जीवन एक प्रवास आहे ...सुख दु:खाचा, गोड कटू आठवणींचा , प्रेमाचा अन संघर्षाचा.. अन अशा ह्या प्रवासात कितीतरी बरे - वाईट अनुभव आपणास येतात. ह्या अनुभवानेच आपण शिकतो. घडतो. अन आपल्या पुढील जीवनाची वाटचाल सुरु ठेवतो. माझ्या आयुष्यातले असेच काही क्षण मी तुमच्यापुढे मांडत आहे. जे मी अनुभवलेत, माझ्या शब्दात ..माझे जीवनानुभव ..! - संकेत पाटेकर
गुरुवार, ७ जून, २०१२
मन ..
मनं ...........
कधी म्हणतं तिच्याशी खूप भांडाव , रागवाव....
पण रागाच्या भरात नको ते शब्द भराभरा निघतात आणि मग समोरील व्यक्तीच्या मनावर आघात करतात ...नंतर आपणासही पच्छांताप होऊ लागतो त्या गोष्टीचा.......
समोरील व्यक्तीच वागण कधी कधी अचानक बदलत...ते कां बदलत ह्याच कारण काही केल्या आपणास मिळत नाही.
जोपर्यंत ती व्यक्ती स्वताहा ते सांगत नाही , खर काय आहे ते कळत नाही तोपर्यंत आपण मात्र वेगळ्याच गैरसमजुतीन जात असतो.
मनात येत कि हि जाणून बुजून अस करते आहे , भेटण बोलन वगैरे सार टाळते आहे. ...पण खरी परिस्थिती वेगळी असते , असू शकते ....पण
आपण मात्र .....त्याच लयात राहतो, मनाचा ताण अधिक वाढवत जातो .
- संकेत
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .