शनिवार, १४ मार्च, २०१५

'' अरे, ऐकतोस ना रे...''

'' अरे, ऐकतोस ना रे...''

एखाद्या स्वप्नवतं  दुनयेत गाढ असता  अचानकपणे जाग यावी अन ते स्वप्नचं कोलमडून जावे  तसंच  काहीसं आयुष्यात कधी  घडतं  .
आयुष्यातले ' रंग ' एकाकी  बदलतात..  अन होत्याच न्हवतं  होवून जातं. 
'क्षणा' चा  हि  विलंब न लागता...
अशीच एक रविवारची रात्र ,हास्य आनंदा कडून वेद्नेकडे झुकलेली ...

रात्रीचे साधारण सव्वा आठ  होत आले होते ..
पनवेल स्थानकाहून ठाण्यासाठी आम्ही  लोकल पकडली अन सीट वर  निवांत बसते झालो. .
रेल्वे रुळावरून लोकलं अगदी धीम्या गतीनं  पुढे सरत होती.
डब्यात कमी अधिक रेलचेल  होती.
हळू आवजात  कुणा एकेकाची,  आप आपसात   कुजबुज चाललेली .
कुणी मोबाईल मध्ये डोकावलं  होतं. कुणी एकांतात हरवलं होतं.

आम्ही हि  आजच्या दिवसभरातल्या गोडव्यात अगदी मंत्रमुग्ध  झालो होतो.
निसर्गाने देऊ केलेला  आनंदाचा रसाळ  प्याला नुकताच प्राशन करून मनं  तृप्त झालं होतं.  
त्यामुळे तना- मनात  आनंदाचे  लहरी वारे अगदी सुसाट वेगाने वाहू लागले होते.

म्हणावं   तर आजचा ट्रेक अगदी  प्रसन्नतेच्या वावटळात फिरक्या घेत पूर्ण झाला होता .
निसर्गाने आज असे काही रंग उधलेले होते  कि काय बोलावं  अन काय नाही, अशी ह्या मनाची स्थिती झाली होती.
किती सुंदर वातावरण होतं ते  ..!

न बोलविता  हि , ‘ कधीही , अवेळी दाखल होणाऱ्या  पाहुण्या मंडळीसारखा  हा वेडापाऊस...
कधी रिमझिम कधी धो धो बरसत  लोकांच्या  सहनशीलतेचा अंत पाहतो .  
तर  दुसरीकडे  जीव सृष्टीला  ना ना विविध अलंकार परिधान करत  लोकांकडूनच  अमाप  सौंदर्याची वाहः वाहः अन  कौतुकाची वारेमाप थाप मिळवत राहतो.

आजचा आमचा दिवस  अश्याच अलंकार चढवलेल्या लावण्यावती प्रमाणे नटाटला होता.
त्याने सगळेच मोहित झालो होतो. सृष्टी सौंदर्याचे अमाप सुख मनी ढवळत  होतो.
त्यातच  रममान होतो ...

तोच एकाकी ..हृदय पिळावनारं   वाक्य कानी पडलं.

'अरे,  ऐकतोस ना रे '
क्षणात ह्या वाक्यांनी हृदयावर एक घाव घातला  अन वेदनेची ठिकरी उडाली..
नजर त्या आकृतीकडे स्थिरावली.

एखाद्या  फळा फुलांनी बहरलेल्या,  अन गर्द छायेंनी नेहमीच
आपलसं  करणाऱ्या, ' वृक्षावर 'आपल्या नजरेदेखत कुर्हाडीचा कत्तली  घाव   पडावा अन काळजात कळीची चर्र  उठावी  तशी काहीशी स्थिती  झाली होती. काळजाला एक एक शब्द ते भिडले होते.  

'अरे,  ऐकतोस ना रे...  , ऐक ना , थांब ना ..'

ती माउली कळकळीने  हाक देत होती.  आपल्या पाठमोऱ्या मुलाकडे पाहत.
पण तो तसाच चालत सुटला , आईचे ते  बोल ऐकूनही न ऐकल्यासारखं  करत,   मागे जराही वळून न बघता ..
तेंव्हा मनात विचारांची गस्त सुरु झाली.

कशी हि  माणसं असतात, काळीज  नावाचं  प्रकार असत कि नाही त्यांच्याजवळ , काही कळत नाही  .. तो एक प्रश्न चिन्हच  ?
जिथे काळीज नावच मनचं नाही तिथे ती आर्त हाक तरी कशी पोहोचणार, कशी भिडणार ?

काळजाची आर्त हाक कळायला आधी 'काळीज'   असावं  लागत तेंव्हा ती  हाक  काळजाला जावून भिडते.
पण कुणास ठाऊक त्या तरण्या मुलाकडे ते नसावं  ?
अन्यथा तो असा चालत सुटला नसता . ..मागे न वळता  ..त्या माउलीच्या डोळ्यात आसवे निर्माण करून ...

ती माउली मात्र तिच्या वेगानं धापा टाकत त्या पाठोपाठ लोकल मधून उतरती झाली .
'अरे थांब ना ' ऐक ना रे ... अशी आर्त हाक मारत,  हृदय पिटाळत...त्या  पाठोपाठ...

क्षणभर नजर   तिथेच  खिळून राहिली. ..त्या पाठमोऱ्या आकृतीकडे ..त्या माउलीकडे.. त्या क्षणाभोवती रेंगाळत ..
विचारांचं  काहूर  माजलं मनात  ...
अवघा क्षणाचा तो प्रसंग ...मनावर घाव करून भळभळती जखम देऊन गेला.

हे काळीज...खरच फार हळवं असत ..फारच  हळवं...

भावनेनं  उतू गेलेलं,  प्रेमानं ओथंबून वाहिलेलं
कुणा ना कधी कळलेलं , एकांतात कायम गढलेलं

शब्दांशी मिसळलेलं , काळजाशीच  नडलेलं
आक्रोशांनी  रडावंलेलं  , स्वतः वरच  हास्यांलेलं 

बंध  नात्याशी जुळलेलं , कधी कुठे भांडलेल
क्षणात तुटलेलं..अन दुभंगून उरलेलं, दुरावलेल .

हे काळीज...खरच फार हळवं असत ..

संपल ते सगळ नाट्य , संपल सगळ  .... डोळ्यात देखेतं...घडलेलं.. क्षणापूर्तीच..   .

गाडीने हळूच वेग घेतला  अन ती पुन्हा धावू लागली.
काही क्षणाआधी ,नजर भेट झालेली ती मंडळी...
ती माउली ,  तिचा  तो  मुलगा ..अन ते वाक्य , तो सारा प्रसंग मनात  तसच तरलत राहिला.

काय घडलं असेल त्या  बंध त्या नात्यात....ते माहित नाही .
पण त्या  माउलीच्या काळजाची ती आरोळी  मात्र मनास अजूनही खूप यातना देते....कळवळत मनं त्यानं..
 
आई वडील , जन्मदाते आपले , अनेक स्वप्नं बघून , सुखाचा त्याग करून , काबाड कष्ट करून  लहानाचं  मोठ  करून वाढविलेलं.
त्या माउलीच्या मनाची साधी हाक, ती कळकळ   आपण ऐकू नये ...  त्यास प्रतिसाद देऊ नये .तिला तसच एकट सोडूनी निघून जावे  ..
काय  बोलावं  ह्या उपरी ..शब्द नाहीत ....

आपलीच माणसं  जेंव्हा आपल्याशी अशी तर्हेवाईकपणे वागतात..
तेंव्हा खरंच गुदमरत मनं ..

संकेत य. पाटेकर

१५.०४.२०१५

शनिवार, ७ मार्च, २०१५

'घर'चे अन 'घर' च्याबाहेरचे..

२०१२ ला लिहिलेली हि एक पोस्ट..

काल योगायोग म्हणा , माझं  नशीब म्हणा ...
माझं ज्या व्यक्तीवर मनापासून अन जीवापाड प्रेम आहे त्या व्यक्तीची नि माझी बरेच दिवसाने भेट घडली.

तसं हे मनं नेहमीच आतुरलेलं  असतं. जिच्यावर आपल जीव असतो ...भरभरून प्रेमं  असत .
त्या व्यक्तीच्या भेटीसाठी ..
आपलेपणाचे तिचे गोड प्रेमळ  शब्द ऐकण्यासाठी ...
तिला भरभरून नजरेनी पाहण्यासाठी .....
तिच्या सहवासाच्या चाह्येखाली निवांत पहुडण्यासाठी ..
मग ती  कोणत्याही नात्यातली व्यक्ती असो .........प्रेम माणसाला त्या रेशीम बंधनात अडकवून ठेवतो ..

काल ती भेटली.
नाही नाही  मीच भेटलो तिला   .. .सायंकाळी.
रिक्षाने घरी परतत असता,  वाटेतल्या  रस्ताच्या कडेला फोन वर कुणाशी तरी बोलत असता दिसली.
बस्स तेंव्हाच ठरवलं आज हिला भेटूनच जायचं . मनातल सारं  बोलून टाकायचं .
तसं हि मनात मी काही ठेवत नाही . तरीही वाटत मनातल्या त्या भावना,
ज्या सतत वादळासारखे घुन्गावत राहतात  ते बोलून द्याव अन शांत करावं  ह्या वादळी मनाला .

तसं  बऱ्याच दिवसापासून ..कित्येक महिन्या पासून पाहतोय.  तिचं वागणं, तिचं  बोलणं..
 बदललंय...खुपसा फरक पडला आहे .
पूर्वीची  अन  आताची ती... ह्यात...

क्षण हे असे का , का बर्र बदलावेत,  अस राहून राहून वाटत कधी .
सुखाचे अवघे क्षण ..ते हि अगदी मोजून अन दुख हा  पाठशिवणी सारखा मागेच सतत... का हे अस ?
का हे क्षण असे बदलतात ?
असत्याच न्हवतं  करून टाकतात . एखाद्या मनाला घुसमटून देतात ?

कुठे ते हास्य लहरीत गुंफलेले , बहरलेले  सोनेरी  क्षण ? अन कुठे हे अत्ताच्चे तळपत्या उन्हात पार काळपटून गेलेले  मरगळलेले  निरुत्साही क्षण....

परिस्थिती सार वेळ , वेळेनुसार  परिस्थिती  अन वेळ- परिस्थिती  नुसार माणसाचे आचार विचार , त्याचं   वागणं , बोलणं सार काही बदलतं.
अन ह्याचा होणारा परिणाम त्या व्यक्तीसोबत इतर  मनावर हि होतोच.
हे नातच तसं असत .
म्हणून आपण हि आपल्याच विचारात बुडतो. आठवणीचं  गाठोड हळूच उघडून  स्वताहाशीच  संवाद  साधत.

किती सुंदर आणिक सोनेरी क्षण होते ते ..किती आनंद..अन उत्साहाने  बहरलेले  दिवस होते ते ....
पण सांर  अचानक कुठे गेलं ? कस गायब झालं.
बहरलेला तो हास्य गंध कुठे नाहीसा झाला ? .कुठे गेले ते दिवस ?
मन  चाचपडतं  ..गढून जातं  त्या अश्या असंख्य विचारांच्या भाव गर्दीत ....

काल ती दिसली .
रस्त्याच्या कडेला उभी कुणाची तर प्रतीक्षेत....मी  रिक्षाने जात असता ,तेंव्हा ठरवलं आज भेटूनच जावू तिला ..कित्येक दिवस भेट न्हवती .म्हणून रिक्षातून उतरलो नि थेट तिच्या समोर उभा राहिलो.

क्षणभर तिच्या चेहऱ्यांकडे नजर खिळून राहिली.
असंख्य विचारांच्या छटा अन कुठल्यातरी विवंचनेत असलेला तिचा  हताश,  निराश,अन थकलेला निरुत्साही चेहरा पाहून मन काळवंडल अन मनोमन म्हणून लागलं.

हीच का ती ? हसऱ्या  मनाची ..खेळकर वृत्तीची, माझी प्रिय अन प्रेमळ...

काही वेळ  तसाच अगदी  शांत उभा  होतो तिच्या  चेहऱ्यावरील  भाव टकमकते ने  निरखत .
काहीच क्षण असेच गेले... निशब्दतेत..  पण मीच पुढे  बोलण्यास सुरवात केली .

मनात असलेल्या अनेक विचारांना , मनातल्या शंकांना अन माझ्या त्या प्रेमळ रागाला तिच्या समोर कसं   मांडाव , कसं  व्यक्त करावं हाच  एक मोठा  प्रश्न होता.
त्यातही तिची ती अवस्था पाहून खरचं  आपण आता बोलावं  का ? बोलत व्हावं का ?
अगोदरच ताणतणावा खाली असेल , अन अस असताना आपल्या बोलण्याने तिला अजून त्रास झाला तर ? ह्याविचाराने मन पुन्हा हळवं झालं. पण ना ना म्हणता मी बोलण्यास सुरवात केली.

कशी  आहेस ?
ठीक...
एक विचारू ?
बोल  ...,
का अशी वागतेस ?

संकेत , Please..
मला पुन्हा पुन्हा ह्या गोष्टीत खेचू नकोस.
अंतर मनाला  भिडलेल्या त्या माझ्या प्रश्नांनी तिला बोलतं  केल.

मी अगोदरच खूप ताण तणावात आहे . मलाच नकोस झालं  आहे सगळ .
तूच बघतोयस ना ..

क्षणभर ती  थांबली , एक निश्वास टाकत पुन्हा बोलती झाली .

'संकेत,  खरच इतकं जीव नको लावूस  कुणावर...
हव तर घरच्यांवर जीव लाव   , पण  बाहेरच्यांनवर  नको ....'

ह्या तिच्या शब्दांनी काळजावरच  घाव पडला.
मग तू घरातली नाही आहेस का . ? तिच्या प्रश्नाला कसबसं उत्तर देत मी म्हटलं .

ह्या प्रश्नवार तिने उत्तर दिल नाही. पण पुढे बोलत राहिली.

काही नाही  रे मिळत ह्यातून... . त्रासाच होतो खूप ....
मनातल्या  सार्या अनुभवी क्षणांना  एकवटून  ती पुन्हा बोलती  झाली

तुझ्यात आता 'मी' पाहतेय ...'संकेत'
माझ्या जागी  आता तू आहेस , वेड लागेल अश्याने .. . त्रास होईल खूप  ..नको जीव लावूस माझ्यावर . 
खरच ...
क्षणभर सगळ शांत झालं.....
पुढे काय बोलावं ते माझाच मला  कळेना .

मी तसाच हताश अन पोखरल्या मनाने तिचा निरोप घेत मागे फिरलो.
मनात पुन्हा विचारांचं वादळी वादळ  उठल.

इतके दिवस ती मला का टाळू पाहते ह्याच कारण आज मला मिळाल होत .
का तर तिच्यासारखं मला हि तसा त्रास होऊ नये,  त्या ताणतणावातून मी जावू नये म्हणून ..
माझ्या काळजी पोटी .. इतक्या तळमळीने ती बोलली  आज...

तिने तिच्या परीने माझा विचार केला होता . पण माझ्या मनाची वेदना काय  कशी बर सांगावी ....
मला त्रास तर होणारच...मी तयार हि आहे त्रास सोसायला.

पण असं टाळाटाळ नको.....आपलेपणात तुट नको...दुरावा नको ..
मनापासून प्रेम आहे ग ...

अन प्रेमं  हे आंधळ असतं. अन ते घरातले अन बाहेरचं असं   बघून कधी होत नाही .
नाती हि रक्ताचीच असतात असं हि नाही .
मनात घर केलेली माणसं  हि  तितक्याच रक्तमोलाची , प्रेमाची  अन ..आपलेपणाची ...

नातं कुठलेही असो   एकदा ते जुळलं कि ते शेवटपर्यंत निभवावं.
प्रेमाचं पारड  हि शेवटच्या श्वासापर्यंत ... तोलून राहावं
भले त्यात कितीही खाचखळगी   येवोत.

माझ प्रेम हि असंच आहे . भले त्यात थोडा स्वार्थ असेल पण ते निखळ आहे अन तसंच राहील शेवटच्या श्वासागणिक ....

संकेत य पाटेकर
मनातले काही ...
११.०९.२०१२