शनिवार, १७ मे, २०१४

'" Sometimes your heart needs more time to accept what your mind already knows."


मन हि मन में...
'" Sometimes your heart needs more time to accept what your mind already knows."
बरंच काही लिहायचं आहे आज ...पण कसं लिहू ?
कुठून सुरवात करू? काही कळत नाही .
"मन" नावाचा हा प्रकारच खूप अजब आहे . विचार विचार आणि फक्त विचार ..अगदी भेडसावून सोडतात . एखाद्या भुताटकीसारखं ...पिच्छा सोडत नाही
जगात सर्वात गतीवान काय असेल तर मी म्हणेन हे आपले विचार ....सतत धावत असतात सतत .
ह्यांच्या वेगाचा मोजमापाच नाही . करताच येणार नाही . करणार तरी कसं ते ...शक्य आहे का ?
दर सेकांद्ला मिनिटाला कित्येक विचार बाहेर पडतात . ते कुठून कसे येतात? कुठे जातात काही माहित नाही . त्या त्या परिस्थितीनुसार , वेळेनुसार सार घडतं . अशावेळी विचारांची संख्या हि अगणिक असते.
कधी हेच विचार मनाला पार खचून टाकतात . आपल्या दुबळेपनाच कारण ठरतात .
तर कधी तेच मनाला बळकटी प्राप्त करून देतात काल अशीच एक घटना घडली.
सकाळपासून विचारांनी अगदी हैराण करून सोडलं होतं. मनात अनेक प्रश्नांनी थैमान घातले होते.
असलेल्या प्रश्नाची उकल होत न्हवती .
शेवटी मनाचा निर्णय घेऊन ती उकल करण्यास काहीसा (पूर्णपणे नाही ) सफल झालो. मनाचा थोडा भार कमी झाला . प्रश्नाचं उत्तर मिळालं . मात्र ह्याचा त्रास समोरच्याला झाला . नाईलाज होता. अन तो होणारच होता. त्यासाठी माफी मागतो .
माफ कर, ...करशील का ? प्लीज
तसं दर वेळेसच आहे हे माझं . चुका करायच्या अन नंतर माफी मागायची.
 पण त्या मागे हि कारण होत. एका उत्तरासाठी धडपडत होतो . ते मिळत न्हवतं .कित्येक दिवस..
ते आज मिळालं . मनात अस काही नाही . तुला त्रास वगैरे देणं , त्रास द्यावा हा मुळीच हेतू नाही .
 आपल्या आवडत्या जिवलग अश्या व्यक्तीला त्रास देण कुणाला आवडेल का ? नाही , अजिबात नाही .
उलट कितीही काही झालं तरी त्या भगवंताजवळ एकच प्रार्थना असते नेहमी .
हे देवा ,भगवंता ' माझ्या त्या लाडक्या व्यक्तीला सदा आंनदी अन सुखी ठेव . तिच्या चेहऱ्यावरचे हास्यतरंग नेहमीच बहरू दे प्रसन्नतेच्या वाटेवर सदा ..न सदा ..
दु:खाची जर देवाण घेवाण करता आली असती तर , नक्कीच तीच दु:ख, तिच्या मनाला पिडणार्या वेदना मी हसत हसत माझ्याकडे घेतल्या असत्या . पण त्या कर्त्याने असा काही नियम लागू केला नाही .
अशी सूट दिली नाही . ज्याचं त्याचं दु:ख ज्याने त्यानेच भोगावं . हा नियम त्याने लागू केला . अन त्या नियामा प्रमाणेच आपण आता सारं सहन करतोय . त्यातून घडतोय .
आयुष्यात मला एक ' चांगला माणूस' म्हणून नाव कमवायचं आहे .
एक चांगला माणूस व्हायचं आहे आहे .
 माझ्या भाऊ- बहिणींचा एक ' चांगला भाऊ' . माझ्या वाहिनीचा चांगला दीर , माझ्या आई वडलांचा चांगला मुलगा , माझ्या पुतण्या - भाच्यान्चां एक चांगला काका - मामा , माझ्या मित्रांचा एक चांगला मित्र .
अन पुढे भविष्यात माझ्या पत्नीचा एक चांगला पती . बस्स प्रयत्नाची कसर चालू आहे .
त्यात अजून तरी सफल झालो नाही. पण शेवटपर्यंत प्रयत्न चालू राहतील .
जुळलेल नातं कधी तोडणार नाही . ह्या मताचा मी आहे.
नात्यांच्या ह्या असंख्य धाग्यातूनच हे जीवन गुंफल आहे . वेगवेगळ्या रंगाचे स्वभावाचे हे धागे आपलं जीवन खरया अर्थाने समृद्ध करतात . जीवनाची व्याख्या अश्या विविध धाग्यातूनच तर मिळते .
कुठेतरी कधी एक धागा सैल होतो शब्दांच्या धारेने , कधी मूकपणाने ...तेंव्हा मनाची फरफराट उडते .
बस्स हे शब्द बोचू लागतात . मग सार निरर्थक वाटू लागतं.
कितीही चांगलं वागलं ..तरी कुठेतरी काहीतरी खटकत समोरच्याला .
ते आपणास कळत नाही . मग हेटाळणी सूर होते. कुणी मूकपणाने दूर जावू लागतं....
कुणी त्वेषाने बघू लागतं . कुणी दुर्लक्ष करू लागतं .
हे जाणून हि आपल्याशिवाय ती व्यक्ती जगू शकत नाही . तर कुणी मुकपनाचं शाब्दिक घाव देतं.
चुकी कुणाची हि असेना ते महत्वाच नसतं .
अश्यावेळी आपण एकमेकांना समजून कसं घेतो हे महत्वाच ..पण ...घडतं वेगळंच . तेंव्हा वाटू लागतं .....
आयुष्यात एकच असा दिवस आहे . जिथे आपले शत्रू पक्ष हि , जीवापाड प्रेम असूनही आपल्या पासून दुरावलेले...आपली हेटालनी करणारे एक चांगली गोष्ट बोलून जातात.
अगदी मनापासून, ते म्हणजे ' तो खरचं खूप चांगला होता '
असा दिवस एकदाच येतो .पण तो कधी येईल तो सांगता येत नाही .त्याचा नेम नाही .
पण आलच तर सर्वांना एकत्रित आणतो हे खरे,  तो दिवस म्हणजे आपला ' मृत्यू' शेवटची घटका. 
 हा मृत्यू हि कधी फार जवळून बघता येतो .
स्वतःच्या डोळ्यांनी ..स्वतःचाच मृत्यू . विश्वास बसत नाही आहे ना? पण येतो पाहता..
स्वतःच्या डोळ्यांनी .....जिवंतपणी .
मी तरी पाहतो ...
कोण कोण आणि कितीजण बरं अश्रू वाहतील आपल्यासाठी .
कोण येईल सर्वप्रथम ?
 त्यांच्या मनातल्या भावना काय असतील अश्यावेळी?
 आपली आवडती जिवलग व्यक्ती येईल का ?
तिच्या भावना काय असतील अश्यावेळी ? गणिताची अशी आकडेमोड सुरु होते .

पण हे सारं निरर्थक . जागेपणीच हे दृश्य मनाला ..मात्र पुन्हा चांगल्या मार्गाकडे वळवत.
तुला अजून खूप काही कमवायचं आहे . माणसं जुळवायची आहेत . हे नातं फुलवायचं आहे,  टिकवायचं आहे .
हे जीवन जगतानाच अस जगायचं आहे कि त्याचं जिवंतपणीचं सार्थक झाल पाहिजे .
मृत्यूनंतर हि प्रत्येकाच्या ओठी आपलं नाव उमटलं पाहिजे .
बस्स..जीवन असाच जगायचं आहे .
काही प्रश्नाची उत्तर हि आपल्याकडेच असतात . जुळलेल्या नात्याची , समोरच्याशी संबंधित अशी ...
पण ती उत्तर देताना मनाची तारांबळ उडते . जेंव्हा समोरील व्यक्ती अशा प्रश्नाचं सतत पाठपुरावा करत राहते . तेंव्हा खूप अवघड जातं . मनातले भाव बोलून दाखवणे . ते व्यक्त करणे . तेंव्हा शब्द बोलतात ते मूकपणाचे ....
कुठून तरी आलेले ..पण अंतरीचे ... मी हि असाच पाठपुरावा करत राहिलो तेंव्हा हे एक इंग्रजी वाक्य नजरेस पडलं.
'" Sometimes your heart needs more time to accept what your mind already knows."
काही प्रश्नांची उत्तर तयार असतात आपल्या मनात. हे असच का , ते तसच का ? तर्क वितर्कावर आपण बरेच निष्कर्ष काढतो हि . पण साऱ्यांच गोष्टी तर्क वितर्कावर सोडवल्या जात नाहीत.
त्यास खरेपणाची पृष्टी मिळावी लागते. त्यासाठी इतर मनाचा त्या व्यक्तीच्या अंतरीचा वेध घ्यावा लागतो. पण कळूनही काही गोष्टी स्वीकारण्याची आपल्या मनाची तयारी होत नसते .
एक तर आपलं खूप जीव असतो अश्या गोष्टींवर अशा व्यक्तींवर ... अन अशापासून स्वतःला दूर करण , बाजूला सारण फारच अवघड जातं . वाटते तितकी सोपी गोष्टी नसते ती .
एक घट्ट धागा विणलेला असतो नात्याचा . तो सहजा सहजी सोडता सोडवता येत नाही.
मन हि मन में...
असंच लिहिता लिहिता ...
नातं तुझं माझं..
संकेत य पाटेकर
१९.०३.२०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .