शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

सांत्वन..

एखादी भावना अनावर झाली कि 'अश्रू' किंव्हा 'राग' किंव्हा दोन्हीही अगदी जुळ्या भावंडा सारखी एकत्रितपणे नांदू लागतात .
तेंव्हा ऐकणारा हि घायाळ होतो . विव्हळतो. आज हि तसंच काहीस झालं . 
जितक्या सहजतेने शब्द कागदावर उमलतात ना , तितक्याच सहजतेने तेच शब्द , एखाद्या मनाचं सात्वनं करू शकत नाही .
हि एक खंत अजूनही ह्या मनास कुठेशी टोचत राहते. सलत राहते .
आज पापण्या पुन्हा एकदा जडावल्या ..पुन्हा एकदा मन स्तब्ध झालं .
तिच्या एक एक करुण शब्दाने ... ज्यात फक्त वेदना होत्या , अन त्या  वेदनांचा न सोसणारा दाह..कालपटून टाकणारा...करपून टाकणारा ....
कसं असतं आयुष्यं एकेकाचं ..... ऐकताना मेणासारखं वितळायला होतं अगदी .
पण ते मेण हि प्रकाश वाटा देऊन मोकळ होत ओ ,आधार देतं , असलेला अंधार नाहीसा करून ..
इथे नुसतंच वितळायला होतंय ... प्रकाश धर्म काही..वाट्याला नाही . तीच ठेच लागतेय मनाला .
जीवन हे संघर्षमय आहे. लढा हा आहेच अन तो असणारच...जगण्यासाठी. 
पण त्यासाठी हि आधार हवा असतो . कुणाचा न कुणाचा तरी त्याशिवाय उभं राहता येत नाही.
विश्वास अन प्रेम ह्या दोन धाग्यांनी नातं घट्ट ओवलं जातं . मग ते कुठलही नातं असो.. 
त्याघट्टपणाच्या आधारावरच ते पुढे सरत जातं. पण तो आधारच कमकुवत झाला तर...
आपलीच माणसं जेंव्हा आपल्याशी तर्हेवाईकपणे वागतात तेंव्हा ...नकोस वाटत अगदी...
हे जगणंच नकोस वाटतं ..
पण जगायला हवा यार ..आशेचा एक दिवा रोज उगवतोच ना ..नवी पहाट घेऊन ...इतकं सहन केलं मग आता धीर का सोडवा.
क्षण बदलतात . आणि त्या क्षणानुसार हि नको असलेली परीस्थितीही... , विश्वास ठेव . आशा ठेव . सारं बदलेल . नक्कीच बदलेल .
दुख प्रत्येकाला आहे ...त्याचं स्वरूप मात्र वेगवेगळ आहे. 
आपण किती सहन करतो ..ते आपल्यालाच माहिती असतं. दुसऱ्याला कितीही सांगितल तरी त्यातली ती दाहकता आपल्या इतकी त्यापर्यंत पोहोचणार नाही. हे मान्य . 
खंर तर सात्वनासाठी शब्दच नसतात...
वपुंच्याच शब्दात म्हणावं तर सांत्वन म्हणजे दुःखाच मूल.
मूल आईपेक्षा मोठं कसं होईल?मूल मोठं व्हायला लागलं की आई आणखी मोठी व्हायला लागते.म्हणून,समजूत घालणारं कुणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात.
तुझे हुंदके नजरेने पहीले नसले तरी हृदयाने ते जाणलेत .. ऐकलेत मी..
येणारा प्रत्येक क्षण हा कसोटीचा आहे नि असतो. . त्यात तोलून मापून आपण बाहेर पडतो . पडत असतो. ती आशावादी जिद्द मात्र कायम ठेव. त्यातून बाहेर पडण्यासाठी ..
काहीच उरलं नाही अस बोलू नकोस ...उद्याचा दिवस नक्कीच काही तरी घेऊन येईल . 
आनंदी वलयासह ...बागडत...बागडत...
तुझाच ..
एक मित्र 
- संकेत
३०.१०.०१५


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .