जीवन एक प्रवास आहे ...सुख दु:खाचा, गोड कटू आठवणींचा , प्रेमाचा अन संघर्षाचा.. अन अशा ह्या प्रवासात कितीतरी बरे - वाईट अनुभव आपणास येतात. ह्या अनुभवानेच आपण शिकतो. घडतो. अन आपल्या पुढील जीवनाची वाटचाल सुरु ठेवतो. माझ्या आयुष्यातले असेच काही क्षण मी तुमच्यापुढे मांडत आहे. जे मी अनुभवलेत, माझ्या शब्दात ..माझे जीवनानुभव ..! - संकेत पाटेकर
शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०
अशिक्षितपणाचं लेबल
मला ना ते हल्ली ‘तुम्ही शिकलेली माणसं असं …….’ हे वाक्य कुठं ऐकलं ना ( म्हणजे
माझ्या स्वतःकडून आलं तरीही ) मला हसायलाच येतं.
म्हणजे शिकलेल्या माणसांना एका
चौकटीत बसून मोकळे झालोत आपण ? म्हणजे काय तर अशिक्षितपणाचा ठप्पा ( अशिक्षितपणाचं
लेबल ) आपल्या वाट्याला येईल अशी कामे शिकलेल्या माणसाने कधी करूच नये वा
त्याच्याकडून अशी कामं कधी घडता कामाचं नये, असा अलिखित नियमच जणू लागू केलाय ?
त्याने तेच करावं जे इतरांना ( एक विशिष्ट असा शिक्षित वर्ग ज्याला ते ) योग्य
वाटतं ? बाकी त्याने काही करू नये ? बरोबर ? अनवधाने..चुकून काही घडलंच तर आहेच
चिखलफेक दगडफेक शब्दांची, अशी तशी …ह्याच लोक्कांकडून .. आता माणूस आहे म्हटला तर
तो इथे तिथे थोडा गडबडणारच, साहजिकच आहे.
यंत्रासारखं स्थिर अचूक राहणं वा राबणं
त्याला थोडंच ना जमणार आहे. तो थकणार, आळस करणार, गप्पा गोष्टीत रमणार ….आणि कधी
कधी गडबडणारच… तोल जातोच होsss माणूस आहे म्हटलं कि .. हो कि नाही ?
सर्वगुणसंपन्न
एखाद विरळाच होssssss ,
म्हणूनच म्हणतोय, ज्याचं त्याने स्वतःला पारखावं. स्वतःला
उभं करावं.. कुठं काय अडलं गड्बडलंच तर … अशिक्षितपणाचं लेबल मात्र कुणावर चिटकू
नये. स्वतःने हि आणि स्वतःला सुशिक्षित समजून घेणाऱ्यांनीही..
गंमत म्हणजे आपण
त्यातच श्रेष्ठ असतो. -संकेत पाटेकर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
खूप काही लिहूस वाटतंय आज ? कारण हे मनं , फारच अस्वस्थ झालंय . हळवं झालंय ते , 'कारण 'संवाद' हरवला आहे'. बंध नात्यातला ...
-
सर्वच नाती काही रक्ताची नसतात . काही नाती मनानं जुळली जातात . आयुष्याच्या पायवाटेवर निवांतपणे कधी धावत पळत असता... त्यात बहिण भावाच्या ...
-
तुझ्यावरच्या चारोळ्या ..... आयुष्यात एकदा तरी आपण प्रेमात पडतो. अन आपले भान सर्वस्वी त्या व्यक्तीपुढे हरपून बसतो... नवी ओळख असते नवं न...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .