गुरुवार, १७ मे, २०१२

मित्रहो
जवळ जवळ १०० पैकी ९० टक्के लोक (त्यात अडाणी आणि सुशिक्षित आणि नेते मंडळी हि) हे घरातून बाहेर पडल्यावर आपल्या जवळ असणारे कागद - बॉटल्स- कचरा रस्त्यावर कुठेही सैरा -वैरा टाकून देतात. आणि तेथील परिसर अस्वच्छ - घाण करून टाकतात. तर मित्रहो कृपया अस करू नका...
!! आपला परिसर स्वच्छ तर आपल आरोग्यही निरोगी !!
एखाद सुंदर स्वच्छ परिसर पाहिल्यावर आपल मन कस टवटवीत आणि प्रफुल्लीत होवून जात.
तर मित्रहो माझी तुम्हाला अशी विनंती आहे कि कृपया इतरत्र अस कचरा कुठेही टाकू नका तो जिथे कचरा पेटी दिसेल तिथेच टाका. आणि आपला परिसर सुंदर - स्वच्छ ठेवा.
मित्रहो तुम्ही म्हणत असाल कि तू आम्हाला सांगतोय तर तू तरी ते करतोस का ?
अमलात आणतोस का ? तर मी हो म्हणेन..
मित्रांनो मी कुठेही जाताना ..तर ते पिकनिक असू देत.
ट्रेकिंग असू देत .. किंवा रस्त्या वर फेर फटका मारताना असू देत ..
मी कुठेही अस कचरा मग तो छोटासा कागद हि असू देत.
कुल्फीची काडी हि असू दे किंवा इतर काही असू दे ..
ते कचरा पेटीतच किंवा घरातल्या कचरा पेटीतच टाकतो .
आणि मित्रांनाही आवर्जून ओरडून - समजावून सांगतो. कि कचरा हा कचरा पेटीतच टाका इतरत्र नाही.
माझे मित्र तर आता कुठे पिकनिकला वगैरे गेल्यावर मला कचऱ्याचा डबा च म्हणतात (मस्करीने हा ) ते मी आनंदाने स्वीकारतो . कारण मला माहित आहे माझ्यामुळे त्यांच्या सवयी मध्ये काहीतरी परिवर्तन होतंय . आणी झालाय सुद्धा ..!
मित्रहो शिस्त हि आपोआप नाही लागत.
ती लावावी लागते. समजावून ..प्रेमाने ..आणि कधी कधी दमदाटिनी सुद्धा ..!
 तर चला मग तुम्ही सुद्धा तयार आहात ना...आपला परिसर स्वच्छ - सुंदर ठेवण्याकरिता..!
आणि हो तुमच्या मित्रांनाही आवर्जून सांगा आणि त्यांच्या मध्येहि हि सवय रुजवा..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .