सोमवार, २ जुलै, २०१२

आतल्या मनाचा आवाज..

हे मनं, कधी म्हणतं  तिच्याशी खूप भांडाव , रागवावं,
पण रागाच्या भरात नको ते शब्द भराभरा निघतात अन  समोरील व्यक्तीच्या मनावर आघात करतात.
नंतर आपणासही पच्छांताप होऊ लागतो त्या गोष्टीचा.

समोरील व्यक्तीचं  वागणं कधी कधी अचानक बदलतं ...
ते कां बदलतं, ह्याची कारणं  अनेक  असतील पण ते  आपणास  मिळत नाही अन जोपर्यंत ती व्यक्ती स्व:ताहा ते सांगत नाही , खरं  काय आहे कळत नाही  . तोपर्यंत  आपण वेगळ्याच गैरसमजुतीतून  जात असतो.
मनात येतं  कि हि जाणूनं  बुजून करते आहे , भेटणं  बोलणं टाळते आहे.
पण खरी परिस्थिती वेगळी असते , असू शकते हि ...
आपण मात्र .....त्याच लयात राहतो, मनाचा ताण अधिक वाढवत जातं
- संकेत 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .