बुधवार, १४ मे, २०१४

नातं तुझं माझं ..

ज्या व्यक्तीवर मनापासुन प्रेम अन जिव्हाळा असतो.
त्या व्यक्तीच्या सहवासासाठी आपल 'मन' प्रत्येक क्षणी धडपडत राहत.

कधी फोन वर , तर कधी SMS ने,  तर कधी प्रत्यक्ष भेटून वगैरे , आपण त्या व्यक्ती पर्यंत पोहचण्याचा तिच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्नात असतो .
काही कारणास्तव जर त्या नात्यात दुरावा वाढला असता , संपर्क तुटला असता
 'भेटीची ती ओढ'' अधिकच प्रमाणात वाढते , अन ज्यावेळेस अप्रत्यक्षरीत्या जेव्हा तिची जेव्हा भेट घडते.
तेंव्हाचा तो आनंद काही औरच असतो , जो शब्दात वर्णन करता येणार नाही .
त्या भेटीत तो इतक्या दिवसाचा मनात असलेला राग ..क्षणात कुठे पळून जातो.
कुणास ठाऊक , शब्द हि ओठावरच अडले जातात.
मुके होतात जणू,.
कान टवरले जातात ते फक्त तिच्या एक एक प्रेमळ शब्दांची गुंफण ऐकण्यास....
नजर हि गुंतली जाते ते तिच्या आपल्याबद्दल असणार्या प्रेमळ भावना टिपण्यास ..............
पण वेळ मात्र नेहमीच्याच तिच्या स्वभावाप्रमाणे पुढे निघून जाते , ते क्षण मागे टाकून...
असलेल्या गैरसमजुतीचे निरासन करून ...नात्यातले रुसवे तोडून ...
मनातले काही ..
नातं तुझं माझं
संकेत य पाटेकर

















Hiiiii.... मला आज भेटायचं , भेटशील??
तिच्याकडून ऊतर मिळेल ह्याची शाश्वती न्हवतीच , तरी सुद्धा whatsapp वर आज तिला मेसेज केला.

प्रत्येक वेळेस काही विचारला असता तिच्या कडून कसलाही प्रतिसाद मिळत नसे.
असे कित्येक दिवस ओलांडले ,महिनो महिने उलटले , एक वर्ष उलटल हे असंच चालू आहे .
 ना फोन , ना मेजेस , ना भेट , ना बोलनं. नात्याची ती रेशीम गाठ जणू ढिली होत चालले .
संवाद हा नात्यातला महत्वाचा दुवा , तोच इथे नाही , मग हे असच होणार. ..
मन विचारांच्या असंख्य गर्दीत हरवणारच ..
माणूस हा स्वतहा पेक्षा दुसर्यांच्याच विचारांमध्येच अधिक गुंतलेला असतो, रममान असतो.
आणि म्हणून नात्यात जिथे प्रेम अधिक दृढ ..खोलवर रुजलेल असतं. तिथे त्या व्यक्तीशिवाय इतर विचार मनात शिवत हि नाहीत.
' प्रेमासारखी अजब गोष्ट ह्या दुनियेत नाहीच ' .
प्रेम अन नातं , नातं अन प्रेम , ह्या शिवाय दुसरा विषयच माझ्या मनात तसा फिरकत नाही.
का ? का कुणास ठाऊक ..नातं अन अन प्रेम ह्या विषयक इतकी आपुलकी कशी निर्माण झाली.
असो छानच आहे , देवाने दिलेली ती देणगी आहे आणि ती सांभाळायला हवीच.
 पण ते सांभाळता वेळ अन परिस्थितीशी सांगड घालावी लागते आणि त्यात आपलं अनमोल नातं अन त्यातल निरागस निर्मल प्रेम जपाव लागतं.
माणसं बदलतात अस म्हणतात , 'तू फारच बदललाय स रे ? तू फार बदललीस गं ?
असे प्रश्न एखाद्य्ला आपण विचारतोच ..कधी ना कधी..
कारण सुरवातीचे त्याच्या सोबत तिच्या सोबत घालावालेले ते क्षण आणि आताचे हे क्षण ह्या मध्ये बराच फरक , बदल आपल्याला जाणवायला लागतो , दिसतो प्रत्यक्ष , आणि म्हणून आपण त्याना बोलून जातो.
तसे काही बदल आपल्या अपेक्षानुसार असतात, घडायला हवे असे आपण मानत असतो.
 पण काही अपेक्षा नसताना घडतात , तेंव्हा मात्र मनाला चटके बसतात.
माणूस परिस्थितीशी झुंजता झुंजता स्व:तहा झिजून निघतो...आणि ते आपल्यला बघवत नाही.
आणि त्यात आपली जिवाभावाची व्यक्ती असेल तर मग मन बैचेन झाल्यावाचून राहतच नाही.
 ती तिथे दुखाने पोळली असता, आपण अस आनंदाच्या लहरींमध्ये तरंगायचं ?
अस कस हा विचार मनाला शिवून जातो. नि आपण काय करू शकतो जे केल्याने ती व्यक्ती ह्यातून बाहेर पडेल ? ह्याच्या विचारात गुंततो.
काही वेळा मार्ग दिसतो , काही वेळा नाही . सर्वच गोष्टी तश्या आपल्या हाती नसतात.
जे समोर आहे ते स्वीकारल्याशिवाय पर्याय नसतो.
काहीवेळा आपल्याला बघ्याची भूमिकाच स्वीकारावी लागते. पण अशावेळी मन मात्र आपल धडपडत , तळमळत .......केवीळवान होत .
मनातले काही
नातं .....तुझं माझं
संकेत य पाटेकर
२२.०१.२०१३
 ______________________________________________________________________ ______________________________________________________________________
सहज रस्त्याने चालत होतो. रात्रीचे ९ वाजले होते. रस्त्यावर फार तशी रहदारी हि न्हवती.
पाउस हि आताशी कुठे निवांत झाला होता . दोघे हि तसे शांत मनाने एक एक पाउलं हळूच पुढ टाकत होतो ,पण तिच्या मनात मात्र विचारांच्या गतीने अधिक वेग घेतला होता. चेहर्या वरून तिच्या ते स्पष्ट दिसून येत होत.
जवळचीच , पण विश्वासातील कुणी व्यक्ती सोबत असल्यास ,मनात सळनारया मनातल्या गोष्टी मनात राहत नाही , त्यांना एक मोकळी वाट मिळते, त्यांचा मार्ग खुला होतो . समोर तशी व्यक्ती असल्यास .
संकेत , खूप कंटाळले रे ,
अस वाटतं दूर जाव कुठे तरी ..........
चालता चालता तिच्या मनातल्या विचारांचे बंदिस्त दार तिने आता उघडायला सुरवात केली होती . एखाद्यावर दृढ विश्वास असेल तर मनातल्या अगदी संवेदनशील भावना हि आपण समोरील व्यक्ती कडे व्यक्त करून टाकतो , मन मोकळ करून टाकतो तसं तिनेही केल . तीच मन मोकळे करायला .
संकेत , खरच खूप कंटाळले रे ,
लग्न होत नाही अजून ?
बघ ना कुणी असेल तर ? तिच्या कडे पाहून मी स्मित हास्य केल .
अन म्हणलो होईल ग , भेटल भेटल .. पण कधी ?
प्रत्येकाची एक वेळ ठरलेली असते ग , त्या त्या वेळी भेटी गाठी घडत असतात.
नाती जुळत असतात. त्यामुळे बिनधास्त रहा . सर्व काही सुरळीत होईल . समजावण्याच्या हेतूने मी तिला म्हणालो .
मम्मी - पप्पा ना हि उगाच त्रास ना , पप्पा असे काही बोलत नाही ,पण त्यांच्या हि मनात माझ्या लग्ना बद्दलचा विषय चालूच असतो . स्थळ येत आहेत रे , पण मुलगा वयाने माझ्या पेक्षाही ६ - ६ वर्षाने मोठा, अस , मला ते पसंद पडत नाही, मी नाकारते मग आलेलं स्थळ . मम्मी मग त्यावर बडबडते , नाराज होते.
त्या दिवशी खूपच त्रास झाला होता रे ह्या सगळ्याचा , मी मनातलं सर्व भाव लिहून काढायला सुरवात केली होती , एका कागदावर , अन लिहून हि काढलं. त्यावेळेस अस वाटत होत कि स्वतःचच काहीतरी बर ...
अग वेडी आहेस का ? मी तिचे वाक्य पूर्ण होऊ न देता तिला दटावूनच म्हणलो .
अस भलत सलत काही करायचं नाही , मनात अस आणायचं हि नाही . कळल. जीवन एकदाच मिळत ..आणि ते जगावं, भले ते किती हि दुखाने व्यापलेले का असो,
तुला माहित आहे . माझी एक मैत्रीण आहे . ती ने असंच एकदा मला एक हादरा दिला होता .
अचानक बोलून कि , मला जीवनाचा कंटाळा आला आहे , मी जीवन संपवीत आहे . तिच्या त्या बोलण्याने मी गोंधळून गेलो होतो तेंव्हा , काय कराव ते हि कळत न्हवत.
माझे फोन calls हि उचलत न्हवती , तेंव्हा मनाने मी अगदी सैर वैर झालो होतो . . पण नंतर मात्र तिने call उचलला तेंव्हा मी तिच्याशी जे काही बोललो , ते तिने अगदी मनाने ऐकल .
तिच्या घरी हि सेम प्रोब्लेम , पण सोबत जॉब , तीच करिअर, अशा अनेकानेक गोष्टी तिला त्रास दायक ठरत होत्या. त्यानेच तिची मनस्थिती ढासळली होती . तशात तिने तो निणर्य घेतला होता.
माणसाने आलेल्या परिस्थितीशी झुंजायचं असत . तिला शरण जायचं नसत . शरण जाणे म्हणजे हार पत्करणे.
त्यावेळेस तिने माझे हे बोल , शब्द ना शब्द अगदी मनापसून ऐकले . एवढ बोलून मी जरा शांत राहिलो.
,निशब्द झालेल्या माझ्या चेहऱ्याकडे पाहून , तिने बोलायला सुरवात केली . खरच यार , मला वाटत होत कि माझंच दुख फार मोठ आहे. पण माझ्या पेक्षा हि कुणी अधिक दुखी आहे . ह्याची मला कल्पना न्हवती . तिच्या ह्या वाक्याने मात्र मला माझ्या आवडत्या लेखकाची वपुंची आठवण झाली .
त्यांच्या कथा कथानातील अनामिक ह्या पात्राची.......
- संकेत पाटेकर
मनतले काही ..
नात तुझ माझ

२ टिप्पण्या:

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .