शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

सांत्वन..

एखादी भावना अनावर झाली कि 'अश्रू' किंव्हा 'राग' किंव्हा दोन्हीही अगदी जुळ्या भावंडा सारखी एकत्रितपणे नांदू लागतात .
तेंव्हा ऐकणारा हि घायाळ होतो . विव्हळतो. आज हि तसंच काहीस झालं . 
जितक्या सहजतेने शब्द कागदावर उमलतात ना , तितक्याच सहजतेने तेच शब्द , एखाद्या मनाचं सात्वनं करू शकत नाही .
हि एक खंत अजूनही ह्या मनास कुठेशी टोचत राहते. सलत राहते .
आज पापण्या पुन्हा एकदा जडावल्या ..पुन्हा एकदा मन स्तब्ध झालं .
तिच्या एक एक करुण शब्दाने ... ज्यात फक्त वेदना होत्या , अन त्या  वेदनांचा न सोसणारा दाह..कालपटून टाकणारा...करपून टाकणारा ....
कसं असतं आयुष्यं एकेकाचं ..... ऐकताना मेणासारखं वितळायला होतं अगदी .
पण ते मेण हि प्रकाश वाटा देऊन मोकळ होत ओ ,आधार देतं , असलेला अंधार नाहीसा करून ..
इथे नुसतंच वितळायला होतंय ... प्रकाश धर्म काही..वाट्याला नाही . तीच ठेच लागतेय मनाला .
जीवन हे संघर्षमय आहे. लढा हा आहेच अन तो असणारच...जगण्यासाठी. 
पण त्यासाठी हि आधार हवा असतो . कुणाचा न कुणाचा तरी त्याशिवाय उभं राहता येत नाही.
विश्वास अन प्रेम ह्या दोन धाग्यांनी नातं घट्ट ओवलं जातं . मग ते कुठलही नातं असो.. 
त्याघट्टपणाच्या आधारावरच ते पुढे सरत जातं. पण तो आधारच कमकुवत झाला तर...
आपलीच माणसं जेंव्हा आपल्याशी तर्हेवाईकपणे वागतात तेंव्हा ...नकोस वाटत अगदी...
हे जगणंच नकोस वाटतं ..
पण जगायला हवा यार ..आशेचा एक दिवा रोज उगवतोच ना ..नवी पहाट घेऊन ...इतकं सहन केलं मग आता धीर का सोडवा.
क्षण बदलतात . आणि त्या क्षणानुसार हि नको असलेली परीस्थितीही... , विश्वास ठेव . आशा ठेव . सारं बदलेल . नक्कीच बदलेल .
दुख प्रत्येकाला आहे ...त्याचं स्वरूप मात्र वेगवेगळ आहे. 
आपण किती सहन करतो ..ते आपल्यालाच माहिती असतं. दुसऱ्याला कितीही सांगितल तरी त्यातली ती दाहकता आपल्या इतकी त्यापर्यंत पोहोचणार नाही. हे मान्य . 
खंर तर सात्वनासाठी शब्दच नसतात...
वपुंच्याच शब्दात म्हणावं तर सांत्वन म्हणजे दुःखाच मूल.
मूल आईपेक्षा मोठं कसं होईल?मूल मोठं व्हायला लागलं की आई आणखी मोठी व्हायला लागते.म्हणून,समजूत घालणारं कुणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात.
तुझे हुंदके नजरेने पहीले नसले तरी हृदयाने ते जाणलेत .. ऐकलेत मी..
येणारा प्रत्येक क्षण हा कसोटीचा आहे नि असतो. . त्यात तोलून मापून आपण बाहेर पडतो . पडत असतो. ती आशावादी जिद्द मात्र कायम ठेव. त्यातून बाहेर पडण्यासाठी ..
काहीच उरलं नाही अस बोलू नकोस ...उद्याचा दिवस नक्कीच काही तरी घेऊन येईल . 
आनंदी वलयासह ...बागडत...बागडत...
तुझाच ..
एक मित्र 
- संकेत
३०.१०.०१५


सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

माणूस आहे ...तो चुकणारच ...

माणूस आहे ...तो चुकणारच ...

प्रेमात सगळ 'क्षेम' असतं अस म्हणतात . पण त्यासाठी क्षमाशील वृत्ती मुळात असवी लागते. अन प्रेम आतून असावं लागतं. खरं खुर.. हृदयाच्या सुप्त वाणीतून प्रकट झालेलं. 
तेंव्हा कुठे झाल्या गेल्या क्षणांना किंव्हा दुखावलेल्या आपल्या मनाला पुन्हा शांत करून , पुन्हा सार आपलसं करून . सारं विसरून, नव्याने नातं झुलवता येतं. 
मुळात प्रेम हे 'हृदय' जोडणं शिकवतं ..तोडनं नाही. 
दोन मनं एकत्रित आली कि तडजोड हि आलीच . नातं म्हटलं कि वाद विवाद आलेच ...मग ते शुल्लक कारणावरून असतील ..वा कुठलेही .. 
पण त्या एका कारणासाठी, त्या मागची पार्श्वभूमी न पाहता उमगता ..
तुम्ही जर टोकाची भूमिका घेऊन, एकमेकांपासून दूर जात असाल तर त्याला काही एक अर्थ नाही . त्या नात्याला हि अर्थ उरत नाही .
एका कारणावरून एवढ्या घडामोडी होत असतील .तर पुढचं आयुष्यं एकत्रित काढण अथवा जगण कठीण आहे.
माणूस समजायला अन समजून घ्यायला आयुष्यही अपुरं पडतं. 
जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा अन त्या त्या वेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीचा वा वातारणाचा परिणाम एकंदरीत आपल्या मनावर होत असतो. 
अन त्यातून वेगवेगळ्या भावछटा ना ना रुपी ढंगान प्रकट होत असतात. अन त्यानुसार आपण व्यक्त होत जातो.
स्वभावाचे विविध पैलू ...अश्यावेळी आपलं दर्शन देतात. मग ते आपल्याला अपेक्षित नसलेले स्वभाव गुण असतील वा दोष .. त्यावेळेस समोरच्याने बावरून न जाता . त्या मागची कारणे लक्षात घ्यावी. 
सांभाळून घ्यावं एकमेकांना ...
एका क्षणात नांत तोडण्याची बतावणी कशाला ?
माणूस आहे ...तो चुकणारच ....., तो काही सर्व गुण संपन्न नाही. देव नाही.
आपली चूक मान्य करण्याची वा पुन्हा नात्यात बहर आणण्यची त्यात धमक असेल तर माफ करायला काही हरकत नाही. 
मुळात आपली बाजू समजून माघार घेण वा आपली चूक मान्य करणं हि क्षमाशील मनाची अन सदृढ नात्याची लक्षण आहेत. 
तो सावरतोय मग तुम्ही का नको सावरायला ?
चूक कोणाची हि असली तरी एकाने बाजू सावरायची असते. नात्याची फळी म्हणून तर मजबूत राहते. त्याला पोखरून काढणाऱ्या वाळवीची कीड लागत नाही . ज्याला प्रेम कळलं ..त्याला नातं सांभाळाव लागत नाही ते आपुसकच सांभाळलं जातं.
आपल्या अपेक्षानुसार त्याने वागायलाच हवं किंव्हा असंच वागणं तुझं अपेक्षित आहे हि आपली वृत्ती सोडायला हवी .
समोरच्याच्या अश्या अनपेक्षित वागण्याने हृदयास घाव बसतो हे मान्य ..ती जखम काही वेळा भरून हि येणारी नसते. पण तरीही समोरच्याने आपली चूक मान्य केली ..तर त्याला माफ करायला हवच. 
तेवढेच ते घाव हि विरून जातील. 
प्रेम आहे नं ...मग सांभाळायला हवंच एकमेकांना नाही का ?त्यासाठी नातं का तोडावं ? 
मन तुटलचं तर ते पुन्हा जोडता यायला हवं . 
माणूस आपल्या माणसाशिवाय अन त्याच्या प्रेमाशिवाय जगू शकत नाही. त्याला आपलीच माणसं जवळ लागतात. प्रसंगी त्याला समजून घेणारी प्रसंगी समजून देणारी ...!
इथे मंगेश पाडगावकरांच्या काही ओळी आठवतात . 
प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
नातं तुझं माझं... 
संकेत य पाटेकर 
१२.१०.२०१५
 

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०१५

पहिल्या प्रेमाची सर ...


असंच काहीस लिहण्याचा प्रयत्न ..बघू जमतंय का मला ...Romantic जरा..
______________________
खर सांगू , मला तुझं हे वाक्य आता पटू लागलं आहे .
ह्या क्षणक्षणा मधलं मिळालेलं प्रेम , किंव्हा त्याची झुळूक सुद्धा आपल्याला
हवी हवीशी वाटते .
जेंव्हा नवेपणाचं एखादं नातं हळूहळू उलघडत असतं तेंव्हा, त्या नात्याच्या
सुरवातीस अन नातं उलगडेपर्यंत ...ती जी मधली स्पेस असते , त्यात ती व्यक्ती
,आपल्याशी किती प्रमाणात खरी अन जवळिकतेने वागतेय .
ह्याचं अंदाज बांधता येत नाही . सगळ कस तळ्यात मळ्यात असतं. अस्थिर असं..
पण अश्या झुलत्या मनाच्या स्थितीत हि , त्या क्षणामधलिक ओढ , ते प्रेम ,ती
आपुलकी सारं हवंहवसं वाटतं आपल्याला .
त्या रात्रीचे तुझे हे बोल अजूनही मनाशी ठासून आहेत बर का...
खरं तर ज्या विश्वासाने अन आपुलकीने आपण नातं जपतो .जपत असतो .
त्याच मूल्यमापन कधी करूच नये . पण काय होतं. कुठेतरी एक ठेच पोचत असते . सल खुपत असते. आपल्या मनाला.
जे काही घडतंय ते जाणीवपूर्वक कि खरंच आपलेपणानं ?त्याचा खुलासा होत नाही .
करता येत नाही .
आतल्या आत मन पोखरत जातं. अन नात्यावरचा तो विश्वास कुठेसा ढिला पडत जातो .
मला वाटत ह्या वेळेवर सुटणाऱ्या गोष्टी आहेत. थोडा वेळ द्यावा . नात अधिकतेने
खुलावं उलगडावं म्हणून , पण त्याच विश्वासानं ..दोघांच्याही.

आता हेच बघ ना !
तुझं माझं नातं घे ...
किती महिन्याची ओळख गं आपली , अगदी मोजून काहीच महिने.
विश्वासाने हे नातं फुलवत आलो आपण...
तुझी माझी ओळख तरी कुठलीशी होती बर सांग . एका माध्यमातून आपली मनं जुळली. अन हळूहळू ती बहरत गेली. शब्दांच्या वलयातून ...आपलेपणातून...
एकमेकांना आपण कधी पाहिलं हि न्हवतं. तरी देखील मनाची सुत जुळली .
ह्याला कारण काय ? तर तू दाखविलेला विश्वास ..त्याच विश्वासने आपण बोललो. बोलत
राहिलो अन एकदा भेटलो हि ..
आठवतेय , ती पहिली भेट ...
तुझं वाक्य फोनवरचं, अजूनही कानाशी घुमतयं बर का ? अरे खूप नर्वस झाले रे ?
मनातल्या मनात खूप हसून घेतलं होतं मी ( आता रागावू नकोस हा )
पण तेव्हढीच हुरहूर, चुरचुर देखील होती. का ?  कारण मी तुला कधी पाहिलं नव्हतं. तुझ्या बोलण्यावरून अन तुझ्या विचारसरणी वरून तुझं चित्र रेखाटल होतं तेवढंच ..

पण तरीदेखील मन खचलच ..पहिल्याच भेटीत ..
जे मनाशी चित्र रेखाटलं होतं त्याच्या कितीतरी पटीने ती अवाढव्य आकृती समोर
उभी होती . त्याच ठिकाणी, त्याच ठरल्या वेळेत , त्याच हाव भावनेने.
ते पाहूनच म्हटलं इथून पलायन केलेलं बर....
पण तेव्हड्यात तुझी कुठूनशी हाक आली .अन तेंव्हा हायसं वाटलं .
किती बर वाटलं म्हणून सांगू. शब्दात कथन करता येणार नाही. 

म्हणजे केलच तरी , एखाद्या मोठ्या बिकट प्रसंगातून आपण निसटलो ह्याचा जणू तो
साक्षात्कारच ...अस म्हणावं लागेल .. त्यानेच हसू फुटलं होतं .

तू देखील हे सगळ ऐकल्यावर किती दिलखुलास हसली होतीस.
किती गोड अन सालस रूप होतं तुझं ते..घायाळ झालो होतो अगदी ..
अन आजही आहे.
आपली हि तशी पहिलीच भेट , म्हणायला दिवस हि तसा खासच होता .
मैत्री दिनाचा , फ्रेंडशीप डे.. योगा योगच म्हणावं लागेल न्हाई .
कितीसार्या गोड गप्पा अन आठवणी रंगल्या त्या अवघ्या दोन तासाच्या अवधीत. कदापि
न विसरता येणाऱ्या ..आयुष्याच्या ओंजळीत कायम जपता येणाऱ्या ..
आठवतंय तो पाऊस, ऐनवेळी हळूच बरसलेला . नेमकी अचूक वेळ साधली होती ह्याने,
म्हणूनच एकाच छत्रीखाली दोघांना (दोघांकडे छत्री असूनही ) एकत्रितपणे वावरता
आलं होतं . पण त्यातही तू मुद्दाम मला डिवचल होतंस.
छत्री आहे माझ्याकडे म्हणून ..तेंव्हा नजरेतूनच काय तो संवाद साधला होता.
आठवतंय , किती Romantic क्षण होता नां तो...,
पहिलीच भेट , अन पहिलाच पाऊस ...

सी फेस च्या दिशेने नजर झेपावत केलेल्या अवांतर गप्पा  आठवतायेत  का ?. 
गप्पानेवजी  खंर तर त्याला 'प्रश्न-मंजुषा' खेळच  म्हणावा लागेल . कितीसे  प्रश्न करत होतीस ? बोल ना , सांग  ना अस म्हणत  ?
मी मात्र निशब्द होवून तुझ्या त्या प्रनार्थी चेहऱ्याकड कुतूहलाने पाहत होतो बस्स . किती सोज्वळ रूप ते ! 
पण त्यात हि तुझे  नखरेबोल शब्द अडून धरत...अस नको रे पाहूस , ऑक्वर्ड  वाटतंय.  हसू  सुटलं होतं तेंव्हा हि..., आठवतंय नं ! 

पहिल्यांदा असं  , कुणा एका मुलीसोबत , ते हि पहिल्याच भेटीत,  मी म्हणजे आपण कपल लोकांच्या (जोडप्य जोडप्याने बसलेले ) पंक्तीत जावून बसलो होतो .
अन त्यातही नेमकेपणानं आपल्याच  बाजूला एक  सहकुटुंब , सह आनंदासही , दानं शेंगदाणं , मुखी मिचकावत कडेलाच येऊन स्थिरावलेलं .  
जणू आपल्यातल्या बोलणं  छुप्या रीतीने ऐकण्यासाठीच ,आठवतंय ? 
तुझं तसंही तिकडे लक्ष न्ह्वतचं  म्हणा ... स्वतःच्याच प्रश्न कुंचल्यात गुंतली होतीस तू ..... असो , 
आपल्या एकमेकांच्या  आवडीनिवडी तश्या काही प्रमाणात  आपण जाणून घेतल्या होत्या.  फोनवरूनच..संवाद साधून ,  
त्यात तुला आईस क्रीम खूप आवडतं .हि गोष्ट लपून कशी राहील म्हणा .
म्हणून परतीच्या वाटेवरची  साज-संध्या आईस्क्रीमच्या  यम्मी फ्ल्वेर मध्ये ढवळून द्यावी  . यासाठी  दुकान धुंडाळू लागलो. तर त्याच्या हि धड थांगपत्ता लागला नाही. 
तसं कित्येकदा , त्या ठिकाणाला भेट  देऊन  आलोय  . पण नेमकेपणान तेंव्हाच रस्ता न सापडावा हे  एक मोठ आश्चर्यच म्हणावं लागेल ...;) 
असो, आपली आईस क्रीम , राहिली ती राहिलीच  ,नाही का    ?

बर हे  हि ..असू दे , 
पण  मैत्रीत्वाचा खास दिवस असूनही   ..साधं रिबीन BAND  हि घेऊन आलो नाही . 
हे कुठेतरी बोचलं  मात्र माझ्या मनाला , त्यात हि  तुझे लाडीकतेचे शब्दओळ., हळूच बरसले.  माझं रिबीन कुठे आहे ,  हा ? है  नां ? मी त्यावर  फक्त स्मित हास्य खुलवलेलं.  
खर तर 'नातं ' घट्ट रोवायला अशी BAND, रिबीनची  गरजच  नसते. .है ना ? हवा असतो तो फक्त विश्वासाचा बांधीलपणा . 
जो तुझ्या माझ्यात आहे . अन तो असाच राहिलं हि आशा व्यक्त  करतो. 

ऐ ,  ऐक ऐक,  अजून थोडं... 
दादर फलाटावर , तुला निरोप देताना , तुझे ते हळवे नाजुकसे बोल , आठवतंय ? 
हृदयात बंदिस्त आहेत .बर का ..
त्याच बरोबर , भेटत्या क्षणीच, दहा बारा पाऊलं पुढे टाकतो नाय टाकतो,  तर तू उपस्थित केलेला  प्रश्न देखील ., म्हणजे, 
कसं वाटल तुला भेटून ?  खरं  तर तुझ्या प्रश्नाचा पाढा  इथूनच सुरु झालेला , ह्या प्रश्नाने .. आठवतंय ? 
त्यातही माझं उत्तर तुला रुचलं न्हवतं  .  खट्टू झाली होतीस तू  ,  है ना ?
एका कवी मनाच्या अन लेखकाच्या ( मी काही लेखक वगैरे नाही आहे हा ) मुखातून फक्त,  'छान वाटलं' अस उत्तर  खंर तर कुणालाच पटणार नाही. 
मला देखील नाही. पण तरीही मी दिलं  . 
पण त्यात हि तुझ्या लाडिक हट्टा पुढे मला शरणागती पत्करावी लागली. है ना ? 
नाही , मला असं हे  उत्तर नको ...तसं ऊतर नको ..आठवतंय. ?

आठवणीतले  हे गोजिरे क्षण असेच कायम लक्षात राहतील . 
हृदयी मनात प्रेम अत्तराचा नवा गंध शिडकावत. 
तुझाच , 
....................

-संकेत पाटेकर 
.२७.०८.२०१५ 



बुधवार, २६ ऑगस्ट, २०१५

तुझं प्रेम...

हरलो अगं ! सरते शेवटी हरलोच..
नात्यातील ती रसिकता , तो आपलेपणा , ती शब्दांची मोहकता , त्यातला प्रांजळपणा प्रयत्न करूनही मला पुन्हा मिळविता आला नाही . हरलो मी ....
तुझ्या अविश्वासालाच पात्र , हो ना ?
कितीसा धडपडलो , रडलो , सावरलो , प्रयत्नाची शर्थ केली. पण नाही .
म्हणतात ना , एकदा का कुणाच्या मनातून आपण उतरलो , अविश्वासाच्या पात्र ठरलो ,कि मग पुन्हा जैसे थे स्थिती होणे .कठीणच....
माझा हि असंच झालं आहे बघ . पण मी प्रयत्न केले हा …
मनापासून अगदी ..नाही अस नाही .

मुळात मी कुठे चुकलो ? 
हेच मला अद्याप कळलेलं नाही. अन तू सांगितले हि नाहीस . फक्त इतकं तू म्हणालीस ..
''परिस्थिती माणसाला बदलते रे , मी हि बदलले , तू कुठे चुकला नाहीस'' .
बस्स एवढंच ते वाक्य ...अजूनही मनाची खापरं तोडतंय.

मी कुठेच चुकलो नाही . मग तरीही तू , मला तुझ्यापासून दूर ढकलतेस ? का रे ? कश्यासाठी ? मला हे कळून येत नाही आहे, अग ! सांग ना ..
प्रत्येक भेटीत , किती विश्वासानं तुझ्या कडे पाहतो . कान टवकारतो .
क्षणभरल्या तुझ्या त्या सहवासात.. तुझं प्रेमभरलं एक एक शब्द वेचण्यासाठी ..
पण खर सांगू ..त्या शब्द वलयात 'आपलेपणा' असा गवसलाच नाही कधी, .
ह्या मागील दोन तीन वर्षात ...
तुच लाडीकतेने देऊ केलेलं माझं नावं घे ना ..सारं जग त्या नावाने हाक मारतं आता , पण तू ....नाही . कुठेशी टोचतं हे मनाला , तुला कसं कळणारं ? 
खंर सांग ना , कुठे चुकतोय मी ?
कितीस ओरडून सांगितल तुला , हक्काचं नातं म्हणून भांडलो हि कित्येकदा,
अन रुठावलो हि ....ठाऊक आहे .
एकदा तर रागानेच लालबुंद होवून दिवसभर मोबाईल बंद ठेवून ..वेड्यासारखा भटकत राहिलो होतो.
सकाळी निघालेलो कुणास न विचारता,  ते थेट रात्री घरी परतलेलो .
किती रागावले होते सगळे . . माझी तर हजेरीच घेतली होती साऱ्यांनी .
पण आता क्षणभराच्या माझ्या रागाला मी हळूच थोपवतो अन म्हणतो , 'अरे वेड्या अस रागावून कस चालेल ,आपली आहे ना ती , जिव्हाळ्याची जिवलग   ..बस्स , जरा शांत हो ,
कित्येकदा अशी स्वतःची समजूत घातली .
आज ना उद्या तो एक दिवस उजाडेलच ह्या आशेवरच चालत राहिलो .
दिवस ढकलत राहिलो . कधीतरी तू आपलेपणाने बोलशील ..आपलेपणाने जवळ घेशील . पण नाही ग ..हरलो मी ..
सहजा सहजी कुणाला आपलंस करता येत नाही ..हेच खरं ..
तू तर आपलीच आहे . तरीही मी असा बघ ..,
तो विश्वास मी हरवून बसलोय ..अन आपल्या नात्यातली ती रसिकता हि ..
हरलो मी..........हरलो अगं !
पण अजूनही एक आशेची हलकीशी दीप मनाच्या अंधाऱ्या खोलीत निर्विकारपणे तेवत आहे.
ऐकतेस ना गं !
तुझाच ,
असंच काहीसं डोक्यात घुनघूनलेलं, 
सहज उमटलेलं ...
संकेत पाटेकर 
२५.०८.२०१५


शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०१५

पत्ररूपी संवाद ...

पत्ररूपी संवाद ...
प्रिय आई ...

साष्टांग  दंडवत ,
आज पुन्हा एकदा , बऱ्याच  दिवसाने ... तुला पत्र लिहावयास घेतोय . रागावू नको हं ..!
तशी तू रागावणार  नाहीस  हे मला माहित आहे.!
कुणी आई आपल्या पिल्लावर कधी रागावते का ? नाही , नाही रागवत , राग असला तरी तो क्षणभराचाच , तो हि समजाविण्या अन घडविण्या  हेतूने... हो नां  ?
मी तर तुझाच बछडा ...  तुझ्याच ममत्वेने उंचावलेली...तुझीच घडीव मूर्ती  ..   
मी जे काही  आज आहे ते सर्वस्व तुझ्यामुळे...तुझ्या शिकवणीमुळे , तुझ्या संस्कारामुळे..आई !

पण आज एकट वाटतंय ... तुझी उणीव अधिकतेने जाणवतेय ,  गहिवरून येतंय ,
का ? ते विचारू नको ...मला सांगता येणार नाही...
सावली होवून तू  नित्य नेहमी,  तशी सोबतच असतेस म्हणा , …पण तरीही आज राहवलं नाही. म्हणून हि लेखणी हाती घेतली .  

आई ..
अगं..! वयाने कितीही मोठो झालो ना,  तरी आईसाठी तिचं  छोटंसं तान्हुलं बाळचं असतो आपण , न्हाई ?
अन म्हणूनच बघ ,   मोठे झालो तरी हि आईच्या  मायेभरल्या पंखाखाली,
तिच्या कुशीत,  क्षणभरासाठी का असेना  , कधी निवांततेत  अलगद पडून राहतो. वात्सल्याची सुख चैनी  उब घेत .

तेंव्हा ना कसली  चिंता असते,  ना कसले दु:ख .... ते सर्व्वोच क्षण असतात .
जीवनातल्या अथांग सागरातले ...स्थिर असे..., लुडबुड  न करणारे , हवेहवेसे ..हसरे , आनंदा पलीकडचे ..हो ना...?

पण ऐक ना आई ,  कित्येक दिवस झाले बघ .., ह्या क्षणापासून मी पोरका झालोय अगं..  .
तू अशी दूर .. 
''मी कुठे हि असली तरी  तुमच्यावर  नजर ठेवून असेन.''  अस म्हणून , रागावून  कुठे निघून गेलीस ती पुन्हा  परतून न येण्यासाठी…
पण कधीतरी तुला,  तुझ्या ह्या पिल्लांना कवेत घेउसं वाटत  असेलचं   ना ? डोळे भरभरून पहायचं असेलच ना ? 
सांग...येशील   परत....., तुझ्या पिल्लांसाठी ?
  
तुझ्या उबदार कुशीत शांतपणे  निजायच आहे अगं..!  
कष्टाने झिजलेल्या  तुझ्या  नाजूक कोमल हाताचा , मायेभरला स्पर्श
हळुवार केसांतून  भिरभिरताना    ..किती बर वाटायचं सांगू...

ते क्षण आठवले कि आजही  ममत्वेने  भरलेला तो तुझा हात ,  अलगद केसातून भिरभिरत  राहतो .
किती सौख्य आहे अगं , त्या स्पर्शात  . सुखाची व्याख्या ह्यावूनी वेगळी  करता  येईल का ?

'मायेचा स्पर्श' सगळे क्षण कसे हलके फुलके बनवितात , न्हाई  ? 
वेदना दुखांना  तिथे अजिबात  थारा नाही. एखादी भळभळती जखम सुद्धा 'आनंदाचे गायन' करत चिडीचूप होईल इतकं अफाट  सामर्थ्य  , इतकं प्रेम त्या  मायेभरल्या स्पर्शात असतं .

 ह्या 'प्रेमाची' उत्पत्ती' च मुळात 'आई' ह्या रुपानं’च झालेय,  असंच  जणू  .  अन आहेच . 
ती अवतरतली अन प्रेमाचं वारं सर्वत्र भिनभिनू  लागलं ..,  मग ती हि 'पृथ्वी' रुपी आई का असो ,  ती आई आहे . वात्सल्य मूर्ती आई...!

ह्या माय भूमीसाठी , ह्या राष्ट्र रक्षणासाठी , देशाच्या सीमारेषेवर, दिवस रात्र शत्रूशी झुंजणारी ,  त्यांना जागीच थोपवून देणारी हि शूरवीर लेकरं, ह्यांच्या रगा रगात , उरा उरात तेजोवलय प्रवाहित करणारी हि मातृभूमी. आईचंच रूप .   
तिच्याच प्रेम ओढीने , तिच्या रक्षणार्थ धावत आपल्या प्राणाची आहुती हसत हसत देणारी  तिची हि शूरवीर लेकरं.
माय लेकरांच,  किती हे अफाट प्रेम ना..! ह्याला तोड नाही.
आई हि आईच  !

माधव ज्युलिअन  ह्यांनी तर लिहूनच ठेवलंय .
'प्रेमस्वरुप आई, वात्सल्य सिंधू आई''

फ. मुं. शिंदे हि म्हणतात .
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते
दुधावरची साय असते, लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही.

खरच गं !
आईचं  हे नातंच  अस आहे,  श्रेष्ठत्वाचं  . त्याला तोड नाही. त्याहुनी कुणी मोठं नाही.

