मंगळवार, २५ जून, २०१९

प्रवाह..

पहिल्या भेटीत किंव्हा त्या आधी सुरु असलेला ‘दोघातला ‘ तो ‘मुक्त नि हसरा संवाद’  पुन्हा तसाच अगदी पहिल्यासारखा उत्साहित आणि  प्रभावित  राहील का  ? राहू शकतो का ?
 हे निश्चित कधीच सांगता येत नाही . 

कारण व्यक्ती स्वभावानुसार  किंव्हा क्षणा प्रसांगानुसार ,  होणारा भावनांचा चढ उतार, मनाच्या पुढच्या वळणाला सर्वस्वी कारणीभूत ठरतो. आणि जे घडणार  आहे ते घडतं.
जे  खरं तर आपल्याला नको असतं.  पण ते घडतं आणि त्याला कारणीभूत आपणच  असतो.

कळतंय , काय म्हणायचंय ?
मनाचा कल नक्की कुठे ? हेच कधी कळून येत नाही. आणि त्यामुळेच हे सगळं निर्माण होतं.

हि अस्वस्थता ..हि चलबिचलता ..हि अस्थिरता …
कठीण असतं बुवा  हे ..मनाचं प्रकरण   ?

नव्याची आस धरतं. भेट घडवतं. ओढ निर्माण करतं.  बोलतं  करतं  आणि एकाकी  निवळतं सगळं  ..साऱ्यासह…
कळतं हि नाही   …कधी ? काय? कसं ? आणि  कुठे ?
फक्त प्रश्न निर्माण होतात  ? ज्याचं उत्तरं आपल्याकडे तेंव्हा नसतं.  आणि कदाचित मिळणारं हि नसतं .
पण हे कदाचितच हा .. पुढे सकारात्मक पाऊलं उचलायला हरकत नसावी.
पण तसं होत नाही.  आपण हताश होतो.  असलेला संवाद हि मिटवतो आणि  कुठल्याश्या गर्दीत स्वतःला गुरफटून घेतो.  न काही सांगता न काही बोलता …

प्रवास इथूनच सुरु होतो मग,  जुळवलेल्या नात्याचा ..
पूर्वेकडून पश्चिमेकडे …
कळतंय ?
सहवासात घडतात म्हणतात मन ..
पण तरीही का बिथरतात हि मन ?
कठीण आहे बुवा.. हे मनाचं सारं प्रकरण ..!
कळतं असतं पण जुळवून घेत नाही.
हृदयातले भाव ओठावर येऊ देतं नाही..?

मन कि बात समजेलच कशी  मग ?
मनात जागा निर्माण व्हायला  ‘सहवास’  आणि त्याचबरोबर ‘संवाद’  लागतो.
आणि संवादाचं हे हसरं अंकुर हृदयाशी रुजलं कि प्रेमाचं बीज फळफळायला  वेळ लागतं नाही.

तू संवाद ठेव . मुक्त मोकळा ..
मी  होतो परीघ आभाळाएवढा …
लव्ह यु …
उगाच – सहज सुचलेलं

– संकेत पाटेकर
http://www.sanketpatekar.com/






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .