जीवन एक प्रवास आहे ...सुख दु:खाचा, गोड कटू आठवणींचा , प्रेमाचा अन संघर्षाचा.. अन अशा ह्या प्रवासात कितीतरी बरे - वाईट अनुभव आपणास येतात. ह्या अनुभवानेच आपण शिकतो. घडतो. अन आपल्या पुढील जीवनाची वाटचाल सुरु ठेवतो. माझ्या आयुष्यातले असेच काही क्षण मी तुमच्यापुढे मांडत आहे. जे मी अनुभवलेत, माझ्या शब्दात ..माझे जीवनानुभव ..! - संकेत पाटेकर
गुरुवार, १७ मे, २०१२
' मनं ' खरच खूप वेडं असतं
' मनं ' खरच खूप वेडं असतं . किती भावूक होत ते लगेच ...
आपली प्रिय व्यक्ती आपल्या पासून दूर जात आहे....हे त्याला सहनच होत नाही.
सहन तरी कस होणार ?नित्य नेमाच बोलनं , रुसनं , मस्करी करणं , भेटनं हे चालूच असतं.
प्रेम असत ते ..., मनापासूनचं .
नातं असतं ते एक अनमोल अस.....हृदयाशी गुंफलेल .
पण एक दिवस अचानक तीच दूर जाणं .........जीवाला लागतं , वेदना होतात फार मनाला ..
आता सार सार काही बंद होणार , ते बोलनं , ते भेटनं ,ते हास्य , ते शब्द , ती प्रेमळ हाक '
तो प्रेमळ स्पर्श, सार सार दुरावणार ...हि भावना मनाला खूप छळते.
प्रेम.. हसवतं रडवतं
प्रेमच आपणास जवळ आणतं
आणि तेच प्रेम पुन्हा दुरावतं आपणास त्या व्यक्ती पासून
विश्व दडलंय ह्या प्रेमात .....
प्रेम प्रेम प्रेम .........
संकेत य. पाटेकर
१६.११.२०११
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
खूप काही लिहूस वाटतंय आज ? कारण हे मनं , फारच अस्वस्थ झालंय . हळवं झालंय ते , 'कारण 'संवाद' हरवला आहे'. बंध नात्यातला ...
-
सर्वच नाती काही रक्ताची नसतात . काही नाती मनानं जुळली जातात . आयुष्याच्या पायवाटेवर निवांतपणे कधी धावत पळत असता... त्यात बहिण भावाच्या ...
-
वसंत पुरुषोत्तम काळे वपु ..हे माझे सर्वात आवडते लेखक .. आज ते हयात असते तर खरच नक्कीच भेट घेतली असती त्यांची. त्यांच्यामुळे मला माणसातल...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .