जीवन एक प्रवास आहे ...सुख दु:खाचा, गोड कटू आठवणींचा , प्रेमाचा अन संघर्षाचा.. अन अशा ह्या प्रवासात कितीतरी बरे - वाईट अनुभव आपणास येतात. ह्या अनुभवानेच आपण शिकतो. घडतो. अन आपल्या पुढील जीवनाची वाटचाल सुरु ठेवतो. माझ्या आयुष्यातले असेच काही क्षण मी तुमच्यापुढे मांडत आहे. जे मी अनुभवलेत, माझ्या शब्दात ..माझे जीवनानुभव ..! - संकेत पाटेकर
गुरुवार, १७ मे, २०१२
'माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर'
'माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर' वाक्य काही दिवसापासून माझ्या मनाच्या अवकाशात सतत घिरट्या मारतंय.
खरच माझ प्रेम आहे का त्या व्यक्तीवर ...जिच्याशी मला नेहमी मनापासून बोलावेस वाटतं .
भेटावास वाटतं .
प्रेम हे असं बोलून व्यक्त करता येत का ?नाही ...अजिबात नाही.
प्रेम हे बोलून नाही व्यक्त करू शकत ...ते कळत ते सहवासातून,
आपण घेतलेल्या काळजीतून , आपल्या विश्वासातून ..
आपण तीच ' मनं ' किती समजून घेतोय त्यावरून..
आपण त्या व्यक्तीच दु:ख किती हलकं करतोय त्यावरून ..
तिला किती सुख देतोय त्यावरून...
प्रेम हे एकमेकांच्या सहवासात घडतं , एकमेकांच्या सहवासात फुलत आणि मग कळत.
प्रेम किती आहे ते बोलून सांगण्या ऐवजी सहवासातून कळल पाहिजे.
आणि ते निस्वार्थ प्रेम असल पाहिजे.
संकेत य पाटेकर
२० .०१.२०१२
शुक्रवार
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
सर्वच नाती काही रक्ताची नसतात . काही नाती मनानं जुळली जातात . आयुष्याच्या पायवाटेवर निवांतपणे कधी धावत पळत असता... त्यात बहिण भावाच्या ...
-
खूप काही लिहूस वाटतंय आज ? कारण हे मनं , फारच अस्वस्थ झालंय . हळवं झालंय ते , 'कारण 'संवाद' हरवला आहे'. बंध नात्यातला ...
-
वसंत पुरुषोत्तम काळे वपु ..हे माझे सर्वात आवडते लेखक .. आज ते हयात असते तर खरच नक्कीच भेट घेतली असती त्यांची. त्यांच्यामुळे मला माणसातल...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .