गुरुवार, १७ मे, २०१२

प्रेमातला वाद ..

काल संध्याकाळी आणिखी एक प्रकरण डोळ्यान देखत घडलं  , मन सुन्न झालं, 
का करतात हे लोक प्रेम ? 
का करायचं प्रेम ? हौस म्हणून करायचं का ? आपल्या स्वार्था साठी प्रेम करायचं का ?
ज्या प्रेमात विश्वासच नसेल तर ते प्रेम कसलं ? 

काल संध्याकाळी स्टेशन परिसरातून लायब्ररीत जाताना...समोरच एक प्रियकर आपल्या प्रेयसीवर हात उगारताना दिसला..त्याने तिला ढकललं , मारलं ...
तिनेही प्रयत्न केलां त्याच्यावर हात उगारायचा ..
पण तो धिप्पाड असल्याने,  ती फार काही करू शकली नाही . ती तिथून रडतच निघून गेली. .....
काय करणार बिचारी.....

काय झालं  होतं  त्यांच्या दोघात कुणास ठाऊक,  पण जे काही इतक्या सारया लोकांदेखत घडत होतं ...
ते चुकीच होतं .
मुळात एकमेकांवर हात उगारण हेच चुकीच होतं. 
प्रेम करता ना तुम्ही .....मग त्यात भांडण रुसवा खोड्या हे ते येणारच ना ....

प्रेमात समजुददारपणा लागतो , एकमेकांचा विश्वास खूप  गरजेचा ..
भांडण हे होतातच .....पण ते अस एकमेकांवर हात उगारून...कस चालेल ?

एकमेकाना समजून घ्या ........एकमेकांचा विश्वास ठेवा .

प्रेमा मध्ये जास्त करून मुलीच बळी पडतात ....आणि मग पच्छाताप करून घेतात. 
त्याच्याकडे गाडी आहे , पैसा आहे , तो श्रीमंत आहे , दिसायला सुंदर आहे. 
म्हणून प्रेम करायचं नसतं.. (सगळ्याच मुली अश्या नसतात ) 
स्वभाव पहावा , मन पाहावं , मनाने श्रीमंत असावा, असायला हवा, सामंज्यास पणा त्याच्यात असावा, मना पासून आपल्यावर प्रेम करणारा असावा ...
त्याला पूर्णतः समजून ओळखून ...मग काय ते ठरवावं ...पुढे काय कराययचं ते ...

एकमेकांवर हात उचलण  हे कितपत योग्य आहे? बघा विचार करा जरा...
?
प्रेम हे एकमेकांच्या विश्वासाच्या जोरावर चालतं , टिकतं अन फुलतं ...
कृपया एकमेकांवर अस हात उचलू नका...

संकेत य पाटेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .