.
त्याकडे काहीही कमी नाही. आपण बारकाईने , अगदी समरस होवून गोड कौतुकाने
त्याकडे पाहिलं . त्याला ऐकलं ना तर तो बऱ्याच गोष्टी कथन करत जातो.
आता हेच बघा ना ..!
कधी कधी ह्या हिरव्याशार वृक्षराजींच्या सहवासात असता , नजर हळूच सळसळनाऱ्या
, ' त्या पानांकडे एकवटली जाते.
अन मनात विचारांचा फुलोरा हळूच आकार घेत जातो.
किती प्रेम अन जवळीक आहे ह्या दोघांत , अन तितकीच उत्कंठा हि ...आगमनाची !
हा उनाड , खट्याळ वारा..
त्याच्या नुसत्या चाहुलीनं हि पानं- फुलं अगदी शहारून येतात.
लाजून मोहून ती अगदी थरथरून जातात . स्पर्शाची मोहिनी त्यांच्यावर झेप घेते
जणू...
एखाद्या प्रियकरांनं आपल्या प्रेयशीचा हात हळूच हाती घ्यावा. अन तिने त्या
स्पर्शानं अगदी शहारून जावं, हूरहुरून जावं. तशीच काहीशी चेतना अंगभर संचारली
जाते त्यांच्या ..
कुणीतरी येतंय , आपलं हसू खुलवायला ..ह्यानेच ते अगदी बेभान होवून जातात .
आनंदाने नाचू बागडू लागतात.
आपलेपणाची नाळ रोवून हा उनाड वारा हि न चुकता त्यांचा आनंद त्यांना तो देऊ
जातो. स्वार्थ बाजूला ठेवून...
एकमेकांशी त्याचं इतकं घन्निष्ट नातं जुळलेलं असतं कि काही वेळा हि पानं-
फुलं त्याच्या निस्वार्थी प्रेमापायी स्वतःची आहुती हि द्याला तयार होतात .
अन मग हा उनाड वारा हि मोठ्या धीरानं अन कष्टी मनानं त्यांना आपल्यासोबत
सामावून घेतो. वाहून नेतो.
असच काहीसं स्फुरलेलं..
- संकेत पाटेकर (संकु )
०८.०७.२०१५


गुरुवार, २ जुलै, २०१५

! पाऊस मनातला ...पाऊस आठवणीतला !

सकाळपासूनच साऱ्या सृष्टीवर मनावर सरसरनारा हा धुंद पाऊस...
'मनसोक्त भिजून घे रे ' अस जणू काही वेडावूनच सांगत होता . पण मी आपला स्तब्ध ,  एकाच जागी . ..अधीर मनानं सृष्टीच्या ह्या नवंलाईचं रूप डोळ्यात साठवत होतो . त्याशिवाय पर्याय हि न्हवता म्हणा . म्हणावं तर हे तनं मनं तर केंव्हाच आतुरलं होतं . चिंब भिजावं , मनसोक्त बागडावं म्हणून ..पण ठरली ऑफिस वेळ, नाईलाज .... काय करणार ..!

खिडकीतून दिसणारा , झाडांच्या पाना फांदीतून ओघळनारा , टपटपनारा , मोत्यावाणी 
नितळ असा तो थेंबे थेंबे पाऊस मी नजरेनेच काय ते टिपत होतो .
नजरेनेच प्राशन करत होतो. पण तरीही हे मनं काही तृप्त होईना .
अन त्याह्यानेच दुपारच्या मधल्या सुट्टीत (लंच ब्रेक मध्ये ) पावसाच्या रिमझिमत्या टपोऱ्या 
थेंबाचा मारक स्पर्श , अगा खांद्याशी घेऊ लागलो . त्याने काहीसा सुखावलो... वेडावलो . अन निच्छलं मनानं एका  ठीकान्याहून सृष्टी सौंदर्याच हे वेड रूपं टकमकतेने न्यहाळू लागलो.

साऱ्या जीव सृष्टीशी सुत जुळवनारा हा बेंधुंद पाऊस, ' हलक्या सरीनिशी अजूनही तसाच बरसत होता ,वाऱ्याचे मंद झोके त्याला हळूच वळवणी देत होते. मृदल माती अजून मृदू झाली होती. न्हाहून निघालेल्या वृक्ष वेली, अन थरथरत्या पानसळीतून टपटपनारे थेंबाचे टपोरी रूप, एखाद्या मोत्यावाणीच लकलकुन दिसे.  
तर वृक्षराजींच्या पायथ्याशी , भूसभूसित मातीतुनी एक ढंगाने,  एका चालीने मार्ग काढत  , चालीलेली मुग्यांची  पोटापाण्याची लगभग मनास शिस्तीचे डोस देऊन जाई.
कोकीळाची मंजुळ कुहु अधून मधून कुठ्नशी कानी येत, तशी हृदयाची स्पंदन वेडावत ,त्या लयात ती धडधडत.
एखाद इवलसं फुलपाखरू कुठसं बागडता दिसे, तेंव्हा मन त्याकडे आकर्षिले जाई ,
अन मनोमनं म्हणून जाई , किती छानुलं आहे ना ते !
सौंदर्याची रूपरेखा आपल्या पाठीशी घेत ते कस निवांत बागडत आहे बघ ! 
आपल्या मनाशी ना ना विविध रंग भरत..!
सृष्टीचं हे असलं वेडावलं रूप मनास भोवत होतं.

ऑफिस बाहेरचा परिसर पावसाने असा उजळून निघाला होता.
एखादी नदी , दुथडी भरून वाहत जावी तशी रस्त्यावरून 'वाहत्या' पाण्याचा प्रवाह एकीकडे खळखळू लागलेला .
त्या खळखळून वाहणाऱ्या प्रवाहाकडे पाहून , एकाक्षणी वाटलं कि लहानपणी केली ती दंगा   मस्ती , मौज मजा , त्या गमती जमती,  तो आनंद, आपण पुन्हा का लुटू नये ?
का पुन्हा लहान होऊ नये  ? लहानपण प्रत्येकात दडलेलं असतंच ना …
 भले हि आपलं  वय वाढत राहो.

एखादी कागदाची होडी करून (मग ती नांगर होडी असो वा राजा राणीची) वाहत्या प्रवाहात ती सोडून त्या पाठोपाठ धावून , टाळ्या पिटून, ‘ त्या क्षणाचा आनंद’ जो आपण आपल्या लहानपणी लुटायचो, ‘ तो आता ह्या क्षणी हि का बर्र लुटू नये ?
तो आता ह्या क्षणी हि लुटून घ्यावा . ह्या गोष्टीवर मनाचं विचारविनिमय सुरु झालं .
अन मनाने एकदाचा काय तो निर्णय घेतलाच.  
त्यासाठी ते कागद धुंडाळू लागलं. नजर शोध घेऊ लागली.  अवती भोवती भिरभिरु लागली .
पण कागदाचा तुकडा कुठेच  मिळेना.  त्यात भर म्हणून कि काय , 'एक प्रश्न (अश्यावेळी टाळक्यात गजबजलेलाच असतो) मनाशी पुन्हा डोकावू लागला.
लोक काय म्हणतील ? उगा पाहून हसतील, राहू दे , जाऊ दे…!
मन काहीस खट्टू झालं .   देवाशी गार्हान गावू लागलं
लहान पण देगा देवा ... हे लहान पण दे!
तितक्यात नजर हि  घडल्याकडे स्थिरावली , त्यानं भानावर आलो .. लंच ब्रेक संपला होता . 
पटापट ऑफिस मध्ये धाव घेतली . अन पुन्हा कामास जुंपलो.
पण हा पाऊस अजूनही मनावर रुंजी घालत होता.
ये पुन्हा ये ..धाव घे…
संकेत य पाटेकर
१०.०७.२०१५

ई मेल – sanketpatekar2009@gmail.com

बुधवार, १ जुलै, २०१५

आधुनिक जगाच्या गुजगोष्टी ...

Whatsapp वर एखाद तरी अशी जिव्हाळ्याची व्यक्ती असतेच , जिथे आपण दिवसभरात 
कितीतरी वेळा तिच्या Profile मध्ये डोकावून पाहत असतो . 
मग त्या व्यक्तीचा मेसेज येवो अथवा ना येवो ...आपण तिथे डोकावणारच 
आणि डोकावतोच ..अधून मधून ..wink emoticon 
कधी उगाच स्टेटस पाहणार , कधी लास्ट सीन , कधी profile pic , कधी असच..
चैनच पडत नाही म्हणा , wink emoticon wink emoticon
त्या मध्ये काही वेळा गम्मत अशी होते , कि नकळत whatapp calling वर क्लिक
होतं अन call लागला जातो . tring tring .....
अन त्यामध्ये आपली पुन्हा झटपट ...तो call end करतना होतेच होते .
तुमची हि असेलच अशी जिव्हाळ्याची व्यक्ती wink emoticon
whatspaa_ जग
- संकेत उर्फ संकु