बुधवार, ३० मे, २०१२

आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती सोडून का जाते रे ?

आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती सोडून का जाते रे ?
काल सायंकाळी ऑफिस मधून घरी परतत असताना ... एक मेसेज आला मोबाईल वर जवळच्याच एका व्यक्तीचा .. त्यात तिने प्रश्न केला होता ...
आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती सोडून का जाते रे ?
काही क्षण त्या प्रश्नाकडे नजर माझी स्थिरावली गेली. अन क्षणात वाऱ्या गतीने मनात विचारांचे चक्र गरगर फिरू लागले . भूतकाळाच्या आठवणीत मनं कस गढून गेल.
का दुरावते ती व्यक्ती जिच्यावर आपण मनापासून प्रेम कराव ? का होत अस ? काय चुकतं आपलं ?
पहिली गोष्ट : आपण त्या व्यक्तीशी कसं बोलतो कस वागतो कस आचरण करतो ? त्यावरून तिच्या मनात आपल्या विषयीक प्रेम भावना व आदर निर्माण होत असतो.
व त्याप्रमाणेच तिचं आपल्याशी बोलणं वगैरे होत असतं.
दुसरी गोष्ट : काही वेळा ...वेळे अभावी ...व परिस्थितीच्या कचाट्यात सापडल्यामुळे त्या व्यक्तीला आपणास वेळ देता येत नाही .
भेटता येत नाही ..नि बोलता हि येत नाही . हे खर असत पण ते आपणास खोट वाटू लागत .. ती व्यक्ती जाणून बुजून आपल्याशी अस वागत आहे ह्याच तंद्रीत आपण राहतो . त्यामुळे कधी कधी अस वाटून जात . कि ती व्यक्ती आपणा पासून दुरावत चालली आहे .
तिसरी गोष्ट : आपल इतक प्रेम असत त्या व्यक्तीवर .. कि सतत आपण त्या व्यक्तीचाच रात्रंदिवस विचार करत राहतो तिच्याविना आपणास दुसर काही दिसत नाही किंवा काही सुचतच नाही . अशा वेळी समोरील व्यक्ती जीवन काय आहे , आपल ध्येय काय आहे . .. प्रेमा पलीकडे सुद्धा एक जग आहे . हे दाखवून देण्यासाठी आपणापासून काही अवधीसाठी स्वताहाच्या मनावर दबाव टाकून दूर राहते . आपल्या हितासाठी आपल्या भल्यासाठीच ..!!
बघा माझं म्हणणं पटत का ते तुम्हाला ...
संकेत य पाटेकर २४.०५.२०१२
गुरुवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .