बुधवार, २९ जुलै, २०१५

सरप्राईझ पार्टी ..

आयुष्यात चांगल्या मित्रांची साथ संगत लाभनं हे नशिबातच म्हणावं लागेल.
असे मित्र मला लाभलेत ह्यातच माझं अर्ध अधिकी जीवन सार्थकी झाल्याचं मी समजतो. 

हे मित्र लाभनं जस भग्यातलं समजावं तसं त्यांच्या शिवाय हे जीवनं जगण देखील
व्यर्थच म्हणावं लागेल.
नेहमीच कुठल्याही प्रसंगी तत्पर असणारे .
न बोलता , न सांगता, कधीही कुठे हि, कसेही , टपकणारे हे मित्र .
म्हणजे आपला एक परिवारच ....एक इवलंस पण मोठ्या मनाचं , मोठालं कुटुंब...
आपल्या सुख द्खाचा वाटा स्वताहून हिसकावून घेणारे ... हे मित्र ,
आपला मूड असो वा नसो ...पण नेहमीच आपली सोबत करणारे ..हे मित्र ,
कधी सगळ्यां समोर आपली टर्र उडवणारे , कधी हसवून खिदळवनारे , कधी योग्य तो
मार्ग दाखवून ,मार्गीस्थ लावणारे , छोट्या छोट्या गोष्टींवरूनही पार्टी
मागणारे... हे मित्र ,

खिशात दमडी नसतानाही , स्वताहून आपले पैसे भरणारे ....,राहू दे रे, ' घेईन
नंतर व्याजासकट अस मुद्दामहून म्हणनारे , पण दमडी हि न घेणारे.. हे मित्र ,
कधी चित्रपट पाहण्यास चल म्हणणारे, नाही म्हणताच ओढवून घेऊन जाणारे ,म्हस्का
मारणारे , अन CCD त कॉफ्फी पाजणारे हे मित्र ..

कधी टपरीवरचा चहाचा घोट घेता घेता तासनतास गप्पात रंगणारे ,
कधी मुंबईतल्याच सागरी किनारी सांजवेळी एकांतात हरवणारे हे मित्र ,

कधी सह्याद्रीच्या माथ्यावरून ओसंडलेल निसर्ग सौदंर्य न्याहाळत ,सृष्टीचं
गुणगान गाणारे हे मित्र ,
कधी प्रेमा सारख्या हळव्या विषयावरून ..बोलून टाक रे , आता तरी वेळ दवडू नकोस
, अस वेळेच गणित मांडून समजावून सांगणारे हे मित्र ,

बिनधास्तपणा राहणारे , बिनधास्तपणातच जगणारे अन जगण्यास शिकवणारे असे हे
टवाळ खोर (मुदाद्मुहून हा शब्द टाकतोय हा )मित्र ...

हे मित्र म्हणजे आपल्या जीवनातील सुखाची हर्षगुणी लाटच जणू .. ती लाट स्वतः
बरोबर, काही ना ना काही भरभरून घेऊनच येत असते . अन आपण त्यात थुई थुईनि
हर्षमुख होवून जीवनगाण गात असतो .

असेच काही माझे मित्र ..अन त्यांनी दिलेली हि सरप्राईझ पार्टी ..

रात्री साडे बारेचा ठोका , दरवाज्यावर ठकठकल्याचा आवाज आला .
इतक्या रात्री कोण असणार ? म्हणून मनात ना ना विचारांचा फडश्या पडला.
वाढदिवसाचा दिवस नुकताच टळून गेला होता.

रविवारची मध्यरात्र सुरु झालेली ..., रातकिड्यांची संगीतमय स्पर्धा सुरु झाली
होती. त्यांची किर्र किर्र सुरु होती. 
गावी असल्याने ..साहजिकच रात्री १० च्या आधीच सगळेच सामसूम असतं. (मी हि
होतो ) संपूर्ण गाव निद्रास्त असतं अश्यावेळी . अन अश्यावेळीच नेमकी ठक ठक ..ठक ठक
.....
सावध पाउलनिशिच हळूच दरवजा उघडला . बाहेर डोकावून पाहिलं .
अंधाराशिवाय काही दिसत न्हवतं .पण क्षणात 'हैप्पी बर्थ डे' चा नारा देत एका
पाठोपाठ एक मित्र हजर झाले. अन एकाकी आश्यर्यचा सुखद धक्का मिळाला.
रात्री साडे बारा ते एक दरम्यान 'बर्थ डे सेलेब्रेशन' सुरु झालं. फोटोशेशन चा
कार्यक्रम हि उरकला . अन त्यानंतर अडीच तीन पर्यंत गावाबाहेर ,काळोख्या
रस्त्यावरून ..भूता सारखे आम्ही भटकत राहिलो. भूत खोताच्याच गोष्टी करत ...
अशी हि मित्र मंडळी ...
दुसर्या दिवशी ...अथांग तळ्यात मनसोक्त पोहणं काय , नि शहरी पुन्हा येता
येता ...पवित्र भूमी उंबरखिंड चे दर्शन घेतो काय अन निसर्ग सौंदर्याची लयलुट
तृप्त भारल्या नजरेनेच लुटतो काय ...सारच न्यारं...मदहोश करणार ..
पण इतक असूनही एक ठिणगी मनाच्या तळ कोपर्यात तांडव करत होती. त्याने मनं
काहीसं ढासलेलं. एक जिवाभावाची जिवलग व्यक्ती आपला वाढदिवस, विसरतेच कशी?
ह्याचं शल्य मनास लागून होतं . अद्याप हि ..

भले हि आपण लहानच किती हि मोठे झालो तरी हे लहानपणातलं हट्टीपण काही मिटत नाही
हो . अन ते माझ्यात आताही आहेच .... ...त्यासाठी राग अनावर झालेला . 
पण तो आता हळूहळू ओसरतोय ....
कारण हक्काने भांडायला अशीच संधी लाभावी लागते . तीसोडायची नसते. अन ती मी घेतलेय .

मध्यंतरी (वाढ दिवसाच्या दिवशी ) मी काही वेळ मोबाईल बंद ठेवला होता .
त्यासाठी क्षमस्व ....

काहींचा फोन रिसीव्ह करता आला नाही . काही call करत होते पण तो लागला नाही .
काही मित्र नक्कीच रागावलेत . हे माहित आहे .

तुम्ही बिनधास्त भांडू शकता . हक्क आहे तो तुमचा ...
माझ्या सर्व मित्रांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद ....वाढ दिवसाच्या
प्रेममयी शुभेच्छांसाठी ..असंच प्रेम बहरू द्या ...दरवळत राहू द्या .
आपलाच ,
संकेत उर्फ संकु ..
२८.०७.२०१५
फोटो - संदेश कोयंडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .