गुरुवार, १७ मे, २०१२

मित्रहो माझ्या वाचनात आलेली एक सुंदर गोष्ट तुम्हाला मी सांगतो...
शिकण्यासारख आहे त्या गोष्टीतून ... एकदा एका आश्रमात गुरु आपल्या शिष्याला बोलावतात.
 अन त्याला एक काम सांगतात.. कि असाच पळत जा पलीकडच्या गावातील लोकांना संध्याकाळच्या भोजनासाठी आपल्या येथे बोलावून आण..
तो मुलगा तसाच पळत सुटतो. आश्रम आणि गावाच्या मध्ये आंब्याच्या अनेक बागा असतात.
वाटेत ते त्याला दिसतात. त्याला ते आंबे खाण्याचा मोह होतो..आजूबाजूलाही कोणीही नसत.
थोडा वेळ थांबतो ..अन स्वतःशीच म्हणतो,'परत येताना बघू' .पहिलं आपल्या गुरुंच काम करू...
त्या गावातील लोकांना तो गुरूंनी सांगितल्या प्रमाणे भोजनच आमंत्रण देतो.. आणि पुन्हा परतीच्या वाटेला लागतो..
वाटेत त्याला पुन्हा त्या आंब्याच्या बागा दिसतात.. तो आजूबाजूला बघतो. कोणी नसत...कसला तरी तो विचार करतो ... आणि सरळ आश्रमाच्या दिशेने निघतो.
गुरु त्याला विचारतात ...अरे काही आंबे वगैरे खाल्ले कि नाही..भरपूर बागा आहेत तिथे..
तो त्यांना सांगतो ...गुरुजी "मला आंबे खायचा मोह तर झालेलाच...
आजूबाजूलाही कोणीही न्हवत.
 कोणीही नसताना परवानगीशिवाय ते काढण म्हणजेच ती चोरी ठरली असती मला कोणी पाहत नसलं तरी मी स्वतःला पाहत होतो .."आपण दुसर्यांना फसवू शकतो. पण आपण स्वतःलाच कधीच नाही फसवू शकत."
त्याचे ते बोल एकूण गुरु त्याला म्हणतात ..."आता तू माझा खरा शिष्य वाटतोय"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .