गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१३

जेंव्हा आपण काहीच नसतो ..


जेंव्हा आपण काहीच नसतो तेंव्हा आपल्याला कुणी विचारात घेत नाही .
जेंव्हा आपण काहीतरी असतो तेंव्हा लोक स्वताहून आपली विचारपूस करतात, जवळीक साधतात.
आयुष्य हे असं ... कुठल्यातरी एका वळणावरती , पाउल वाटेवरती आपल्याला समजून घेणार , आपलं ऐकणार कुणी एक नसतं. तेंव्हा त्या वळणावर त्या वाटेवर स्वतःला सावरतंच आपल्याला पुढे याव लागतं.
ज्या गोष्टींची ज्यावेळेस खरी गरज असते ती गोष्ट वेळेवर मिळतेच अस नाही . काही वेळा गरजेची ती खरी वेळ निघून जाते. आणि आपण मात्र अनुभवाने शहाणे होतो.
- संकेत
मनातले काही
०३.१०.२०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .