सोमवार, १९ ऑगस्ट, २०१३

I have done Big mistake in my life''


''I have done Big mistake in my life''
सकाळ्च मोबाईलची रिंग खणखणू लागली.
इतक्या सकाळच कुणाचं call म्हणून मोबाईलकडे सहज नजर फिरवली , नंबर ओळखीचाच होता. आलेला call रिसीव्ह केला . आणि बोलण्यास सुरवात केली .
नित्य नेहमीचाच आवाज सुरवातीला वाटला , पण हळू हळू शब्दातली गंभीर भावमुद्रा मनावर उमटू लागली .
पुढे शब्दांसोबत अश्रूंचाही बांध फुटू लागला . तसं तसं चेहर्यावर प्रश्नार्थी भाव उमटू लागले.
'' संकेत मी आयुष्यात फार मोठी चूक केलेय.
'I have done Big mistake in my life, feeling guilty n upset ''
तिच्या ह्या एकएक शब्दांसोबत अश्रुथेंब हि वाहत होते . तुटक तुटक शब्दात ती बोलत होती.
'' संकेत, कुणासाठी खरचं compramise करू नकोस , sacrifice करू नकोस , त्यांना त्याची काहीच किंमत नसते .
तिच्या ह्या वाक्यात मात्र सत्यता होती . आयुष्यात कधी अशी एखादी व्यक्ती येते . जिच्यावर आपला जीव जडला जातो. एक घट्ट नातं जुळल जातं. ज्या साठी आपण बऱ्याच गोष्टी सर्वस्वी पणाला लावतो . पण शेवटी त्या व्यक्तीला आपल्या ह्या साऱ्याची काहीच किंमत नसते . अस जेंव्हा कळत तेंव्हा मनाचं संतुलन साहजिकच बिथरत .
अशा वेळेस झालं ते विसरून , काय तो त्यातून बोध घेऊन आपल्या पाउल वाटेने पुढे निघत जायचं. आयुष्याचा एक तो भाग होता अस समजून पुढे निघायचं. बस हेच हाती असत .
आयुष्य असंच अनेकानेक चांगल्या वाईट घटनांनी भरलेलं आहे . त्यात अडकून न राहता हसत खेळत पुढे चालत राहण आणि इतरना हसवत राहण हेच जीवन आहे .
मनातले काही ...
नातं तुझं माझं
संकेत पाटेकर
१२.०८.२०१३

शनिवार, १७ ऑगस्ट, २०१३

शिकून सुद्धा अडाणी ...ते अडाणीच


शिकून सुद्धा अडाणी ...ते अडाणीच व्यवस्थित टापटीपपणा आणि सूट बुटात असणारी एखादी व्यक्ती ..घरात , ऑफिस मध्ये व्यवथित वागेल . पण घर बाहेर पडताच .... एखाद्या ना समज मुलासारखी .... अक्कल नासेलेली आपण इतकी पदवी घेतलेय शिकलोय ह्याच त्यांना काहीच मुल्य नाहि ., खर तर लाज वाटायला हवी . आपण जे काही करतोय त्याची ... तुम्हाला वाटेल मी काय हे वायफळ बडबडतोय ........काय लिहितोय , खर तर मित्र मंडळी ... एक साधासाच विचार आहे . पण खरच शिस्तीची गरज आहे .
जाता येता रस्त्याने आपणास एक चित्र नक्कीच पाहायला मिळत असेलच . एखादी व्यक्ती एखद्या दुकानातून काही खाद्य पदार्थ विकत घेते , आणि त्याने पोट तृप्ती झाल्यानंतर त्यातून निर्माण झालेला केरकचरा , कागदाचा एखदा बोळा असो , प्लास्टिक असो , टरफलं असो वा इतर काही ...आपल्या आसपास कुठे हि टाकून पसार होते . ह्याउलट तंबाकूच्या पिच्कारया उडवण ..असे प्रकार हि सर्रास दिसतातच .
बस मध्ये म्हणा , ट्रेन मध्ये म्हणा , रस्त्याने चालताना म्हणा , driving करत असतना म्हणा एखद्या ऐतिहासिक स्थळी म्हणा ........ह्याना शिस्त नि नीती मुल्य ती नाहीच.
घरात ह्यांच्या स्वच्छता , टापटीपपणा , पण घरा बाहेर सार्वजनिक ठिकाणी घाण करायची .
हे शोभत का ? हा प्रश्न स्वतःने स्वतःलाच विचारा ? रस्त्येन चालताना आपणच एका ठिकाणी कचरा करायचा ...आणि तिथे कचर्याचा ढीग साचल्यावर मात्र दुसर्यांच्या नावावर बोंबा मारायची . हे असे प्रकार .. निदान शिकलेल्या माणसांनी तरी शिकल्या सारखं थोडं तरी वागा.
जिथे स्वच्छता असते , तिथले वातावरण हि छान , मोकळ असत . मनाला ताजतवान करणार . देशात अनेक प्रश्न आहेत . पण सर्व प्रथम खरच मुल्यशिक्षणाची गरज आहे .
चला तर मग स्वच्छतेची शिस्त पाळू ......
- संकेत पाटेकर
१७.०८.२०१३

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१३

वाद हे होतंच असतात . एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती हवी .


रागापेक्षा देवाने प्रत्येकाला सामंज्यसपणा अधिक दिला असता ..तर मला वाटतं कित्येक नात्यांमधली जवळीकता नि त्यातली माधुर्यता कायम तशीच टवटवीत राहिली असती.
व्यक्ती व्यक्ती दुरावल्या नसत्या .......नात्यातला सुगंधितपणा तसाच निखळपणे दरवळत राहिला असता. पण हल्ली अस घडतं नाही . ऐकमेकांच कुणी ऐकूनच घेत नाही ? समजण्याइतपत माणसं आहेत तरी कुठे ? एक ऐकतो नि दुसरा संतापतो ..मग दोघे हि एकेमेकांशी ऐकेनासे होतात. हा वाद इथेच मिटत नाही ,तो तसाच ज्वलंत राहतो. जोपर्यंत जो तो एकमेकांपासून दुरावत नाही .
पूर्वी एकत्रित कुटुंबीय पद्धत असे .., आजही आहे , मी नाही अस म्हणत नाही. पण मोजण्या इतपतच असे काही कुटुंबीय असतील. बहुतेक जण हल्ली ह्या धावत्या पळत्या दुनियेत ...एकमेकांपासून दूर असलेलंच पसंद करतो.
नात्यातली सुवासिकता हरवून बसतो. काही वेळा अस करणं भाग हि असत. मी घरातल्या प्रत्येक व्यक्ती बद्दल बोलतोय . आई - बाबा - भाऊ बहिण , मोठा भाऊ - वाहिनी - जे कुणी घरात असतील .
वाद हे होतंच असतात . एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती हवी .
- संकेत य पाटेकर

प्रश्न पडल्यावरच त्याची उत्तर शोधावी लागतात .
- संकेत

जगावं तर ह्या पावसा सारखं..


जगावं तर ह्या पावसा सारखं.. कुणी काहीही बोलो , त्याला हवं तेंव्हा तो बरसतो . हवं तेंव्हा येतो , हवं तेंव्हा निघून जातो . कुणी त्याला चांगलं म्हणत, तर कुणी शिव्या शाप देतं. पण तरीही तो सर्वांना हवा असतो . त्याच्या असण्यातच बऱ्याच गोष्टी सामावलेल्या असतात .
म्हणून... जगावं तर ह्या पावसा सारखं... कुणी कितीही काहीही बोलो , आपल्या परीने आपण जगायचं . पण जगता जगता ह्या पावसा सारखं , तो जसा सर्वांना हवा असतो , तसं आपण ही सर्वांना हवे असू , असंच काहीतरी करत राहायचं .
- संकेत य पाटेकर

जिथे शांतता नांदते .....तिथे मनाची एकाग्रता वाढते ...!!

तारुण्य...


तारुण्य, तरुणपण हि अशी स्थिती आहे , जिथे घरातील जबाबदारयान सोबत , घरा बाहेरील येणाऱ्या जबाबदाऱ्यांच , तसेच समस्यांचं , अडचणींच .. प्रेम , नातं , नात्यातील भावनिक गुंत्यांच , अशा अनेकानेक गोष्टींच भार मनावर एकाच वेळी दडल जातं.
अशा वेळेस मनाचा संतुलन बिघडण्याची शक्यता हि नाकरता येत नाही . पण अशा हि परिस्थितीतून , ह्या साऱ्या गोष्टीतून जो स्वतःला सावरतो .....व्यवस्थित सार हाताळून जो पुढे जातो तो आयुष्यात यशस्वी होतो .
- संकेत य पाटेकर