सोमवार, २ जुलै, २०१२

आयुष्य ...



७५ टक्के आयुष्य हे दुखाने व्यापलं आहे जणू आणि २५ टक्के फक्त सुख आणि आनंद .... सुखाचे क्षण तरी किती ते हाताच्या बोटावर मोजता येईल तितके ...दुख हे अथांग महासागरासारख विस्तीर्ण ....
कधी कधी वाटत कि दुखी अश्रुनेच हां अथांग महासागर निर्माण झाला असावा . प्रत्येकाचे दुख किती वेदानात्मक असतात ...काळजावर ते अनेक घाव घालतात . पाहवत नाही ...बघवत नाही.
अस वाटतं कि गांधीजीनी ज्या प्रकारे इथल्या गोर गरिबांसाठी त्यांच्यासाठी , जोपर्यंत त्यांना अंगावर घालण्यासाठी व्यवस्थित कपडालत्ता मिळत नाही तोपर्यंत ...स्वतःसाच्या अंगावर फक्त पंचा नि धोतराच परिधान करून राहिले ..... तसं मीही माझ्या प्रिय जनासाठी जोपर्यंत त्याचं दुख दूर होत नाही ...तोपर्यंत आपण कसलीही मौज मजा न करता ह्या दुखाला कवटाळून राहावं ......अस मनात येतं :)

- संकेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .