प्रेम हे मोजता येत नाही रे , त्याला
आकार माप अस काही नाही .म्हणून ते मिट्विता ही येत नाही .
ते फ़क्त अनुभवता येतं. जाणता येतं …
हृदयातल्या भाव गीतेतून .. नजरेतल्या
अथांगतेतून, सप्त सुरांच्या अमोघ वाणीतून, स्नेह पूर्ण स्पर्शातून , अबोल्यातून,
दुराव्यातून..आणि आपलेपणाच्या जिव्हाळीक नात्यातून..
आणि प्रेम हे एकच शाश्वत आणि सत्य , मी मानतो ..जे अक्षय आहे.
ज्याला मरण नाही.
आणि हेच एकमेव 'प्रेमरत्न' मी तुला देऊ शकतो .
.
बोल...आयुष्य भरासाठी तुझि साथ मला देशील ?
माझ्या सारख्या वेडगळ , साधसचं जीवन जगणाऱ्या ...अन साधसचं राहणीमान असलेल्या ..
मुलाशी लग्न करशील ? तयार आहेस ?
तू चंद्र तारे म्हणशील तर , ते तुला मी कदापि आणून देणारं नाही हा ...अश्या वायफळ बाता मी करणार नाही. पण कले कलेतून वाढत जाणाऱ्या त्या चंद्राची शीतलता अन मिणमिणत्या ताऱ्यांची लखलख आणि ते अथांग विश्व तुला जवळून अनुभवायला नक्कीच मिळेल. ह्याची खात्री देतो .
आणि हेच एकमेव 'प्रेमरत्न' मी तुला देऊ शकतो .
.
बोल...आयुष्य भरासाठी तुझि साथ मला देशील ?
माझ्या सारख्या वेडगळ , साधसचं जीवन जगणाऱ्या ...अन साधसचं राहणीमान असलेल्या ..
मुलाशी लग्न करशील ? तयार आहेस ?
तू चंद्र तारे म्हणशील तर , ते तुला मी कदापि आणून देणारं नाही हा ...अश्या वायफळ बाता मी करणार नाही. पण कले कलेतून वाढत जाणाऱ्या त्या चंद्राची शीतलता अन मिणमिणत्या ताऱ्यांची लखलख आणि ते अथांग विश्व तुला जवळून अनुभवायला नक्कीच मिळेल. ह्याची खात्री देतो .
कसं
ते माझ्यावर सोपवं ...त्यातला आनंद तुला नक्कीच मिळेल.
आजवर तुझ्यावर ओघाने प्रेम करत आलोयं .. तो ओघ ह्या पुढे हि कायम राहील . पण मनातून उमटलेली प्रत्येक भावना तू त्या त्या वेळेस समजून घेशील हि आशा व्यक्त करतो.
आजवर तुझ्यावर ओघाने प्रेम करत आलोयं .. तो ओघ ह्या पुढे हि कायम राहील . पण मनातून उमटलेली प्रत्येक भावना तू त्या त्या वेळेस समजून घेशील हि आशा व्यक्त करतो.
प्रेम ही तशी एक आतंरिक भावना आहे ...सहजतेतून , सहजतेत ओघळलेली ..मिसळलेली.
ती सहजता ती ओघळता तुझ्या माझ्यात यायला हवी. .....तरच हे नातं उमलेलं आणि बहरेल ....
शेवटच्या श्वासा अखेरपर्यंत …..
बोल
, लग्न करशील माझ्याशी ?
पुन्हा विचार कर ...आणि काय तो निर्णय दे ...आता मात्र उशीर नको करू..
आधीच खूप उशीर झालायं...
तुझाच ....
पुन्हा विचार कर ...आणि काय तो निर्णय दे ...आता मात्र उशीर नको करू..
आधीच खूप उशीर झालायं...
तुझाच ....
असंच..काही सुचलेलं .
- संकेत - १९.०५.२०१६
- संकेत - १९.०५.२०१६
____________________________________________________________________
मी
काही कृष्ण नाही आहे रे ... तो सावळारुपी ईश्वरी रूप , प्रत्येक हृदय मंदिरात आपलं
हक्काचं स्थान मिळवून , नुसत्या एका सादेला हि हवं तेंव्हा , एकाच वेळी प्रतिसाद
देणारा ...
प्रत्येकाच्या
हृदयी गाभाऱ्यात आपलं सावळारुपी अस्तित्व कायम खिळवून मन ज्योती उजळवून देणारा ,
समोरील मनातल अचूक हेरणारा ..आणि अपेक्षापूर्ती करणारा ...... नैराश्याचा ,
अविचारीपणाचा सखोल नायनाट करणारा ...
मी
...मी आहे, साधासाच अन सामान्य , कृष्णाई रूपासारखं सर्वत्र नाही. पण काही हृदयी
घरात नक्कीच आपलेपणाचं स्थान मिळविलेला...
पण त्यासारखं मला कुठेय रे , सर्वत्र नांदता येतंय ..
मनात दडलेल्या अनेकानेक प्रश्नांना ,चिंतांना अन आसवांना कुठे रे शमविता येतंय ..
अपेक्षांचे निरपेक्ष भार हि उचलण्याची तितकी क्षमता नाहीये रे माझ्यात ...
पण त्यासारखं मला कुठेय रे , सर्वत्र नांदता येतंय ..
मनात दडलेल्या अनेकानेक प्रश्नांना ,चिंतांना अन आसवांना कुठे रे शमविता येतंय ..
अपेक्षांचे निरपेक्ष भार हि उचलण्याची तितकी क्षमता नाहीये रे माझ्यात ...
पण
कुठेशी मनमोकळा प्रयत्न असतोच ना सातत्याने , कुणा हिरमुसल्या कळीला , हास्य
चैतन्याचा सुगंध लेवून आपलेपणाने फुलवून देण्याचा .., कुणा एखाद्याशी आपलेपणाच्या
मृदू शब्दानं आधारवड होण्याचा ..
मान अपमान सार सोडून नाती गुंफण्याचा अन जपण्याचा ..
मान अपमान सार सोडून नाती गुंफण्याचा अन जपण्याचा ..
पण तरीही मला ह्या सर्वाना एकत्रित बांधता येत नाही आहे. नात्यातली कुठलीशी घडी हळूच कधी मोकळी होते ..ते कळून येत नाही. आणि जेंव्हा कळत ..तेंव्हा अंतर वाढलेलं असतं.
आयुष्य जगताना , अन ह्या वेळे सोबत पुढे सरताना प्रत्येकाला सोबत घेऊन जायचं असतं.
बस्स ह्या प्रवासात आपलेपणाने जोडलेले हात अन त्यांची साथ , नकळत कधी सुटू नये..इतकंच..
असंच काहीस...
- संकेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .