शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१६

हृदया - एक स्वप्न सखी ..

हृदया - एक स्वप्न सखी 

पत्र संवाद…

प्रिय सखे ,
सगळ असं Unexpected असेल न तुला ..
मला वाटलंच , माझं असं जगावेगळं वागणं ( तुझ्यासाठीच हा ) तुला कदापि 
रुचणार नाही, ना पटणार नाही. हे ना ? 
मुळात अगं ... अपेक्षानुसार वागणं हि अवघड अशी गोष्ट आहे. दरवेळी ते शक्य नाही . 
कधी - कुठेतरी.. .. घाव हा बसतोच , ह्या बदलत्या परिस्थितीचा...
अन मग भली मोठी जखम होते. तीच सहन होत नाही . अन आपल्या मनाचा विस्फोट होतो . 
अन एकमेकांपासून तुटले जातो.
पण तेंव्हा , हा एकाकी असा का वागला ? ह्याचा शोध घ्यावासा वाटत नाही 
आपल्याला …
इथेच तर फसगत होते.. नात्याची, नात्यातल्या विश्वासाची .... 
आपलं हि असच काहीस झालंय रे., हे ना ?

मुळात आपल्या भेटी गाठी , फारश्या अश्या झाल्याच कुठे आहे म्हणा ? 
एक भेट ती काय घडली. ती हि योगायोगानेच , बाकी हा सगळा मोकळा असा सुसंवादच.
त्यावरूनच नाही का , मी तुझ्या जवळ इतका ओढला गेलो. 
स्वप्नील दुनयेत निखळ प्रवाह सारखा एकाकी असा वाहत राहिलो. हे ना ? 

आता त्यानेच सगळ अवघड होवून बसलंय , स्वतःलाच सावरता येत नाही आहे कि तुला 
नजरेतून दुर सारता येत नाही . पूर्णतः उधळून गेलोय रे मी ....फांदीवरच्या तुटल्या पानासारखा ... .
एकाकी असा ... तुझ्या प्रेमात....!

ऐकतेस ना , ? बघ जरा नजरेला नजरे देऊन , अन सांग मला ..
काय असते रे हे प्रेम ? चालते बोलते , दोन जिवंत मन ? भावनांचे उथळ झरे ?
संवेदना जागण्या इतपत सुज्ञ अन संवेदनशील असलेले हे मन ?एवढंच... कि अजून 
काही.. 
खर सांगू हि तर माणसाची अंतरंग ...स्वभाव गुण , वा स्वभाव शैली.
प्रेमाची व्याख्या तशी करताच येत नाही. 

ह्या अथांग पसरलेल्या निळाईची व्याप्ती कुणाला मोजता येईल का ? सागराच्या 
खोलीची मोजदाद करता येईल का ? तसंच ह्या प्रेमाचं... जो तो आपल्या अनुभवानुसार 
अन त्या योग्यतेनुसार प्रेमाची व्याख्या रचतो. मी हि आजवरच्या अनुभवावरून शिकलोय . 

प्रेम म्हणजे दोन श्वासातलं अंतर एक होणं. समरस होतं जाणं. दुधात साखर मिसळून 
जावी तशी...पूर्णतः समर्पण ...

ते समर्पण कुठेश कमी पडलेलं दिसतंय. 
तसं तुझं हि माझ्यावर प्रेम होतंच ना (आत्ताही असेल) ? नाही असं नाही . फक्त 
तुला स्वतःलाच ते उमगलं नाही . 

तूच नाही का म्हणाली होतीस , मला माझंच कळत नाही आहे , मी प्रेमात आहे कि 
नाही ते ? हे ना ? 
खर तर तेंव्हाच मला सावरायला हवं होतं. पण नाही मी वाहत राहिलो . 
स्वप्नांना कवेत घेऊन ...प्रेमाच्या ह्या स्वच्छंदी प्रवाहात ... एकटाच..एकाकी ! 
तीच ठेच लागलेय ह्या जिव्हारी .. 
ह्या प्रवाहात वाहलो म्हणून नाही. तर ह्या प्रवाहात वाहत असताना ..तू एकाकी 
माघार घेतलीस ...ह्याची ठेच.

पण तू वाईट वाटून घेऊ नकोस... हा..
आपल्या नकळत अन नियतीच्या संकेतानुसार घडणाऱ्या ह्या साऱ्या गोष्टी 
आहेत . पण गम्मत अशी आहे बघ , कि हे सर्व माझ्या बाबतीत घडून आलं आहे. 
तुझाच, 
क्रमश :
संकेत पाटेकर



रविवार, १४ फेब्रुवारी, २०१६

कुणी शोधून देईल का ?

अगदी म्हण्याचचं तर लहानपणापासून तिची माझी गट्टी , गाढ मैत्रीची.. 

माझ्या शिवाय तिला काही अस्तित्व नाही अशी तिची काहीशी समजूत, म्हणून
मी जेथे जाईन तेथे तिची साथ असायचीच (हा अपवाद काही क्षणाचा असेल हि ) पण तिने माझी सोबत कधी सोडली नाही. अगदी शालेय जीवनापासून ते कॉलेज कट्ट्यापर्यंत ती माझी सखी सोबती राहिली .
इतकंच न्हवे तर कुणा पाहुण्यामंडळी कडे आम्ही जात असू तर ती हि माझ्या सोबत असे . 

मुळात तिचा स्वभावच अगदी शांत , म्हणजे कायम तो ठरलेलाच , त्यात फेरफार तिनं कधी केला नाही. अन करू शकत हि न्हवती. त्यामुळे घरातले हि ओळखून होते. त्यांनी हि कधी हा कि हु केली नाही . कधी काही बोलले नाहीत . उलट कौतुकच फार असायचं . पण एकदिवशी त्याला हि उकलती कळा लागली . अन तिच्याविना हे मन विरघळू लागलं
.
मुळात झालं काय तर ..
सह्याद्रीच्या वाऱ्याने तना मनात घेर केला . त्याची ओढ लागली. पाय फिरकी घेऊ लागले. सह्याद्रीतल्या कड्या कपाऱ्यातुनी निर्धास्त होवून मी भटकू लागलो. तीही तिथे असायचीच. नाही असं नाही .
पण हळूहळू ह्या सहय प्रवासात इतर मैत्रीचे धागे दोरे वाढू लागले. एक एक माणसं जोडू लागली, भेटू लागली . बोलू लागली. नात्यांची जीवमोळी अशी एक एक साखळी निर्माण झाली. आणि झालं इथेच खटकलं. 
त्यातलेच कोणीतरी उगाच डीवचलं.. थेट स्वभावावरच शब्द रोष ...आणि वार ...
मग काय , सारंच बिघडलं , त्या रोषाला अन उगाचच्या चटक्या बोलणीला, बळी पडून , सुर्याबिबा सारखं लालबुंद होऊन ती सटासटा निघून गेली . ती अद्यापही परतली नाही . 

तिचं अस्तित्व हे माझं अस्तिव आहे , ह्याची जाणीव मला झाली खरी... पण आता काय उपयोग . मी एकटा पडलो. वेड्या सारखा प्रत्येक क्षणाला हसत..उगाचच .
कितीश्या विनविण्या केल्या . मन जुळवणी करून पहिली . पण काही उपयोग नाही.
ती रुसली ती रुसलीच . पण अधूनमधून ती येते. बहुदा , कीव येत असावी माझी. दुसरं आणिक काय असणार ? पण येउन तशीच निघूनही जाते. अवघे काही क्षणाची साथ देऊन बस्स...

पण खरंच यार , मला तुझी गरज आहे . शांत राहायचं मला . शांत ठेवायचं स्वतःला. स्वतःचा शोध घ्यायचा आहे. स्वतःला सिद्ध करायचं आहे . घडवायचं आहे . तुझ्यविना ते शक्य नाही. कारण तू माझ्या स्वभावातली एकुलती एक गुणी अशी सखी आहेस. ......माझी मनशांती .
अरे कुणी तरी बोलवा रे तिला....मला हवेयं ती ....तिची साथ हवेय . कायमस्वरूपी
.
माझ्या मूळ स्वभावातला गुणधर्म हरवलायं . कुणी शोधून देईल का ? देईल ?
मन शातंता...
असंच काहीस लिहिता लिहता...
- संकेत पाटेकर
१०.०२.२०१६



सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१६

हसण्यासारखं काही नाही...

हसण्यासारखं काही नाही...
रविवार , संध्याकाळची वेळ , मित्रांना भेटायला
म्हणून घरातून बाहेर पडलो. पायी चालायची नित्य नेहमीचीच सवय , त्यामुळे चालतच रेल्वे स्टेशन गाठलं. अन तिकीट वगैरे घेऊन ठाणे- वाशी लोकल ट्रेन पकडली. हार्बर लाईन आणि त्यातल्या त्यात रविवार असल्यामुळे फारशी अशी गर्दी न्हवती.

तुरळक असे प्रवाशी .. तर असो.
नियोजित वेळेप्रमाणे लोकलने होर्न देऊन प्रवाशांना Alert केल . अन धीम्या गतीनं ट्रेन गतीवान झाली. ऐरोली गेलं,
रबाळे आलं प्रवाशांचा आत - बाहेर सुरु झालं . मी आपला दाराशी उभा (लटकत न्हवे हा ..आतच )पुढच्या स्टेशनची वाट पाहू लागलो. त्यातही फारसा वेळ गेला नाही.
काही क्षणाच्या अवधीतच घणसोली स्टेशन आलं . इथेच मित्र भेटावयास येणार होता. म्हणून पायउतार झालो अन सांगितल्याप्रमाणे स्टेशनच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वाराशी वाट पाहत उभा राहिलो. तेवढ्यात मित्र हि हजर झाला.
वेळचं अन आम्हा मित्राचं 'गणित' तसं नेहमीच चुकतं , पण आज सगळ अचूक जुळून आलं होतं. 
भेट होताच नेहमीच्या आदराने त्याची खुशालकी विचारली अन गप्पांच्या ओघात आम्ही पुढे निघू लागलो. तोच...
एक सहा फुट उंचीचा ,साध्याश्या पेहरावातला, एक माणूस तिरक्या चालीने माझ्या रोघाने येऊ लागला. नजरेला नजर भिडली. त्याकडे पाहून , त्याने जराशी घेतलीच असावी, असा एक तर्क धरून मी मोकळा झालो. 
पण त्याचा रोख हा माझ्याकडेच , जणू त्याची अन माझी फार वर्षापासूनची ओळख असावी . ती हि सुडेच्या
भावनेने पेटलेली . म्हणून मी हि फुल तयारीत होतो . येत्या प्रसंगाला तोंड देण्यास..., 
मित्रही सोबतीला होताच .. तरीही , नक्की कोणता प्रसंग उद्भवणार आता, , ह्या विचारांनी मनात घेरा केला. 
आणि त्या विचारात असताच , तिरक्या चालीने तो माझ्यापुढे येऊन उभा राहिला. 
आणि अभिनयाच्या सुरात , रोघ नजरेनेच ,सरळ प्रश्न टाकला .
भाऊ, कोल्हापूर कोणत्या बाजूला आलं ? 
त्याच्या ह्या सहज अन काहीश्या अवघड अश्या प्रश्नाने , नकळत हास्याच्या बांध फुटला गेला. . 
आणि खो खो हसत हसत मी अन मित्र पुढे जावू लागलो. 
त्याचा प्रश्नाचं उत्तर काही मला देता आले नाही . थोड पुढे गेल्यावर मात्र पुन्हा मागे वळून पाहिलं . तर तो हि
त्याच लयात आमच्या कडे पाहून मिश्किलपणे हसू लागला होता. 
स्टेशन घणसोली ,आणि प्रश्न कोल्हापूर कोणत्या बाजूला आलं ? कस वाटतं ?
आयुष्याच्या प्रवासात एकेक अशी माणसं भेटत जातात . काही भावना चीथाळून देतात. 
काही नकळत एक संदेश देऊन जातात तर काही हास्यलेपाचा मुलामा, अलगद चेहऱ्यावर फासून जातात.
आयुष्याचा हा प्रवासच फार मजेशीर अन गहन अश्या अर्थाने भरलेला आहे. म्हणूनच हा प्रवास मला आवडतो. 

असंच उगाच काही ..लिहायचं म्हणून ..
- संकेत य पाटेकर
०८.०२.२०१६