गुरुवार, २२ जून, २०१७

ती.. मन व्याकूळ …

अगदी अनपेक्षित असा  एखाद सुखद धक्का बसावा ना,  तसा तो...नवा मोकळा श्वास घेऊन आला आज.  त्याचं हे  असं अचानक  येणं., माझ्यासाठी सर्वोच्च असा आनंदी क्षणच. 

वर्षोनुवर्षे  आपल्या प्रियकराची वाट पाहून  विरहात एकांडलेल्या मनाला  , नुसत्या त्याच्या चाहुलीने   जशी मनभर उभारी यावी नं , तसंच काहीसं झालंय..माझं आज ..!
प्रियकरचं ना तो ....
नुसत्या त्याच्या येण्याच्या  चाहूलीने ..अंग अंग मोहरून गेलंय. शहारलंय  ..उसळत्या अश्या धगधगीत श्वासानं.... ! 
काहीसा हलकेपणा ओघळू लागलाय  मनाशी..आता , 
पण ऐक ना  ?
आज तरी  नजर काळजातून  संवाद साधत,  तुझ्या ओसरत्या मनओघळ स्पर्शानं  ...घट्ट मिठीत ओढून  घेशील ना मला ?  
मनाची हि  धगधगती, पेटती  मशाल आज शांत करायची आहे मला, बोल ना...?

तुझ्याविना  मला अस्तित्व नाही रे , माझं असणं हे केवळ तुझ्यासाठीच, माझी ओळख पाळख , माझं नाव गाव ,  सारं सारं  केवळ तुझ्यासाठीच, तुला वाहिलेलं. 
तूच माझी ओळख, तूच सर्वस्व.......

मन अधीर झालंय रे   ...तुझ्यात सामावून जाण्यासाठी.  
अजून अधिक वेळ नको दवडुस...
माझ्या मनाचा हि विचार धर.  ?

तू आलास कि हा बंद श्वास (कित्येक दिवस तसाच खितपत पडलेला ) मोकळा होतो बघ...
तू आलास कि मनभर आनंद सरी बरसू लागतात....
मोगऱ्याच्या अस्तित्वानं दिशा दिशा गंधाळून जावी , तसं काहीसं होतं बघ, ह्या मनाचं , तुझ्या येण्यानं... 
तू आलास कि...लोकं मला स्वतःहून मोकळी करतात, तुझ्या स्वाधीन व्हायला....! 

हो.. हो ...तुझ्या स्वाधीन  व्हायला. कारण त्यांना हि ठाऊक आहे. 
तुझं माझं नातं , तुझ्या माझ्या नात्यातला ओघळता हळुवार टपोर स्पर्श, तुझ्या  माझ्या नात्यातली   हसरी गंमत, मोहरते क्षण .. आणि ...आणि अ..    

 बस्स , मला अजून अधीर करू नकोस.   सामावून घे तुझ्यात...

बघ , ऐकतेय मी .. जवळ आसपासच, उधाण आनंदाने तू मुक्त बरसतोयस. उधाणला आहेस. काळ्याभोर नभासह ...
तो बघ ....त्या तिथे.!   
आणि मी ...

मी ....
अजूनही ह्या बंद पाठपिशवीत , एकटक खिन्न पडून............व्याकुळती.  

ऐकतोयस ना…

तुझीच  मन व्याकूळ …

‘छत्री’  
एका छत्रीचं  मनोगत ...
- संकेत पाटेकर 
२२.०६.२०१७ 

शनिवार, १७ जून, २०१७

'आपलेपणचा हुंदका'

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे
'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...!

विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे
'हृदयाशी नातं '' जो तो जपून असतो रे... !  

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

भावनांची हि रंगते मैफिल, कल्लोळ जिव्हारी रे
'आसवांचाही'  'जीव' तेंव्हा हळूच तुटतो रे... !

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...
- संकेत  पाटेकर
१७.०६.२०१७ 

बुधवार, १४ जून, २०१७

काळ्या पाषाणाला दुधाळ अभिषेक ....!

काळ्या पाषाणाला दुधाळ अभिषेक ....!

ह्या निसर्गाची हि ना ना कलात्मक अंगे , ना ना विविध अशी रचना,  रंगरूपे  ,  किती विस्मयकारक असतात न्हाई...!    म्हणजे...कधी.. कुठे..कश्यात तो कोणता रंग भरेल आणि मनाशी कोणता भावरंग चढवेल ह्याचा काही नेम नाही. आणि नसतोच मुळी.

मनाची सुंदरता नजरेत जर उतरत असेल तर ते अनुभवंन हि  फार कठीण नाही. सहजासहजी ते नजरेत उतरेल  वा भरेल . मनभर  आनंदी मळा फुलवूंन ..

कोर्लई कडे ..एक एक पाऊलं सरत असताना...लहरी लाटांशी,  नजरेचा लपंडाव सुरु असताना , धडाडणाऱ्या  गाजेचा प्रतिध्वनी उमटत असताना ,
त्या वळणावर क्षणभर थांबलो मी ..  काळ्या पाषाणावर होणाऱ्या त्या दुधाळ अभिषेकाने ....

मनभर विचारांचाही  हि अभिषेक  सुरु झाला होता .

'दूर आणिक जवळीकता'' ह्यात  क्षणिक अंतर केवळ .....आपण किती लांबवून ठेवतो न्हाई ?
घरंगळत येणाऱ्या , त्या   शुभ फेसाळ लाटेसारखं,  आपलेपणाची ओढ अशी.. क्षणा क्षणाला उमटत असेल तर  ...तर ह्या  काळ्या पाषाणासारखं  दुधाळ अभिषेक होतंच राहील....अविरत !! आपल्या मनावरही ...

तो दुधाळ लाटांचा अभिषेक मला , एकटेपणात गढलेल्या आणि मनातून तुटलेल्या ..मनावरचा आपलेपणचा वर्षाव वाटला. आईच्या पदराखालीची मायेची उब तेंव्हा  कुठूनशी मनाला  अलगद स्पर्शून  गेली.  कष्टाने सुरकुतलेले ते  प्रेमळ हात ...केसावरुन अलगद फिरल्यासारखे झाले.
हलकेपणाचा शिडकावा त्यानं मनभर  पसरला  गेला.   मनाच्या  डोहातून नजरेच्या खळीत आसवांचा जमाव  सुरु होण्याआधीच...थांबलेली  वाट मी पुन्हा चालू लागलो....
- संकेत पाटेकर


शुक्रवार, ९ जून, २०१७

बस्स, एक तेवढी मोकळीक हवी...

तुला एक उदाहरण देतो. म्हणजे काय ते तुला कळून येईल ..

तू  रस्त्याने.कधी ...चालता फिरता  वा एखाद कुठल्या वाहनातून ,  प्रवास केला असशीलच नाही का ? नाही म्हणजे प्रवास करणं वा न करण्याचा प्रश्न नाही आहे  ,  पण प्रवास करताना 
, कधी समोरच्या वाहनाकडे नीट लक्ष  देऊन पहिले आहेस का   ?
 एखाद रिक्षा वैगरे ...ट्रक , टेम्पो .काहीही घे, 
त्यावर मागे बघ , लिहलेलं असतं. 'Keep safe Distance' म्हणून .... 'सुरक्षित अंतर ठेवा' . 
का असतं ते ? 
कारण अधिक पुढे पुढे होण्याच्या नादात ,  कोणत्याही प्रकारचा अपघात घडू नये म्हणून , प्रवास ज्याचा त्याचा सुखकर व्हावा म्हणून ,  इतकंच. 
नात्यात हि अगं हेच लागू होतं . सुरक्षित असं अंतर राखलं म्हणजे किंव्हा  एक स्पेस असली म्हणजे    नात्यात कोणताही  गैरसमज वा दुरावा निर्माण होतं नाही. 
पण ते  नसेल तर अपघात होण्याचे चान्सेस हे अधिक असतात. 
कळतंय ना मला काय सांगायचं ते ..?
नातं आपलेपणाने जोडलंय , जिव्हाळ्याचं आहे. ते राहील. बस्स,  एक तेवढी मोकळीक हवी. 

सहज लिहता लिहता.....
- संकेत पाटेकर 
०८.०६.२०१७