शनिवार, ६ जानेवारी, २०१८

''संवाद ...''

अगदी म्हणावं तर घसा कोरडा होईपर्यंत मला केकटून  ओरडावं लागतं. प्रत्येकवेळी.. 
 ''अरे बाबा.., अगं बाई .''
आहेस का जिवंत ? कि गेलात ? हा ?
एक साधा कॉल नाही करू शकत , म्हणजे कमाल आहे यार  ? विसरलात ना ? 
तेंव्हा समोरून प्रतिउत्तर  येतं. 
जरा माफीच्या स्वरात....नमत्या अदबीनं ..
''सॉरी सॉरी ... ''
आहे रे , आहे इथेच आहे. 
नाही सोडून जाणार इतक्यात..,  थोडं..... 
मग नेहमीचच  त्यांचं 'कारणे द्या'' सत्र सुरु होतं. कधी तास भर , तर कधी काही मिनिटं ,गप्पांच्या   गुणगुणत्या ओघात  आणि ते मी सगळं  निमूटपणे ऐकून घेतो. (घ्यावं लागतंच म्हणा...पर्यात नसतो नं  )    ''पनीर चिली आणि भेटीच्या शर्थीवर ...  '' 
असो, तर सांगायचं काय आहे  , 
संवाद हा नात्यांचा 'मूळ' ..म्हणावा तर 'दुवा' 
मनं बांधून ठेवणारा. जोडणारा . 
तो असा 'जागता' ठेवावा लागतो. भलेही  ''जिवाभावाची'' स्नेहगोडीने , ममत्वेने जोडली गेलेली हि  कार्टी आप आपल्या संसारात , दुनियेत कितीही व्यस्त आणि धावपळत असली तरीही ... 
शेवटी 'आयुष्य' हे अश्या नात्यांच्या सहवासातच ( क्षणांच्या  विविध अंगाने ) झुलत असतं , न्हाई का ? 
म्हणूनच कधीतरी,  साधावा संवाद .  आपल्या ह्या  मनाला सांभाळून ..थोपवून आणि घ्याव्यात अवचित भेटी गाठी. नात्यांची  वीण पुन्हा घट्ट रोवत. 
जगण्यातला गोडवा वाढवत…
तुमचाच ..
- संकेत पाटेकर 
०६ /०१/२०१८ 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .