बुधवार, २१ जानेवारी, २०१५

ते ओघळते अश्रू थेंब....

शनिवार , संध्याकाळची वेळ . साधारण ६ वाजत आले होते.
माटुंगा स्थानकात एका मित्राची वाट पाहत बसलो होतो . पाच एक मिनिटे बोलूनही तो अद्याप आला न्हवता . त्यामुळे रिकामा वेळ , मोबाईल हि हाती पण त्यात न रेंगाळता नजर इकडे तिकडे सहजच भिरभिरत होती.
नित्य नेहमीच्या ठरल्या वेळेप्रमाणे लोकल ये जा करत . त्यातून नवं नवीन चेहरे पायऊतार होई . तेंव्हा नजर आपुसकच त्या येणा जाणाऱ्या चेहऱ्यावरील , विविध रंगी भाव छटा टिपून घेण्यात मश्गुल होई, अशातच काही वेळ निघून गेला. अन एके ठिकाणी अचानकपणे मनाच्या अंतरंगाला एकच घाव बसला ते ताडकनं जागं झालं . काहीसं कळवळल हि...
त्या ''ओघळत्या अश्रू थेंबानी ''
अश्रू आनंदाचे ,
अश्रू वेदनांचे,
अश्रू धडधडनाऱ्या,
हृदयी स्पंदनांचे

नजर स्तब्ध झाली. एकवटली, त्या वेदनामय अश्रू थेंबाकडे... काय झाले असेल ? का ,असे ओघळतायेत, हे अश्रू थेंब ? न थांबता , आळी पाळीने लगातार ...
काय कारण असावं ? का ?
'क' ची बाराखडी सुरु झाली. तिच्या अंतरंगाचा, मनाचा आढावा घेत.
साधारण ३० एक वर्षाची ती विवाहित स्त्री , मनातले हुंदके तिला अनावर होत होते. इतके कि आपण रेल्वे परिसरात , सार्वजनिक ठिकाणी , ऐन गर्दीत , फलाटावर उभे आहोत हे माहित असूनही त्या अश्रूं थेंबांना , तिला आवर घालता येत न्हवता. ते मोकाट सुटले होते.
वेदनामय हाल अपेष्टा सहन करून , भोगून ...जणू मुक्तीच्या दिशेने ...गालावरून सरसर......सरसर...धाव घेत.
मनातल्या हृदयी भावनेला जरा तरी कुठे असा धक्का लागला कि अश्रूचा बांध फुटतोच फुटतो . मग ते ठिकाण एकांतातलं असो वा सार्वजनिक कुठलही ..त्या आतल्या भावनेस रोकता येत नाही . ते ओघळतातच ...अश्रू रूपाने ..
हे अश्रू हि असेच.....भावस्पर्शी , ओघळते ..
मी ते टिपून घेत होतो . माझ्या मनाच्या भावपटलावर. ह्या पलीकडे काही करता येत न्हवतं . अन करू हि शकत न्हवतो . काय करणार मी ? काही क्षण असंच टकमक पाहत राहिलो.
मोबाईल च्या स्क्रीनवर एक वेळ ती पाही अन पुन्हा , वेदामानय हुंदके तिला अनावर होई . अन तिच्या अश्रूंचा बांध फुटे. ते दडवण्याचा ती प्रयत्न हि करे ..पण व्यर्थ ..., कसल्या तरी गहिर्या वेदनेने तिला वेढून धरलं होतं. त्यातून सुटका मात्र होत न्हवती. भरीस भर म्हणून कुठेतरी हृदय चिरणार हिंदी गाण हि नेमकं त्याच वेळेस सुरु होत.
मी ते पहात होतो . न्हाहाळत होतो. ऐकत होतो .
काही क्षण असेच निघून गेले अन पाटोपाट धावणाऱ्या एका लोकल मध्ये ती हि तिच्या वाटे ....पुढे झाली. मनात , त्या क्षणाची छबी ठेवत. ना- ना विचारांना उमाळा देत.
आयुष्यात खरचं सर्वात अधिक जर वेदना होत असतील तर त्या आपण, आपलं म्हणून घेणाऱ्या, अन आपल्या असलेल्या, त्या जीवापाड व्यक्तीन मुळेच.
जिथे प्रेम तिथे वेदना ह्या आल्याच . जसं प्रेम निखळ आनंद देत तसं ते कळवळनारया न शमनारया वेदना हि देत. नात्यांची हि मोतीमाळ, कधी कधी अश्रूंच्या ह्या भावगंध दवबिंदू नि न्हाऊन निघते. प्रेमाचा ओघळता वर्षाव जणू.....
प्रेम प्रेम प्रेम अन प्रेम ...
प्रेमात माझ्या, हृदयी स्नेह बंध
डोळ्यात तरळते, तुझेच प्रतिबिंब
संकेत य. पाटेकर
२१.०१.२०१५
खालील इमेज हि अंतरजालातून घेतली आहे.

बुधवार, १४ जानेवारी, २०१५

कट्ट्याचं नुतनीकरणं- अन आठवणीतले ते क्षण ..

कट्ट्याच नुतनीकरणं- अन आठवणीतले क्षण
'पुष्पक कट्टा'
एकदा का लिखाणाला सुरवात केली अन शब्दांशी सुत जुळले कि ना -ना विविध विषय आपुसकच मागे मागे धावून येतात . मग ते कधी कुठे कसे ... ते काय सांगता येत नाही. आसाच हा एक विषय काल रात्री अचानक डोक्यात भूनभुनला अन म्हटलं चला ह्यावर लिहू काहीतरी .म्हणून लिहावयास घेतले.
तसा 'कट्टा' म्हटला कि नजरेसमोर येते ती नित्य नेहमीचीच, एक ठराविक भेटीची जागा . मित्र मैतरणी अन ना ना विविध गप्पांत उधळलेले , कधीही न विसरता येणारे, ते सुवर्णरेषित सोनेरी क्षण ..
अन क्षण म्हटले कि ते विविध ढंगी, विविध रंगी असतातच. . मनाच्या अंतरंगात उसळणाऱ्या अश्या विविध ढंगी, विविध रंगी भावनांना अश्या कट्ट्यांवर एक मोकळीक मिळून जाते.
आपल्या आयुष्यातले मग ते सुखाचे प्रसंग असो , वा वेदनेने कळवळनारे भाउक क्षण असो , समोर विश्वासार्थ नात्याची गुंफण असलेली व्यक्ती असली म्हणजे मनात दडलेल्या त्या असंख्य भावनांचं दार हळूच उघडलं जातं. असाच हा आमचा किंव्हा माझा म्हटलं तरी चालेल एक 'कट्टा' विवध रंगी भावनांचा , हसऱ्या भाव गंधाचा 'पुष्पक' 'कट्टा' पुष्पक हॉटेल ....

नात्यातली पहिली जोडी जी ह्या कट्ट्यावर अवतरली असेल ती म्हणजे आम्हा भाऊ- बहिणीची जोडी. माझी लाडकी प्रिय बहिण ....जिने तिच्या प्रेममऊ शब्दाने अन मायेनं मला आपलंस करून टाकलं. वेडावून सोडलं.
लोकं प्रेमात वेडी होतात...ते प्रेयशीच्या ,मैत्रिणीच्या ..मी मात्र माझ्या बहिणीच्या प्रेमात हरखून गेलो. ह्या कट्ट्यावरच , बिर्याणीवर ताव मारत, एक एक कप चायचा घोट घेत ते सारे सुवासिक क्षण मनाच्या कप्यात कैद होत गेले.
ह्या कट्ट्यावरच आम्हा दोघांनी मिळून एक कविता हि रचली. ती पूर्ण केली. तो कागद तिच्या हस्त लिखीताचा अजून जपून ठेवलाय.
ह्या कट्ट्यावर तिच्या लग्ना आधी कित्येकदा भेटत असू....बोलत असू ...एकमेकां विषय...जीवनाविषयक कधी तासभर तर कधी दहा पंधरा मिनिटे . ..गप्पांत अवांतर ..
आता ते सारे क्षण फक्त आठवणीत उरलेत . कारण वेळेनुसार आहे ती परिस्थिती हि बदलत जाते. आता भेट होत नाही अस नाही. होते भेट, पण ह्या कट्ट्यावर नाही...,
पण जाता येता नित्य नेहमीचा तोच रस्ता असल्याने ..ती आठवण मात्र प्रकर्षाने होतेच होते. मग स्वताशीच पुटपुटत जातो ...
किती हसरे क्षण होते ते !...असो
लग्ना नंतर मुलींच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळते . सारंच चित्र पालटतं. तसंच काही तिच्या बाबतीतही ... पण कधीतरी ह्या कट्ट्यावर पुन्हा नक्कीच एकत्रित येउच ...त्या आठवणी पुन्हा उजळवत...... ह्यात शंका नाही.
ह्या कट्ट्यावरची दुसरी भेट म्हणजे माझ्या जीवाभावाचा मित्र ..हेमंत.
मित्र कधी साथ सोडत नाही. ते सोबतच असतात कायम असे म्हणतात वेळेप्रसंगी वेळेत हजर हि होतात. त्यातलाच हा खास जीवाभावाचा मित्र...हे माझं भाग्यच म्हणा ..! आठवड्यातून दोन एकदा तरी ह्या कट्ट्यावर ,आमची भेटहि ठरलेलीच.
पण ह्याच्या वेळेचा ठावठिकाणा हा कधीच नसतो. नित्य नेहमीच्या सवयीप्रमाणे हा भाई पाच एक मिनिटे बोलून ,कधी कधी अर्धा एक तास खोळंबून ठेवतो . अन हजर झाल्यावर कारणे द्या ? चा तास अवितपणे सुरु होतो .
मग कधी चहा तर कधी कॉफ्फी च्या एक एक घोट सोबत (ह्याशिवाय आम्ही इतर पदार्थांकडे वळतच नाही म्हणा ) ना- ना तर्हेच्या विषयवार आमचं अवांतर बोलन होत. तर कधी ट्रेक विषयी गप्पा , पुढील ट्रेक चे प्लान ( असे प्लान कितीसे करतो पण त्यातले निम्मे हि पूर्ण होत नाही हि ह्यातली गंमत.) असो.
उद्यां नाटकाला जावूया का रे ? चल नाही तर एखाद चित्रपट बघू ? अरे आपल्या बाळू दा ला फोन कर, अरे आपल्या ओमी बाबाला विचार येतोय का ? अरे तो नाय तो शॉपिंग करत असेल रे ...हे ते नाना विविध हास्य क्षण ...
कधी भविष्याचा वेध घेत केलेली चर्चा , मग ते 'लग्न' असो वा लग्नातली 'ती' वा नोकरी ... विषय खूप असतात बोलण्यासारखे ..न संपणारे ....अवांतर .. तर मित्रा येतोयस ना ..कट्ट्याच नुतनीकरणं झालय आता ...चल ये कट्ट्यावर ...
ह्या कट्ट्याची एक आवर्जून आठवण सांगायची तर माझा 'Wallet'..
बहिणीसोबत असंच एकदा बसलो होतो. गप्पात दंग होवून ....चहाचा एक एक प्याला घशात लोटत. चहा पिउन झाल्या नंतर आद्य कर्तव्य म्हणून वालेट काढलं , पैसे देऊ केले अन तिथून दोघेही निघालो. .अर्ध्या वाटेत आलो तेंव्हा काहीतरी विसरल्याची आठवण झाली.
एक एक खिसे तपासून पहिले तेंव्हा लक्षात आल. कि 'वालेट' बहुदा ते कट्ट्यावरच विसरलो किंव्हा कुठेतरी पडलं. पैसे देवाण घेवाण मध्ये .. PAN कार्ड ATM कार्ड , LICENCE ह्या त्या गोष्टींचा भरणा त्या WALLET मध्ये होता. त्यामुळे घाबरलोच . तडक पळत सुटलो कट्ट्यावर, हॉटेल मालकाशी चौकशी केली. पण नाही माझं किमती 'WALLET' आता हरवलं होतं. . निराश मनाने तिथेच अवती भोवती चकरा मारत राहिलो, रात्री उशिरा पर्यंत पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. . माझा किमती WALLET..
किमती ह्यासाठी कि ते माझ्या बहिणीने भाऊबीज म्हणून गिफ्ट केलेलं. अन त्याबरोबर इतर महत्वाची हि कार्ड्स हि होती. घरी गेल्यावर ATM कार्ड वगैरे BLOCK करून टाकलं . रात्री तशी झोप लागलीच नाही म्हणा . पण सकाळी उठल्य बरोबर जो फोन खणाणला त्याने तर आनंदुनच गेलो. नाचू बागडू लागलो.
WALLET मिळालं होत. एका सज्जन गृहस्थाला. तडक त्याची भेट घेतली. त्याच्या घरी जावून अन THANKU म्हणत परतलो. तिथपासून त्या गृहस्थाची अन त्याच्या कुटुंबाशी भावपूर्ण नातं जुळल . आता आवर्जून कधी एखाद फोन येतो.
ओळखलतं का मी मनीष सावंत ......?काय कस काय चाललय ?
खरचं अशी सज्जन अन प्रामाणिक माणसं क़्वचितच भेटतात. कट्ट्याशी निगडीत हा एक क्षण मी कधी विसरणार नाही. असो..
ह्या कट्ट्यावरची अजून एक भेट आठवणीत राहणारी म्हणजे माझी एक जवळची मैत्रीण.
स्वतःच्या मनाशी अनेक प्रश्नात गुंतून राहणरी , प्रश्नाचं उत्तर नाहीच मिळालं तर मला हमखास विचारणारी अन मला हि त्या प्रश्न कोड्याच विचार करण्यास भाग करणारी ...अशी हि मैत्रीण हळव्या मनाची हळवी मैत्रीण..... , ते क्षण हि आठवणीत आहेत.
तसे प्रश्न अन त्याची उत्तर हि आपल्या सभोव तालीच कुठेतरी आसपास दडलेली असतात. बस्स त्याचा शोध घेतला कि ती मिळून जातात.
तर असो. असा हा आमचा 'पुष्पक कट्टा' विविध ढंगी, विविध रंगी क्षणांनी फुललेला. अन तो फुलतच जाणार पुढेही .. . किती वेळ अन कधी पर्यंत अन अजून कोणा सोबत ते माहित नाही. पण मित्रा हेमंत आपल्याला भेटायचाच आहे . आपल्या ह्या कट्ट्यावर ..चहाचा एक एक घोट घेत..ना ना विषयाचे फडसे पाडत.....
चला तर भेटू पुन्हा.....कट्ट्यावर....
ह्या कट्ट्यात सहभागी झालेले मित्र परिवार .... माझी प्रिय बहिण श्रद्धा , मित्र हेमंत, ओमकार , शीतल , पुनम , राज , निलेश , बाळू दा ...अन मी..
अजून हि लिस्ट पुढे वाढतच जाईल... भरोसा काय ...
आपलाच , संकेत उर्फ संकु...
संकेत पाटेकर
१४.०१.२०१५

मंगळवार, १३ जानेवारी, २०१५

वहिनीचा एक दिवस...

काल सकाळपासून सुरु झालेली धांदल गडबड..
संध्याकाळी वहिनी अन भाऊ घरी परतल्यावर काहीशी कमी झाली. नित्य नेहमीची , पहाटेपासून सुरु होणारी अन रात्री उशिरा पर्यंत हि सुरु असलेली...
वहिनीच्या कामाची लगभग ,धावपळ...काल काहीश्या प्रमाणात प्रत्यक्ष अनुभवयास मिळाली.
जी आतापर्यंत नित्यनेहमी पाहत होतो.
काही कारणात्सव अचानक भाऊ - अन वहिनीला काही बाहेर जाणे जरुरीचे झाल्याने,  कालचा एक दिवस ' वहिनीचा' माझ्या हाती आला. खास त्या करिता सुट्टी घेतली.
सकाळी स्वतः लवकर उठून आमच्या छोट्या राणी सरकारला जागे करून , आंघोळी पासून ते वेणी फणी करे पर्यंत ,त्यांचा मूड सांभाळेपर्यंत नाश्ता पासून शाळेत वेळेत सोडेपर्यंत कामाची धांदल गडबड सुरु झाली . (गंमत म्हणजे आमच्या छोट्या राणी सरकारची वेणी- फणी करताच येत न्हवती.
मुलींचे लांबलचक केस वळविण्याची तशी सवयच नाही आहे म्हणा.
त्यामुळे वरच्यावर हेअर बेंड घातलं कस बसं अन दिली पाठवून शाळेत...) सकाळी ७:३० ची तिची शाळा...
घरी पुन्हा परतल्यानंतर छोट्या राणी सरकारचे छोटे राजकुमार भाऊ , ह्यांना गाढ झोपेतून कसेबसे जागे करत , त्यांना आंघोळ घालून , नाश्ता देऊन , शाळे ला सोडेपर्यंत सकाळचे ११:३० झाले.
घरी परतल्यावर जेवणाच्या तयारीला लागलो . त्यात १ ते दीड तास कसा गेला ते कळलेच नाही.
पुन्हा शाळेतून आमचं छोट्या बच्चुंना घरी आण्याची वेळ. पुन्हा तेच घर- शाळा- घर जेवण खावनं , दुपारच शांत पडावं  तर ह्याचं धांगड धिंगाणा सुरु ...झोपूच देईना .
त्याना ओरडता ओरडता घसा कोरडा पडे.. . शेवटी काय मुलं ती मुलंच, कसली एक्तायेत एकदा सांगून .....
पुन्हा क्लास ची वेळ , पुन्हा सोडायला एक फेरी ... अस करता करता सूर्य मावळतीला आला.
पुढे भाऊ- वहिनी घरी परतल्या नंतर काय तो श्वास मोकळा केला.
हुश्ह ... !
कितीही हि धावपळ - पळापळ .
दिवस ह्यातच पटकन कसा निघून जातो . ...कळत हि नाही. मग स्वतःसाठी तरी वेळ काय देणार ...?
आपल्या कुटुंबात असा सदस्य असतोच. आपल्यासाठीची त्यांची धडपड , कष्ट, ह्याची मोजदाद कधी नसतेच. अन ती करूहि नये. बस्स , त्या मनास कोवळ्या फुलाच्या पाकळ्या सारखं हळुवारपणे जपावं. 
कधी एकत्रित गप्पांत रंगून जावं , कधी चीटूकल्या हास्य गंधात एकत्रित मिसळाव.
 ह्यातच त्यांच्या मनातला क्षीण कुठल्या कुठे निघून जातो.
असंच लिहिता लिहिता ....
- संकेत पाटेकर

बुधवार, ७ जानेवारी, २०१५

'त्रिकुट' - बहिण- भावाच्या प्रेमावर आधारित एक छोटीशी कहाणी..

बहिण- भावाच्या प्रेमावर आधारित एक छोटीशी कहाणी ...लिहिण्याचा प्रयत्न बघू कितपत जमतंय ...सुरवात तर झालेय ...
नाती कधी ठरवून जुळवता येत नाही , अन म्हणूनच मनाच्या अंतरंगी उसळणाऱ्या उत्कट भावनांना हि कधी थोपवून ठेवता येत नाही . अशावेळी मनाचं हे वेडेपण शब्दांतून कथित होत जातं.
पुढच्या जन्मी , मी ' तुझा भाऊ ' म्हणून जन्म घेईन.
किंव्हा तू ' माझी बहिण' म्हणून जन्म घे ? कसही असो.
पण हे नातं आपलं जन्मापासून हवंय मला ... बस्स ? आपल्या दोघांच ...बहीण - भावाचं
मी आधीच माझ्या देवाकडे साकडं घातलंय , तू हि साकडं घालं.
पण त्या आधी ,तुझ्या अंतकरणातून उमटलेले शब्द मला कळू देतं, ऐकू देतं. मनभरून ..!
मिळेल ना हे नातं ..बहीण - भावाचं ..सक्खेपणाचं , बोल ना ..

बहिणीच्या नजरेला नजर देतं पाणावलेल्या डोळ्यांनी अन जड अंतकरणानी तो बोलत होता. पुढ्यात असलेला चहा हि एव्हाना थंड झाला होता .
कित्येक दिवसाच्या भेटी नंतर हा असा दुर्मिळ योग पुन्हा जुळून आला होता . त्यामुळे दोघं हि बोलण्यात अगदी गुंग झाले होते. . गत आठवणीच्या क्षणांना सुगंधित अत्तराची फोडणी देतं.
तसं आयुष्यात नाती हि अनमोल असतात. सुवर्ण मुद्रित मुखुटासारखी ,अभिमानाने लखलखनारी.., हेवा वाटून घ्यावी अशी.. कायम हृदय समीप हवी असलेली ... ती नाती मग रक्ताची असो वा मनाची , मनाने जुळलेली , हृदयाची धडधड थांबेपर्यंत ती आपली असतात. आपल्यात असतात.
जन्म मरण हा तर प्रकृतीचा नियम . जन्मापासून ते मरणापर्यंत सगळ काही ठरवून दिलेलं . अन त्या त्या प्रमाणे, त्या नुसार घडणारं . पण तरीही भविष्याचा वेध घेत जगत असणारे आपण जीवनातला हर एक क्षण एकमेकांच्या ओढीने, एकमेकां सहाय्याने , ओथंबून निथळनाऱ्या मायेने, शब्द गोडव्याने , गोंजारणार्या भावगंध स्पर्शाने , प्रेमाने, कायम घट्ट विणून राहावं म्हणून प्रयत्नशील असतो.
असाच हा एक प्रयत्न आयुष्याच्या एका वळणावर जुळलेल्या त्या नात्याची वीण कायम घट्ट राहावी म्हणून धडपडनाऱ्या त्या एका मुलाचा ... त्या प्रेम वेड्या भावाचा...
क्रमश :-
संकेत य पाटेकर
०७.०१.२०१५
खालील इमेज हि नेट वरून घेतली आहे .

शुक्रवार, २ जानेवारी, २०१५

जिथे प्रेम तिथे जीवन ..

प्रेम' विना जीवनाला ना रंग आहे ना गंध आहे. हे आयुष्यं प्रेम' विना खरचं बेरंग आहे.
सगळं काही असूनही .., केवल कुणाच्या प्रेमासाठी साठी , काळजी वाहू स्पर्शासाठी , शब्द न शब्दांसाठी माणूस आयुष्यभर कळवळत राहतो .
मनाची ती कळवळ ऐकणार कुणी भेटलं कि तो दाह तेंव्हा कुठे कमी होतो. पण तोपर्यंत.....
असो..
जीवापाड असणारी आपली माणसं सोबत असली कि कसली आलेय चिंता ? मनाच्या अंतर्बाही उसळणार्या अनेकानेक वेदना हि अश्याच मग खळखळत्या हास्य तवांगमध्ये हळूच गुडूप होवून जातात. ते कळत हि नाही, पण त्यासाठी आपल्या माणसांची आपलेपणाची साथ मात्र हवी असते.
अपेक्षेप्रमाणे सगळंच काही मिळतं अस नाही. पण अनपेक्षितपणाचे सुखद धक्के नक्कीच एखाद्याचं आयुष्य उजळून देतात. त्यात तिळमात्र शंका नाही. असे सुखद धक्के प्रत्येकाच्या आयुष्यात येतात.असतात,पण ते कधी, कुठून कसे येतील ते मात्र सांगता येत नाही.
जीवन जगायचं तर आधार हा हवाच. अन तो प्रत्येकाला हवाच असतो, त्याशिवाय उभं राहता येत नाही.

प्रकाशाच्या दिशेने , अवकाशाकडे झेप घेत जाणाऱ्या वृक्ष-वेलींनाही हि जमिनीचा आधार हवा असतो . मग एखादं विजेच्या खांबावर हि झप-झप करत पुढे सरकणाऱ्या वेलेला हि , कसली आलेय तमा ? 
ती पुढे होत जाते प्रकाशाच्या दिशेने...
आधार असला कि जीवनही असंच नव्या आत्मविश्वासने, प्रेरणेने फुलत राहतं.
जिथे प्रेम तिथे जीवन .. 'प्रेम' अन मायेच्या स्पर्शाविना कोणीही वंचित राहू नये .
सगळ्याचं आयुष्यं हे प्रेमानं बहरून निघावं , उजळाव, अधिक अधिक ते उजळत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना ...!

आपलाच ,
संकेत पाटेकर उर्फ संकेत - ०२.०१.२०१५
HAPPY NEW YEAR TO ALL ..