सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

माणूस आहे ...तो चुकणारच ...

माणूस आहे ...तो चुकणारच ...

प्रेमात सगळ 'क्षेम' असतं अस म्हणतात . पण त्यासाठी क्षमाशील वृत्ती मुळात असवी लागते. अन प्रेम आतून असावं लागतं. खरं खुर.. हृदयाच्या सुप्त वाणीतून प्रकट झालेलं. 
तेंव्हा कुठे झाल्या गेल्या क्षणांना किंव्हा दुखावलेल्या आपल्या मनाला पुन्हा शांत करून , पुन्हा सार आपलसं करून . सारं विसरून, नव्याने नातं झुलवता येतं. 
मुळात प्रेम हे 'हृदय' जोडणं शिकवतं ..तोडनं नाही. 
दोन मनं एकत्रित आली कि तडजोड हि आलीच . नातं म्हटलं कि वाद विवाद आलेच ...मग ते शुल्लक कारणावरून असतील ..वा कुठलेही .. 
पण त्या एका कारणासाठी, त्या मागची पार्श्वभूमी न पाहता उमगता ..
तुम्ही जर टोकाची भूमिका घेऊन, एकमेकांपासून दूर जात असाल तर त्याला काही एक अर्थ नाही . त्या नात्याला हि अर्थ उरत नाही .
एका कारणावरून एवढ्या घडामोडी होत असतील .तर पुढचं आयुष्यं एकत्रित काढण अथवा जगण कठीण आहे.
माणूस समजायला अन समजून घ्यायला आयुष्यही अपुरं पडतं. 
जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा अन त्या त्या वेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीचा वा वातारणाचा परिणाम एकंदरीत आपल्या मनावर होत असतो. 
अन त्यातून वेगवेगळ्या भावछटा ना ना रुपी ढंगान प्रकट होत असतात. अन त्यानुसार आपण व्यक्त होत जातो.
स्वभावाचे विविध पैलू ...अश्यावेळी आपलं दर्शन देतात. मग ते आपल्याला अपेक्षित नसलेले स्वभाव गुण असतील वा दोष .. त्यावेळेस समोरच्याने बावरून न जाता . त्या मागची कारणे लक्षात घ्यावी. 
सांभाळून घ्यावं एकमेकांना ...
एका क्षणात नांत तोडण्याची बतावणी कशाला ?
माणूस आहे ...तो चुकणारच ....., तो काही सर्व गुण संपन्न नाही. देव नाही.
आपली चूक मान्य करण्याची वा पुन्हा नात्यात बहर आणण्यची त्यात धमक असेल तर माफ करायला काही हरकत नाही. 
मुळात आपली बाजू समजून माघार घेण वा आपली चूक मान्य करणं हि क्षमाशील मनाची अन सदृढ नात्याची लक्षण आहेत. 
तो सावरतोय मग तुम्ही का नको सावरायला ?
चूक कोणाची हि असली तरी एकाने बाजू सावरायची असते. नात्याची फळी म्हणून तर मजबूत राहते. त्याला पोखरून काढणाऱ्या वाळवीची कीड लागत नाही . ज्याला प्रेम कळलं ..त्याला नातं सांभाळाव लागत नाही ते आपुसकच सांभाळलं जातं.
आपल्या अपेक्षानुसार त्याने वागायलाच हवं किंव्हा असंच वागणं तुझं अपेक्षित आहे हि आपली वृत्ती सोडायला हवी .
समोरच्याच्या अश्या अनपेक्षित वागण्याने हृदयास घाव बसतो हे मान्य ..ती जखम काही वेळा भरून हि येणारी नसते. पण तरीही समोरच्याने आपली चूक मान्य केली ..तर त्याला माफ करायला हवच. 
तेवढेच ते घाव हि विरून जातील. 
प्रेम आहे नं ...मग सांभाळायला हवंच एकमेकांना नाही का ?त्यासाठी नातं का तोडावं ? 
मन तुटलचं तर ते पुन्हा जोडता यायला हवं . 
माणूस आपल्या माणसाशिवाय अन त्याच्या प्रेमाशिवाय जगू शकत नाही. त्याला आपलीच माणसं जवळ लागतात. प्रसंगी त्याला समजून घेणारी प्रसंगी समजून देणारी ...!
इथे मंगेश पाडगावकरांच्या काही ओळी आठवतात . 
प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
नातं तुझं माझं... 
संकेत य पाटेकर 
१२.१०.२०१५
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .