बुधवार, १ जुलै, २०१५

आधुनिक जगाच्या गुजगोष्टी ...

Whatsapp वर एखाद तरी अशी जिव्हाळ्याची व्यक्ती असतेच , जिथे आपण दिवसभरात 
कितीतरी वेळा तिच्या Profile मध्ये डोकावून पाहत असतो . 
मग त्या व्यक्तीचा मेसेज येवो अथवा ना येवो ...आपण तिथे डोकावणारच 
आणि डोकावतोच ..अधून मधून ..wink emoticon 
कधी उगाच स्टेटस पाहणार , कधी लास्ट सीन , कधी profile pic , कधी असच..
चैनच पडत नाही म्हणा , wink emoticon wink emoticon
त्या मध्ये काही वेळा गम्मत अशी होते , कि नकळत whatapp calling वर क्लिक
होतं अन call लागला जातो . tring tring .....
अन त्यामध्ये आपली पुन्हा झटपट ...तो call end करतना होतेच होते .
तुमची हि असेलच अशी जिव्हाळ्याची व्यक्ती wink emoticon
whatspaa_ जग
- संकेत उर्फ संकु

सोमवार, ११ मे, २०१५

प्रिय आई ...

प्रिय आई ...,

साष्टांग  दंडवत ,
आज पुन्हा एकदा  तुला पत्र लिहायला घेतोय . बऱ्याच  दिवसाने ...रागावू नकोस हा ..
तुझी आठवण सदाच असतेच  अगं  !   सावली होवून  तू नित्य नेहमी सोबतच असते म्हणा...
पण तुला ठाऊक आहे ?  आज एक खास दिवस आहे. फार महत्व आहे अग त्याला . त्या दिवसाला .
कोणता माहित आहे. ? 'मातृ दिन' . MOTHER'S DAY..!

जन्म दात्या 'आई' साठी तिच्या प्रेमापोटी , भक्तीभावाने वाहिलेला एक दिवस. 
जगभरात साजरी केला जातो अगं  ..!
कुणी आपल्या आईसाठी काही भेटी गाठी देऊन. कुणी प्रेमाचं प्रतीक असलेलं,  गुलाबचं एखाद  फुल देऊन .  कुणी तिला बाहेर कुठे फिरायला घेऊन जाऊन,   आपल्या आई बद्दल,  तिच्या प्रती असलेल प्रेमं व्यक्त करत असतं. तसं प्रेम व्यक्त करायला  एखाद  ठराविक दिवस असायलाच  हवा  अस काही नाही . 
पण तरीही ठीक आहे ना  , काय होतंय ...
असो, 
वयाने कितीही मोठो झालो तरी , आईसाठी आपण तीच  अगदी  छोटं तान्हुल बाळ असतो. 
अन म्हणूनच लहानाचं मोठे झालो असलो तरी हि एखाद वेळेस आपण मुद्दाम तिच्या कुशीत जाऊन अलगद पडून राहतो. मायेच्या पंखाखाली  वात्सल्याची उब घेत .
तेंव्हा कसलीच चिंता नसते . ना कसले दुख .... ते सर्व्वोच क्षण असतात .
जीवनातल्या अथांग सागरातले ...स्थिर असे....!
लुडबुड  न करणारे , हवेहवेसे ..हसरे , आनंदा पलीकडचे ..हो ना...

पण आई , ऐक ना ,  कित्येक दिवस झाले बघ ..,मी ह्या क्षणापासून पोरका झालोय अग  .
तू अशी दूर , नजर ठेवून आहेस. आम्हावरती ..
''मी कुठे हि असली तरी  तुमच्य्वार  नजर ठेवून असेन.''  अस म्हणून तू रागावून  कुठे गेलीस ती गेलीस . 
पुन्हा न परतण्यासाठी..
पण कधीतरी तुला,  तुझ्या पिल्लाना कवेत घेउस वाटत  असेलच   ना ..,
सांग...येशील ना  परत....., तुझ्या पिल्लांसाठी .

तुझ्या उबदार कुशीत शांतपणे  निजायच आहे अगं..! 
तुझा मायेभरला प्रेमळ स्पर्श. ...ते धीरदार (धीर देणारे ) , कष्टाने झिजलेले तुझे नाजूक कोमल हात  ,
हळुवार केसांतून  भिरभिरताना    ..किती बर वाटायचं सांगू...
ते क्षण आठवले कि आजही तुझा हात  अलगद केसातून फिरत  राहतो .
किती सौख्य आहे अग त्या स्पर्शात  . सुखाची व्याख्या ह्यावूनी वेगळी  करता  येईल का ?

'मायेचा स्पर्श' सगळे 'क्षण कसे हलके फुलके बनवितात . वेदना  दु:ख ह्याना तिथे थारा नाही. 
एखादी भळभळती जखम सुद्धा 'आनंदाचे गायन' करत चिडीचूप होईल .
इतक सामर्थ्य  , इतकं प्रेम त्या मायेच्या अलगद होणर्या स्पर्शात असतं .
'प्रेमाची' उत्पत्ती मुळात 'आई' ह्या रुपान च झालेय  जणू  .
ती अवतरतली अन प्रेमाचं वारं भिनभिनू  लागलं सर्वत्र...,  मग ती हि 'पृथ्वी' रुपी आई का असो .
ती आई आहे . वात्सल्य मूर्ती आई...

माधव ज्युलिअन  ह्यांनी त्यांच्या कवितेतून ..लिहूनच ठेवलंय. 
'प्रेमस्वरुप आई, वात्सल्य सिंधू आई''

फ. मुं. शिंदे हि म्हणतात .
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते
दुधावरची साय असते, लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही.

खरच गं  ...
आईच हे नातंच  अस आहे . श्रेष्ठत्वाच ..,,त्याला तोड नाही. त्याहुनी कुणी मोठ नाही.
बघ ,  हे मी कुणाला सांगतोय .  एका गोडश्या , प्रेमळ अश्या माझ्या  'आई' लाच  'आई' ची महती सांगतोय.
वेडा आहे ना मी ,..  तुझाच  तान्हुला  गं ..! समजून घे ..घेशीलच. 
अन ये पुन्हा ...तुझ्या ह्या लेकरूसाठी...वाट पाहतोय .

हैप्पी मदर्स   डे…...मातृ दिनाच्या शुभेच्छा…!  

तुझ्या पोटी मी जन्म घेतला हे माझं भाग्य .., अन हे भाग्य मला प्रत्येक जन्मी मिळू दे.
लव्ह यु आई… ,
खूप खूप खूप सारं प्रेमं  ..!


तुझाच  तान्हुला  गं,
तुझ्याविना जगतोय ,
मायेच्या स्पर्शाविना
पोरकपणं  वाटतयं !

तुझाच लाडका,
............

नातं तुझं माझं 

असच लिहिता लिहिता...
- संकेत य पाटेकर 
१०.०५.२०१५

गुरुवार, ३० एप्रिल, २०१५

'संवाद' हरवलेलं नातं ...

खूप काही लिहूस वाटतंय आज ? कारण हे मनं ,  फारच अस्वस्थ झालंय .
हळवं झालंय ते ,  'कारण 'संवाद'  हरवला आहे'.
बंध नात्यातला आपलेपणाचा 'संवाद'

कुठे दिसला का हो , तो ?
नाही ? नाही ना.....  ?
कुठेसा  निघून गेला आहे बघा   ... दूर कुठे , नाराज होवून माझ्यावर ...
कसं शोधावं अन कसं परत आणावं  त्याला  ? काही काही .... कळेना.
तुम्ही सांगू शकाल का ?
नाही.................असो,

आयुष्याची सगळी बहरच निघून गेलेय आता,
सगळे रंगच  जणू  धुसर झालेत  ,   रखरखत्या उन्हासारखं  अगदी...कालपटलेलं  जगण झालंय हे.
नाही राहवत आता..

तू हवा आहेस रे , खरचं  तू  हवा आहेस.
तुझ्याविना  ह्या नात्याला गंध नाही ..आपलेपणाचा स्वर  नाही,  चैतन्याचा बहार  नाही .
हास्य रंगाची  ती मुक्त उधळण  हरवलेय रे , तुझ्याविना . . .,

कुठे आहेस  तू , कुठे आहेस ?
सांगशील का ? बोल ना  काहीतरी...,

येशील  माघारी....  ..येशील  ...  ? बघ नाराज  नको होऊ असा ..
मला हवा आहेस  रे.......हवा आहेस तू...

मनाचे असे पुटपुटने सुरु होते . शब्द शब्दांची कागदावर  रीघ लागली होती.
भाऊक होवून ते स्वतःला त्यावर झोकु देत होते.

इतकं  वर्ष जीवापाड जपलेल्या नांत्यातला  मधाळपणा  , 'एकाकी कुठे  आणि  कसा   हरपला  कुणास ठाऊक , मनं  अगदी सैरभैर झालंय . अस्वस्थ होवून बसलंय आणि होणारच हो ,

जीवापाड जपलेल्या नात्यातला,  आपलेपणाचा गोड संवादच कुठेसा हरपला  म्हणजे मन असंच  सैरभैर होणार ,  नाही का ? .घुटमळनारचं  ते  मनातल्या मनात .

किती विश्वासाने नाती जोडतो आपण ? कितीशी स्वप्न बघतो . त्यात  हरखून जातो अगदी..
पण एकाकी......

विश्वासाची हि नाती , आपलेपणाची  साथ  कशी काय सोडतात, कळत नाही ?
त्याचा घाव मात्र झेलावा लागतो . ह्या इथे.... हृदयी...!
असो,

खूप काही विचार केला ह्या गोष्टीचा   , रात्रंदिवस अगदी..
मी चुकलो का, कुठे ? ते हि शोधून पाहिलं. कित्येक प्रश्नाचा संच पुढे मांडला .

तेंव्हा कुठे ऊतर आलं समोरून ...

तू कुठेच चुकत नाहीस रे , परिस्थितीनेच  मला बदललय.  

मी अगदीच सुन्न ...

परिस्थिती...,

हि परिस्थिती सुद्धा  अजब असते. खरच  बदल घडवते माणसा- माणसात..., त्याच्या विचारंना वेगळ्या वळणावर स्वार करते ती  .. स्वतःच्या निर्णयावर ठाम राहून ...
पण नाती..., त्याच काय ...?

आपलेपणाने जुळलेल्या नात्यात 'दूरत्व' का बरं  यावं.  ? ते हि त्या परिस्थितीमुळे .  ?
परिस्थितीमुळे एखाद नात्यात बदल घडू शकतो ?
छे ...पुन्हा प्रश्न ..

पण ह्याच उत्तर अजूनही काही सापडलं नाही . कित्येक दिवस ओलांडली . वर्ष निघून गेली .
नात्यातला  'संवाद'च हरवला आहे.  आता ते नुसतंच नातं उरल आहे. संवाद हरवलेलं नातं .
त्यात जाणीवा उरल्या  नाहीत .
एखाद्या कोमात गेलेल्या आणि संवेदना हरवलेल्या  व्यक्ती सारखंच  जणू  ..
जगण्यापुरता  श्वावोश्वास  काय तो सुरु आहे  ..बाकी आयुष्यातील  सारे रंग फिके ...

ह्यास जबाबदार कोण ? मी ? समोरील व्यक्ती ? कि हि परिश्तीती ? कि हा स्वार्थ ?
नाही   सांगता येणार मला, . सध्यातरी…
आणि आणि दोष हि कुणाला द्यायचा नाही आहे..
पण हरवलेला  तो 'संवाद'  मला पुन्हा आणावयाचा आहे.
नात्यातली ती  'बहरता  ' कायम ठेवायची आहे.
हास्य विनोदाचा, भरल्या प्रेमाचा , आपलेपणाचा गोड  संवाद हवाय मला.
त्याचसाठीच हि धडपड.
ऐकतेस का तू...
मला संवाद हवाय …आपलेपणाचा… प्रेमानं साधलेला. 
ऐकतेस ना...
संवाद हरवलेल्या नात्याची,  एका मनाची अशी हि अवस्था…

आपलं प्रत्येकाचं  आयुष्यं  तसं ह्या अनेकानेक नात्यांनी गुंफलंय.
मग ती रक्ताची नाती  असतील,  काही आपुलकीनं जोडलेली  ,   मना मनाची .
त्यात आई मुलाचं नातं असेल  , बहिण भावाचं असेल,  प्रियकर प्रेयाशीच असेल  , वा नवरा बायकोच .
ह्या सर्वांना एकसंध ठेवणारा , किंव्हा जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणजे हा  'संवाद'  .

नात्यातला मुख्य गाभा, तो नसेल तर नात्याला अर्थ नाही .
नाहीतर एखाद्या पर्णगळीत वृक्षासारखं ...भकास पण आलेलं ते नातं वाटायचं.
त्यातला हिरवा शारपणा जरा कायम  टिकून ठेवायचं असेल .  तर संवाद हवा .
पण नुसता संवाद  काही  उपयोगाचा नाही    ,  सुसंवाद हि हवा.

आपलेपणाचे , आपुलकीने म्हटलेलं  चार एक शब्द  मनाला खूप आधार देऊन जातात हो  . 
नवं काही करण्याची अन जगण्याची  नवी उमेद त्या स्वरातूनच   तर मिळते .  अन हेच तर  हवं असत आपल्याला.  
मनमोकळेपणाचे  आपलेपणाने म्हटलेलं गोड मधाळ शब्द . 
त्यात कधी , एखाद वेळेस उफालेला राग हि मग येवो , आपलेपणाचा  सूर  त्यात  असला म्हणजे त्याच काही वाटत नाही उलट   मनास समाधान लाभतं. आपल्या पाठीशी कुणी उभं आहे.  

जीवनात सर्व काही सहज सोप आहे . 
फक्त जीवापाड जपलेली आपलेपणाची,  आपली हि नाती आपल्या सोबत  असली म्हणजे झालं. 
हे आयुष्य उजळून निघेल . पण त्यासाठी संवाद हवा आपलेपणाचा…

तुमच्या नात्यात तो आहे ना ? असेल तर उत्तमच  , अन असू द्याच तो कायम , दरवळता….

नाती हि खरच अनमोल असतात ओ,  अन हा अनमोलपणा  प्रत्येकाला  जपायला हवा .

शेवटी  मनापासून म्हणावेस वाटतं  , कि…

‘संवाद’ हरवलेलं नातं नको... ‘संवादा’त हरवलेलं नातं हवं. 
… आपलेपणाचं..!

असंच लिहता लिहिता  ,
आपलाच ,
संकेत पाटेकर उर्फ संकु
३०.०४.२०१५

शनिवार, २५ एप्रिल, २०१५

' नातं' तुटत नाही , तुटतात ती ' मनं'

'नातं' तुटत नाही , तुटतात ती ' मनं' 
अन ती पुन्हा जुळवायला कधी वेळ हवा असतो तर कधी प्रेमाची हलकीशी थाप , अन आपुलकीचे काही उबदार प्रेमळ शब्द ... 
कितीही वाद विवाद झाले , रुसवे फुगवे झाले तरी प्रेमाचा एक हलकासा शब्द...
एक हलकसा स्पर्श ' मनातला' सारा राग क्षणात विसरून लावतं.  म्हणून प्रेमाशिवाय नातं नाही . 
अन नात्यांशिवाय प्रेम ....
प्रेम जिथे नातं तिथे .... 
 संकेत य पाटेकर 
४.१२.२०१३

अपेक्षांचं लहान मोठं भार..


कुणी रागावतं , कुणी बोलणं बंद करतं, कुणी रुसून बसतं. तर कुणी अगदी जुळलेल नातं तोडण्याच्या मागे पडतं. नाही नाही म्हणता म्हणता प्रत्येकाची आपल्याकडनं अन आपली समोरच्याकडनं  काही ना काही अपेक्षा हि असतेच. 
अन म्हणून रागावणं , रुसणं , ह्या सारख्या गोष्टी घडतच असतात. 
कुणाला आपलं वागणं पटत नसतं , कुणाला आपला चेहरा मोहरा पसंद नसतो.
कुणीकडे आपला स्वभाव नडत असतो, तर कुणाला प्रेमभरल्या मायेची अपेक्षा असते.
पण त्याची पूर्तता होत नसते, कुणाची काही औरच मागणी असते ती पुरी होत नसते , ह्या त्या कारणास्तव अपेक्षांचं लहान मोठं भार आपल्या मनावर थोड्या अधिक प्रमाणात तरी असतच असतं .
आणि ते आपण आपल्या परीने पूर्ण करण्याचा काटोकाट प्रयत्न करत असतो .
व्यक्तीव्यक्ती नुसार ..
मनातले काही ...
संकेत य पाटेकर
१८.०६.२०१४

शनिवार, १८ एप्रिल, २०१५

वपु .. माझे आवडते लेखक ..

वसंत पुरुषोत्तम काळे
वपु ..हे माझे सर्वात आवडते लेखक ..
आज ते हयात असते तर खरच नक्कीच भेट घेतली असती त्यांची.
त्यांच्यामुळे मला माणसातला माणूस शोधण्याच तंत्र गवसलं अस मी म्हणेन .
ती सुरवात हि मी माझ्यापासूनच केली आहे म्हणा, मी हि माणूस शोधतोय ....
स्वतःमधला , दडलेला माणूस , अन आयुष्याच्या ह्या प्रवास वाटेवर येणाऱ्या प्रत्येकामध्ये ...तो शोध घेण्याचा प्रयत्न करतोय ..
वपुंच्याच शब्दात सांगायचं तर ...
माणूस नावाचा प्राणी अनेकदा भेटला.
ना ना स्वरूपात भेटला , कधी खऱ्या स्वरूपात कधी खोट्या ,
तर कधी संपूर्ण स्वरुपात, पुष्कळदा तो निसटला हि , ह्या माणसानं कधी मला रडवलं कधी हसवलं , कधी भुलवलं कधी थकवलं , कधी बैचेनं केलं..कधी अंतर्मुख ..
तरीही माझा शोध चालूच आहे, अन चालूच राहणार ..माझा पेशन्स दांडगा आहे.
ह्याच श्रेय हि पुन्हा माणसांनाच आहे.
वाट पाहत राहण्याची माझी ताकद माणसांनीच वाढवली आहे.
साधारण ६-७ वर्षापूर्वी ठाण्यातल्या मराठी ग्रंथालयाचा मी सभासद झालो. अन तिथपासून खऱ्या अर्थाने वाचनाला सुरवात झाली . मित्रानी (जगदीश शेट्ये ) पाहिलं पुस्तकं हाती ठेवलं ते म्हणजे व्यक्ती अन वल्ली . पु . ल देशपांडे ह्याचं ..
तिथून पुढे मग.. , वि. स. खांडेकर , प्रवीण दवणे ह्यांनी वेड लावलं.
प्रवीण दवणे सरांच्या व्याख्यानाला जावू लागलो. भारावल्या अवस्थेत त्यांच्या व्याख्यानातून बाहेर पडत होतो. एकदा असाच एका पुस्तक मध्ये , त्यांनी पत्राविषयी लिहिलं होतं.
हल्ली ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पत्र सहसा कुणी लिहत नाही .
त्यातच माझ्या मित्राने त्यानां पत्र लिहिलं.  त्याच उत्तर हि पंधरा एक दिवसातच  त्यांच्या पत्रातून त्याला मिळालं .
ते पाहून वाचून त्याचा बोलण्यातून व्यक्त झालेला,  त्याचा तो 'ओसंडता आनंद' मी  हि उपभोगत होतो .
तेंव्हा मी हि मनाशी ठरवलं . आपणही पत्र लिहायचं .
मी  सुरवात केली .पेन हाती घेतला . अन भरभर मनातलं उतरून काढलं .
अन ते पोस्टाने न टाकता. थेट त्यांच्या घरीच जावून दिलं.
त्यावेळेस ते मात्र घरी न्हवते .
त्यानंतर पंधरा एक दिवस ओलांडून गेले . त्याचं उत्तर काही आले नाही.
तेंव्हा मन थोडसं  काळवंडल. तरीही अशा सुटली नाही.
येईल उत्तर एक ना एक दिवस ह्यातच गढून राहिलो. .
आणि खरच ..एका महिन्या नंतर त्याचं सुवाच्च हस्ताक्षरात लिहिलेलं पत्र हाती आलं.
दिलगिरी व्यक्त करत...थोड उशिराने ऊतर देतोय म्हणून ...
तेंव्हाचा आनंद काही औरच होता. इवढ्या मोठ्या लेखकाने माझ्या पत्राला उत्तर दिलं . ह्यातच किती ते सुख होतं . मी ते पत्र सर्वांना दाखवत सुटलो . आनंद कसा गगनी मावेनासा झाला होता.
त्यानंतर वपुंच एक पुस्तक हाती आलं . आणि त्यांच्या लेखणीने मी अक्षरशा झपाटून गेलो.
अधाशासारखी एक एक पुस्तकं त्यांची वाचून काढली.
आपण सारे अर्जुन ,
इन्टिमेट , का रे भुललासी ,
गुलमोहर ,
गोष्ट हातातली होती,
घर हलवलेली माणसे ,
चिअर्स ,
तू भ्रमत आहासी वाया ,
दुनिया तुला विसरेल ,
दोस्त, पाणपोई , पार्टनर ,
प्लेझर बाँक्स,
फॅन्टसी - एक प्रेयसी ,
भुलभुलैय्या, महोत्सव , माझं माझ्यापाशी
मी माणूस शोधतोय , मोडेन पण वाकणार नाही
ही वाट एकटीची ..अशी एक एक पुस्तकांनी माझ्या मनावर छाप उमटवली .
त्याचा मनावर परिणाम झाला. .. माणसं निरखता येऊ लागली.
वपुंची वाक्य अन वाक्य मनावर कोरली गेली.
समाजात विशिष्ट उंची गाठे पर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.
जबाबदारी...
?जबाबदारी आणि ओझं, ह्यातला नेमका फरक सांगाल??
"ओझं म्हणजे खांद्यावर दिलेला बोजा. पण कधीकधी दहा-बारा हजारांचा एखादा
दागिना सांभाळायचा असतॊ. ते इतरांनाही माहित नसतं. त्याला जबाबदारी म्हणतात. आयुष्यापासून मघाशी मी सांगितलेली यादी.."
"प्रेम, मैत्री, संगोपण, शुश्रूषा ह्या सगळ्या जबाबदारया.
त्यांचं ओझं वाटलं की सहजता गेली."
"ओझं हीदेखील जबाबदारी नसते का?"
"ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते.
ओझं बाळगणारयाला कदाचित मदतीचा हात मिळतो. तसं जबाबदारीचं नसतं."
“एकाकीपण वेगळं , एकांत वेगळा . परीसराचं मौन म्हणजे एकांत .आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण .एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं. अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला असेल.”
अशी कितीतरी वाक्य आहेत . ..सांगायला गेलं तर हे पान हि  अपूरं पडेल. त्यापेक्षा तुम्ही वाचाच ...हाती पुस्तक घेऊन smile emoticon
माझे सर्वात आवडते लेखक ..वपु ..
- संकेत पाटेकर


बुधवार, १ एप्रिल, २०१५

असंच लिहिता लिहिता ...

वाऱ्याची एखादी हळुवार झुळूक क्षणभर सुखद गारवा देऊन जाते ना , तसेच काहीसे हे 'क्षण' असतात 
आपल्या आयुष्यातले...
हळुवार  कधी  कुठून,  गुपचूप  संधी साधून येतात अन तना  मनात रोमांच फुलवून जातात . 

मनी आसुसलेल्या  अपेक्षांची हि   पूर्तता  होवूनी जाते मग , सुखावून जातो अगदी त्या क्षणात आपण.

सुखाची एक व्याख्या तयार होते हळूहळू .. .
आनंदाच्या  परमोच्च शिखरावर ताठ मानेने , अभिमामाने आपण विराजमान होतो.
बेन्धुंद होतो बेभान होतो अगदी...

पण हे सगळ क्षणभर  ..क्षणभरच  सगळ...
वाऱ्याची झुळूक तेवढ्यापुरतीच  असते नाही का ? 
पुन्हा ती , कधी कुठून , कशी येईल त्याचा  नेम नाही ...पण तोर्पयंत असंच, असंच  चालत राहायचं .
असंच  चालत राहायचं ...

पण आपलं हे   मनं   ऐकेल  तेंव्हा.. .
ते एकच हेका घेऊन बसत .
जे हवं आहे ते कायम स्वरूपी ...क्षणभरासाठी नको..

इथूनच  मग सुरु होते ..   मनाच्या वेदनेची कथा ...

असंच लिहिता लिहिता ...
आपलाच ,
संकेत पाटेकर
०१.०४.२०१५
_______________________________________________________________________
_______________________________________________________________________

काही जखमा ह्या वेदना विरहित असतात . त्या कधी आपलं व्रण सोडून देतात ते कळून येत नाही
रक्त ओघळलं  तरी त्याची जाणं होत नाही. पण जेंव्हा ते नजरेआड येतं  ,
तेंव्हा कपाळी प्रश्नार्थी आठ्या पडतात ? हे कधी झालं ? कस झालं ?कुठे झालं ?
शोधार्ती मनं मागोवा घेत राहतं.  पुन्हा ते   थांबतं.  
किंचितसं कळवळतं  . पुन्हा हसतं,  पुन्हा भरारी घेतं.

आयुष्यं  अश्याच जखमांच  एक गोफ आहे. काही जखमा अश्याच कळून न येणाऱ्या असतात .
त्याच काही वाटत नाही.  पण  काही  भरून न येणाऱ्या असतात ...
पण प्रत्येकवेळी मनाला  भरारी घ्यावीच लागते .
रहदारीच्या ऐन रस्त्यावर माणसाच्या गर्दीत   कितीसा वेळ काढतो आपण , त्यातून मोकळी वाट काढावीच  लागते तेंव्हा कुठे मोकळा श्वास घेता  येतो . तसंच काहीसं  ....ह्या आयुष्याचं...

असंच काहीसं लिहिता लिहिता...
संकेत  पाटेकर
०३.०४.२०१५









शनिवार, १४ मार्च, २०१५

'' अरे, ऐकतोस ना रे...''

'' अरे, ऐकतोस ना रे...''

एखाद्या स्वप्नवतं  दुनयेत गाढ असता  अचानकपणे जाग यावी अन ते स्वप्नचं कोलमडून जावे  तसंच  काहीसं आयुष्यात कधी  घडतं  .
आयुष्यातले ' रंग ' एकाकी  बदलतात..  अन होत्याच न्हवतं  होवून जातं. 
'क्षणा' चा  हि  विलंब न लागता...
अशीच एक रविवारची रात्र ,हास्य आनंदा कडून वेद्नेकडे झुकलेली ...

रात्रीचे साधारण सव्वा आठ  होत आले होते ..
पनवेल स्थानकाहून ठाण्यासाठी आम्ही  लोकल पकडली अन सीट वर  निवांत बसते झालो. .
रेल्वे रुळावरून लोकलं अगदी धीम्या गतीनं  पुढे सरत होती.
डब्यात कमी अधिक रेलचेल  होती.
हळू आवजात  कुणा एकेकाची,  आप आपसात   कुजबुज चाललेली .
कुणी मोबाईल मध्ये डोकावलं  होतं. कुणी एकांतात हरवलं होतं.

आम्ही हि  आजच्या दिवसभरातल्या गोडव्यात अगदी मंत्रमुग्ध  झालो होतो.
निसर्गाने देऊ केलेला  आनंदाचा रसाळ  प्याला नुकताच प्राशन करून मनं  तृप्त झालं होतं.  
त्यामुळे तना- मनात  आनंदाचे  लहरी वारे अगदी सुसाट वेगाने वाहू लागले होते.

म्हणावं   तर आजचा ट्रेक अगदी  प्रसन्नतेच्या वावटळात फिरक्या घेत पूर्ण झाला होता .
निसर्गाने आज असे काही रंग उधलेले होते  कि काय बोलावं  अन काय नाही, अशी ह्या मनाची स्थिती झाली होती.
किती सुंदर वातावरण होतं ते  ..!

न बोलविता  हि , ‘ कधीही , अवेळी दाखल होणाऱ्या  पाहुण्या मंडळीसारखा  हा वेडापाऊस...
कधी रिमझिम कधी धो धो बरसत  लोकांच्या  सहनशीलतेचा अंत पाहतो .  
तर  दुसरीकडे  जीव सृष्टीला  ना ना विविध अलंकार परिधान करत  लोकांकडूनच  अमाप  सौंदर्याची वाहः वाहः अन  कौतुकाची वारेमाप थाप मिळवत राहतो.

आजचा आमचा दिवस  अश्याच अलंकार चढवलेल्या लावण्यावती प्रमाणे नटाटला होता.
त्याने सगळेच मोहित झालो होतो. सृष्टी सौंदर्याचे अमाप सुख मनी ढवळत  होतो.
त्यातच  रममान होतो ...

तोच एकाकी ..हृदय पिळावनारं   वाक्य कानी पडलं.

'अरे,  ऐकतोस ना रे '
क्षणात ह्या वाक्यांनी हृदयावर एक घाव घातला  अन वेदनेची ठिकरी उडाली..
नजर त्या आकृतीकडे स्थिरावली.

एखाद्या  फळा फुलांनी बहरलेल्या,  अन गर्द छायेंनी नेहमीच
आपलसं  करणाऱ्या, ' वृक्षावर 'आपल्या नजरेदेखत कुर्हाडीचा कत्तली  घाव   पडावा अन काळजात कळीची चर्र  उठावी  तशी काहीशी स्थिती  झाली होती. काळजाला एक एक शब्द ते भिडले होते.  

'अरे,  ऐकतोस ना रे...  , ऐक ना , थांब ना ..'

ती माउली कळकळीने  हाक देत होती.  आपल्या पाठमोऱ्या मुलाकडे पाहत.
पण तो तसाच चालत सुटला , आईचे ते  बोल ऐकूनही न ऐकल्यासारखं  करत,   मागे जराही वळून न बघता ..
तेंव्हा मनात विचारांची गस्त सुरु झाली.

कशी हि  माणसं असतात, काळीज  नावाचं  प्रकार असत कि नाही त्यांच्याजवळ , काही कळत नाही  .. तो एक प्रश्न चिन्हच  ?
जिथे काळीज नावच मनचं नाही तिथे ती आर्त हाक तरी कशी पोहोचणार, कशी भिडणार ?

काळजाची आर्त हाक कळायला आधी 'काळीज'   असावं  लागत तेंव्हा ती  हाक  काळजाला जावून भिडते.
पण कुणास ठाऊक त्या तरण्या मुलाकडे ते नसावं  ?
अन्यथा तो असा चालत सुटला नसता . ..मागे न वळता  ..त्या माउलीच्या डोळ्यात आसवे निर्माण करून ...

ती माउली मात्र तिच्या वेगानं धापा टाकत त्या पाठोपाठ लोकल मधून उतरती झाली .
'अरे थांब ना ' ऐक ना रे ... अशी आर्त हाक मारत,  हृदय पिटाळत...त्या  पाठोपाठ...

क्षणभर नजर   तिथेच  खिळून राहिली. ..त्या पाठमोऱ्या आकृतीकडे ..त्या माउलीकडे.. त्या क्षणाभोवती रेंगाळत ..
विचारांचं  काहूर  माजलं मनात  ...
अवघा क्षणाचा तो प्रसंग ...मनावर घाव करून भळभळती जखम देऊन गेला.

हे काळीज...खरच फार हळवं असत ..फारच  हळवं...

भावनेनं  उतू गेलेलं,  प्रेमानं ओथंबून वाहिलेलं
कुणा ना कधी कळलेलं , एकांतात कायम गढलेलं

शब्दांशी मिसळलेलं , काळजाशीच  नडलेलं
आक्रोशांनी  रडावंलेलं  , स्वतः वरच  हास्यांलेलं 

बंध  नात्याशी जुळलेलं , कधी कुठे भांडलेल
क्षणात तुटलेलं..अन दुभंगून उरलेलं, दुरावलेल .

हे काळीज...खरच फार हळवं असत ..

संपल ते सगळ नाट्य , संपल सगळ  .... डोळ्यात देखेतं...घडलेलं.. क्षणापूर्तीच..   .

गाडीने हळूच वेग घेतला  अन ती पुन्हा धावू लागली.
काही क्षणाआधी ,नजर भेट झालेली ती मंडळी...
ती माउली ,  तिचा  तो  मुलगा ..अन ते वाक्य , तो सारा प्रसंग मनात  तसच तरलत राहिला.

काय घडलं असेल त्या  बंध त्या नात्यात....ते माहित नाही .
पण त्या  माउलीच्या काळजाची ती आरोळी  मात्र मनास अजूनही खूप यातना देते....कळवळत मनं त्यानं..
 
आई वडील , जन्मदाते आपले , अनेक स्वप्नं बघून , सुखाचा त्याग करून , काबाड कष्ट करून  लहानाचं  मोठ  करून वाढविलेलं.
त्या माउलीच्या मनाची साधी हाक, ती कळकळ   आपण ऐकू नये ...  त्यास प्रतिसाद देऊ नये .तिला तसच एकट सोडूनी निघून जावे  ..
काय  बोलावं  ह्या उपरी ..शब्द नाहीत ....

आपलीच माणसं  जेंव्हा आपल्याशी अशी तर्हेवाईकपणे वागतात..
तेंव्हा खरंच गुदमरत मनं ..

संकेत य. पाटेकर

१५.०४.२०१५

शनिवार, ७ मार्च, २०१५

'घर'चे अन 'घर' च्याबाहेरचे..

२०१२ ला लिहिलेली हि एक पोस्ट..

काल योगायोग म्हणा , माझं  नशीब म्हणा ...
माझं ज्या व्यक्तीवर मनापासून अन जीवापाड प्रेम आहे त्या व्यक्तीची नि माझी बरेच दिवसाने भेट घडली.

तसं हे मनं नेहमीच आतुरलेलं  असतं. जिच्यावर आपल जीव असतो ...भरभरून प्रेमं  असत .
त्या व्यक्तीच्या भेटीसाठी ..
आपलेपणाचे तिचे गोड प्रेमळ  शब्द ऐकण्यासाठी ...
तिला भरभरून नजरेनी पाहण्यासाठी .....
तिच्या सहवासाच्या चाह्येखाली निवांत पहुडण्यासाठी ..
मग ती  कोणत्याही नात्यातली व्यक्ती असो .........प्रेम माणसाला त्या रेशीम बंधनात अडकवून ठेवतो ..

काल ती भेटली.
नाही नाही  मीच भेटलो तिला   .. .सायंकाळी.
रिक्षाने घरी परतत असता,  वाटेतल्या  रस्ताच्या कडेला फोन वर कुणाशी तरी बोलत असता दिसली.
बस्स तेंव्हाच ठरवलं आज हिला भेटूनच जायचं . मनातल सारं  बोलून टाकायचं .
तसं हि मनात मी काही ठेवत नाही . तरीही वाटत मनातल्या त्या भावना,
ज्या सतत वादळासारखे घुन्गावत राहतात  ते बोलून द्याव अन शांत करावं  ह्या वादळी मनाला .

तसं  बऱ्याच दिवसापासून ..कित्येक महिन्या पासून पाहतोय.  तिचं वागणं, तिचं  बोलणं..
 बदललंय...खुपसा फरक पडला आहे .
पूर्वीची  अन  आताची ती... ह्यात...

क्षण हे असे का , का बर्र बदलावेत,  अस राहून राहून वाटत कधी .
सुखाचे अवघे क्षण ..ते हि अगदी मोजून अन दुख हा  पाठशिवणी सारखा मागेच सतत... का हे अस ?
का हे क्षण असे बदलतात ?
असत्याच न्हवतं  करून टाकतात . एखाद्या मनाला घुसमटून देतात ?

कुठे ते हास्य लहरीत गुंफलेले , बहरलेले  सोनेरी  क्षण ? अन कुठे हे अत्ताच्चे तळपत्या उन्हात पार काळपटून गेलेले  मरगळलेले  निरुत्साही क्षण....

परिस्थिती सार वेळ , वेळेनुसार  परिस्थिती  अन वेळ- परिस्थिती  नुसार माणसाचे आचार विचार , त्याचं   वागणं , बोलणं सार काही बदलतं.
अन ह्याचा होणारा परिणाम त्या व्यक्तीसोबत इतर  मनावर हि होतोच.
हे नातच तसं असत .
म्हणून आपण हि आपल्याच विचारात बुडतो. आठवणीचं  गाठोड हळूच उघडून  स्वताहाशीच  संवाद  साधत.

किती सुंदर आणिक सोनेरी क्षण होते ते ..किती आनंद..अन उत्साहाने  बहरलेले  दिवस होते ते ....
पण सांर  अचानक कुठे गेलं ? कस गायब झालं.
बहरलेला तो हास्य गंध कुठे नाहीसा झाला ? .कुठे गेले ते दिवस ?
मन  चाचपडतं  ..गढून जातं  त्या अश्या असंख्य विचारांच्या भाव गर्दीत ....

काल ती दिसली .
रस्त्याच्या कडेला उभी कुणाची तर प्रतीक्षेत....मी  रिक्षाने जात असता ,तेंव्हा ठरवलं आज भेटूनच जावू तिला ..कित्येक दिवस भेट न्हवती .म्हणून रिक्षातून उतरलो नि थेट तिच्या समोर उभा राहिलो.

क्षणभर तिच्या चेहऱ्यांकडे नजर खिळून राहिली.
असंख्य विचारांच्या छटा अन कुठल्यातरी विवंचनेत असलेला तिचा  हताश,  निराश,अन थकलेला निरुत्साही चेहरा पाहून मन काळवंडल अन मनोमन म्हणून लागलं.

हीच का ती ? हसऱ्या  मनाची ..खेळकर वृत्तीची, माझी प्रिय अन प्रेमळ...

काही वेळ  तसाच अगदी  शांत उभा  होतो तिच्या  चेहऱ्यावरील  भाव टकमकते ने  निरखत .
काहीच क्षण असेच गेले... निशब्दतेत..  पण मीच पुढे  बोलण्यास सुरवात केली .

मनात असलेल्या अनेक विचारांना , मनातल्या शंकांना अन माझ्या त्या प्रेमळ रागाला तिच्या समोर कसं   मांडाव , कसं  व्यक्त करावं हाच  एक मोठा  प्रश्न होता.
त्यातही तिची ती अवस्था पाहून खरचं  आपण आता बोलावं  का ? बोलत व्हावं का ?
अगोदरच ताणतणावा खाली असेल , अन अस असताना आपल्या बोलण्याने तिला अजून त्रास झाला तर ? ह्याविचाराने मन पुन्हा हळवं झालं. पण ना ना म्हणता मी बोलण्यास सुरवात केली.

कशी  आहेस ?
ठीक...
एक विचारू ?
बोल  ...,
का अशी वागतेस ?

संकेत , Please..
मला पुन्हा पुन्हा ह्या गोष्टीत खेचू नकोस.
अंतर मनाला  भिडलेल्या त्या माझ्या प्रश्नांनी तिला बोलतं  केल.

मी अगोदरच खूप ताण तणावात आहे . मलाच नकोस झालं  आहे सगळ .
तूच बघतोयस ना ..

क्षणभर ती  थांबली , एक निश्वास टाकत पुन्हा बोलती झाली .

'संकेत,  खरच इतकं जीव नको लावूस  कुणावर...
हव तर घरच्यांवर जीव लाव   , पण  बाहेरच्यांनवर  नको ....'

ह्या तिच्या शब्दांनी काळजावरच  घाव पडला.
मग तू घरातली नाही आहेस का . ? तिच्या प्रश्नाला कसबसं उत्तर देत मी म्हटलं .

ह्या प्रश्नवार तिने उत्तर दिल नाही. पण पुढे बोलत राहिली.

काही नाही  रे मिळत ह्यातून... . त्रासाच होतो खूप ....
मनातल्या  सार्या अनुभवी क्षणांना  एकवटून  ती पुन्हा बोलती  झाली

तुझ्यात आता 'मी' पाहतेय ...'संकेत'
माझ्या जागी  आता तू आहेस , वेड लागेल अश्याने .. . त्रास होईल खूप  ..नको जीव लावूस माझ्यावर . 
खरच ...
क्षणभर सगळ शांत झालं.....
पुढे काय बोलावं ते माझाच मला  कळेना .

मी तसाच हताश अन पोखरल्या मनाने तिचा निरोप घेत मागे फिरलो.
मनात पुन्हा विचारांचं वादळी वादळ  उठल.

इतके दिवस ती मला का टाळू पाहते ह्याच कारण आज मला मिळाल होत .
का तर तिच्यासारखं मला हि तसा त्रास होऊ नये,  त्या ताणतणावातून मी जावू नये म्हणून ..
माझ्या काळजी पोटी .. इतक्या तळमळीने ती बोलली  आज...

तिने तिच्या परीने माझा विचार केला होता . पण माझ्या मनाची वेदना काय  कशी बर सांगावी ....
मला त्रास तर होणारच...मी तयार हि आहे त्रास सोसायला.

पण असं टाळाटाळ नको.....आपलेपणात तुट नको...दुरावा नको ..
मनापासून प्रेम आहे ग ...

अन प्रेमं  हे आंधळ असतं. अन ते घरातले अन बाहेरचं असं   बघून कधी होत नाही .
नाती हि रक्ताचीच असतात असं हि नाही .
मनात घर केलेली माणसं  हि  तितक्याच रक्तमोलाची , प्रेमाची  अन ..आपलेपणाची ...

नातं कुठलेही असो   एकदा ते जुळलं कि ते शेवटपर्यंत निभवावं.
प्रेमाचं पारड  हि शेवटच्या श्वासापर्यंत ... तोलून राहावं
भले त्यात कितीही खाचखळगी   येवोत.

माझ प्रेम हि असंच आहे . भले त्यात थोडा स्वार्थ असेल पण ते निखळ आहे अन तसंच राहील शेवटच्या श्वासागणिक ....

संकेत य पाटेकर
मनातले काही ...
११.०९.२०१२

सोमवार, १६ फेब्रुवारी, २०१५

बा'चा बाची...

आज  कुणास ठाऊक कसला परिणाम झाला होता मनावर ,  कुठलीशी प्रेरित शक्ती अंगभर संचारली होती जणू ..
डोळ्यादेखत,समोर जे  विपरीत घडतंय ते थांबविण्यासाठी  ...

आपली जीवनवाहिनी म्हणजे हि 'मुंबई लोकल' , दिवसभरात हजारो लाखो लोक आपला जीव मुठीत घेऊनच रोजचा हा  जीवावरच प्रवास करतात . कशासाठी तर पोटासाठी ...आपल्या कुटुंबियांसाठी ..

रोजची ये जा करणारी, धावणारी हि मुंबई लोकल ..आपल्याला तशी  अनेक  भावचित्रांचे कधी हसरे कधी अधिक दु:खद असे प्रसंग डोळ्यादेखत घडवून आणते. आणि आपल्या मनाला विचारांच्या भाउक गर्दीत हळूच लोटून देते . काय घ्यायचा तो धडा आपण त्यातून  घेतो हि किंव्हा काही जणू  घडलच नाही अश्या अविर्भावात आपण  सगळ सोडून देतो हि  .

अवघा क्षणभरचा  प्रवास काय तो   ....तुमचा आमचा ....अनोळख्यांचा ... एकाच  वाटेचा , त्या  क्षणापुरती काय तो   ..,
प्रत्येकाची  वाट  निराळी  तरी हि भेटतोच आपण एका वळणावर ..
पण तो  वळण हि असा जिवावर लोटला तर ...कल्पनाच नको करायला .

ह्या आपल्या धावत्या  मुंबई लोकल मध्ये  रोज बघावं  तर आपली बाचा- बाची सुरूच असते.
कधी ह्याची तर कधी त्याची ,
नुसता हलकासा धक्का लागला   कि त्यावरून   वाद , चौथ्या सीटसाठी वाद   , ट्रेन मध्ये चढता उतरता  वाद , त्यातून एकमेकांना शिवीगाळ , अन त्या हि पुढे मग टोकाची भूमिका अर्थात  ..हाणामारी ..

अवघा क्षणाचा प्रवास, रम्य कधी रटाळ हि असेल पण हे लोक बेरंग करून टाकतात . कुणी ऐकून घेत नाही अन समजून हि घेत नाही .अन हे थांबावं म्हणून बघणारे सुद्धा पुढे येत नाही . ते फक्त बघ्याची भूमिका घेतात. येणारे येऊ पाहतात पुढे  . पण त्याना हि जागीच अडवलं  जात . कशाला नुस्कारण मध्ये पडतोयस  ? ते ऐकणार नाहीत अस बोलून गप्प बसवलं जातं  . अन पुढे जे घडणार तेच घडतं  . 

आजचा हि असाच काहीसा प्रसंग
विषय तोच , पण जरा वेगळा ,
वेगळा ह्या अर्थी   कि फक्त वयोमानाचा फरक काय तो ...

एकीकडे  सळसळतं  तरुणपण मनगटात पोलादी ताकत असलेल तर दुसरीकडे  वृद्धत्वाकडे झुकलेलं  म्हातारपण.. अनुभवी बोल तेच काय त्याचं  प्रभावी  शस्त्र ...

वार शनिवार ,  काला घोडा फेस्टिवल पाहून झाल्यावर सी एस टी   वरून ठाणे लोकल पकडली अन निवांत सीट वर बसलो होतो . तीन चार स्थानक अशीच निघून गेली .
अन वारे माप शब्दांचा एकंच गोंधळ उडाला. त्यान सार्यांचे लक्ष  वेधून घेतलं .

बापाने हे असच  शिकवलं का रे ?XXXXXX
बाप काढू नका हा , अन शिव्या हि देऊ नका .
ये ..XXXXXX
वाद वाढत होता...पण कुणीच  ऐकेना अन समजूनच घेईना..

जागेवरून काहीतरी बिनसलं होत . त्या दोघात .
ते दोघे म्हणजे  एक साठीच्या आसपास असलेले  'काका' अन एक हट्टा कट्टा 'तरुण'
अन त्या दोघां समवेत असलेले त्यांचे इतरसहकारी ...

सुरवातीला साधेपणाचेच  शब्द काय ते रागाने वरचढ करत होते मग मात्र  हळूहळू त्यात इतर अवजड शब्दांची (शिवीगाळ )रस मिसळ होऊ लागली अन हात उगारन्यापर्यंत  मजल  गेली.
पण ते ते थांबविन्यास्ठी कुणी हि पुढे येईना .
जणू काही मनोरंजनाचा खेळ चालू  होता . अन लोक टकमकतेने अविर्भावपणे ते  बघत होते. मजा घेत होते .

कुणी हि मोठी व्यक्ती असो , वयोमानानुसार एक आदर असतोच  त्यांची विषयी आपल्या मनात,
मग ती व्यक्ती ओळखीची असो वा अनोळखी.
त्याना एकेरी शब्दाने बोलण्या इतपत  आपण कुसंस्कारित  नसतो..अन बोललो तर
'हेच का रे तुझ्या आई वडलांनी  दिलेले संस्कार' असे बोल समोरच्या मुखातून हमखास निघून जातात .

इथे हि असच झालं.
त्या काकांनी रागा भरात एक शिवी हाणली काय अन बाप काढला काय ? त्या तरुणाच सळसळ रक्त ताप लं  अन तो लगेच 'अरे तुरे' ची भाषा करू लागला.
इतपर्यंत सगळ ठीक होत पण त्याने जेंव्हा वयोमानाच भान सोडून त्यांच्यवर जेव्हा हात उगारायला सुरवात केली  तेंव्हा तो तिथेच चुकला .....अस म्हणाव लागेल. कारण मनगटात ताकद असली म्हणून काय झालं समोरील व्यक्ती कोण कशी आहे त्याचा तरी विचार करावा. निदान वयोमनचा तरी ..

इथे वादाला सुरवात पहिला कुणी केली हे महत्वाच नाही.
महत्वाच हे होत कि सुरु झालेला वाद , दोघांपैकी एकाने हि समजून न घेता , तो  मिटवावा ह्या करिता  प्रयत्न हि केला नाही उलट तो  वाढत नेला  ...

अन गम्मत  अशी कि जेंव्हा मी  त्यांच्या मध्ये पडू लागलो . सगळ निवळण्यासाठी  म्हणून ..तर एका दोघांनी मला , कशाला मध्ये पडतोयस ? ते ऐकणार नाहीत अस बोलून निवांत  राहायला सांगितल .
पण ते सगळ  ऐकून घेणार अन निवांत बसणार माझ मन तेंव्हा माझ नव्हतच  ..ते प्रयत्न करत होत . शांत होण्यसाठी ..ये दादा, वोह काका ...अशी आर्त हाक मारत ..
हे  झालं माझ्याबाबतीत ,

पण त्याचवेळेस माझ्या शेजारी उभ्या असलेल्या .. त्या बाईनी सुद्धा हातवारे करत अन 'तुम्ही गप्प बसा हो, कशाला मध्ये पडतायेत अस म्हणत आपल्या नवऱ्याला   हि त्यामध्ये पडू दिलं नाही .

पुढे हे सगळ निवांत झालं ..खरं ..

पण वयोमानाच विचार करता....वाद घालणाऱ्या त्या दोघात
एकमेकांना समजून घेण्याची वृत्तीच कुठे दिसली नाही.

आपल्या पेक्षा वयोमानाने मोठे म्हणून शांत राहावं ते त्या तरुणाला कळून आलं नाही .
अन आपण मोठे आहोत जाणकार आहोत अस समजूनही त्या काकांनी  माघार घेतली नाही .
अन हा वाद सुरु असता  बघनार्यांनी हि नुसतीच बघ्याची भूमिका घेतली .

शब्दाने शब्द अन वादाने वाद वाढत जातो. तो वाढविण्यापेक्षा कुणी एकाने तरी माघार घ्यावी  लागते. अन्यथा 
क्षणाच्या त्या प्रवासात तुमच्या अमुच्या आयुष्याची राख होवू शकते . 
हे कुणी समजूनच घेत नाही . 

- संकेत य पाटेकर
१६.०२.२०१५ 

बुधवार, २१ जानेवारी, २०१५

ते ओघळते अश्रू थेंब....

शनिवार , संध्याकाळची वेळ . साधारण ६ वाजत आले होते.
माटुंगा स्थानकात एका मित्राची वाट पाहत बसलो होतो . पाच एक मिनिटे बोलूनही तो अद्याप आला न्हवता . त्यामुळे रिकामा वेळ , मोबाईल हि हाती पण त्यात न रेंगाळता नजर इकडे तिकडे सहजच भिरभिरत होती.
नित्य नेहमीच्या ठरल्या वेळेप्रमाणे लोकल ये जा करत . त्यातून नवं नवीन चेहरे पायऊतार होई . तेंव्हा नजर आपुसकच त्या येणा जाणाऱ्या चेहऱ्यावरील , विविध रंगी भाव छटा टिपून घेण्यात मश्गुल होई, अशातच काही वेळ निघून गेला. अन एके ठिकाणी अचानकपणे मनाच्या अंतरंगाला एकच घाव बसला ते ताडकनं जागं झालं . काहीसं कळवळल हि...
त्या ''ओघळत्या अश्रू थेंबानी ''
अश्रू आनंदाचे ,
अश्रू वेदनांचे,
अश्रू धडधडनाऱ्या,
हृदयी स्पंदनांचे

नजर स्तब्ध झाली. एकवटली, त्या वेदनामय अश्रू थेंबाकडे... काय झाले असेल ? का ,असे ओघळतायेत, हे अश्रू थेंब ? न थांबता , आळी पाळीने लगातार ...
काय कारण असावं ? का ?
'क' ची बाराखडी सुरु झाली. तिच्या अंतरंगाचा, मनाचा आढावा घेत.
साधारण ३० एक वर्षाची ती विवाहित स्त्री , मनातले हुंदके तिला अनावर होत होते. इतके कि आपण रेल्वे परिसरात , सार्वजनिक ठिकाणी , ऐन गर्दीत , फलाटावर उभे आहोत हे माहित असूनही त्या अश्रूं थेंबांना , तिला आवर घालता येत न्हवता. ते मोकाट सुटले होते.
वेदनामय हाल अपेष्टा सहन करून , भोगून ...जणू मुक्तीच्या दिशेने ...गालावरून सरसर......सरसर...धाव घेत.
मनातल्या हृदयी भावनेला जरा तरी कुठे असा धक्का लागला कि अश्रूचा बांध फुटतोच फुटतो . मग ते ठिकाण एकांतातलं असो वा सार्वजनिक कुठलही ..त्या आतल्या भावनेस रोकता येत नाही . ते ओघळतातच ...अश्रू रूपाने ..
हे अश्रू हि असेच.....भावस्पर्शी , ओघळते ..
मी ते टिपून घेत होतो . माझ्या मनाच्या भावपटलावर. ह्या पलीकडे काही करता येत न्हवतं . अन करू हि शकत न्हवतो . काय करणार मी ? काही क्षण असंच टकमक पाहत राहिलो.
मोबाईल च्या स्क्रीनवर एक वेळ ती पाही अन पुन्हा , वेदामानय हुंदके तिला अनावर होई . अन तिच्या अश्रूंचा बांध फुटे. ते दडवण्याचा ती प्रयत्न हि करे ..पण व्यर्थ ..., कसल्या तरी गहिर्या वेदनेने तिला वेढून धरलं होतं. त्यातून सुटका मात्र होत न्हवती. भरीस भर म्हणून कुठेतरी हृदय चिरणार हिंदी गाण हि नेमकं त्याच वेळेस सुरु होत.
मी ते पहात होतो . न्हाहाळत होतो. ऐकत होतो .
काही क्षण असेच निघून गेले अन पाटोपाट धावणाऱ्या एका लोकल मध्ये ती हि तिच्या वाटे ....पुढे झाली. मनात , त्या क्षणाची छबी ठेवत. ना- ना विचारांना उमाळा देत.
आयुष्यात खरचं सर्वात अधिक जर वेदना होत असतील तर त्या आपण, आपलं म्हणून घेणाऱ्या, अन आपल्या असलेल्या, त्या जीवापाड व्यक्तीन मुळेच.
जिथे प्रेम तिथे वेदना ह्या आल्याच . जसं प्रेम निखळ आनंद देत तसं ते कळवळनारया न शमनारया वेदना हि देत. नात्यांची हि मोतीमाळ, कधी कधी अश्रूंच्या ह्या भावगंध दवबिंदू नि न्हाऊन निघते. प्रेमाचा ओघळता वर्षाव जणू.....
प्रेम प्रेम प्रेम अन प्रेम ...
प्रेमात माझ्या, हृदयी स्नेह बंध
डोळ्यात तरळते, तुझेच प्रतिबिंब
संकेत य. पाटेकर
२१.०१.२०१५
खालील इमेज हि अंतरजालातून घेतली आहे.

बुधवार, १४ जानेवारी, २०१५

कट्ट्याचं नुतनीकरणं- अन आठवणीतले ते क्षण ..

कट्ट्याच नुतनीकरणं- अन आठवणीतले क्षण
'पुष्पक कट्टा'
एकदा का लिखाणाला सुरवात केली अन शब्दांशी सुत जुळले कि ना -ना विविध विषय आपुसकच मागे मागे धावून येतात . मग ते कधी कुठे कसे ... ते काय सांगता येत नाही. आसाच हा एक विषय काल रात्री अचानक डोक्यात भूनभुनला अन म्हटलं चला ह्यावर लिहू काहीतरी .म्हणून लिहावयास घेतले.
तसा 'कट्टा' म्हटला कि नजरेसमोर येते ती नित्य नेहमीचीच, एक ठराविक भेटीची जागा . मित्र मैतरणी अन ना ना विविध गप्पांत उधळलेले , कधीही न विसरता येणारे, ते सुवर्णरेषित सोनेरी क्षण ..
अन क्षण म्हटले कि ते विविध ढंगी, विविध रंगी असतातच. . मनाच्या अंतरंगात उसळणाऱ्या अश्या विविध ढंगी, विविध रंगी भावनांना अश्या कट्ट्यांवर एक मोकळीक मिळून जाते.
आपल्या आयुष्यातले मग ते सुखाचे प्रसंग असो , वा वेदनेने कळवळनारे भाउक क्षण असो , समोर विश्वासार्थ नात्याची गुंफण असलेली व्यक्ती असली म्हणजे मनात दडलेल्या त्या असंख्य भावनांचं दार हळूच उघडलं जातं. असाच हा आमचा किंव्हा माझा म्हटलं तरी चालेल एक 'कट्टा' विवध रंगी भावनांचा , हसऱ्या भाव गंधाचा 'पुष्पक' 'कट्टा' पुष्पक हॉटेल ....

नात्यातली पहिली जोडी जी ह्या कट्ट्यावर अवतरली असेल ती म्हणजे आम्हा भाऊ- बहिणीची जोडी. माझी लाडकी प्रिय बहिण ....जिने तिच्या प्रेममऊ शब्दाने अन मायेनं मला आपलंस करून टाकलं. वेडावून सोडलं.
लोकं प्रेमात वेडी होतात...ते प्रेयशीच्या ,मैत्रिणीच्या ..मी मात्र माझ्या बहिणीच्या प्रेमात हरखून गेलो. ह्या कट्ट्यावरच , बिर्याणीवर ताव मारत, एक एक कप चायचा घोट घेत ते सारे सुवासिक क्षण मनाच्या कप्यात कैद होत गेले.
ह्या कट्ट्यावरच आम्हा दोघांनी मिळून एक कविता हि रचली. ती पूर्ण केली. तो कागद तिच्या हस्त लिखीताचा अजून जपून ठेवलाय.
ह्या कट्ट्यावर तिच्या लग्ना आधी कित्येकदा भेटत असू....बोलत असू ...एकमेकां विषय...जीवनाविषयक कधी तासभर तर कधी दहा पंधरा मिनिटे . ..गप्पांत अवांतर ..
आता ते सारे क्षण फक्त आठवणीत उरलेत . कारण वेळेनुसार आहे ती परिस्थिती हि बदलत जाते. आता भेट होत नाही अस नाही. होते भेट, पण ह्या कट्ट्यावर नाही...,
पण जाता येता नित्य नेहमीचा तोच रस्ता असल्याने ..ती आठवण मात्र प्रकर्षाने होतेच होते. मग स्वताशीच पुटपुटत जातो ...
किती हसरे क्षण होते ते !...असो
लग्ना नंतर मुलींच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळते . सारंच चित्र पालटतं. तसंच काही तिच्या बाबतीतही ... पण कधीतरी ह्या कट्ट्यावर पुन्हा नक्कीच एकत्रित येउच ...त्या आठवणी पुन्हा उजळवत...... ह्यात शंका नाही.
ह्या कट्ट्यावरची दुसरी भेट म्हणजे माझ्या जीवाभावाचा मित्र ..हेमंत.
मित्र कधी साथ सोडत नाही. ते सोबतच असतात कायम असे म्हणतात वेळेप्रसंगी वेळेत हजर हि होतात. त्यातलाच हा खास जीवाभावाचा मित्र...हे माझं भाग्यच म्हणा ..! आठवड्यातून दोन एकदा तरी ह्या कट्ट्यावर ,आमची भेटहि ठरलेलीच.
पण ह्याच्या वेळेचा ठावठिकाणा हा कधीच नसतो. नित्य नेहमीच्या सवयीप्रमाणे हा भाई पाच एक मिनिटे बोलून ,कधी कधी अर्धा एक तास खोळंबून ठेवतो . अन हजर झाल्यावर कारणे द्या ? चा तास अवितपणे सुरु होतो .
मग कधी चहा तर कधी कॉफ्फी च्या एक एक घोट सोबत (ह्याशिवाय आम्ही इतर पदार्थांकडे वळतच नाही म्हणा ) ना- ना तर्हेच्या विषयवार आमचं अवांतर बोलन होत. तर कधी ट्रेक विषयी गप्पा , पुढील ट्रेक चे प्लान ( असे प्लान कितीसे करतो पण त्यातले निम्मे हि पूर्ण होत नाही हि ह्यातली गंमत.) असो.
उद्यां नाटकाला जावूया का रे ? चल नाही तर एखाद चित्रपट बघू ? अरे आपल्या बाळू दा ला फोन कर, अरे आपल्या ओमी बाबाला विचार येतोय का ? अरे तो नाय तो शॉपिंग करत असेल रे ...हे ते नाना विविध हास्य क्षण ...
कधी भविष्याचा वेध घेत केलेली चर्चा , मग ते 'लग्न' असो वा लग्नातली 'ती' वा नोकरी ... विषय खूप असतात बोलण्यासारखे ..न संपणारे ....अवांतर .. तर मित्रा येतोयस ना ..कट्ट्याच नुतनीकरणं झालय आता ...चल ये कट्ट्यावर ...
ह्या कट्ट्याची एक आवर्जून आठवण सांगायची तर माझा 'Wallet'..
बहिणीसोबत असंच एकदा बसलो होतो. गप्पात दंग होवून ....चहाचा एक एक प्याला घशात लोटत. चहा पिउन झाल्या नंतर आद्य कर्तव्य म्हणून वालेट काढलं , पैसे देऊ केले अन तिथून दोघेही निघालो. .अर्ध्या वाटेत आलो तेंव्हा काहीतरी विसरल्याची आठवण झाली.
एक एक खिसे तपासून पहिले तेंव्हा लक्षात आल. कि 'वालेट' बहुदा ते कट्ट्यावरच विसरलो किंव्हा कुठेतरी पडलं. पैसे देवाण घेवाण मध्ये .. PAN कार्ड ATM कार्ड , LICENCE ह्या त्या गोष्टींचा भरणा त्या WALLET मध्ये होता. त्यामुळे घाबरलोच . तडक पळत सुटलो कट्ट्यावर, हॉटेल मालकाशी चौकशी केली. पण नाही माझं किमती 'WALLET' आता हरवलं होतं. . निराश मनाने तिथेच अवती भोवती चकरा मारत राहिलो, रात्री उशिरा पर्यंत पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. . माझा किमती WALLET..
किमती ह्यासाठी कि ते माझ्या बहिणीने भाऊबीज म्हणून गिफ्ट केलेलं. अन त्याबरोबर इतर महत्वाची हि कार्ड्स हि होती. घरी गेल्यावर ATM कार्ड वगैरे BLOCK करून टाकलं . रात्री तशी झोप लागलीच नाही म्हणा . पण सकाळी उठल्य बरोबर जो फोन खणाणला त्याने तर आनंदुनच गेलो. नाचू बागडू लागलो.
WALLET मिळालं होत. एका सज्जन गृहस्थाला. तडक त्याची भेट घेतली. त्याच्या घरी जावून अन THANKU म्हणत परतलो. तिथपासून त्या गृहस्थाची अन त्याच्या कुटुंबाशी भावपूर्ण नातं जुळल . आता आवर्जून कधी एखाद फोन येतो.
ओळखलतं का मी मनीष सावंत ......?काय कस काय चाललय ?
खरचं अशी सज्जन अन प्रामाणिक माणसं क़्वचितच भेटतात. कट्ट्याशी निगडीत हा एक क्षण मी कधी विसरणार नाही. असो..
ह्या कट्ट्यावरची अजून एक भेट आठवणीत राहणारी म्हणजे माझी एक जवळची मैत्रीण.
स्वतःच्या मनाशी अनेक प्रश्नात गुंतून राहणरी , प्रश्नाचं उत्तर नाहीच मिळालं तर मला हमखास विचारणारी अन मला हि त्या प्रश्न कोड्याच विचार करण्यास भाग करणारी ...अशी हि मैत्रीण हळव्या मनाची हळवी मैत्रीण..... , ते क्षण हि आठवणीत आहेत.
तसे प्रश्न अन त्याची उत्तर हि आपल्या सभोव तालीच कुठेतरी आसपास दडलेली असतात. बस्स त्याचा शोध घेतला कि ती मिळून जातात.
तर असो. असा हा आमचा 'पुष्पक कट्टा' विविध ढंगी, विविध रंगी क्षणांनी फुललेला. अन तो फुलतच जाणार पुढेही .. . किती वेळ अन कधी पर्यंत अन अजून कोणा सोबत ते माहित नाही. पण मित्रा हेमंत आपल्याला भेटायचाच आहे . आपल्या ह्या कट्ट्यावर ..चहाचा एक एक घोट घेत..ना ना विषयाचे फडसे पाडत.....
चला तर भेटू पुन्हा.....कट्ट्यावर....
ह्या कट्ट्यात सहभागी झालेले मित्र परिवार .... माझी प्रिय बहिण श्रद्धा , मित्र हेमंत, ओमकार , शीतल , पुनम , राज , निलेश , बाळू दा ...अन मी..
अजून हि लिस्ट पुढे वाढतच जाईल... भरोसा काय ...
आपलाच , संकेत उर्फ संकु...
संकेत पाटेकर
१४.०१.२०१५

मंगळवार, १३ जानेवारी, २०१५

वहिनीचा एक दिवस...

काल सकाळपासून सुरु झालेली धांदल गडबड..
संध्याकाळी वहिनी अन भाऊ घरी परतल्यावर काहीशी कमी झाली. नित्य नेहमीची , पहाटेपासून सुरु होणारी अन रात्री उशिरा पर्यंत हि सुरु असलेली...
वहिनीच्या कामाची लगभग ,धावपळ...काल काहीश्या प्रमाणात प्रत्यक्ष अनुभवयास मिळाली.
जी आतापर्यंत नित्यनेहमी पाहत होतो.
काही कारणात्सव अचानक भाऊ - अन वहिनीला काही बाहेर जाणे जरुरीचे झाल्याने,  कालचा एक दिवस ' वहिनीचा' माझ्या हाती आला. खास त्या करिता सुट्टी घेतली.
सकाळी स्वतः लवकर उठून आमच्या छोट्या राणी सरकारला जागे करून , आंघोळी पासून ते वेणी फणी करे पर्यंत ,त्यांचा मूड सांभाळेपर्यंत नाश्ता पासून शाळेत वेळेत सोडेपर्यंत कामाची धांदल गडबड सुरु झाली . (गंमत म्हणजे आमच्या छोट्या राणी सरकारची वेणी- फणी करताच येत न्हवती.
मुलींचे लांबलचक केस वळविण्याची तशी सवयच नाही आहे म्हणा.
त्यामुळे वरच्यावर हेअर बेंड घातलं कस बसं अन दिली पाठवून शाळेत...) सकाळी ७:३० ची तिची शाळा...
घरी पुन्हा परतल्यानंतर छोट्या राणी सरकारचे छोटे राजकुमार भाऊ , ह्यांना गाढ झोपेतून कसेबसे जागे करत , त्यांना आंघोळ घालून , नाश्ता देऊन , शाळे ला सोडेपर्यंत सकाळचे ११:३० झाले.
घरी परतल्यावर जेवणाच्या तयारीला लागलो . त्यात १ ते दीड तास कसा गेला ते कळलेच नाही.
पुन्हा शाळेतून आमचं छोट्या बच्चुंना घरी आण्याची वेळ. पुन्हा तेच घर- शाळा- घर जेवण खावनं , दुपारच शांत पडावं  तर ह्याचं धांगड धिंगाणा सुरु ...झोपूच देईना .
त्याना ओरडता ओरडता घसा कोरडा पडे.. . शेवटी काय मुलं ती मुलंच, कसली एक्तायेत एकदा सांगून .....
पुन्हा क्लास ची वेळ , पुन्हा सोडायला एक फेरी ... अस करता करता सूर्य मावळतीला आला.
पुढे भाऊ- वहिनी घरी परतल्या नंतर काय तो श्वास मोकळा केला.
हुश्ह ... !
कितीही हि धावपळ - पळापळ .
दिवस ह्यातच पटकन कसा निघून जातो . ...कळत हि नाही. मग स्वतःसाठी तरी वेळ काय देणार ...?
आपल्या कुटुंबात असा सदस्य असतोच. आपल्यासाठीची त्यांची धडपड , कष्ट, ह्याची मोजदाद कधी नसतेच. अन ती करूहि नये. बस्स , त्या मनास कोवळ्या फुलाच्या पाकळ्या सारखं हळुवारपणे जपावं. 
कधी एकत्रित गप्पांत रंगून जावं , कधी चीटूकल्या हास्य गंधात एकत्रित मिसळाव.
 ह्यातच त्यांच्या मनातला क्षीण कुठल्या कुठे निघून जातो.
असंच लिहिता लिहिता ....
- संकेत पाटेकर

बुधवार, ७ जानेवारी, २०१५

'त्रिकुट' - बहिण- भावाच्या प्रेमावर आधारित एक छोटीशी कहाणी..

बहिण- भावाच्या प्रेमावर आधारित एक छोटीशी कहाणी ...लिहिण्याचा प्रयत्न बघू कितपत जमतंय ...सुरवात तर झालेय ...
नाती कधी ठरवून जुळवता येत नाही , अन म्हणूनच मनाच्या अंतरंगी उसळणाऱ्या उत्कट भावनांना हि कधी थोपवून ठेवता येत नाही . अशावेळी मनाचं हे वेडेपण शब्दांतून कथित होत जातं.
पुढच्या जन्मी , मी ' तुझा भाऊ ' म्हणून जन्म घेईन.
किंव्हा तू ' माझी बहिण' म्हणून जन्म घे ? कसही असो.
पण हे नातं आपलं जन्मापासून हवंय मला ... बस्स ? आपल्या दोघांच ...बहीण - भावाचं
मी आधीच माझ्या देवाकडे साकडं घातलंय , तू हि साकडं घालं.
पण त्या आधी ,तुझ्या अंतकरणातून उमटलेले शब्द मला कळू देतं, ऐकू देतं. मनभरून ..!
मिळेल ना हे नातं ..बहीण - भावाचं ..सक्खेपणाचं , बोल ना ..

बहिणीच्या नजरेला नजर देतं पाणावलेल्या डोळ्यांनी अन जड अंतकरणानी तो बोलत होता. पुढ्यात असलेला चहा हि एव्हाना थंड झाला होता .
कित्येक दिवसाच्या भेटी नंतर हा असा दुर्मिळ योग पुन्हा जुळून आला होता . त्यामुळे दोघं हि बोलण्यात अगदी गुंग झाले होते. . गत आठवणीच्या क्षणांना सुगंधित अत्तराची फोडणी देतं.
तसं आयुष्यात नाती हि अनमोल असतात. सुवर्ण मुद्रित मुखुटासारखी ,अभिमानाने लखलखनारी.., हेवा वाटून घ्यावी अशी.. कायम हृदय समीप हवी असलेली ... ती नाती मग रक्ताची असो वा मनाची , मनाने जुळलेली , हृदयाची धडधड थांबेपर्यंत ती आपली असतात. आपल्यात असतात.
जन्म मरण हा तर प्रकृतीचा नियम . जन्मापासून ते मरणापर्यंत सगळ काही ठरवून दिलेलं . अन त्या त्या प्रमाणे, त्या नुसार घडणारं . पण तरीही भविष्याचा वेध घेत जगत असणारे आपण जीवनातला हर एक क्षण एकमेकांच्या ओढीने, एकमेकां सहाय्याने , ओथंबून निथळनाऱ्या मायेने, शब्द गोडव्याने , गोंजारणार्या भावगंध स्पर्शाने , प्रेमाने, कायम घट्ट विणून राहावं म्हणून प्रयत्नशील असतो.
असाच हा एक प्रयत्न आयुष्याच्या एका वळणावर जुळलेल्या त्या नात्याची वीण कायम घट्ट राहावी म्हणून धडपडनाऱ्या त्या एका मुलाचा ... त्या प्रेम वेड्या भावाचा...
क्रमश :-
संकेत य पाटेकर
०७.०१.२०१५
खालील इमेज हि नेट वरून घेतली आहे .

शुक्रवार, २ जानेवारी, २०१५

जिथे प्रेम तिथे जीवन ..

प्रेम' विना जीवनाला ना रंग आहे ना गंध आहे. हे आयुष्यं प्रेम' विना खरचं बेरंग आहे.
सगळं काही असूनही .., केवल कुणाच्या प्रेमासाठी साठी , काळजी वाहू स्पर्शासाठी , शब्द न शब्दांसाठी माणूस आयुष्यभर कळवळत राहतो .
मनाची ती कळवळ ऐकणार कुणी भेटलं कि तो दाह तेंव्हा कुठे कमी होतो. पण तोपर्यंत.....
असो..
जीवापाड असणारी आपली माणसं सोबत असली कि कसली आलेय चिंता ? मनाच्या अंतर्बाही उसळणार्या अनेकानेक वेदना हि अश्याच मग खळखळत्या हास्य तवांगमध्ये हळूच गुडूप होवून जातात. ते कळत हि नाही, पण त्यासाठी आपल्या माणसांची आपलेपणाची साथ मात्र हवी असते.
अपेक्षेप्रमाणे सगळंच काही मिळतं अस नाही. पण अनपेक्षितपणाचे सुखद धक्के नक्कीच एखाद्याचं आयुष्य उजळून देतात. त्यात तिळमात्र शंका नाही. असे सुखद धक्के प्रत्येकाच्या आयुष्यात येतात.असतात,पण ते कधी, कुठून कसे येतील ते मात्र सांगता येत नाही.
जीवन जगायचं तर आधार हा हवाच. अन तो प्रत्येकाला हवाच असतो, त्याशिवाय उभं राहता येत नाही.

प्रकाशाच्या दिशेने , अवकाशाकडे झेप घेत जाणाऱ्या वृक्ष-वेलींनाही हि जमिनीचा आधार हवा असतो . मग एखादं विजेच्या खांबावर हि झप-झप करत पुढे सरकणाऱ्या वेलेला हि , कसली आलेय तमा ? 
ती पुढे होत जाते प्रकाशाच्या दिशेने...
आधार असला कि जीवनही असंच नव्या आत्मविश्वासने, प्रेरणेने फुलत राहतं.
जिथे प्रेम तिथे जीवन .. 'प्रेम' अन मायेच्या स्पर्शाविना कोणीही वंचित राहू नये .
सगळ्याचं आयुष्यं हे प्रेमानं बहरून निघावं , उजळाव, अधिक अधिक ते उजळत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना ...!

आपलाच ,
संकेत पाटेकर उर्फ संकेत - ०२.०१.२०१५
HAPPY NEW YEAR TO ALL ..