बघ ,  अन  मी हे कुणाला सांगतोय .  एका गोडश्या , प्रेमळ अश्या माझ्या  'आई' शीच      
'आई' ची महती कथन करतोय .
वेडा खुळा  आहे ना मी ,..  तुझाच  तान्हुला  गं ..! समजून घे ..घेशीलच. 
अन ये पुन्हा ...तुझ्या ह्या लेकरूसाठी... मी वाट पाहतोय .

तुझ्या पोटी मी जन्म घेतला हे माझं  भाग्यं .., अन हे  भाग्यं मला प्रत्येक जन्मी मिळू दे.
लव्ह यु आई…! 
खूप खूप ....खूप सारं प्रेमं  ..!

एक चारोळी मुखी येतंय ..म्हणू...
म्हणतोच..!

तुझाचं तान्हुला अगं 
तुझ्याविना जगतोय ,
मायेच्या स्पर्शाविना
जरा पोरकपणं वाटतयं ! 

ये लवकर ...आई..! 
ये लवकर ….
तुझाच लाडका
-संकु 

- संकेत य पाटेकर
१४.०८.२०१५ 

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

'पाऊस मनातला पाऊस आठवणीतला' भाग -२

 (भाग -1) 
'पाऊस मनातला पाऊस आठवणीतला'  भाग -२

तसं ऑफिस मध्ये आज कामाचा फार काही ओझा न्ह्वातच , त्यामुळे निवांत होतं
सगळ... त्या निवांतपणातच पाचचा टोला वाजून गेला . आणि क्षणभरातच मित्राचा फोन खणाणला .
अरे , बाहेर मस्त पाऊस आहे, चल जाऊ कुठेतरी .. मी येतोय ठाण्यात , 
भिजूया मनसोक्त...मी म्हटल ठीक आहे. 
भेटू मग ठाण्यातच अस बोलून आमच संभाषण संपलं. अन सहाच्या सुमारास मी ऑफिक मधून बाहेर पडलो .
पावसाने आज तसं चांगलाच झोडपल होतं . कालपासूनच त्याची रिकरिक सुरुच होती.
आज सकाळपासून तो तर रागातच बरसात होता जणू .. . 
त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचून त्यास तळ्याच स्वरूप प्राप्त झालं होतं . रस्तोरस्ते ठिकठिकाणी ट्राफिक अन दुसरीकडे रेल्वेची नित्यानेह्मीची दिलगिरी व्यक्त करणारी घोषणा एकीकडे सुरु होती . 

लोकल ट्रेन हि तुडूंब गर्दीने खचाखच भरलेली ..त्यातच कसबस संध्याकाळी साडेसात दरम्यान त्या दिव्य गर्दीतून सुखरूप ठाणे गाठलं . मित्र येण्यास अजून तरी पुष्कळ वेळ होता .
त्याची नित्य नेहमीची सांगून भेटण्याची वेळ अन प्रत्यक्ष येण्याची वेळ ह्या  मध्ये नेहमीच तफावत असते.
 कधी कधी हो  हे जाणून मी तलावपाळी मस्त एकाग्र चिताने न्हाहाळत बसलो.

पावसाळी तीच रूप फारच मोहक अन तितकंच हुडहुडी आणणार होतं .एरवी रात्री उशिरापर्यंत प्रेमी युग्लांनी गजबजलेलं हे ठिकाण आज तुरळक काहीनीच शांत पहुडलं होतं . 
नियमित एकमेकांच्या हास्य खळीने , वा थट्टा मस्करीने , जीवनातील गोड कटू  अनुभवाने वा जीवनाविषयी विचाराने एकमेकांच्या हृदयाशी जोडणारे नाते संबंधित कट्टे आज तसे रिकामेच दिसत होते. 
कुठेशी झाडाच्या आडोश्याला मात्र काही प्रेमी युग्लांचा पावसाळी अधिवेशन भरलं होतं . ते अन त्यांचे चाळे (दुर्लक्ष करूनही) . नजरेस येत. अन मनात गुदगुल्या होत.
साला आपलं नशिबाच नाही यार....एक मुलगी पटत नाही अजून ... असा स्वर मनातल्या
मनात उठाव करी अन पुन्हा शांत होई . 
काही वेळा तर कल्पनाच्या दुनियेत ते हरखून जातं . ह्या पावसाचं अन प्रेमाचं मनोमन चित्र उभारून ... 
पाऊस ...
कुणाला आवडतो तर कुणाला आवडत नाही . कुणी त्यास शिव्या शाप देतो.
कुणी त्याच तोंडभरून कौतुक करत . पण त्याला त्याची कसलीच देव घेव नाही. .
तो आपला त्याच्याच धुंदीत त्याच्या स्वभावानुसार वावरत असतो.
कधी धो धो .. कधी रिमझिम बरसत , कधी पाठशिवणीचा खेळ करत तो आपल्या मनाशी प्रतीबिंबित होतो.
कधी कुणा काही न सांगता कुठेसा दूरवर निघून जातो....मनाची उत्कंठा वाढवत .
प्रेमी युगालांच्या मनाशी तर त्याची विशेष छाप, त्यांच्या तो जिव्हाळ्याचा विषय ..

गप्पांच्या ओघात नकळत , कुठूनसा चोर पावलाने हळूच बरसणारा हा पाऊस वेडावून सोडतो .
सुखद आठवणी देऊन ..!
स्पर्शाची एक वेगळीच जाणीव अन व्याख्या देऊन जातो हा पाऊस ..
आडोसा मिळावा म्हणून घेतलेली धाव अन त्या नकळत झालेला स्पर्श , त्या स्पर्शानं उसावलेला दीर्घ स्वास ...अन शहारून आलेलं अंग ग ..हि धुंदीच काही वेगळी ...मादक .. मदहोश करणारी ...! 
कित्येकांच्या मनात ह्या पहिल्या पावसाची सर अन त्या आठवणी नव्याने फुलत असतील ....
अन आपण अजूनही तिच्या शोधात मात्र हिंडत आहोत ...
कुठेशी ठेच लागली .
स्वप्नांच्या कल्पिक दुनियेतून बाहेर येत ..कधी गडकरीला येऊन स्थिरावलो ते
कळेलच नाही. मित्र अजूनही आला न्हवता .
पण ह्या पावसाने मात्र चांगलाच रंग भरला होता ...तो बरसतच होता धो धो... धो
धो...धो धो......
क्रमश :-
संकेत पाटेकर
०७.०७.२०१५


हा खळखळता 'प्रवाह' हि कुठेशी शांत होतोच ना ...

हा खळखळता 'प्रवाह' हि कुठेशी शांत होतोच ना !
त्याला हि त्याचं ते खळखळून बागडणं, खळखळून हसणं , खळखळून वाहणं , ह्या सर्वांपासून कुठेशी दूर , निवांत अन मोकळ्यापणानं पहुडावं वाटत असेलच ना??
म्हणूनच अशी वेडी वाकडी वळण घेत, तो हि कुठे दूर , समतल ठिकाणी , मुक्तअंगे स्वतःला झोकून , 
अगदी निच्छलं होवून जात असेल .. शांत अगदी ..न्हाई का ?

जिथे केवळ एकांत आहे. खळखलाट नाही .
जिथे वाऱ्याचा हलकासा शिडकावा आहे , वावटळ नाही . पण प्रसन्नता नक्कीच आहे .
जिथे हिरव्याशार सावलीने अंग अंग शिरशिरून जात आहे.
जिथे प्रवाह वाहता असला तरी त्यात निमुळतेपण आहे . निवांतपण आहे .
जिथे आत्मा आहे . स्वतःशीच कुजबुज करणारा ...
आपल्याला मनास देखील असंच काहीसं हवं असतं......नाही का ?
असंच काहीसं ..
मनातलं काही..
संकेत य पाटेकर
१७.०७.२०१५

वरळी सी-लिंक अन ती पावसाळी रात्र ...

रात्रीचे आठचे ठोके पडले.  तलाव पाळीला वळसा घेत संथ पाऊलानिशि मी आपला  गडकरी रंगायतन च्या प्रांगणात प्रवेश करता झालो. मित्र  अजूनही वेळेवर काही पोचला न्हवता .
नेहमीचीच त्याची सवय   , सांगून  कधी वेळेत पोहचलाय  म्हणून शप्पथ .....

आजही नेमकं असच, सांगितलेली वेळ टळून गेली होती . 
मी आपला उगाचं  ईकडनं - तिकडनं चौफेर नजर टाकत ताटकळत उभा होतो.  
पाउस,  गुणगुणनाऱ्या  वार्यासोबत ताल धरून अद्यापही  सूर लावून होता .
सकाळपासूनच त्याची जी रिपरिप  सुरु होती ती अद्याप हि सुरूच होती .
 कृष्ण मेघांनी हे आभाळ घेरलं होतं. विद्युलत्ता  हि अधून मधून आपलं अस्तित्व दाखवून जाई. 
तेंव्हा  मनात काहीशी धडकी भरी . पण क्षणभरासाठी ....

वातावरणात  हि मस्त हुडहुडी आणणारा गारवा पसरला होता .  
मनसोक्त पावसात न्हाऊन निघण्याची इच्छा आज पूर्णत्वाला जाणार होती .
 तनं -मनं  त्यासाठीच  तर  आतुरलं  होतं  .
माझ्या सह्याद्रीतल्या दऱ्याखोऱ्यांतून,  उनाड वार्यासंग चौफेर उधळणाऱ्या पावसाची सर, ' ह्या मुंबईतल्या पावसाला कुठे येणार , हे ठाऊक होतं.
तरी हि  भिजायचंच  होतं  बस्स.. ह्या एकाच  कारणांन  आज मित्रासोबत त्याच्या दुचाकीने कुठेशी जाण्याचं योजील होतं . 
पण त्याच्याच अजून ठावठिकाणा नव्हता. दिलेल्या वेळेपत्रिकेनुसार हा भाई  जरा दहा-पंधरा  मिनिटे उशिरानेच पोहचला .  तो हि पूर्णतः भिजलेला  .. कुडकुडलेला   ..दातखिळ्या  वाजवतच .

मी मात्र अजूनही कोरडा करकरीत  डोक्यावर छत्रीचं पातं धरून  उभा होतो.
तो येताच  रस्त्याकडेला खेटून असलेल्या , ' एका हॉटेलमध्ये वाफाळलेल्या चहाचा घोट घेत, आम्ही गप्पांचा  फड रंगवला  अन त्यातच गप्पांच्या  ओघात  बोलता बोलता मुंबईतलं  धावतं ठिकाण हि  ठरवलं .
ठाणे - वरळी सी लिंक -- मरीन ड्राईव्ह  अन तिथून पुन्हा घरी ...
मनसोक्त भिजायचं ...अन भिजायचं.  बस्स ...

साधारण साडेआठ वाजता , ठाणे  पूर्वद्रुतगती मार्गे , आमचा हा  दुचाकीप्रवास सरू  झाला.
वाऱ्यागतीनं  ..पावसाच्या  टपोर्या थेंबाचा मारा झेलत , कधी तो  चुकवण्याचा प्रयत्न करत,   वेगावर नियंत्रण ठेवत , आम्ही सुसाट निघालो.

माझा जन्म हा मुंबईचा . लहानाचा मोठा इथेच झालो. त्याचा सार्थ अभिमान आहेच.  पण तरीही मुंबई अजून काही पूर्णपणे फिरलो नाही. इथेले रस्तो रस्ते , गल्लो गल्ली चा अजूनही धुंडावा नाही .  
इथल्या प्रसिद्ध असलेल्या काही  देवस्थानाचं  दर्शन हि अजून दुर्लभच म्हणा  ...
मात्र आजच्या हा  दुग्धशर्करा योग  म्हणावा  लागेल.  
काळोख्या रात्रीची हि लखलखति  मुंबई , अन इथले रस्तो रस्ते पाहण्याचा योग आज जुळून आला होता . सोबत वरून राजाची  कृपा ..हि होतीच .

उधाणलेल्या सागराची धून  तर आताच कानी गुंजत  होती. त्यासाठी मनं धडाडत होतं.
 मुंबईतलं  मरीन ड्राईव्ह हे माझं सगळ्यात  आवडतं  ठिकाण.
भर गर्दीतही इथला एकांत मनाला स्पर्शून  जातो . म्हणून अधेमधे  एखाद फेरफटका हमखास
इथे  असतोच असतो....
तरीही  पावसातलं अन काळोख्या   रात्रीचं अनोखं रूप  , मी अद्याप अनुभवलं  न्हवतं  .  
ते आज  अनुभवयास मिळणार होतं .  त्यासाठीच निघालो होतो ....आनंदसरी झेलत..

ठाणे - भांडूप - विक्रीली - चेंबूर असा प्रवास  करत आता आम्ही पुढे सरसावलो. 
पावसाची संततधार अद्याप हि  सुरू  होती.
ठीक ठिकाणी वाहनाच्या लांबच लांब रांगा नजरेस  येत होत्या . 
त्यांच्या त्या लाल पिवळ्या रंग छाटायीमुळे, मनाभोवती सुरेल रंग मिश्रित नक्षत्रांच वलय निर्माण झाल होतं. 

डांबरी  काळ्या रस्त्यांना  झळाळी  मिळाली  होती . पावसाच्या सरींमुळे ते हि आधीच स्वच्छ न्हाहून  निघाले होते. त्याचे प्रतिबिंब मनाशी उमटत होतं.   
तसेच ..काळोख्या रात्रीची हि  मुंबई  ,  तिचा झगमगाट ,  उंच आकाशाला गवसणी घालणाऱ्या   टोलेजंग इमारती , त्यांचा दिमाखीपणा  त्याची  रोषणाई मनाभोवती विलासात होती.

खर तर  रात्रीचा हा प्रवासच  सर्वार्थाने वेगळा असतो .  निरव शांततेचे  पडघम अलगदपणे  सुरु असते
अन अश्यावेळी नाना विचारांचं  बीज मनात आकर घेऊ लागतं . मग सृष्टीच्या नवलाईच्या दुनियेतुन  स्वतःचे प्रश्न हि सुटले जातात. काही प्रश्नासाहित ऊतर मिळू लागतात . 
म्हणून दिवसापेक्षा हि रात्रच अधिक तपस्वी वाटते मला  . शांत निच्छलं अगदी ...
तर असो

रात्रीचे साधारण दहा वाजले होते. . रस्त्याला फारशी रहदारी  न्हवती.
दादर प्रभादेवी  मार्गे येता येता सिद्धिविनायकाचं  मनोमनं  दर्शन घेत आम्ही  वरळी सी लिंकच्या किंचित पुढे येउन पोहचलो. 
तिथेच रस्त्या कडेला बाईक उभी केली. अन सागराचं  उधाणलेलं रूप न्हाहाळू लागलो. 
किती अथांग अन अफाट आहे हा  समुद्र .......शब्दांची गुंफण होऊ लागली. 
लाटांचा आवेग  कानाशी  हळूच झुलक्या  घेऊ  लागला .  भरून आलेल्या आभाळची आर्त हाक आता शब्दांची लय पकडू लागली. 

अरे ऐक रे मानवा 
किती वेदना रे पोटी 
घेउनि दुखाचे पारडे 
उधळतो हास्य मोती ! 

हा सागर विलास 
घेतो सामावूनी सारं 
त्याचं  मन रे मोठालं
त्याचं  मन रे विशालं  ! 

किती अथांग अन अफाट आहे हा समुद्र ?   कितीतरी अनाकलनीय गूढ , कितीतरी लक्षणीय घटना , कीत्येक वर्ष आपल्या पोटी एकवटून आहे हा.. 
वरवरून जरी हा  उधाणलेला ,खवळलेला  दिसत असला तरी त्याच अंतर्बाह्य मन एखाद्या तपस्वी साधू सारखच तेजस्वी अन शांत वाटतं. खरच आत्मसात करून घेण्यासारख्या कितीतरी मौलिक  गोष्टी आहेत ह्याकडे ..त्यासाठी तशी दृष्टी हवी .. एकांत साधणार मनं हवं. 
मी स्थिर मनानं ते न्याहाळत होतो.  

निरव शांततेचे पडघम अद्याप हि सुरु होते .रस्त्यावरच्या  मिणमिणता प्रकाशात सोडला तर कालोख्याने सर्वत्र अंधारलेलं. 
अधून मधून शिवशिवनारा अल्लड वारा अन सागरी तुषार अंगावरून शिड्कावून जातं  . त्याने अंग शहारून येई . 
आम्ही दोघेही तसे   पूर्णपणे भिजलो होतो . कुडकुडू लागलो होतो
तरीही क्षितिजाशी जड अंतकरणाने भरली रेखा नजरेआड होत न्हवती . वेळ मात्र  पुढे सरत होती . 

निघायची वेळ झाली. घरी जाईपर्यंत तरी आता बारा वाजणार होते. 

पण त्याचा प्रश्न न्हवता . मनसोक्त भिजलो होतो . आता फक्त कडकडीत वाफालेलेला चहा तेवढा  हवा होता........................

 संकेत य पाटेकर 
०७.०८.२०१५