मंगळवार, ९ जुलै, २०१३

अपेक्षा .....


अपेक्षा .....
आपल्या माणसांकडूनच आपण अपेक्षा फार ठेवतो . आणि तेच कारण असतं काहीवेळेस असलेल्या विश्वासाला तडा जाण्याचं..
. त्याच दोष मात्र आपण सर्वस्वी समोरच्याला देऊन मोकळे हि होतो लगेच , पण खरी चूक हि आपलीच असते, कारण अपेक्षा ठेवणारे आपले आपणच असतो .
अपेक्षा ह्या आपल्या माणसांकडूनच नाही कराव्यात तर कुणा कडून कराव्यात हा ? हा प्रश्न देखील लगेच उद्भवणारच ......पण त्या प्रश्नाचं उत्तर देखील तयार असत..
अपेक्षा ह्या असाव्यात ...पण फार नसाव्यात , ज्या आहेत त्या समोरच्याकडून पूर्ण होत नसेल तरी त्याच दुःख नसावं . कारण समोरचा त्याच्या वतीने पूर्णपणे प्रयत्नशील असतो , जर त्याच्या तुमच्यावर अगदी जीवापाड प्रेम असेल. तुमच्यावर विश्वास असेल तर ........
पण प्रत्येक वेळीस त्याच्या प्रयत्नांना यश येइलच असंही नाही .त्यामुळे आपल्या माणसांकडून ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तरी त्याची खंत मनी नसावी . नाहीतर जीवन जगण असह्य होईल .
आपल्या जशा अपेक्षा असतात , तशा समोरील व्यक्ती कडून हि असतात, हे हि लक्षात ठेवावं . पण अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तरी त्याच दुखं नसावं .....अन त्यासाठी कधी कुणाचा विश्वास तोडू नये. कारण तुटलेला विश्व्वास पुन्हा मिळवण , जुळवण खूप अवघड असत.
- संकेत य पाटेकर
०९.०७.२०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .