मंगळवार, २५ जून, २०१९

प्रवाह..

पहिल्या भेटीत किंव्हा त्या आधी सुरु असलेला ‘दोघातला ‘ तो ‘मुक्त नि हसरा संवाद’  पुन्हा तसाच अगदी पहिल्यासारखा उत्साहित आणि  प्रभावित  राहील का  ? राहू शकतो का ?
 हे निश्चित कधीच सांगता येत नाही . 

कारण व्यक्ती स्वभावानुसार  किंव्हा क्षणा प्रसांगानुसार ,  होणारा भावनांचा चढ उतार, मनाच्या पुढच्या वळणाला सर्वस्वी कारणीभूत ठरतो. आणि जे घडणार  आहे ते घडतं.
जे  खरं तर आपल्याला नको असतं.  पण ते घडतं आणि त्याला कारणीभूत आपणच  असतो.

कळतंय , काय म्हणायचंय ?
मनाचा कल नक्की कुठे ? हेच कधी कळून येत नाही. आणि त्यामुळेच हे सगळं निर्माण होतं.

हि अस्वस्थता ..हि चलबिचलता ..हि अस्थिरता …
कठीण असतं बुवा  हे ..मनाचं प्रकरण   ?

नव्याची आस धरतं. भेट घडवतं. ओढ निर्माण करतं.  बोलतं  करतं  आणि एकाकी  निवळतं सगळं  ..साऱ्यासह…
कळतं हि नाही   …कधी ? काय? कसं ? आणि  कुठे ?
फक्त प्रश्न निर्माण होतात  ? ज्याचं उत्तरं आपल्याकडे तेंव्हा नसतं.  आणि कदाचित मिळणारं हि नसतं .
पण हे कदाचितच हा .. पुढे सकारात्मक पाऊलं उचलायला हरकत नसावी.
पण तसं होत नाही.  आपण हताश होतो.  असलेला संवाद हि मिटवतो आणि  कुठल्याश्या गर्दीत स्वतःला गुरफटून घेतो.  न काही सांगता न काही बोलता …

प्रवास इथूनच सुरु होतो मग,  जुळवलेल्या नात्याचा ..
पूर्वेकडून पश्चिमेकडे …
कळतंय ?
सहवासात घडतात म्हणतात मन ..
पण तरीही का बिथरतात हि मन ?
कठीण आहे बुवा.. हे मनाचं सारं प्रकरण ..!
कळतं असतं पण जुळवून घेत नाही.
हृदयातले भाव ओठावर येऊ देतं नाही..?

मन कि बात समजेलच कशी  मग ?
मनात जागा निर्माण व्हायला  ‘सहवास’  आणि त्याचबरोबर ‘संवाद’  लागतो.
आणि संवादाचं हे हसरं अंकुर हृदयाशी रुजलं कि प्रेमाचं बीज फळफळायला  वेळ लागतं नाही.

तू संवाद ठेव . मुक्त मोकळा ..
मी  होतो परीघ आभाळाएवढा …
लव्ह यु …
उगाच – सहज सुचलेलं

– संकेत पाटेकर
http://www.sanketpatekar.com/






रविवार, ३१ मार्च, २०१९

'एक एप्रिल आणि ती'

तर उद्या १ एप्रिल ..हाय, उगाचच कुणाला फसवत बसू नका..   
कारण काय तर उगाच्च हंस होतं ओ,  
मला चांगलाच आठवतंय , म्हणजे मी विसरू शकणारच  नाही...
काही वर्षांपूर्वी , 
बरोरबर ह्या तारखेला ...म्हणजे १ एप्रिलला , सहज फोनवरून बोलता बोलता, माझ्या एका मैत्रिणीनें   मला  ''आय लव्ह यु '' म्हणून  चक्क  लग्नाची मागणी घातली होती. ..
WILL YOU MARRY ME ?
मैत्री होती इथपर्यंत ठीक  होतं ओ , त्यामुळे बोलणं हे  असायचंच.,, पण असं अचानक भयानक काही ऐकायला  मिळेल ह्याची मला हि ग्वाही न्हवती. 

तिच्या ह्या अश्या मागणीने काय बोलावं तेंव्हा कळेना  सुचेना ,जणू विचारांनी पळवाट शोधली होती . 
मी म्हटलं मला थोडा वेळ दे ,  सांगतो तुला आणि तो दिवस झोपच नाही हो ...
नुसती आलटा पालट मनाची ...

हो म्हणावं कि नाही  ? हा मोठ्ठा प्रश्न  'आ 'वासून उभा होता ?
कारण माझ्या मनात असे काही भावच उमटले न्हवते  , हा असा विचारच कधी शिवला नव्हता. 

ह्या अश्या गोंगाटातच 
दुसरा दिवस उजाडला आणि  पुन्हा मनभर कल्लोळ माजला.  म्हटलं जाऊ दे , जे होईल ते होईल , बघू तिचा कॉल आला कि , 
ऑफिसला निघालो आणि प्रवासातच तिच्या नावाने फोन खणाणला, .
ते पाहून क्षणभर कपाळावरच्या आठ्या विस्तारल्या गेल्या ...हृदयाचे ठोके हि श्वास रोकुन दडून राहिले.  
कॉल उचालला गेला. 
हॅल्लो SANKY ,  (प्रेमाने म्हणायची ओ .. )
फसलास ना ? 
खरं वाटलं ना तुला ? अरे येडपट काल एक एप्रिल होतं ..
‘’एप्रिल फुल ‘’
लहान मुलीने तिच्या आनंदात जश्या टाळ्या पिटाव्यात , उडया घेऊन ...तसं क्षणभर मला तीच बोलणं ऐकून वाटलं , तिच्याच बाबतीत ..
तरतर  तिने एकदाच काय ते  बोलून टाकलं आणि तेंव्हा मला हि कुठे  हायसं वाटलं. 
आता तिचं लग्न झालं म्हणा ,पण  हे क्षण मी कदापि विसरू शकणार नाही . 

कुणीतरी आपल्यालाही 'प्रपोज' केलं होतं. लग्नाची मागणी घातली होती .
हि  माझ्या आयुष्यातली सामान्यातली  'असामान्य गोष्ट' मी  सध्या मिरवत असतो. 
उगाच - 
संकेत पाटेकर 
३१.०३.२०१९ 

शुक्रवार, २९ मार्च, २०१९

'व्हाय नॉट आय'


किती सुंदर होती ती...! 
अगदी रोजच्या जगण्यातला साधेपणा तिच्या त्या सौन्दर्यातून ही खुलून येत होता..
क्षणभर मी तिच्याकडे पाहतच राहिलो. एकामागोमाग पडणाऱ्या तिच्या पाऊला कडे आणि कुठलीही न्यूनगंडता न बाळगणाऱ्या तिच्या स्मित चेहऱ्याकडे... 
रेल्वेचा तो जिना त्याच आणि तितक्याच सहजतेणे ती उतरत असताना..

मी ही तेंव्हा त्याच बाजूने..जिना उतरत होतो.
क्षणभर तेंव्हा वाटलं तिचा हात धरावा..आणि तिला सोबत करत हळुवार उतरावं..
पण नाही...
कुठेतरी हे विचार मी सरसकट फेकून दिले..
आणि पाठमोऱ्या जाणाऱ्या त्या आकृतीकडे मी सॅल्युट करून..उभा राहिलो..

नजर मिट्ट काळोख्याने मिटली असली तरी मनभर पसरलेल्या प्रकाशाची प्रेरित किरणं, तिला दिशा देत होती..
तिच्या आयुष्याच्या वाटेवर..

खरंच, काहीतरी करण्याची जिद्द आणि त्यासासाठी चाललेली धडपड , न तुटलेला बिथरलेला..आत्मविश्वास , आपल्याला आयुष्यात खूप काही मिळवून देतो.. 

'व्हाय नॉट आय' ..
ह्या पुस्तकातून भेटलेल्या त्या 'सिद्धी देसाईच्या' संघर्षमय पण प्रेरित जीवनाची तेंव्हा प्रकर्षाने आठवण झाली.
- संकेत पाटेकर
29.03.2019







रविवार, २४ मार्च, २०१९

'दुर्गसखा आणि धुळवड'

आनंद मिळवून देणारी (अगदी निस्वार्थ हेतूने केली गेलेली.. ) कुठलीही गुंतवणूक हि इतर गुंतवणूक पेक्षा वेगळी नि सर्वश्रेष्ठ असते. असं मी मानतो, कारण  हृदयाच्या तळ गाभ्यातनं , मना मनावर आरूढ होणारी , हास्याची ती केवळ  एक निमुळती छटा,   आपल्या अंतरंगासोबतच आपल्या आयुष्याचा मार्ग हि  सुखासिद्ध करत असते. ते हि समाधानाने परिपूर्ण असं ..!

आणि  हेच महत्वाचं आहे आयुष्यात..'' आनंदाच्या स्वाधीन होणं , आनंद घेणं आणि देणं ''
कारण आनंदाला व्याज नसतो.  मापदंड नसतो. ते निर्व्याज असतं .मोकळं असतं. सहज सोपं असतं आणि म्हणूनच ते सहज मिळविता येतं आणि सहज देता हि येतं . 
त्याला कारण हवंच असं काही नाही. मनाची तेवढी जाणीव असावी लागते. 
आनंद नेमका कश्यात आहे आणि कुठे आहे ? 
 हेच 'दुर्गसखा' सारखी संस्था अचूकपणे जाणून आहे. 

''जीवनाला आनंदाचा लेप हवाच, त्याशिवाय  जगण्याला मोहर कसा येईल ?''  हा लेप देण्याचं महत्वाचं कार्य 'दुर्गसखा' सारखी संस्था आणि संस्थेतील  सदस्य आज करत आहे. 
कुठलाही मोबदला न घेता ...अगदी निस्वार्थेने (आणि हेच  सर्वाधिक भावतं मनाला...) 

'धुळवड' हा त्याचाच एक भाग . 
दुर्गम ..ग्रामीण भागातल्या आपल्याच लहान मोठ्या भावंडांसोबत , त्या पालकांसोबत , शिक्षकांसोबत  आपला आनंद वाटून तो द्विगुणित करणं. 
केवळ  आनंद नाही तर इथला आजचा हा विदयार्थी उद्याचा  सुजाण नागरिक व्हावा. आपल्या पायावर उभा रहावा . समाजमनाचा आरसा व्हावा.  ह्यासाठी शैक्षणिक जबाबदरी हि घेतली जाते. 
शैक्षणिक साहित्य वाटप आणि असे अनेक उपक्रम म्हणूनच  वर्षभर सुरू असतात.  

आपण ज्या समाजात राहतो , त्या समाजाचं आपण हि देणं लागतो . हि जाणीव माणसाला मोठ्ठ करते.आणि त्याचबरोबर समाजमनाचा आदर्श हि ठरते. 

मला ह्या आनंदात सहभागी होता आलं. हाच मोठ्ठा आनंद. 
पर्यटनांतून प्रबोधन हे ब्रीद घेऊन समाजमनाच्या हितासाठी झटणाऱ्या दुर्गसखा ला मनाचा मुजरा. 
तुमचं हे कार्य अखंड सुरु राहो ..! 
     आपलाच , 
- संकेत पाटेकर 
२४.०३.२०१९ 
http://www.sanketpatekar.com/






शनिवार, २ फेब्रुवारी, २०१९

" सहवास.. तुझा माझा "

थोडं थांबशील ?
बिलगू दे असंच काहीवेळ अजून...
हट्टाने मला कवटाळून घेऊ दे.. असंच, नाहीतरी तू पुन्हा कुठं भेटणार आहेस ?
एकदा वेळ निसटली कि निसटलीच ...पुन्हा ती माघार घेत नाही आणि सांगूनही परतणार नाही . मला माझा वेळ घेऊ दे रे..
निदान आज तरी... ह्या घटकेला..
क्षणभर त्याने तिच्याकडे एकटक रोखून पाहिलं. तिच्या नजरेतला ओलावा स्पष्ट दिसून येत होता.
नेहमीच स्मित हास्यानं उजळलेला , हसता - मोहरता चेहरा आज मात्र विरह भावनेने सुरकुतला गेला होता.
क्षितीज रंगाचं सांजपण जणू दाटून आलं होतं.
वेळ हि तीच होती.
दोघेही ऑफिसमधून सुटल्यावर मरिन ड्राईव्हच्या गारव्यात एकटक चालले होते.
सूर्य अस्तेला लागला होता. आभाळ विविध रंगांनी न्हाहून सजलं होतं. किलबिल करत पाखरं घरच्या ओढीनं माघारी फिरत होती .
गंधित वारा त्यांना स्पर्श करून जणू पुढे सरत होता . उनाडपणाच्या ह्याच त्याच्या लहरी स्वभावमुळे , त्याचा आवेग क्षणा क्षणाला बदलत होता.
त्याने दिशा दिशा शहारून उठे, मोहरून उठे, सागराचं गहिरेपण  हि त्यानेच खवळलं होतं.
त्याच्या अथांग देहमीठीतुन असंख्य लाटा जणू उसळ्या घेत होत्या.
जीवन वर्तुळाचं अस्तित्वं दाखवत..जणू..
क्षणांचा असा धूसर - लख्ख  खेळ सुरु असताना दुसरीकडे मात्र,
सहवासातील तृप्त - अतृप्त आठवणींच्या भवसागरात ती फिरक्या घेऊ लागली होती.
भास - आभासापलीकडे तिचं मन झेपावलं गेलं होतं .
काय होतंय तुला ? तिची तंद्री मोडत, त्याने मधेच सवाल साधला.
काही नाही..
बोल..ग ..मन मोकळं करावं .
स्मित हास्य करत, ...त्याकडे न बघता तिने काहीसं बोलायला सुरवात केली .
“सगळं काही जवळ आहे रे,
पण ..
पण काय ?
पण, हवं ते जवळ असून देखील आणि इच्छा असतानाही,
आपल्याला आपल्याच इच्छा , आपल्या मनात दडवून ठेवाव्या लागतात..दाबाव्या लागतात. त्याचाच त्रास होतो.
म्हणजे बघ ना ,
मला आता, ह्या क्षणी.. तुझ्या मिठीत सामावून घ्यायचं आहे .
घट्ट बिलगायचं आहे तुझ्या बाहुपाशात..
अनेक स्वप्नं रंगवायची आहेत.
आयुष्यं भरासाठी केवळ आणि केवळ तुझी होत , तुझ्या स्वाधीन होत बस्स..
पण नाही .. नाही तसं करता येत ना..?
बोलता येतं पण साधता येत नाही.
इच्छा असूनही आणि अतोनात प्रेम असूनही मनावर पांघरून घालावंच लागतं.
कधी ह्या लोकांसाठी ..''लोक काय म्हणतील म्हणून'
कधी आखलेल्या रूढी परंपरा म्हणून , तर कधी घरच्यांनी आखून दिलेल्या मर्यादांचा मान सन्मान ठेवत , त्यांचा विश्वास मोडू नये म्हणून.., त्यांच्या हितार्थ..
कुठे चुकतो रे आपण..?
बोल..?
जिव्हाळा निर्माण व्हावा अश्या ज्याच्यावर भरभरून प्रेम करावं..त्यानं ही आपल्यावर तितकंच भरभरून प्रेम करावं, द्यावं. अनेकानेक स्वप्नं रंगवावीत आणि ती अशी एकाकी , क्षणभरात धुळीस मिळावी.
काय अर्थ ह्याला..?
प्रेम तरी का व्हावं मग?
का अश्या भेटी गाठी घडाव्या? का जुळावेत मनाचे हे धागे दोरे, का उसवावी ही नाती आणि केवळ,  ती ही क्षणासाठी  , क्षणाच्याच सहवासासाठी ?का ?
मी प्रेम केलं ही चूक झाली का?
तुझं ही माझ्यावर प्रेम आहेच ना ?
मग घरच्यांनी तरी का नाकारायचे आपल्याला , आपल्या ह्या नात्याला.
का लग्नास नकार दिला त्यांनी ?
कुठे कमी पडलो आपण...? का घडलं असं?
क्षणभर तिने उसासा घेतला. श्वास मोकळा केला
जाऊ दे..
प्रश्नांनी नुसतं पछाडलं रे, नकोसं केलंय.
क्षणभरात ती शांत झाली. पुन्हा गहन अश्या विचारात गढून..
त्याच वेळी त्याने बोलायला सुरुवात केली.
होईल ग सगळं नीट., असा त्रास नको करून घेऊस ,
काळ हाच..ह्या सगळ्यांवर औषध आहे.
आपण प्रयत्नं केले नाहीत, असं थोडीच आहे ना?
आपण फक्त समाजाने आखून दिलेल्या नियमात बसलो नाही. इतकंच ,
बाकी आपलं प्रेम आहेच की एकमेकांवर , ते कुणी आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आणि घेणार ही नाही..
बस्स , तू सावर ग स्वतःला..
मला असा पडता चेहरा तुझा पाहवत नाही हा,
बघ कसा कोमेजून गेलाय पार.. माकड दिसू लागलेय आता तर,
हाहाहा…तिने हसावं म्हणून त्याने विषय मुद्दामहून बदलला.
थट्टा नको ह पुरे...? तिने एकसुरात म्हटलं.
ठिकाय ...
पण प्लिज,  नको राहुस अशी...
जे घडतं ते योग्यच…आपल्यासाठीच..
आपण विवाह बंधनात सफल झालो नसलो आणि आयुष्यं - भरासाठी ‘नवरा- बायको’ म्हणून एकमेकांचे होऊ शकलो नसलो तरी, मैत्रीचा हा वटवृक्ष नेहेमीच राहील ग..सावलीचं छ्त्र धरत..
काळजी नको..
पण का जातोयस तू..नको ना जाऊ ? पाणावलेल्या डोळ्यांनी तिने त्याकडे एकटक पाहत म्हटले..
"नशिबाने दिलेल्या वाटेवर जाणे येतंच ग..
मार्ग त्याने आखलेला असतो. आपण चालायचं फक्त, प्रयत्नांची शिकस्त करत.."
आपण ही प्रयत्न केले , पण त्याला यश मिळालं नाही. बस्स इतकंच,
पण हा , ह्याचा अर्थ असा ही नाही की आपण हरलो.
"प्रेमाची बाजू नेहमीच यशाच्याच स्वाधीन असते"
विजयाची ग्वाही देत.
बस्स बस्स ,नेहमीच असा शब्दात भुलवतोस..
राहू दे..
आपल्या निमुळत्या स्मित हास्याने त्याने तिच्याकडे पाहिलं आणि तो पुन्हा बोलता झाला.
‘प्रेम हे जीवनाचं स्वरूप आहे ..' मीरा ' आणि 'त्याग' हा त्याचा मूळ..’
माणसाचं आपल्या आयुष्यात येणं ' जवळीक साधणं आणि परस्पर निघून जाणं ' हे नियतीनेच आखून दिलेलं संकेत आहेत. आपलं मनोधैर्य आणि मनोबळ वाढविण्याचं...
कळतंय ?
समज ही आपली पूर्वपरीक्षा आहे.
पुढच्या क्षणाला खंबीरपणे उभं राहण्यासाठी..
मिळालेला हा एक नवा अनुभव , नवा अध्याय..ज्याचं मोल कधीही वाया जाणार नाही.
बोलता बोलता तो शांत झाला.
डोळ्यावरची कड मात्र भावनेने ओथंबून गेली होती.
मनात असंख्य तंरग उमटत होते.
नातंच तसं होतं ,प्रेम ह्या भावनेने जोडलेलं गेलेलं.
सहवासाच्या मगरमीठीतून उमळलेलं..
वर्षभराची त्यांची ओळख...
ऑफिस सुटण्याची दोघांची एकच वेळ , एकच ठिकाण, एकत्रच जाणं येणं.., त्यामुळे सहवासाच्या गर्द मिठीत आणि संवादाच्या हृदयी भावसागरात ते दोघे एकमेकांशी कधी एकसंध झाले ते त्यांनाही कळलं नाही.
मन मात्र दोघांचं मोकळं होतं होतं. लग्न करावं असं ठरवूनही झालं.
रीतसर घरातल्यांना सांगणं झालं.
आणि तिथूनच पुढे ...
पाहिल्या त्या साऱ्या स्वप्नांचा धुरळा उडाला...
घरच्यांचा विरोध...आणि समाज आड आला.
तुटलं सगळं..एकाच वेळी..एकाच क्षणी.
मनाची बाजू पोखरली गेली.
व्यथेने, वेदनेने ते कळवळून उठलं.
‘’ प्रेमाची सांगता ही स्पर्शाने होते असे म्हणतात..’’
तो स्पर्श होण्याआधीच वावटळ उठलं.
संपलं.
मनाचे धागेदोरे उसवत...
ती चालता चालता त्याच्या बॅगेला घट्ट बिलगून होती.
छातीशी कवटाळूनच घेतलं होतं तिने..त्याच्याच सहवासात नित्य नेहमी असलेल्या त्या बॅगेला..
जणू त्याचीच ऊब तिला त्यातून मिळत होती.
‘’ मला ह्या क्षणी तुला आता घट्ट बिलगावं वाटतंय श्याम ‘’
दुःखाचे , विरहाचे हे क्लेश सारे दूर करत..गहिऱ्या वेदनेने तिने त्याकडे हळुवार पाहत म्हटलं.
त्याने केवळ त्यावर स्मित हास्य केलं. बस्स..
जाऊ दे..
इच्छा आहे पण ही वेळ नाही.
आणि त्यात लोकं काय म्हणतील...हा प्रश्न आहेच..
सोड..
तुझी ही ऑफिस ची बॅग , तू आहेस असं समजून घेते..
बिलगु दे मला असंच काही वेळ..थांबवू नकोस..प्लिज..
मला माझा वेळ घेऊ दे..
निदान आता तरी, ह्या घटकेला..ह्यावर तरी कुणी काही बोलणार नाही.
अंधार चढत होता.
मरिन ड्राईव्ह हुन..ते पुन्हा परतीच्या मार्गला लागले होते.
ती गहन विचारात होती. त्याचं मन ही काव्यधारांनी धुमसत होतं..
पुन्हा मन आज शांत झालं
पुन्हा एक कारण मिळालं..
पुन्हा उठली कळ वेदनेची
पुन्हा हसणं ओघानं आलं..
पुन्हा झाली क्षितिज सांजा..
पुन्हा तेच काळोखी गाणं
पुन्हा नवी पहाट मोकळी
पुन्हा क्षणाचं येणं जाणं..
- संकेत य. पाटेकर
http://www.sanketpatekar.com/
प्रतिलिपी :


सोमवार, ७ जानेवारी, २०१९

भाई- व्यक्ती की वल्ली

क्षण ..कधी केंव्हा कुठे आणि कसा रंग उधळवतील ना ह्याचा काही नेम नाही आणि नसतोच असा कधी, अगदी क्षणा क्षणातच म्हणायला, तश्या खूप काही घडामोडी घडतात. ध्यानी मनी नसताना एखाद मैफिल ही जुळून येते आणि अफलातून अशी रंगून जाते. अशी रंगते की ती कायम स्मरणाशी उरते  , आपल्याच माणसाच्या सहवासाचा आणि आपुलकीचा अत्तरीय गंध दरवळून 
आणि म्हणूनच अश्या त्या गत क्षणांना , त्या सर्व आठवांना.. कधी शिणवटा येत नाही. 
ते क्षण नेहमीच प्रसन्नतेत वाहतात, आनंदाचा फुलोरा घेऊन येतात. फुलतात आणि हसवतात.
भूत वर्तमान काहीही असो,

काल 'भाई' व्यक्ती की वल्ली हा पुलं वर आधारित चित्रपट पाहताना , पदोपदी त्यांचा जणू सहवासच घडत होता. इतकं एकरूप झालो होतो. 

वाक्य वाक्यातनं आणि त्यांच्या हास्य विनोदातंन मनमोकळी आरोळी फुटत होती.
टाळ्या पडत होत्या. 

वाह..! वाह..! मिळत होती.
त्यांनी जगलेले आणि जागविलेले क्षण आमच्यापुढे असे नव्याने उभे होत असताना
स्वरगंगेत मिसळलेली ती मैफिल..काय आणि कसं बरं वर्णवू..
तोड नाही हो त्याला
साक्षात कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी , वसंत , ह्या आदी दिग्गजांच्या स्वर्गीय सुरात आणि विठू माऊलीच्या नामजपात रंगलेली ती दर्दी मैफिल..
ह्याने माझ्यासोबत इतर प्रेक्षवर्ग ही तल्लीन होऊन त्या सुराशी मिसळला गेला होता..
त्या मैफिलीला खरंच तोड नाही...

कानडा राजा पंढरीचा ..
अजूनही गुणगुणतोय मी..

गदिमा सोबत 'नाच रे मोरा' शी जुळलेली बैठक..
ती रंगत...आहा..!

तो काळ खरच वेगळा होता..ती कलावंत आणि कलारसिक ,कला जोपासणारी माणसंच वेगळी होती. कलेने झपाटलेली आणि तशीच दर्दी देखील..

पुलं.. असो, ग.दि मा असो, सुधीर फडके असो
भीमशेन जोशी..कुमार गंधर्व, बालगंधर्व..
किती नावं घेऊ..

"कला जगवते आणि जीवन घडवते ही "

पुलंचा 'सहवास' आज ह्या चित्रपटातून घेता आला..
ह्यातच आनंदी आनंद..
अजून काय हवंय..

भेटू आता पुन्हा ८ फेब्रुवारीला ...
तोपर्यंत हसा खेळा आणि क्षणा क्षणांचा आनंद घ्या..आणि एखादी मैफिल ही रंगवा..
धन्यवाद..! 
- संकेत पाटेकर
०६/०१/२०१९

#भाई- व्यक्ती की वल्ली

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2117663381589894&id=100000387574764




सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१८

'नाळ'


जिथे शब्द अपुरे पडतात , तिथे नजरेची भाषा बोलू लागते. 
आणि जिथे नजरच क्षणासोबत लपंडावचा खेळ मांडते तिथे स्थिर हृद्य हि कोसळतच..
अश्याच नजरेशी भाषा , भाबड्या  हळव्या शब्दांची  भाषा , खेळाची भाषा , मौनाची भाषा आणि  प्रेमाची मृदाल भाषा 'नाळह्या चित्रपटातून काल अनुभवली. 

आईच्या काळजाचा स्वर , झिरपणारा मायेचा हळुवार कोपरा , झेपावणारं, दौडणारं आणि आल्या प्रश्नाची उकल करू पाहणारं , त्यासाठी धडपडणारंचैतूचं ते भाबडं निरागस मन , हे सगळं मनावर हळुवार कोंदून जातं . 
 इथं 
आल्या त्या  प्रसंगाशी आणि परिस्थितीशी सामोरे जाताना , स्वतःच्या  मनाची  तडफड बाजूला ठेवून ,स्व - आनंदाच रोपटं दुसऱ्याच्या दारी लावणं, हे हि काही  सहज पेलण्यासारखं नाही . त्यासाठी  आईपण लाभलेलं काळीजच असावं लागतं.  ते पुन्हा प्रकर्षानं जाणवलं.  

म्हणावा तर  चित्रपट अगदी साधासरळ आहे, सौम्य आहे. 
एखाद्या भिरभिरत्या फुलपाखरानं  नावीन्य घेऊन अलगद आपल्या तळ-हाताशी येऊन  क्षणभर  विसावं आणि भावरंगाचा क्षितिजगंध.. नजरेत उगाळत , आल्या पावलानिशी पुन्हा भिरभरीत निघून जावं
तसा हा चित्रपट हळुवार स्पर्श करत जातो .  भावनेचे ना ना असे कंगोरे जोडत. 

चित्रपटाचं चित्रीकरण, अँगल वगैरे अप्रतिम आहे.  भाषेतला  हि गोडवा आहेच आणि त्याचबरोबर 
सगळ्यांचा अभिनय..अगदी त्या म्हशीचा हि..  निव्वळ  नैसर्गिक आहे. त्यात कुठेही खोटेपणा दिसत नाही. इतका तो शुद्ध आहे. 
बालपणात रमायला लावणारा , खुद्कन हसू  आणणारा , डोळे पाणवणारा आणि आई च्या ममत्वेशी नाळ जोडणारा हा चित्रपट ...
माझ्या दृष्टीने अप्रतिम आहे . मला तरी खूप भावला. 
कारण 
आईची थोरवीच इतकी अगाध आहे नि असते 
कि आई ह्या एका शब्दानं आणि नुसत्या हाकेनं ‘ मन गलबलून उठतं. 
 - संकेत पाटेकर 
१९.११.२०१८ 



मंगळवार, १३ नोव्हेंबर, २०१८

बबन काका


माणसं बोलता बोलता कधी आपलीशी होंऊन जातात ना  ते कळत हि नाही. 
मनाच्या ह्या तळ गाभ्याला  भावनांचा हळवा स्पर्श जरी झाला कि मनातला डोह आपसूकच उसळून बाहेर येतो. आणि मग शब्दांची उसळण होते. शब्दांना सूर गवसतो. आणि आठवणींचा  रंगमोहित सडा विघुरला जातो. त्यात वेळेचं भान राहत नाही. समाधानाचं एक चिटपाखरू मात्र भिरभरीत राहत अवतीभोवती . 
आपल्या  बोलण्याला  गोडव्याचं सारण चिटकलं कि असं सगळं घडतं. 
अनोळखी हि आपलीशी होतात. 

उत्साह भरलेले बबन काका हि असेच . क्षणभराची काय ती आमची ओळख . 
परेल मधल्या खास गिरणी कामगारांच्या मनोरंजनासाठी १९३२ साली उभारलेल्या ह्या भारतमाता सिनेमागृहात ..
आज
आणि डॉ.काशीनाथ घाणेकर हा चित्रपट पाहून  आम्ही बाल्कनीतल्या दरवाज्यातून बाहेर पडलो. स्टाईल आणि डायलॉग मारताच  ..''आपलं नाणं कसं खणखणीत वाजलं पाहिजे . .''एकदम कड्डक''
तोच ह्या  काकांची भेट घडली. 

साडे नऊचा खेळ पुन्हा रंगणार होता.  उठावदार वळणदार त्या जिण्यावरून रसिक प्रेषक आत प्रवेश करतं  होते . त्यांची तिकिटं तपासून देणं आणि सीट दाखवून देण्याचं काम हे काका गेले ३८ वर्ष इथे करतं आहे. ३८ वर्षाची अखंड सेवा . 
त्यामुळे रंजक अश्या आठवणींचा ठेवा त्यांच्याकडे अमाप. 
त्याचाच उलगडा काल झाला. 
दरवाजतुन बाहेर पडलो तोच फोटोशेषन सुरु  झाला. 
साडे सहाच्या त्या शोचे सगळे रसिक प्रेषक एव्हाना चित्रपट पाहून गेट बाहेर पडले होते. उरलो होतो तो आम्हीचपाच महारथी . 
काकांनी ते पाहिलं. पण त्यावर काही बोलले नाही. उलट चालू द्या चालू द्या . फोटो काढा कुणी काही बोलणार नाही. असे त्यांचे बोल पुन्हा सेल्फी घेण्यात आम्हाला मुभा देत होते. 

पाच दहा मिनिट अशीच  इकडं तिकडं गेली. आमचं फोटोशेसन सुरुच होतं. लगभगिने ते काका ..येणाऱ्या रसिक प्रेक्षकांना  त्यांची जागा दाखवून आमच्याकडे पुन्हा येत  होते. 

कारण त्यांचा मनाच्या तळघराला ..आमच्या  मनाचा हळवा कोपरा जो लागला होता. 
आणि म्हणूनच गेल्या ३८ वर्षातल्या त्यांच्या कारकिर्दीतल्या  रंजक आठवणींना पुन्हा मुलामा फुटला  होता. 
काका उत्साहाने अगदी भरभरून बोलत होते.   
ऐकणारं कुणी असं भेटलं  कि मन हि आपलं मोकळं होतं जातं. 
ऐकून घेणाऱ्याला हि नव्या गोष्टी उलगडत  जातात. मन स्वच्छंदी होतं . 

काका बोलत  होते .  
राजकुमार पासून..ललिता पवार ...राजेश खन्ना मराठी चित्रपट सृष्टीतळे  दिग्गज ..
भालाजी पेंढारकर पासून  दादा कोंडके खुद्द डॉ. काशिनाथ घाणेकर ...ह्यांची आठवण त्यांच्याशी त्यांचा झालेला संवाद ..अंकुश चौधरींशी बातचीत आणि तेंव्हाचे आताचे रसिक प्रेषक आणि अवतालभोवताल . 
आम्ही ते सगळं रसिकतेने श्रवण करतं  होतो.  एखाद्या  मैफिलतला सूर कानी पडावा तसा ...
संकेत पाटेकर