बुधवार, ८ जुलै, २०१५

निसर्ग आणि प्रेमं ..

ह्या निसर्गाचं एक वेगळंचं रूप आहे. अनेक गोष्टींनी तो अगदी स्वयंपूर्ण आहे.
त्याकडे काहीही कमी नाही. आपण बारकाईने , अगदी समरस होवून गोड कौतुकाने
त्याकडे पाहिलं . त्याला ऐकलं ना तर तो बऱ्याच गोष्टी कथन करत जातो.
आता हेच बघा ना ..!
कधी कधी ह्या हिरव्याशार वृक्षराजींच्या सहवासात असता , नजर हळूच सळसळनाऱ्या
, ' त्या पानांकडे एकवटली जाते.
अन मनात विचारांचा फुलोरा हळूच आकार घेत जातो.
किती प्रेम अन जवळीक आहे ह्या दोघांत , अन तितकीच उत्कंठा हि ...आगमनाची !
हा उनाड , खट्याळ वारा..
त्याच्या नुसत्या चाहुलीनं हि पानं- फुलं अगदी शहारून येतात.
लाजून मोहून ती अगदी थरथरून जातात . स्पर्शाची मोहिनी त्यांच्यावर झेप घेते
जणू...
एखाद्या प्रियकरांनं आपल्या प्रेयशीचा हात हळूच हाती घ्यावा. अन तिने त्या
स्पर्शानं अगदी शहारून जावं, हूरहुरून जावं. तशीच काहीशी चेतना अंगभर संचारली
जाते त्यांच्या ..
कुणीतरी येतंय , आपलं हसू खुलवायला ..ह्यानेच ते अगदी बेभान होवून जातात .
आनंदाने नाचू बागडू लागतात.
आपलेपणाची नाळ रोवून हा उनाड वारा हि न चुकता त्यांचा आनंद त्यांना तो देऊ
जातो. स्वार्थ बाजूला ठेवून...
एकमेकांशी त्याचं इतकं घन्निष्ट नातं जुळलेलं असतं कि काही वेळा हि पानं-
फुलं त्याच्या निस्वार्थी प्रेमापायी स्वतःची आहुती हि द्याला तयार होतात .
अन मग हा उनाड वारा हि मोठ्या धीरानं अन कष्टी मनानं त्यांना आपल्यासोबत
सामावून घेतो. वाहून नेतो.
असच काहीसं स्फुरलेलं..
- संकेत पाटेकर (संकु )
०८.०७.२०१५


२ टिप्पण्या:

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .