अगदी म्हणावं तर घसा
कोरडा होईपर्यंत मला केकटून ओरडावं लागतं. प्रत्येकवेळी..
''अरे बाबा..,
अगं बाई .''
आहेस का जिवंत ? कि
गेलात ? हा ?
एक साधा कॉल नाही करू
शकत , म्हणजे कमाल आहे यार ? विसरलात ना ?
तेंव्हा समोरून
प्रतिउत्तर येतं.
जरा माफीच्या
स्वरात....नमत्या अदबीनं ..
''सॉरी सॉरी ... ''
आहे रे , आहे इथेच
आहे.
नाही सोडून जाणार
इतक्यात.., थोडं.....
मग नेहमीचच
त्यांचं 'कारणे द्या'' सत्र सुरु होतं. कधी तास भर , तर कधी काही मिनिटं
,गप्पांच्या गुणगुणत्या ओघात आणि ते मी सगळं निमूटपणे
ऐकून घेतो. (घ्यावं लागतंच म्हणा...पर्यात नसतो नं ) ''पनीर
चिली आणि भेटीच्या शर्थीवर ... ''
असो, तर सांगायचं काय
आहे ,
संवाद हा नात्यांचा
'मूळ' ..म्हणावा तर 'दुवा'
मनं बांधून ठेवणारा.
जोडणारा .
तो असा 'जागता' ठेवावा
लागतो. भलेही ''जिवाभावाची'' स्नेहगोडीने , ममत्वेने जोडली गेलेली हि
कार्टी आप आपल्या संसारात , दुनियेत कितीही व्यस्त आणि धावपळत असली तरीही
...
शेवटी 'आयुष्य' हे
अश्या नात्यांच्या सहवासातच ( क्षणांच्या विविध अंगाने ) झुलत असतं , न्हाई
का ?
म्हणूनच कधीतरी, साधावा संवाद . आपल्या ह्या मनाला
सांभाळून ..थोपवून आणि घ्याव्यात अवचित भेटी गाठी. नात्यांची वीण पुन्हा
घट्ट रोवत.
जगण्यातला गोडवा वाढवत…
तुमचाच ..
- संकेत पाटेकर
०६ /०१/२०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .