शनिवार, १७ ऑगस्ट, २०१३

शिकून सुद्धा अडाणी ...ते अडाणीच


शिकून सुद्धा अडाणी ...ते अडाणीच व्यवस्थित टापटीपपणा आणि सूट बुटात असणारी एखादी व्यक्ती ..घरात , ऑफिस मध्ये व्यवथित वागेल . पण घर बाहेर पडताच .... एखाद्या ना समज मुलासारखी .... अक्कल नासेलेली आपण इतकी पदवी घेतलेय शिकलोय ह्याच त्यांना काहीच मुल्य नाहि ., खर तर लाज वाटायला हवी . आपण जे काही करतोय त्याची ... तुम्हाला वाटेल मी काय हे वायफळ बडबडतोय ........काय लिहितोय , खर तर मित्र मंडळी ... एक साधासाच विचार आहे . पण खरच शिस्तीची गरज आहे .
जाता येता रस्त्याने आपणास एक चित्र नक्कीच पाहायला मिळत असेलच . एखादी व्यक्ती एखद्या दुकानातून काही खाद्य पदार्थ विकत घेते , आणि त्याने पोट तृप्ती झाल्यानंतर त्यातून निर्माण झालेला केरकचरा , कागदाचा एखदा बोळा असो , प्लास्टिक असो , टरफलं असो वा इतर काही ...आपल्या आसपास कुठे हि टाकून पसार होते . ह्याउलट तंबाकूच्या पिच्कारया उडवण ..असे प्रकार हि सर्रास दिसतातच .
बस मध्ये म्हणा , ट्रेन मध्ये म्हणा , रस्त्याने चालताना म्हणा , driving करत असतना म्हणा एखद्या ऐतिहासिक स्थळी म्हणा ........ह्याना शिस्त नि नीती मुल्य ती नाहीच.
घरात ह्यांच्या स्वच्छता , टापटीपपणा , पण घरा बाहेर सार्वजनिक ठिकाणी घाण करायची .
हे शोभत का ? हा प्रश्न स्वतःने स्वतःलाच विचारा ? रस्त्येन चालताना आपणच एका ठिकाणी कचरा करायचा ...आणि तिथे कचर्याचा ढीग साचल्यावर मात्र दुसर्यांच्या नावावर बोंबा मारायची . हे असे प्रकार .. निदान शिकलेल्या माणसांनी तरी शिकल्या सारखं थोडं तरी वागा.
जिथे स्वच्छता असते , तिथले वातावरण हि छान , मोकळ असत . मनाला ताजतवान करणार . देशात अनेक प्रश्न आहेत . पण सर्व प्रथम खरच मुल्यशिक्षणाची गरज आहे .
चला तर मग स्वच्छतेची शिस्त पाळू ......
- संकेत पाटेकर
१७.०८.२०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .