मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

प्रेम हे ....

विसरलास कि विसरतोयस ?

कधी कधी सहवासाची इतकी सवय होंऊन जाते नाकि जिवाभावाची ती सावली क्षणभर  
जरी आपल्यापासून नजरेआड झाली वा दुरावली तरी मन आपलं अस्वस्थ  आणि कावरंबावरं
होऊन जातं.
अश्यावेळी काय करावं काय नाही ह्यांचादेखील विसर पडतो . कुठंच लक्ष लागेनासं 
होतं. जोपर्यंत ती व्यक्ती पुन्हा आपल्याशी संवादाने  जुडत नाही. बोलत नाही.

दोन एक दिवसापासून त्याची देखील अशीच काहीशी अवस्था झाली होती . मन एकटेपणात वेढलं गेलं होतं. एकांतात  विचाराधीन झालं होतं.

खरं तर
एखाद्या व्यक्तीशी,  जवळीक वाढली.  सहवास मिळत गेला. आणि मनमोकळा असा संवाद
ज्वर धरू लागला  कि प्रेमाचं  बीज तिथं अंकुरायला लागतं. 

त्या बाबतीत देखील  तेच 
झालं. प्रेमाचं बीज अंकुरलं जाऊन त्यांचं आता रोपटं झालं होतं. त्याच मूळ 
मनाच्या गर्भाशी घट्ट रोवलं गेलंलं.

रोजचं बोलणं,  शब्दांसंवेत हसणं अधून मधून भेटी गाठी होणंह्याने जीव ओढवला जात होता. 
क्षणाची उसंत मिळत न्हवती . ह्याचाच   परिणाम काय तो ,  
जराशी देखील चुकामुक झाली. इकडचा क्षण तिकडे झाला  कि त्याच्या मनाची अवस्था  वर खाली 
होई. जीव वेडावून जाईकासावीस होत ते ,

तिच्यविना आता  खरं तर,क्षण क्षण जगणं हि त्याला असह्य जात होतं,
तिने सतत आपल्या सहवासात रहावं . आपल्याशी मनमोकळं बोलावं बोलत राहावं .गुणगुणावंह्यासाठी मनाची एकूण धडपड सुरु राही.  हि धडपड ,  हि मनाची तळमळ तिने हि जाणली 
होती. पहिली होती. पाहत होती.

भेटीच्या  पहिल्या क्षणापासून ..
नात्यातली वाढत असलेली जवळीक वाढत असलेला 
स्नेहबंध . प्रेमभरला संवाद आणि एके दिवस.  भेटीगाठीचं ठरलेला तो  खास असा क्षण.
डोळ्यासमोर अजूनही त्याच्या जश्याच तसा उभा राहायचा.

वार बुधवार ,क्षितीजाच्या पंख-सावलीत मोहरले गेलेले क्षण.  
सहाची वेळ ,  ऑफिस मध्ये One Hour Early चा मेल टाकून धावत पळत निघालेला तो 
आणि घरातून  सहाच्या बरोबरपाच एक  मिनिट आधी त्या जागेशी येऊन पोचलेली ती ...

साधीच अशी,  पण पाहताच,  कुणाचं हि  ध्यान मन हरपून जाईल अशी  ...नाजुक गुलाब कळी
निळपंती रेखीव नजर मृदू हळुवार आवाज तजेलदार असा उजळकांती  चेहरा 
कमनीय देहबोली आणि मनमोकळं असं खेळतं बागडतं  मन....! 
सुदंरतेचा म्हणावा तर अति नाजूक आणि रत्नमोल दागिनाच जणू तो, ...!  ईश्वरी देणच दृष्ट लागू नये 
कुणाची..कधी ! 


आयुष्यात पहिल्यांदाच असं कुणा मुलीसोबत,  जिच्यावर आपलं मन ओढवलं आहे . 
जिच्यासाठी  आपण अक्षरशः  वेडावलो गेलो आहे. त्या अश्या खास  व्यक्तीसोबत एखाद कुठला चित्रपट पाहण्याचा योग जुळून येणं,  हा आनंदच  निराळा    , ह्याची व्याप्ती अशी शब्दातहि  मांडता   येणार नाही. 
जीवसृष्टीतल्या पाखर- जीवांनी वृक्ष सावल्यांनी जसं  वाऱ्या संगे  ताल धरावा आणि आंनदाच्या स्वर लहरीत धुंद-मान व्हावे . तशी मनाची अवस्था झाली होती. तन - मन भेटीच्या ओढीनं अधिरलं आणि शहारलं जात  होतं. अवघ्या क्षणांची ती काय आता उसंत होती . 

ऑफिस मध्ये दाखल होताच ,  ...लवकर निघण्याकरिता  मेल हि  केला गेला होता .  तिच्याशी बोलणं झालं होतं . 
दोन तिकीटं आधीच ऑनलाईन बुक करून झाली होती . बस्स आता पाचच्या टोळ्याची ती घडी वाट पाहत होती. लक्ष सगळं त्या येणाऱ्या क्षणांशी  वाहत होतं.  उत्कंठा प्राणपणानं जणू झपाटून गेली  होती . 
आदल्या दिवशीचा तो संवाद 
लडिवाळ शब्दसंख्यांची जादुई मोहर त्यात 
येऊन ठाकलेल्या चित्रपटा विषयक केलेली चर्चा आणि त्याच चित्रपटाच्या शो ला एकत्रित जाण्याचा दोघांचा  तो नेमका  कट,  हा निव्वळ  योग,  नियतीच्या संमतिनेच तर ठरला जात  होता . 
क्षणाचा हि  विलंब न घेता तिने हि होकार देऊन आनंदची  व्याप्ती वाढवली होती . 
सगळं कसं जुळून आलं होतं. स्वप्नवत पण सत्य ..

बस्स आता अजून एका निर्णयाशी ठाम व्हायचं  होतं .   मोठं धाडस करायचं होतं. त्यानेच  धाकधूक वाढली होती.   
क्रमश : 
संकेत पाटेकर 






मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७

कितीदा नव्याने तुला आठवावे....

'' कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे....''
गाणं ऐकता ऐकता त्याच्या डोळ्यात आसवं उतरू लागली. विरह एकांताने टाहो फोडावा
तशी एकूण त्याची अवस्था झाली. आक्रोश नि आकांताने मन ढवळलं गेलं.
भरल्या नजरेनेच त्यानं
बाजूच्या रिकाम्या ख्रुचीजवळ एकटक पाहिलं. आणि तो आठवणींच्या विरह जाळात
पुरता स्वाधीन झाला.
'' किती हाक द्यावी तुझ्या मनाला,
किती थांबवावे मी माझ्या दिलाला..''
जोगेश्वरीच्या २४ कॅरट चित्रपट गृहात , लागलेला तो सिनेमा 'ती सध्या काय
करते'
संध्याकाळची ती हुरहुरती वेळ...
चित्रपट जवळ जवळ शेवट होण्याच्या
मार्गी असताना, लागलेलं गाणं आणि त्या गाण्यानं , शब्द शब्दानं
तिच्या आठवणी संगे काहूरलेला तो...
आज मनाशी तसा तो ठरवूनच बाहेर पडला होता. तिच्यासोबत हा चित्रपट आपण पहायचा.
म्हणून दोन तिकिटं त्यानं आगाऊचं बुक करून ठेवली होती. आणि भेटीच्या त्या
घडीव आशेनं, नव्यानं स्वप्नं रंगवायला सुरवात हि....
वर्ष झालं होतं म्हणा , त्यांच्या त्या भेटीला आता...
आठवतंय ते सगळं ,
ती पहिली भेट .
दादरच्या शिवाजी पार्कमध्ये , सांजवेळी , एकांतात.... एकमेकांच्या सहवासात
नजरेशी लपंडाव खेळत , मनाशी साधला गेलेला तो संवाद ,गढून गेलेली ती क्षणांची मैफिल , मोहरून उमळलेले ते क्षण ,ती अविस्मरणीय भेट ...
आठवतंय,
कित्येक दिवस ओलांडले , महिनो सरले , पण कधी भेटणं झालंचं नाही , पुन्हा ?
प्रचंड तहानेने एखाद्याचं मन कासावीस नि भावव्याकुळ व्हावं, तडफडावं, तशी मात्र ...
ह्या मनाची अवस्था
झालेय माझी..एकाकी अशी... तुझ्या त्या एका भेटीसाठी....तुला आपलंसं करण्यासाठी, तुला मिळविण्यासाठी...
किती ते कॉल्स , किती ते मेसेजेस .....कितीत्या विनविण्या , माफी ,
क्षमायाचना , ह्याची गणती नाही.
पण काहीच परिणाम नाही.
मुद्दामहून टाळायचीस ना मला ?
तुझं ते टाळणं आणि माझं मलाच सांभाळणं, हे होतंच राहिलं.
दरवेळेस सांभाळून
घेत होतो मी स्वतःला .. ,स्वतःचीचं समजूत काढत..
आज ना उद्याच्या ह्या आशेवर...
दिवस ह्यातच सरसर निघून गेले .
तू बदलली नाहीस. तुझ्या निर्णयावर ठाम राहिलीस आणि मी...
संध्याकाळच्या बोचऱ्या वाऱ्यासारखा सैरवैर होत गेलो...
माणसं प्रेमात आंधळी होतात , ह्याचा तो प्रत्यय होता . मी आंधळा झालो होतो ,
प्रेमात पुरेपूर..तुझ्या.
कशाचीचं उसंत न्हवती. तहान भूख न्हवती. झपाटलो होतो नुसता, प्रेम ह्या
अवस्थेने...
,प्रेम ह्या भावनेने,प्रेम ह्या वेदनेने,
पण ते तुला कळूनही , तू कधी, पटवूंन घेतलं नाहीस .
मी मात्र ...तासंतास वेड्यावानी नजर रोखून असायचो.
दिसतेयस का कुठे ? शोध घ्यायचो. तुझ्याच , राहत्या परिसरात येऊन कित्येकदा..
कित्येकदा तसा आलो , आलो तसाच निघून गेलो मी ,
पण तो भेटीचा योग कधी जुळून आला नाही . तू भेटलीसचं नाही आणि तुझं उत्तर हि कधी आलं नाही.
आठवतंय ते सगळं...
तरीही प्रेमवेड हे मन ..ऐकतंय कुणाचं ?
काढल्या तिकिट्स , नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ''ती सध्या काय करते'' ह्या निमित्ताने तरी तू भेटशील , येशील सोबत , बोलशील ..., संवाद साधशील ,
ह्या वेड्या खुळ्या आणि भाबड्या आशेपायी..
वाट पहिली मी...
आलो, लोकलच्या भर गर्दीतून मार्ग काढत एकदाचा जोगेश्वरीला. सेंट्रल ते वेस्टर्न असा प्रवास करत, गाठलं ते चित्रपट गृह .. नजर फिरवली , इकडून तिकडे सर्वत्र, पण दिसलीच नाही कुठे तू ,
ओल्या नजरेनेचं मोबाईलकडे पाहत राहिलो एकटक ...तसाच,
पुन्हा स्वतःची समजूत काढत, पुन्हा स्वतःला थोपवून घेत,
येईल ..येईल...येईल रे ती... वेळ गेलेली नाहीये अजून, थांब,
पंधरा एक मिनिटं आहेत नं शिल्लक ..?
थांबलो पुन्हा, मनाचं ऐकून...
पाऊलं थबकली होतीच जागी , जाणार तरी कशी ती पुढे ?
नजर पुन्हा नव्याने वेध घेऊ लागली , कान अधिक संयमाने टवकारले जाऊ लागले.
आणि वेळ मात्र नेहमीच्या आपुल्या खोडीप्रमाणे,वाकोल्या देत पुढे सरत होती. वेडा वेडा म्हणत..
मी नुसताच उभा..त्या वाटेकडे, तिची वाट पाहत..
ती ...
आलीच नाही.
मनाची पूर्तता झालीच नाही.
चित्रपट मात्र पुढे सरत राहिला, आठवणींना उसवून,जागवून...वेळोवेळी,
संयमाच्या गहिऱ्या जखमा देत...गाणं मनाशी झुलवत ..
'' किती हाक द्यावी तुझ्या मनाला,
किती थांबवावे मी माझ्या दिलाला..
कितीदा रडुनी जीवाने हसावे…''
'' कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे..''
भरल्या नजरेनं त्यानं आपल्या बाजूच्या रिकाम्या सीटकडे पुन्हा एकटक पाहिलं आणि तो पुन्हा आठवणीत गढून गेला...
प्रेमानं... एव्हाना त्याला,  वेदनेला कसं थोपवावं आणि जगावं ते शिकवलं होतं.
- संकेत पाटेकर
२४.१०.२०१७


क्षितीज सावल्या...

नमस्कार ...मित्रहो,
मी प्रोफेशनल असा फोटाग्राफर अजिबात नाही आहे. :D
पण हा , सृष्टीच्या ह्या अथांग रंगसोहळ्यात आणि माणसांच्या भावगर्दीत..मिसळून जाताना ..
माझ्या नजरेच्या कवाड्यातून आणि कॅमेराच्या पडद्यातून ..
जे जे क्षण मला टिपता आलेत , ते ते इथे मांडण्याचा प्रयत्न...
नवा पेज ....घेऊन आलोय .
'क्षितीज सावल्या'
नजरेच्या कवाड्यातून ..मनाच्या भावरंगातून

संकेत पाटेकर आणि फोटोग्राफी
आवडल्यास लाईक करा.

लिंक इथे देत आहे :
https://www.facebook.com/sanketpatekar.photography/ क्षितीज सावल्या

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०१७

कुणी तरी हवं असतं...!

मला नाही मांडता येत रे , तुझ्या सारखं असं काही, पण सांगू...
कुणी तरी हवं असतं आपल्याला ,
आपल्या जवळ बसून ,आपलेपणाच्या संवादात हरवून देणारं असं कुणी...
आपल्या नजर कवाड्यातून मनातलं अचूक भाव ओळखणारं कुणी.. 
आपल्या मनाला जाणंणारं,
हवं तेंव्हा, हवं त्या क्षणी , हवं त्या वेळी, कुठूनही , कसंही हळूच येऊन ,आपल्याला थोपवणारं,
घट्ट मिठीत घेणारं,आपल्यात मिसळणारं,हसवणारं , छेडणारं, वेडं म्हणणारं आणि म्हणवंणार कुणी...
कुणी तरी हवं असतं....रे .
कधी रागावणारं, कधी लाड पुरवणारं, प्रसंगी समजून घेणारं, समजून देणारं, 
आपली काळजी वाहणारं , काळजी घेणारं, आणि भरभरून प्रेम करणारं कुणी..
कुणी तरी हवं असतं ..... ।
आपल्या मनाची हि बाजू घेणारं.., मनातून मनाशी नातं जोडणारं, 
आपलं वर्तमान आणि भविष्य घडवणारं...आपलं स्वप्नं होणारं,
आपल्यात विसावणारं,
कुणी तरी..
कुणी तरी हवं असतं रे.....
एकटेपणात साथ देणारं, आणि
एकांतात हि आपल्या मनाला सुगंधित करणारं.. कुणी तरी हवं असतं...बस्स..!
~ संकेत पाटेकर
१६/१०/२०१७

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

क्षण..

संध्याकाळची वेळ.  ऑफिस मधून निघाल्यावर ..लोकलमधल्या त्या घामाजल्या  गर्दीचे धक्के पचवत मी ठाण्यात उतरलो.  कुठल्याश्या जाणिवेने आणि व्याकुळतेने आज  मनाची स्थिरता तशी  ढळली होती. 
अस्वस्थता दाटून आली होती देहभर , मनभर संचार करून आणि म्हणूनच थेट घरी जाण्यास हि हे मन आज  मज्जाव करत होतं . त्यालाच  थोडी मोकळीक आणि आपुलकीची  थाप द्यावी  म्हणून मी मुद्दाम तलाव पाळीच्या दिशेनं एकटक 
चालत सुटलो. माणसाच्या स्वभावशैलीच्या रंगीत तालमीतून स्वतःच्या मनाची दखल स्वतः घेत , मी पोचलो त्या ठिकाणी. 
नजरेच्या एका  कोपऱ्यातून ,  मनाच्या एकांता करीत  योग्य   मोकळी  जागा हेरत,  मी एका ठिकाणी    आसनस्थ झालो .विचारांचं प्रहर पुन्हा  सुरु झालं . थांबलंच कुठे होतं म्हणा ते,  पण आता नव्या विचारांची ये जा सुरु झाली. त्यात पुरता गढून गेलो . स्वतःला उसवत,  हळुवार उलगडत गेलो . 
त्या विचारातून  स्वतःच शोध घेत असता....

'काका' अशी हळुवार हाक ऐकू आली. क्षणभर हसलो मी त्या शब्दांनी स्वतःशीच   ...आणि नजरेपुढे आलेल्या त्या कागदाकडे कुतूहलाने पाहत राहिलो . म्हटलं काय आहे हे?  मनाशी उलगडून पाहत होतो . तेव्हड्यात शब्द पुन्हा कानी आले. 
काका, उद्या नाटक आहे गडकरी ला ?  हे दाखवल्यावर तुम्हाला तिकिटावर सूट मिळेल .  
सुरवातीला वाटलं कसलीशी पावती  दाखवून हा  पॆसे वा वर्गणी  गोळा करत असणार , पण नाही 
 त्याने पुन्हा बोलायला सुरवात केली. 
हल्ली ना  सेक्स ह्या विषयाला धरून बरेच अढी तढी निर्माण झाल्यात समाजात  , गैरसमज आहेत. 
त्या विषयाला धरून हे नाटक आहे . जरूर पहा . 
मगासपासून मी त्याचा चेहऱ्याकडे लक्ष दिलं न्हवतं. हाती असलेल्या त्या कागदाकडे शून्य नजरेने एकटक पाहत होतो.  
मात्र त्याच्या ह्या सेक्स विषयी , असे  परखड दोन एक शब्द कानी पडल्यावर  आपसूक त्याकडे लक्ष गेलं.  मान उंचावली गेली. 
सहावी सातवीतला तो विद्यार्थी असावा,  हाफ पॅन्ट आणि इन केलेला शर्ट,  गोलाकार चेहरा आणि चेहऱयावर खिळलेले नितळ  हास्यभाव , सोबत इतर कुणी न्हवतं.
तरीही बेधकडं असं त्याच बोलणं आणि हे सांगणं हेच  मला   कमाल वाटली.  
उघडपणे सेक्स हा विषय तसा  कुणापुढे मांडणं बोलणं हेच खरतरं धाडसाचं , कारण आपल्या समाजमनात त्याविषयी काही बोलणं म्हणजे भलतं सलतं मनात येऊ घालतं. आणि ते काहीसं पापच असं  ठरतं.  
खरं तर ह्या गोष्टीच शिक्षण वेळेत देणं गरजेचं आहे ,  
बलात्काराच्या वाढलेल्या एकूण घटना , वाढत चाललेली स्त्री विषयक वासनांतक  भोग दृष्टी ...हि  मनाची विकृति आणि त्याला बळी ठरलेल्या निरपराध नाज़कू कोवळ्या  मुली, स्त्री... हे सगळं कुठेशी थांबायला हवं. रोखायला हवं . 
आणि त्यासाठी शिक्षण आणि कायद्याचा धाक, ह्या दोन्ही गोष्टींची  कडक अंमलबजावणी आपल्या समाजमनात लागू केली पाहिजे. 
स्त्रीचा आदर , मान सन्मान असेल तर  ह्या देशाची प्रगती आहे . भारत हि मातृभूमी जशी मानतो. तिच्यापुढे जसं आदराने पाहतो. नवरात्रीला देवीला जशी पुजतो . तसं  इथल्या स्त्री  मनाचा हि आदर झाला पाहिजे. नाही नाही ,  तो केलाच पाहिजे. समाज मनाला लागलेल्या ह्या वासनात्मक किडीचा मुळासकट नायनाट करून....

काही क्षण असाच  विचारधुन्द झालो होतो. चेहऱ्यापुढे गोडशी स्माईल देऊन तो मुलगा केंव्हाच निघून गेला होता . आणि मी पुन्हा आपल्या दुनियेत ..
- संकेत पाटेकर 


रविवार, ६ ऑगस्ट, २०१७

'मैत्री'...

दंगात धुंद होऊन 'दवगंधीत' करणारी हि मैत्री...
हास्याचा 'गोफ' हृदयाशी हळुवार झुलवणारी हि मैत्री ...
सह्याद्रीच्या कातळकोरीव प्रमाणे कधी कठोर, कधी सुमधुर वाणी ठरणारी हि मैत्री ..!
मनाला 'चिरतरुण' करणारी, नवं हिरवशार पानातलं 'जीवनमान' होणारी हि मैत्री ...
सूर्याच्या 'तेजाला' हि 'आवाहन' देणारी हि मैत्री. 
अथांग सागराच्या 'विशालतेवढ़ी' प्रेमाचं 'जलस्रोत' होणारी हि मैत्री .
क्षितीजाच्या रंगाइतकी आयुष्य 'क्षितिजमान' करणारी हि मैत्री .
अन मना- मनाने , अन आपलेपणाच्या स्नेह गोडीत जोडली गेलेली , विसावलेली हि लाडिक मैत्री ...
अहो, ह्या 'मैत्रीला' आणि आणि ह्या 'प्रेमाला' वयोमानाची कसलीच अट नाही.
आयुष्याच्या आपल्या प्रवाही मार्गे ती आपल्याला भेटत जाते..नवं नव्या रूपात ..नवं नव्या रंगनिशी नवं नव्या अंतरंगी गोष्टी घेऊनच...
'मैत्री दिनाच्या' माझ्या मित्र मैत्रिणींना भरभरून शुभेच्छा ..
असेच सोबत राहा ..! मस्तीत राहा ...! मिसळत राहा !
तुमचा आपलाच ,
संकेत पाटेकर

गुरुवार, ६ जुलै, २०१७

नव्याने जुळलेल्या...अन क्षणातच मुरझलेल्या'

ह्या नात्यांची फार गंमत वाटते मला ....'नव्याने जुळलेल्या...अन क्षणातच मुरझलेल्या'
म्हणजे अनोळखी असतो तेंव्हा ओळखी साठी धडपडत राहतो आपण...
नवा चेहरा , नवं नाव...नवी ओळख ,नवं मन ..नवा स्वभाव , नवे बोल .... ,
सगळं..उत्साहपूर्ण.., मैत्रीपूर्ण अगदी....


एकमेकांना जाणून घेत घेत .. आपण एकमेकांच्या अधिकाधिक जवळ ओढले जातो काय .
रोज काही ना काही... नवं नवीन विषय घेऊन , त्यावर बोलणं होत काय..


अधून मधून थट्टा मस्करी , कधीतरी भेटणं....कुठशी एकत्रित क्षण घालवणं ...आठवणी गुंफत जाणं आणि अस करता करता ..
कालांतराने ..म्हणजे जास्त नाही काही ..महिन्यातच , किंव्हा वर्षभरातच ... बोलता बोलता . त्या उत्साहाला , आपण विरजण घालतो काय...सगळं अगदी सुफर फास्ट ..नॉन स्टॉप ?
तीन तसाच्या चित्रपटासारखं ..सुरवात आणि दि एन्ड हि...,


नातं जुळलं कधी आणि प्रवाहात वाहून गेलं कधी ह्याचा थांगपत्ताच लागत नाही .
सर्व घडामोडी कश्या पटकन घडून जातात. आणि एकाकी शिथिल होतं जातात.
अश्यावेळी स्वतःकडेच पाहून हसू येतं. मन पुटपुटतं काहीसं स्वतःशीच .. म्हणतं.


काही नाती हि अशीच असतात . 'नावीन्याला' हपापलेली. नावीन्य असेपर्यंत नात्यात 'जीव'.
ते संपलं कि नातं हि कोमजल्या फुलाप्रमाणे मान टाकून देत ...पुढे होतं .
- संकेत

गुरुवार, २२ जून, २०१७

ती.. मन व्याकूळ …

अगदी अनपेक्षित असा  एखाद सुखद धक्का बसावा ना,  तसा तो...नवा मोकळा श्वास घेऊन आला आज.  त्याचं हे  असं अचानक  येणं., माझ्यासाठी सर्वोच्च असा आनंदी क्षणच. 

वर्षोनुवर्षे  आपल्या प्रियकराची वाट पाहून  विरहात एकांडलेल्या मनाला  , नुसत्या त्याच्या चाहुलीने   जशी मनभर उभारी यावी नं , तसंच काहीसं झालंय..माझं आज ..!
प्रियकरचं ना तो ....
नुसत्या त्याच्या येण्याच्या  चाहूलीने ..अंग अंग मोहरून गेलंय. शहारलंय  ..उसळत्या अश्या धगधगीत श्वासानं.... ! 
काहीसा हलकेपणा ओघळू लागलाय  मनाशी..आता , 
पण ऐक ना  ?
आज तरी  नजर काळजातून  संवाद साधत,  तुझ्या ओसरत्या मनओघळ स्पर्शानं  ...घट्ट मिठीत ओढून  घेशील ना मला ?  
मनाची हि  धगधगती, पेटती  मशाल आज शांत करायची आहे मला, बोल ना...?

तुझ्याविना  मला अस्तित्व नाही रे , माझं असणं हे केवळ तुझ्यासाठीच, माझी ओळख पाळख , माझं नाव गाव ,  सारं सारं  केवळ तुझ्यासाठीच, तुला वाहिलेलं. 
तूच माझी ओळख, तूच सर्वस्व.......

मन अधीर झालंय रे   ...तुझ्यात सामावून जाण्यासाठी.  
अजून अधिक वेळ नको दवडुस...
माझ्या मनाचा हि विचार धर.  ?

तू आलास कि हा बंद श्वास (कित्येक दिवस तसाच खितपत पडलेला ) मोकळा होतो बघ...
तू आलास कि मनभर आनंद सरी बरसू लागतात....
मोगऱ्याच्या अस्तित्वानं दिशा दिशा गंधाळून जावी , तसं काहीसं होतं बघ, ह्या मनाचं , तुझ्या येण्यानं... 
तू आलास कि...लोकं मला स्वतःहून मोकळी करतात, तुझ्या स्वाधीन व्हायला....! 

हो.. हो ...तुझ्या स्वाधीन  व्हायला. कारण त्यांना हि ठाऊक आहे. 
तुझं माझं नातं , तुझ्या माझ्या नात्यातला ओघळता हळुवार टपोर स्पर्श, तुझ्या  माझ्या नात्यातली   हसरी गंमत, मोहरते क्षण .. आणि ...आणि अ..    

 बस्स , मला अजून अधीर करू नकोस.   सामावून घे तुझ्यात...

बघ , ऐकतेय मी .. जवळ आसपासच, उधाण आनंदाने तू मुक्त बरसतोयस. उधाणला आहेस. काळ्याभोर नभासह ...
तो बघ ....त्या तिथे.!   
आणि मी ...

मी ....
अजूनही ह्या बंद पाठपिशवीत , एकटक खिन्न पडून............व्याकुळती.  

ऐकतोयस ना…

तुझीच  मन व्याकूळ …

‘छत्री’  
एका छत्रीचं  मनोगत ...
- संकेत पाटेकर 
२२.०६.२०१७ 

शनिवार, १७ जून, २०१७

'आपलेपणचा हुंदका'

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे
'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...!

विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे
'हृदयाशी नातं '' जो तो जपून असतो रे... !  

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

भावनांची हि रंगते मैफिल, कल्लोळ जिव्हारी रे
'आसवांचाही'  'जीव' तेंव्हा हळूच तुटतो रे... !

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...
- संकेत  पाटेकर
१७.०६.२०१७ 

बुधवार, १४ जून, २०१७

काळ्या पाषाणाला दुधाळ अभिषेक ....!

काळ्या पाषाणाला दुधाळ अभिषेक ....!

ह्या निसर्गाची हि ना ना कलात्मक अंगे , ना ना विविध अशी रचना,  रंगरूपे  ,  किती विस्मयकारक असतात न्हाई...!    म्हणजे...कधी.. कुठे..कश्यात तो कोणता रंग भरेल आणि मनाशी कोणता भावरंग चढवेल ह्याचा काही नेम नाही. आणि नसतोच मुळी.

मनाची सुंदरता नजरेत जर उतरत असेल तर ते अनुभवंन हि  फार कठीण नाही. सहजासहजी ते नजरेत उतरेल  वा भरेल . मनभर  आनंदी मळा फुलवूंन ..

कोर्लई कडे ..एक एक पाऊलं सरत असताना...लहरी लाटांशी,  नजरेचा लपंडाव सुरु असताना , धडाडणाऱ्या  गाजेचा प्रतिध्वनी उमटत असताना ,
त्या वळणावर क्षणभर थांबलो मी ..  काळ्या पाषाणावर होणाऱ्या त्या दुधाळ अभिषेकाने ....

मनभर विचारांचाही  हि अभिषेक  सुरु झाला होता .

'दूर आणिक जवळीकता'' ह्यात  क्षणिक अंतर केवळ .....आपण किती लांबवून ठेवतो न्हाई ?
घरंगळत येणाऱ्या , त्या   शुभ फेसाळ लाटेसारखं,  आपलेपणाची ओढ अशी.. क्षणा क्षणाला उमटत असेल तर  ...तर ह्या  काळ्या पाषाणासारखं  दुधाळ अभिषेक होतंच राहील....अविरत !! आपल्या मनावरही ...

तो दुधाळ लाटांचा अभिषेक मला , एकटेपणात गढलेल्या आणि मनातून तुटलेल्या ..मनावरचा आपलेपणचा वर्षाव वाटला. आईच्या पदराखालीची मायेची उब तेंव्हा  कुठूनशी मनाला  अलगद स्पर्शून  गेली.  कष्टाने सुरकुतलेले ते  प्रेमळ हात ...केसावरुन अलगद फिरल्यासारखे झाले.
हलकेपणाचा शिडकावा त्यानं मनभर  पसरला  गेला.   मनाच्या  डोहातून नजरेच्या खळीत आसवांचा जमाव  सुरु होण्याआधीच...थांबलेली  वाट मी पुन्हा चालू लागलो....
- संकेत पाटेकर


शुक्रवार, ९ जून, २०१७

बस्स, एक तेवढी मोकळीक हवी...

तुला एक उदाहरण देतो. म्हणजे काय ते तुला कळून येईल ..

तू  रस्त्याने.कधी ...चालता फिरता  वा एखाद कुठल्या वाहनातून ,  प्रवास केला असशीलच नाही का ? नाही म्हणजे प्रवास करणं वा न करण्याचा प्रश्न नाही आहे  ,  पण प्रवास करताना 
, कधी समोरच्या वाहनाकडे नीट लक्ष  देऊन पहिले आहेस का   ?
 एखाद रिक्षा वैगरे ...ट्रक , टेम्पो .काहीही घे, 
त्यावर मागे बघ , लिहलेलं असतं. 'Keep safe Distance' म्हणून .... 'सुरक्षित अंतर ठेवा' . 
का असतं ते ? 
कारण अधिक पुढे पुढे होण्याच्या नादात ,  कोणत्याही प्रकारचा अपघात घडू नये म्हणून , प्रवास ज्याचा त्याचा सुखकर व्हावा म्हणून ,  इतकंच. 
नात्यात हि अगं हेच लागू होतं . सुरक्षित असं अंतर राखलं म्हणजे किंव्हा  एक स्पेस असली म्हणजे    नात्यात कोणताही  गैरसमज वा दुरावा निर्माण होतं नाही. 
पण ते  नसेल तर अपघात होण्याचे चान्सेस हे अधिक असतात. 
कळतंय ना मला काय सांगायचं ते ..?
नातं आपलेपणाने जोडलंय , जिव्हाळ्याचं आहे. ते राहील. बस्स,  एक तेवढी मोकळीक हवी. 

सहज लिहता लिहता.....
- संकेत पाटेकर 
०८.०६.२०१७