रविवार, २० मार्च, २०१६

अहंभावी मन ....

"अरे तू नाही तर ...तिने ..कुणीतरी म्हणा ना Sorry  , 
हवं तर कान पकडा  ..झाली  बाबा चूक, वा घडलं नकळत  म्हणून ... 
माफी  मागा , स्वतःहून  पुढाकार घ्या, संवाद साधा "
कुठे , काय बिघडणार आहे ? कि  स्वतःला काही कमीपणा येणार आहे  ? 

किंव्हा  दुसरं तिसर  , कुणी बघेल ह्याची  लाज , शंका ,  भीती  ? काय ...? काहीच  नाही  ना ..तरीही ?  
तरीही आपण इतके अविचारी, अहंकारी ....कसे काय होतो रे ? 
साधासा एक विचार आपल्या मनाला शिवत नाही.  आपल्या नात्याबद्दल  त्या व्यक्तीबद्दल , ,  
अन आपल्या जाणीवांबद्दल,   कमाल आहे न्हाई   ?
विचार करायला हवा . 

जितक्या सहजतेने आपण हि  नात्याची  दोर विणतो ना  , तितक्याच सहजतेने हे अविचारी स्वार्थी घाव आपल्या नात्याला  खीळखिळं  करून सोडतात. अन मग  अतूट विश्वासाने बांधली गेलेली  हि नाती सुद्धा क्षणभराच्या अश्या एकेक  शब्दाने घायाळ होवून एकाकी   कोसळतात .अन तुटतात .

अन मग  उरतो तो केवळ  श्वास ...करपटलेला , कोंदटलेला. त्याचाच त्रास होतो. 
अन असह्य होऊन जातं सगळ, . हे जगण सुद्धा ...
 बरोबर ना ? 

इथे क्षणो क्षण जगण्याला अन ह्या जीवनाला 'किंमत' असते रे... 
अन आपण व्यक्ती व्यक्तीला , आपल्या गरजेनुसार 'किमतीचे' लेबल लावून मोकळे होतो. 
मला हेच तर पटत नाही. 

''त्याला माझी काहीच किंमत नाही . तिला किंमत असती तर .............''
हे असे वाक्य बोलणं म्हणजे नात्याला व्यवहारात गुंडाळणे असे होय . म्हणजे काहीतरी द्यावं अन त्या मोबदल्यात काहीतरी घ्यावं असंच जणू ......  

मुळात हा आपला अहंभाव  आहे ना,  हाच  नडतो.  जाणिवांच्या हसऱ्या क्षणात  मुक्तपणे  बहारत  असता, एकाकी आपल्या  नात्याला  'मी' पणाचे अहंकारी लेप देऊन …. 
मीच का  ? त्याने का नाही ?  त्याला / तिला कळायला नको का ?

नेहमी मीच का म्हणून सुरवात करावी  ? गरज असेल तर  बोलेल, कॉल
 करेल   ? हे असे अहंभावी विचार नातं तोडायला अन तुटायला कारणीभूत ठरतात.
तुमचं हि हेच झालंय….. 

खरं  तर ,  समोरच्या मनात काय सुरु आहे .त्याच्या आपल्या बद्दल  काय भावना आहेत ?
त्याला त्याचा किती त्रास होतोय . ह्याची आपल्याला पुरेशी कल्पना नसते.
आपण एक तर्क लावून चालतो .

हा,  असाच आहे . ह्याला  काही फरक पडणार नाही. नेहमीचीच सवय त्याची / तिची वगैरे वगैरे ....,
हि जी गृहीत धरण्याची  आपली वृत्ती  आहे ना ... हीच मुळात वाईट... .  

आपण फक्त  आपल्या परीनेच  विचार करतो. . आपण आहोत त्याप्रमाणे . 
समोरचा आपल्याहून वेगळा आहे . वेगळ्या विचारधारेचा आहे.  ह्याचा आपल्याला विसर पडतो.
मुळात अरे हे ....नातं  हे दोन भिन्न विचारधारा असलेल्या मनानं विणल जातं .

तिथे सगळंच आपल्या  मना प्रमाण घडेल अस होत नाही…ह्याची जाणीव खरं  तर आपल्याला  असायला हवी . वेळो वेळी व्हायला हवी. पण ती होत  नाही . 
अन म्हणून नात्याची घडी दुभंगली जाते. 

खर म्हटलं तर नातं .. म्हणजे एकमेकांना एकमेकांच्या गुण दोशासाहित स्विकारण हे होय.
अर्थात  एकमेकांच वेगळेपण जाणून..जपून …..पण तसं  होत नाही.  

आपण बोलतो तेच योग्य अन बरोबर आहे हा ठेका धरून चालतो अन  स्वतःच मत दुसऱ्यावर लादतो . 
हीच तर आपली चूक ठरते. 
- संकेत पाटेकर 
 २०.०३.२०१६


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .