शनिवार, २२ एप्रिल, २०१७

नवं नातं नवं प्रेम ..

प्रेमात पडणं वगैरे सोपं असतं ...रे ! 
एकमेकांना पाहिलं  आणि एकमेकांच्या विचार धारा काहीश्या जुळून आल्या कि आपण आपणहून असे,
एकमेकांच्या जवळ येतो. वा येत जातो. म्हणायला  मनातली हि ओढ आणि  नजर त्या व्यक्तीकडे आपल्याला नकळत ओढवून नेते. ते हि वारंवार  ..क्षणासेकंदाला अगदी,  हा देहभान सारा विसरून लावत.
आणि तुला सांगू इथेच खरं तर ‘प्रेमाज बीज’ आपल्या अंतरी हळूच ‘अंकुरलं’ जातं. 
दोघांच्या मनातला ‘मनमोकळा संवाद आणि सहवास’  हे सगळं घडवून आणतं. आपल्या  नकळत,
नवं कोवळं नातं हृदयाशी रूजवतं.  आनंदाच्या मोकळ्या आभाळी छायेत
स्वच्छंदी फिरक्या घेत. दौडत. पळत. स्वप्न पाहत .
इथपर्यंतचा हा एकूण प्रवास म्हणजे 'प्रेमात पडणं' असं मला म्हणायचंय. 
काय सांगायचं ते कळतंय ना तुला  ?
‘’प्रेमाची खरी कसोटी अगं.. ह्या पुढे सुरु होते.  नातं जुळल्यापासून ते फुलण्यापर्यंत आणि फुलण्यापासून आपलं अस्तित्व मागे ठेवून जाण्यापर्यंत . कळतंय ना ?’’

प्रेमात पडणं म्हणजे  प्रेम नाही. ती एक सुरवात असते. जस्ट एक सुरवात.
बीज मातीशी  नीटस रोवल्यानंतर,  त्याची जी पुढची पायपीट आहे ना ,आकाशी उंचच उंच झेप
घेण्याची...तो एकूण प्रवास आणि पुढचे अनंत काळ (मातीशी विलीन होई पर्यंत ) परिस्थितीशी स्वतःला झुंजावत ठेवून ,  आनंदाचे क्षण मोहरत नेण्यापर्यंतचा हा एकूण प्रवास  वा काळ म्हणजे 'प्रेम'
लक्षात येतंयं ना..?

माझं  तुला हेच सांगणं आहे. कि नुसतं ‘प्रेमात पडणं' नको. आणि फसणं  नको.
आपण सुरवात करतोय. ते शेवटच्या श्वासाअखेर सोबत राहील,  ह्या विश्वासानं ..अन हा विश्वास आणि त्यातला ‘आपलेपण’ कायम   राहावा , ह्यासाठी आपण दोघांनी तसं प्रयत्नशील राहायला  हवं. प्रत्येक पाऊलवाटेवर ...पाऊला पाऊलावर ...

दिलेल्या त्या  उदाहरणावरून मला हेच काय ते  सांगायचं आहे.
ते 'उंचावलेलं अन बहरलेलं झाड' म्हणजे आपलेपणाने बांधलं गेलेलं 'नातं' अन  त्या नात्यातल्या नितळ प्रेमाचं  प्रतीक ...
 
प्रेम अगं  हे .. असं  हसरं , मोकळं आणि  नितळ हवं. विश्वासानं बांधलेलं. सांभाळून घेतलेलं.   

आयुष्याची हि पायवाट,  आपण दोघांनी मिळून आता सुरु करणारच  आहोत तर ,
एकत्रित चालण्याची शपथ घेतल्यावर ,  कुठल्याहि  गोष्टीचा वा परिस्थितीचा  तोल बिघडल्यावर  .. आपण तिथे एकमेकांना एकमेकांसाठी  उपलब्ध व्हायला  हवं .  कुठलाही गैरसमजूतीचा धागा न ओढता न  ताणता.... आपलेपणानं... एकमेकांचं मन जिकून आणि प्रेमाचा ओलावा कायम राखत...

कळतंय ना ?
तशी तू समजूददारच आहेस म्हणा ....पण तरीही ...

असंच लिहता लिहता..
- संकेत पाटेकर
२२.०४.२०१७ 

sanketpatekar2009@gamil.com

मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

क्षणाचे सांगाती..

कुठलेही भाव न दर्शवता, सतत दृष्टी समोर येणारी वा घडणारी एखाद गोष्ट, सातत्याने टाळत राहणं वा इग्नोर करत राहणं, ह्या साठी खूप मोठं असं मानसिक 'बळ' लागतं रे.., आणि ते तुझ्याकडे भरपूर प्रमाणात आहे. हो  ना ?
किती सहजतेने अगदी जमवून घेतेस तू सगळं,
जे मला अद्याप हि जमलेलं नाही वा जमणार नाही. कसं जमतं तुला रे , हे सगळं ?सांग ना ?
ह्यालाच मी प्रेम म्हणू का ? तुझं माझ्यावरचं , निस्सीम नितळ ? कि प्रेमातली आहुती ? नातं हळुवार उमळताना,  त्यातलं जीव   काढून घेण्याचा वा स्वतःहून देण्याच्या  ह्या  अवस्थेला  नाहीतरी काय बोलावं,  बोल ना..?
तो भरभरून लिहत होता . कित्येक दिवस मनात उसळलेल्या आपल्या भावनांना कागदवर उलगद उमटवून देतं.  आज तिच्यापुढे  हे सगळं  मांडायचं होतं. पत्राद्वारे ...तो लिहत होता .

कुणावर प्रेम करणं हे  पाप  तर नाही ना  रे  ?
नकळत घडणारी सहज अशी हि क्रिया आहे.  आणि अश्या सह्जतेतूनच तुझं- माझं , आपलं नातं जोडलं गेलेलं , न्हाई का ? पण त्याला असं एकाकी वेगळं वळण लागेल.  हे ध्यानी मनी हि न्हवतं.

म्हणतात आयुष्यभर कोण सोबत राहील वा नाही ते आपलं स्वभाव ठरवतं असतं. म्हणायला काही अंशी ठीक आहे हे ,
पण सगळ्याच गोष्टी  आपल्या हाती नसतात रे , हे कळून चुकलंय आता . कर्ता करविता कुणी और असतो.  आपण केवळ क्षणाचे सांगाती.  फक्त चालायचे . मार्ग कोणता तो,  तो ठरवणार .
पण त्या अनामिक मार्गावर जुळलेल्या क्षणिक भेटी गाठी  अन ते  क्षण  आपण केवळ आपल्या स्मृतीत गुंडाळून ठेवू शकतो. इतकंच. 
आणि हाच एक पर्याय उरलाय मला वाटतं माझ्याकडे. अन त्यालाच धरून मला जगायचं आहे .

आयुष्यात एकदाच आणि पहिल्यांदाच कुणावर प्रेम केलं रे मी ,  स्वतःला झोकावून देतं. आणि त्याला असं वळण लागलं बघ ..
तुझं हे  टाळाटाळ करणं ,  ना बोलणं ,   दूर जाणं.,  सगळं समजतंय मला . पण सोसवत नाही . इतकंच .
त्या वेदना अपार आहेत. आणि काळच त्यावर औषध ठरेल. 
तुझाच ...
- मनातलं काही ..
सहज लिहता लिहता ..

 संकेत पाटेकर
११.०४.२०१७ 

गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

मनाच्या भाव 'अवस्था'

ऐ , तू सिरीयस आहेस  का ?
मग थांब तिथे...आलो मी..
मला तुझ्या समोर हे ऐकायचं आहे.  प्रत्यक्ष ..
Then  .. Step away ..

घाटकोपर ला मेट्रोच्या रांगेत उभे असता.  माझ्याच मागे उभ्या असलेल्या,   साधारण  चाळीसच्या आसपास असलेल्या... त्या व्यक्तीच हे वाक्य  , कानी भरभर आदळू लागलं. 

‘मला हि त्रास होतोयं , समजलं  …’
सैरभैर  अवस्थेतील , रागारागाने फणफणत  , फोन वरून सुरु असलेलं,  त्यांचं हे असं  संभाषण..सरळ सरळ कानी येत होतं.
त्याने मनाच्या  विचारांची घडी एकाकी बिघडत गेली. मी आपल्याच विचारात असा मशगुल होतो गेलो.

‘एकमेकांच्या सहवासात इतकी वर्ष घालावल्यांनंतर  हि,   वयाच्या ह्या स्टेज ला  , नात्यात अशी दुंभगता  यावी ? नात्यातली विश्वनीय फळी तुटावी .  ह्यानेच मन  काहीसं प्रश्नार्थी होऊन गेलं . ‘
वाढत्या वयो- मानानुसार आणि मिळालेल्या अनुभवानुसार,  आपली बौद्धिक जाण व समज अधिकाधिक दृढ  होतं जाते. असं काहीसं मी आजवर मानत आलो होतो  ... पण आता ..

तितक्याच , मेट्रो आल्याची चाहूल  झाली .  त्या  तंद्रीतून मी बाहेर पडलो.  
घाटकोपर ते चकाला असा पुढचा  प्रवास सुरु  झाला. 
गर्दीने भरलेली मेट्रो आपल्या लयीत सुरु झाली.  आणि  नव्यानं , नवी काही वाक्य अलगद  कानी झेपावली  . ह्यावेळेस  लाडीगोडीनं  भरलेला असा  प्रेमळ संवाद खिदळून  हसत होता. 
त्याने मन हळूवार मोहरत गेलं.  किंचित आधी ऐकू आलेले ते बोल , तो नात्यातला राग... आता धूसर होत जाऊन , प्रेमाने बाजी मारली होती .
क्षणातच सगळं बदललेलं.  भाव बदलले. जागा बदलेली आणि ती व्यक्ती हि बदलेली . 
मी पुन्हा आपल्याच विचारात असा  गर्क झालो.

मनाच्या ह्या सगळ्या भाव 'अवस्था'  आहेत .
त्या त्या  क्षणा- नुसार  किंव्हा घटना-क्रमानुसार , आपल्यातल्या सुप्त जाणिवांना 
वास्तव्याचा स्पर्श देतं  . आपल्यातला 'माणूस' आणि 'माणूसपण' दाखवून देणारया 'अवस्था' 

- संकेत पाटेकर
०६.०४.२०१७