किती हसरे असतात एकेक 'क्षण'
न्हाई ....नजरेच्या आकंठ साठलेल्या भाव सागरात अन हृदयाच्या ध्यानस्थ मंदिरात ,
तिच्या व त्याच्या सहवासाने गंधित झालेले ते हसरे क्षण, एकदा का प्रवेश करते झाले
कि
ते अधून मधून मनाच्या तळघरात मिश्र भावनांचा, ' एकच हळवा तवंग
निर्माण करतात .
आठवणीच्या साच्याने , ' ज्यात आपण पुरतं आपलं देहभान हरपून जातो '.
तो जुन्या आठवणीतला अत्तरी रंग , सुगंधासह असा काही उधळला जातो कि
डोळ्यातून क्षणभर अश्रू हि घळाळू लागतात .
काय काय घडतं. ह्या क्षणानुसार ......
हि वेळ पुढे सरत जाते . बदलाचे वारे वाहत जातात. माणसं माणसं बदलत जातात .
अनुभवाने सिद्ध होतात. कुणी आधीपेक्षा अधिक कठोर तर कुणी हळवी अजून
हळवी झालेली असतात.
कुणी दूर तर कुणी हृदयाशी अजूनही जवळीक साधून असतात. .
काहींच अजूनही त्याच शैलीतलं दिलखुलास बोलण असतं भेटन असतं .
काहींच्या विचारांना अहंकारी लेप चढलेली असते. किंव्हा कुणाला आता आपणंच नकोस
झालेलं असतो .
सांर चित्र पालटलेलं असतं. काही मात्र अजूनही तेच पुर्वीसारख भासतं
.
पण हसऱ्या क्षणांचा आठवणीचा तो ठेवा , मात्र अजुनी तसाच टवटवीत, अन प्रसन्नतेने सदा बहारलेला असतो. तो क्षणभर कवटाळून घ्यावा , किंव्हा घटाघटाने पियुनी घ्यावा अस मनोमन वाटून जातं. अन त्यातच शब्दांचा फुलोरा ओठावर स्थिरावला जातो.
किती हसरे क्षण होते ते ...जुन्या मैफलीतले ...., तो मोकळा संवाद ,
तो हवासा सहवास ..ती संस्मरणीय भेट ! निसटले सगळे ......, आठवणीचा गंधित दर्प लेऊन
..!
असंच काही मनात आलेलं...अन न राहून लिहिलेलं
संकेत य पाटेकर
०६.१२.२०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .