शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

Love marriage कि Arrange marriage हा एकच मोठा सवाल आहे...

Love marriage कि Arrange marriage हा एकच मोठा सवाल आहे... 
हे करुणाकरा ऐकतोयस ना ?
जिच्यासोबत भावी स्वप्नांचं चित्र चितारलं त्या माझ्या प्रिय सखेशी कि अजूनही माझ्या आयुष्यात पदार्पण न केलेल्या त्या अनोळखीशी , कोणाशी नक्की सुत जुळवनार आहेस रे ? हे एकदा ठामपणे सांगून टाक , आणि मोकळं कर रे मला , ह्या अविवाहा तांच्या जगण्यातून ..
अजून किती रे , हे असं असह्य जगणं मी जगायचं ? सांग तरी ? 
विरहाच्या अपार वेदनेने कष्टीलेल्या, ह्या माझ्याच मनाची ...हि ढासळलेली प्रतिमा मलाच पाहवत नाही रे , तुला तरी हे कसं पाहवतयं. ? हा ?
अरे , जिच्या ओढीने अद्यापही हे मन वेडावलं जातं. जिच्या नुसत्या नावाने , सर्वांग शहारून मन फुल पाखरावानी मोकळी झेप घेतं , जिच्या विचारातच दिवस रात्रीचा क्रम स्वप्नील कथेप्रमाणे बदलत जातं. अरे तिच्या मनात तरी प्रेमाचे कारंजे उमलू दे रे ... 
प्रेम गंधाने शहारलेलं अत्तर पुन्हा एकदा घमघमू दे रे ...
हे करुणाकरा …
 ऐकतोयस ना ..ऐकतोयस ना काळजाने तुटलेल्या ह्या मनाच्या वेद्नेंची हि लक्तरं.. 
अरे ...प्रेम मनाचं हा सेतू , कधी हि न तुटणाऱ्या विश्वासाच्या दोरीने जुळू दे रे एकदा...

मान्य आहे मी चुकलो. 
चुकलो मी त्या एका क्षणी, संयमीमनाचा हा बांध , मला योग्य त्या समयी रोखता आला नाही . म्हणून का त्या एका चुकीसाठी एवढी मोठी सजा , का रे ? माणूस आहे तो चुकणारच ना ?
हे विधात्या...
तू सर्व व्यापी अन जाणता आहेस , मग तरीही माझ्या बाबतीतच इतका कठोर का झालास ? 
घडून गेलेल्या गोष्टीचं प्रायच्छित करून देखील ,माझ्या ओंजळीत हेच का ? 
नकाराच्या स्वरसुराने छिद्र पडलेल्या ह्या हृदयी मनाची वेदना किती , हे तू जाणूनी आहेस नां? तरीदेखील हे असं ? 
विस्कटलेल्या ह्या मनाची घडी अद्यापही मी सावरतोय रे ..
पण तिच्यावाचून ते शक्य नाही ..अन हि वेळ हि न्याय देत नाही.
एकाबाजूस, कधीही कुणासाठी न थांबनारया , ह्या वेळेची दहशत तर एका बाजूस न उलगडलेल्या तिच्या मनाचे कोडे आणि सोबत हे अनोळखीचे दोरे , हे विधात्या शेवटी तूच काय करावं ते सांग ?
लग्न करावे कि नाही हा एकच सवाल आहे ?
कुणी लग्न जुळवून देत का रे , लग्न ? तिच्याशीच …
असंच काही ..डोक्यात घुमलेलं आणि लिहिलेलं 
- संकेत पाटेकर 
२९.०१.२०१६


गुरुवार, १४ जानेवारी, २०१६

काही सांगायचं आहे तुला...

काही सांगायचं आहे तुला...
ऐकशील ..?
मला माहित आहे , माझ्यावरचा राग अजूनही तुझा ओसरला नाही. तो ओसरला नसेलच. पण तरीही ..सखे ...काही सांगायचं आहे मला.
ऐक ?रागावू नकोस रे ..
तसं मनातल्या मनात तू म्हणत असशीलच ? का हा असा, सारखा त्रास देतोय ?का असा छळतोय ?
मी एकदा नाही म्हटले ना , तरी हि पुन्हा पुन्हा तोच प्रश्न ...का ? हो ना ?
वेडावून त्रस्त होत असशील तू .. नाही का ? तुझ्या शब्दात म्हणायचं तर डोक्याचा भुगा होतोय ? हे ना ?
पण काय करू सखे , माझ्या बाबतीत हि असचं आहे बघ , मला हि ह्या साऱ्यांचा खूप त्रास होतोय. पण तुला रे कसं कळणार ?
आणि कळलच तरी तू , तुझं मन ....माझ्यापुढे मोकळ करणार आहेस का ?
ह्या प्रश्नाच उत्तर तसं नाहीच मिळणार , हो ना ? मला हि ह्याबद्दल काही बोलायचं नाही आहे.
पण सखे , मला त्रास होतोय म्हणून मी तुला असा त्रास देत आहे . असा विचार मात्र तू मनी धरू नकोस.
तेवढा मी असभ्य अन वाईट वर्तनाचा मुळीच नाही हा ..
खर म्हणावं तर माणसाला गैरसमजूतिचे हे धागेच खूप अधिक त्रास देतात. गुंडाळून ठेवतात. अकारण ..शंका कुशांकाच्या अंधाऱ्या झोळीत ...
मला वाटतं आपल्या दुभंगलेल्या मनाचं अन तुटलेल्या ह्या नात्याचं हि हेच कारण आहे.
तो गुंता आपण काही सोडवला नाहीच. पण तो गुंता न सोडवताच , एकमेकांपासून मात्र असे दूर निघून गेलो.
म्हणावं तर अगदी जवळ आहोत आपण ..अगदी हाकेच्या अंतरावर ...पण तरीही मनातून मात्र दूर असे...
कधी आठवण येते का रे , तुला माझी ?
नाही आपलं सहजच म्हटल.
तसं मनात घर केलेली माणस , सहजा सहजी विसरता कुठे येतात रे ... न्हाई का ?
राहू दे ..नको सांगू ..
माझ्याकडे तुझ्या आठवणीची मात्र उजळनीच सुरु असते रोज..
किती सुखद अश्या आठवणी आहेत रे त्या , सुखद आहेत म्हणूनच निसटून गेल्याचा त्रास..
काय गम्मत आहे बघ ना,
ह्या क्षणांना पकडता येतं , बांधून ठेवता येतं , आठवणी स्वरुपात , पण व्यक्ती ....
त्यानां नाही धरून ठेवता येत रे ... त्या निघून जातात..आल्या वाटे , तू हि अशीच निघालीस , न्हाई ?
मला एकाकी करून ...जे घडायचंच ते घडलं . रंगवलेले सारे स्वप्न हि अपुरेच राहिले .
असो , मला माझ रडगाणं गायचं नाही आहे .
एक मात्र सांगायचं आहे सखे ,
एकेमांपासून दूर झाल्यावर , तुझं अस अबोल, एकाकी नि शांत राहण , मला स्वस्त बसू देत नाही रे,
तुला त्रास देण्याचा तसा काहीही हक्क नाही आहे मला ...
हे नातंच जेंव्हा आतून तुटलं. आतून म्हणजे काळजातून ..तेंव्हाच तो हक्क मी गमावून बसलो.
म्हणायला तसं आपल्या मैत्रीच्या नात्यातला अर्क अजूनही शाबूत आहे हा..
म्हणूनच त्या हक्काने ह्या शब्दांची हि केविलवाणी धडपड ...
सखे , अशी दूर नको ठेवू स्वतःला ? एकाकीपणात अशी नको रे बांधून घेऊ?
मनाचे सारे कवाड बंद करून , निशब्दाचे तुझे हे गहिरे बोल ...खूप खोलवर रुजतात रे ह्या काळीजास ..त्यानेच चर्र होतंय बघ ..
त्रास होतो रे ..तुला नाही कळायचं ते.
भावनांची ओढ हि अजूनही तशीच आहे अगदी.., भलेही आपल्यात संवाद होत नसेल. भेटी गाठी होत नसतील . पण प्रेमाचं हे चीटपाखरू पंख पसरून अजूनही भिरभिरतंय रे तुझ्याच अवतीभोवती..
तुझीच खूप काळजी वाटतेय ..तुझ्या ह्या अबोलपणाची , तुझ्या तब्येतीची ..
ठीक आहेस ना ?
एकाकी अशी का रे गुंतवून ठेवतेयेस स्वतःला ?
जरा बाहेर ये ह्यातून ..
तुझ्या चेहऱ्यावरती हास्य रेषेची ती सोनेरी खळ ...मला पुन्हा उजळलेली पहायची आहे .
माझ्यासाठी नाही रे , पण तुझ्या स्वतःसाठी..
हे एवढ करशील का रे ....
तुला हसताना सदैव पहायचं आहे . बाकी काही नाही .
म्हणूनच हा अट्टाहास ...सखे .. :) 
तुझाच ..
असच लिहिता लिहिता...
- संकेत य पाटेकर
१३.०१.२०१५

शुक्रवार, ८ जानेवारी, २०१६

निर्दयी मन...

 ‘’अरे बाबा , अंदर  खडे रेहने के लिये जगह नही है  ..’’
‘और तुम ये हे बच्चा  लेके ..., ‘ ना ना , पीछे और एक गाडी हे ..उससे आ जावं.’ 
कंडक्टर ने जरा हेकाटा देतंच म्हटले .
तरीही ती बाई काही ऐकेना...
चलेगा .. अस म्हणत ती शेवटी लगबगीने  आत शिरलीच.
कडेवर  दोन तीन वर्षाचं  तिचं पोर  अन मागोमाग  सत्तरीच्या पुढे असलेली ती म्हातारी (बहुदा आई असावी )दोघीही  एसटीत कसेबसे चढले. तसे  कंडक्टर ने एसटीच दार थाड करून  ओढून घेतले. अन एसटी पुन्हा मुंबई दिशेने धावू  लागली.

खेड  डेपोतून निघून आताशा एखाद तास  झाला होता.
पन्हाळे- मुंबई मार्गे असणारी हि एसटी रविवार असल्यामुळे जरा भरगच्चच भरली  होती.
आसनस्थ होण्यास हि  जागा उरली न्हवती. त्यात प्रत्येक एका व्यक्ती मागे त्याच्या ३ -४ पट असलेलं सामान. ते  सांभाळता सांभाळता त्यांनाच नाकी नऊ येत होते. 
आम्ही खेड वरूनच एसटी पकडली असल्याने बसण्यास तेवढी काय ती जागा मिळाली.
३ दिवसात ३ किल्ले  सर करून थकले भागलेले हे शरीर आता घरच्या  ओढीने,  बसल्या जागी निवांत पहुडल होतं.
दाराच्या उजवीकडच्या  बाजूलाच म्हणजे वाहन चालकाच्या रांगेत असलेली ,  पुढील एक सीट सोडून मागील दोन सीट वर आमचे तिघे मित्र ऐसपैस बसले होते.
कुणाचं आरक्षण नसल्यामुळे कसलीच चिंता न्हवती. पण चौथी सीट म्हणजे पाच नंबरची सीट तेवढी आरक्षित होती.
खेडच्याच असलेल्या गावाच्या एक काकू कितीतरी बोचकी सोबत घेऊन मुंबईला निघाले होते . कुणा नातेवाईकाकडे  त्यांची ती सीट...
तश्या त्या  एकट्याच होत्या पण त्याचं  सामान म्हणजे  दोन तीन जणांच बिऱ्हाड असेल एवढ.  .
ते सामान एसटीत पोहोचवण्यासाठी कुणी एक माणूस त्यांच्या  सोबत आलं  होतं. .  ते  सामान  त्यांनी एसटीत  तेवढ चढवून  दिलं . अन ते निघून गेले .
पण त्या सामानाची आवरा- आवर करता करता , व्यवस्थित जागी  ठेवता ठेवता , त्या काकूंची पार धांदल उडाली.
कंडक्टर हि नेमका त्याचवेळेस तिकिटासाठी उभा राहिल्याने , ऐनवेळी तिकीट हि मिळेना अशी त्यांची  अवस्था...
शेवटी इकडे तिकडे शोधा शोध करत  एकदाची काय ती तिकीट गवसली .
अन त्या काकू सामान आवरून ,  स्वतःला सावरून ,  चौथ्या सीटवर आपल्या जागी  निवांत बसल्या .
आमच्या मित्रांनीही त्यांना सामान आवरण्यास हवी   ती मदत केली.

मी मात्र ह्या सर्वांपासून जरा दूरच बसलो होतो. ते सगळ पाहत होतो.
पाच नंबरच्या त्या चौथ्या सीटवर त्या काकू आल्यामुळे मला दुसऱ्या एका  सीटवर बसण भाग होतं. मित्रांपासून  म्हणून जरा विलगलो गेलो होतो  .
कंडक्टरच्या रांगेत अगदी दुसरी  सीट सोडून तिसऱ्या सीट वर मला जागा मिळाली.

मी  तिथे निवांत पहुडलो.    आम्हा चौघा मित्रांच्या , तीन  दिवसाच्या ,सह्याद्रीतल्या  कॅमेरात टिपलेल्या त्या आठवणी पाहत...कधी सभोवताली हळूच डोकवतं.    

एसटी तले सर्वच तसे त्यांच्या त्यांच्या दुनियेत गाढ झाले होते. 
एसटी हि तिच्या गतीनं  वळण घेत धावत होती.

दुपारचं  उन्हं  पसरलं होतं.
दोनच्या आसपास खेडवरून निघालेली हि  पन्हाळे मार्गे मुंबई एसटी , वाशी ला पोहचेपर्यंत रात्रीचे चांगलेच  आठ ते साडे आठ वाजणारे होते . अन  खेड सोडून आताशा  फक्त  एक  तासाच  झाला होता . अजून  बराच  अवधी तसा बाकी  होता.
खेड ते मुंबई  ह्या धावत्या प्रवासात ,ह्या कोकण मुंबई प्रवासात  .. ना ना चेहऱ्यांची,  ना ना स्वभावाची माणसं  भेटत होती. 
अनोळख्यांची स्वभाव शैली दुरूनच ओळखून येत होती,  नवं नवीन शब्दावली कानावरून  अधोरेखित होत होती,  तसेच खिडकीच्या चौकटीतून  सृष्टी सौंदर्याच  विहिन्ग्मय दृश्य  हि नजरेस पडत होतं .

हे आयुष्य म्हणजेच हा एक प्रवास आहे .  जन्म अन  मृत्यु मधला संघर्षमय अन तितकाच रोमहर्षक असा प्रवास. ह्या प्रवासात आनंदी लहरी आहेत , शरीरमनाला उजळू देणारे , चैतन्य सुख देणारे  तसेच दुःखाचं भवसागर हि आहे  ..शरीर मनाला पार जखडून टाकणारं ...वेदना देणारे ..

मानवी भावनांचे कितीतरी पैलू इथे अनुभवयास मिळतात आपल्याला, सर्र्रास रोजच्या रोज अगदी ..
कधी हासू , कधी अश्रू , कधी राग कधी लोभ , कधी ओढ कधी विरह ...कधी एकांत कधी एकाकीपण.....
भावनांची किती हि उथळ खोली . त्याचं माप घेता येत का ?
क्षणा क्षणाचे हे नवं नवे अनुभव घेत , नव्या विचारांची सकारात्मक उजळणी करत, आल्यावाटे  मार्गीस्थ होत,  हे आयुष्याचं प्रवासी पुस्तक  आपल्याला रंगवायच असतं, रेखाटायचं असतं .
 ह्यातून आपण  जगण्याला अन ह्या  जीवनाला अनुरूप असे एक वळण  देत असतो.
एसटीतला  हा आमचा आजचा प्रवास देखील त्यातलाच एक भाग.

गाडी एका थांब्यावर थांबली .   तसा कंडक्टरचा आवाज कानी गुंजला .
‘’अरे बाबा , अंदर  खडे रेहने के लिये जगह नही है  ..’’
‘और तुम ये हे बच्चा  लेके ..., ‘ ना ना , पीछे और एक गाडी हे ..उससे आ जावं  ‘
त्या आवाजाने  माझी  नजर अन कान दोन्ही त्या दरवाजाकडे अन त्या बाईकडे एकवटले . 
ती बाई , त्या कंडक्टरच्या ओरडण्याला न  जुमानता बिगीबिगी आत शिरली.  
अन तिच्या मागोमाग सत्तरच्या आसपासची, वयोमानानुसार सुरकुत्या पसरलेली अन थरथरत्या अंगाची म्हातारी  हि ..

दोघेही जागा पाहू लागल्या.एसटी तशी भरगच्च होती.  बैसन्यास अशी जागा नव्हतीच. पण   
तितक्याच एक प्रवासी , माझ्या पुढच्या सीटवरला  जागेवरून उठला अन 
त्या सीटवर ,  त्या तरण्याकाठ्या   बाईस लगेचच  जागा मिळाली. 

हाती एकुलतं  एक पोर सांभाळत तिने महाड ची दोन तिकीट घेतली.  अन निवांतपाने ऐटीत बसली.
आपल्या सोबत कुणी एक म्हतारं माणूस देखील आहे . ह्याची तिला पर्वा नसावी .
हे  उघड उघड दिसत होतं. 
तिच्यासोबत असलेली ती म्हातारी  धावत्या ह्या एसटीत स्वतःच तोल सांभाळत कशीबशी उभी होती.
नजरेनेच  विनवत होती , ‘ अरे बाबा , कुणी ह्या म्हातारीला  बसायला जागा देत का रे ? जागा ? ‘
वय झालं रे बाबा , नाही उभ राहता येत . दया करा रे कुणी  , असच जणू सांगत होती. 
तिच्या एकुलता एक पोरीला देखील  तिची कीव येईना.  साधं ढुंकूनही  तिच्याकडे पाहण्याचे कष्ट ती घेत नव्हती .  इतकी निर्लज्ज ., इतकी कठोर ..इतकी निर्दयी ..

कशी कशी लोकं असतात एक एक ,  ज्या  पालकांनी  अपार कष्ट करून  लहानाचं  मोठ केलं ,  त्या पालकांवर अश्या अवस्थेत हि सजा . अरे कुठे फेडणार हे पाप सगळ, इथेच ना .., थोडी लाज अन  भय बाळगा .

त्या म्हातारीची  अवस्था पाहवत न्हवती. दूरचा पल्ला असल्याने कुणीही बसल्या जागेवरून उठायला तयार न्हवते.
शेवटी   राहवलं नाही .  मी जागेवरचा उठलो. म्हटलं , आजी निवांत होवून बसा अगदी…
त्यांना थोड आधार देत . त्यांचा  हात धरत , माझ्या जागी त्यांना बसवलं. अन त्या निवांत झाल्या.
त्यांना निवांत झालेलं पाहून मला हि बर वाटलं.   
जीवनात तसा प्रत्येकाला आधार हवा असतो .  ती आधार धारी व्यक्ती मग कोणतीही असो तिला वयाची अट नसते . असते ती प्रेम भरल्या मायेची अन  मानसिक आधाराची फक्त गरज . 
प्रसंगी कुणासाठी तो  आधार आपण हि कधी व्हावं. जगण्यासठी अन लढून जगण्यासाग्ठी हे बळ पुरेसं  असतं. विचारांचं चक्र अस वाहत होतं.
तिच्या मुलीवरचा राग मात्र अधिकतेने  वाढत होता. दोन तीन शब्दांचे डोस तिलाही द्यावेत   अस वाटू लागलं.
पण ते काही मी केलं नाही . पण मनात विचारांचे  चक्र तेजाने फिरू लागले.
अरे आपल्या आई बाबांची  काळजी घ्या रे...
आई बाबांचीच कशाला ..जे कुणी आपल्या आयुष्यात येत ..त्यांची काळजी घ्या . प्रेम द्या प्रेमाने रहा.
जितकं  प्रेम द्याल तितकं अर्थपूर्ण जीवन जगालं.
- संकेत य पाटेकर
०८.०१.२०१६

शुक्रवार, ११ डिसेंबर, २०१५

‘तुला कोणत्या नावाने हाक मारू? ’

‘तुला कोणत्या नावाने हाक मारू? ’
‘संवाद’….हा मग कुठल्या हि नात्यातला असो .तो विशेष प्रिय असतो . 'जेंव्हा ती व्यक्ती हि तितक्याच जिव्हाळ्याची असते,  तेंव्हा '
मग हा संवाद , आठवणीतला असो ...जणू तो आताच घडलायं ...घडतोय, ह्या क्षणी ...इतकं आपण त्यात गुंतले जातो.  कधी कधी ...
अन त्यात जर दोन  मनातला प्रेम संवाद असेल तर ...
त्यात तर मग विशेष लाडीगोडी, रुसवा असतो ,नखरा असतो, खट्याळपण असतं. ओतीव प्रेम असतं ....
असाच हा संवाद ..त्या दोघातला ..
‘गुड मोर्निंग ....’
त्याच्या नेहमीच्याच स्वरील सवयीने त्याने तिला ‘गुड मोर्निग’ केलं.
(दिवस असो वा रात्र ..ह्याचं ‘गुड मोर्निंग’ कायम ठरलेलं . आजची सुरवात देखील अशीच.)
‘गुड मोर्निंग ...’
गुड इविनिंग झाले हं ...!
तिच्या मधाळ आवाजतील हे शब्द्गर त्याच लयीत घुमूघुमू लागले.
‘हम्म ..’’
मग निघालीस ऑफिस मधून ..?
हो ..थोड्या वेळा पूर्वीच .
‘ओके ...’
मग काय केलेस घरी , दिवसभर ? तिने प्रश्न केला ?
फुकट गेला रे दिवस ?
‘अरे’ रे रे , रे ...तिच्या शब्दांचं खट्याळ स्वर उनाडू लागला.
घरी असल्यावर असंच होतं दिवस वाया जातो..काय करणार., त्याने आपलं कारण बोलून दिले.
‘अच्छा... ’
‘हम्म...’
‘मग तुला सुट्टी न्हवती. ?’
ना रे , आम्हाला सुट्टी नसते अशी..
अच्छा...

हं ...
तर.... तू मला कोणत्या नावाने हाक मारशील ?
काल परवाच झालेल्या दोघांमधल्या संवादातला, ‘ तोच मुद्दा आज, तिने पुन्हा उपस्थित केला. अगदी लाडीकतेने.., शब्दांना आलाप देतं.
कोणत्या नावाने हाक मारू ?
तू ठरवले असशील ना काही ?
थोडसं विचारात डोकावल्या सारखं करतं (खर तर त्याला, तिचे जे नाव आहे , तेच अधिक पसंत.. पण तरीही )
‘’ वेडू ,वेडे हे कसं वाटतं ?’’
‘ना...........’
मग ...हृदया कसं आहे ?
‘काय’ ? अचंबित झाल्याप्रमाणे तिचा स्वर उंचावला गेला .
‘हृदया’ ...........हे काय नाव आहे का ?
‘हो.’.त्याने उत्तर दिलं .
कोणाचं नाव आहे ?
हृदयाचं , हृदय असतं नां , आपलं हृदय.. त्याचंच हृदया. ‘ त्याने खुलासा केला.
राहू दे .. .माझं सखीच छान आहे .
हम्म , छान आहे .
कारण ते माझं नावं आहे.
‘हो..’ .त्याने हि तिला दुजोरा दिला .
अन मला ते आवडतं , ‘ तिने स्वतःच्या नावाची अशी अभिमानी पसंती दर्शवली .
मला हि ..
तुला कशाला ?
असंच , ‘त्याने घुमजाव करत ऊतर दिलं.
असंच...पण कशाला , काहीतरी कारण असेल ना , हं ? जरा नकट्या आवाजातला स्वर ओढत तिने म्हटलं ?
कारण ते तुझं नाव आहे नां ..गोड- मधाळ असं ..!
‘अच्छा... ’
‘हम्म ... ’
’हे ना ’ ? तिचा हा नेहमीचाच खट्याळ अन वेडावणारा शब्द...तिने पुटपुटला , खास त्याच्यासाठीच .
बरेच दिवसाने आज ..’हे ना’ म्हटलेस ..
‘हा ...’
मग , माझी आठवण काढत असशील ना ?
‘हो...’
किती ? अगदी निरागस बाळासारखं कुतूहलाने तिने प्रश्न केला .
किती म्हणजे ? हे सांगू शकतो का ? किती प्रेम आहे?किती आठवण काढतो ते ?.
‘शब्दात वर्णन करू शकतोस ना ..? तिने अल्पशा रागातच जरा हेकटले .
नाही सांगता येणार ..वेडे , ते विस्तारलेल्या आकाशासारख असतं. त्याला मर्यादा रे कसली ? तो उत्तरला .
‘हम्म...'
बाकी , कसं चाललय सगळ , घरातले वगैरे ..? त्याने खुशालकी विचारली.
ठीक आहेत , ‘ मी घरात सगळ्यांशी मिळून मिसळून असते . पण एक मात्र आहे , माझ्या घरी माझाच जास्त दबदबा असतो .’
अच्छा..., दबदबा ..गुड ...!
‘हा....’
पण असंच मिळून मिसळून अन आपलेपणानं राहावं ....सर्वांशी ! तो उत्तरला.
‘हम्म..’
‘अरे ऐक ना, ‘माझ्या ऑफिस मध्ये ना , एक नवीन मुलगा Join झाला आहे .
तर तो नां माझ्याशी सगळ काही शेअर करत होता. घरापासून ते त्यांच्या गर्ल फ्रेंड बद्दल आदी सगळ मोकळेपणने..
‘अरे, वा ..छानच कि ..’
कसं असतं सखे,’ एकदा विश्वास जडला ना , कि माणसं अगदी स्वताहून , त्यांच्या सुख दुखाशी निगडीत असलेले क्षण आपल्याशी शेअर करतात. अन मोकळे होतात. हलकं वाटतं त्यांना ..
‘हो...’
तो जो विश्वास असतो ना , तो महत्वाचा असतो. तो मिळवला कि माणसं आपलीशी होतात . आपल्यात मिसळतात .
‘अच्छा ....मग तुझं माझ्यावर आहे ? तिने प्रश्न केला.
काय ? त्याने प्रती प्रश्न केला.
‘विश्वास ..’
कोणावर ?
‘माझ्या....वर ................’
माझ्या आणि मग वर.. हयातल्या पहिल्या शब्दावर जोर देत अन मग पुढे अंतर ताणत.. हा शब्द, तिने असं काही उच्चारला (ते हि दोन वेळा ) कि त्यातले ते नखरे अन त्यातली ती जादुई लय अजूनही त्याच्या मनावर रोमांच उमटवून जाते.
आज हि तो असाच त्या नशेत धुंदमुंद झाला होता . त्याच्या मुखी तिचं नावं हळूंच उमटलं जातं होतं . ...सखे..........वेडी सखे ! 
आठवणीतला हा संवाद .त्याला निसटलेल्या त्या काळात फरफटुन घेऊन जात होते.
उरलंच काय होतं म्हणा आता....आठवणीतले हे अनमोल क्षणचं..
सांजवेळच्या ह्या भरगर्दीत हि ....सागरी किनारी .. एकटक बसून ....तो हे सारे क्षण, ‘ पुन्हा अनुभवत बसला होता.’ भरीव हसऱ्या अश्या आठवणीच्या संगे ....’
आसपासच्या धावत्या जगाचं हि त्याला भानं उरलं न्हवतं .

प्रेम हे असंच असतं. 'स्व' ला विसरायं लावणारं...
इथे प्रत्येक क्षणाच्या आठवणी होतात . अन तो ठेवा आपल्याला हवा तेंव्हा उलगडता येतो.
पण ..त्या आठवणीतलं ते पात्र ..आपल्या सोबत असेलच अस नाही.
तुटलेल्या न दुरावलेल्या मनाची हि कळ त्याला ही अशीच स्वस्थ जगू देत नव्हती.
पण तरीही तो हसत होता . आठवणीतल्या तिच्या संगे......, नव्या आशेसह .....!
हृदया - एक स्वप्नं सखी..
- संकेत पाटेकर
१०.१२.२०१५
 


हृदया - एक स्वप्नं सखी..

हृदया - एक स्वप्नं सखी..
(एक छोटासा प्रयत्न पुन्हा एकदा ....) 
मावळत्या पिवळ्या धमक अन केशरीवर्णीय रंगछटांनी क्षितीज सजले होते. 
सूर्य नारायण नित्य नेहमीच्या आपल्या रिवाजा प्रमाणे ह्या अथांग बाहू पसरल्या सागरात आस्ते आस्ते विलीन होत साऱ्या जीव सृष्टीला निरोप देत होते . 
आजचा दिवस म्हणवा तर तसा कलंडला होता . कालोख्याचा साम्राज्य हळूहळू विस्तार घेऊ लागलं होतं. 
तो मात्र अजूनही एकटक नजरेने त्या उसळत्या फेसाळ लाटाकडे पाहत , भान हरपून गेला होता. 
मनात असंख्य विचारांचं तसं काहूरच माजलं होतं. 
गेले कित्येक दिवस तो तिच्याच विचारात तासनतास बसून राही. 
वेळेच भान उरत न्हवतं . कि कुठेशी लक्ष लागतं न्हवतं . वेडावला होता तो..

त्या आठवणी ते क्षण त्याचा पिच्छा सोडत न्हवते . जिथे जाऊ जिथे विसावू तिथे तिथे ते क्षण त्याच्या नजरेसमोरुन चालायचे , बोलायचे , हसायचे , हसवायचे , अन पुन्हा शेवटी उदासीत ढकलून द्यायचे . 
चेहऱ्याशी अस एकाकी हास्य फुलून मन पुन्हा एकाकीपणात वेढायचं. 
आपली एक चूक ...आपल्या नात्यात अशी फुट पाडेल, किंव्हा त्यानं विपरीत अस काही घडेल हे त्याच्या ध्यानी मनी न्हवतं . 
पण ते घडलं होतं , नियतीने घडवलं होतं . . 
जे होणार आहे ते होणार आहे त्याला कुणी टाळू शकत नाही ? का ? 
ते त्या नियतीलाच ठाऊक ? 
आपल्या प्रवास वाटे काय काय येणार आहे हे नियतीने आधीच आखून ठेवलेलं असतं अस म्हणतात. पण त्याचा आपल्याला काही मागमूस नसतो. जे वाटयला येईल ते आपण जगायचं . त्यातून काय ते घेत जायचं . अनुभवाने शिकायचं ..अन शिकत शिकता चालायचं . हेच त्या नियतीच नियम असावं . 

काही दिवसापूर्वी घडलेल्या प्रसंगातुनी त्याने असाच काहीसा धडा घेतला होता . 
त्या प्रसंगात मात्र दोन मनं तुटली होती . हृदय प्रेम संगीत कुठेसं हरपलं होतं. पण त्याचा स्वर अजूनही आलाप देत होता.
मनातली आशा अजूनही कुठेशी पल्लवित होत होती. . . त्याने तो काहीसा सुखावला होता. 
अन म्हणूनच गोड आठवणीच्या त्या सुरांमध्ये आज त्याचं भान हरपलं होतं. रात्र पांघुरली होती . तरी त्याचं काही गम्य नव्हतं. 
अर्धवलयाकार मरीन ड्राईव्ह च्या त्या कठड्यावर कित्येक जोड्या एकमेकांना खेटून गप्पांत दंगले होते .त्यांच्याकडे पाहून तो स्वतः हसे अन पुन्हा आठवणीत गुडूप होई. 

प्रेम , हे कधी कुणावर जडेल ते सांगता येत नाही. व्यक्ती व्यक्तीनुरूपे त्याची रूप रेखा बदलत जाते. पण ते जात पात बघत नाही . रंग रूप पाहत नाही. 
ते फक्त आपलेपणाच ओलावापण जाणतं . अन तिथेच ते रमतं. अन बहरतं.

माणसाला निसटून गेलेले ते क्षण पुन्हा पुन्हा हवे हवेसे वाटतात. त्यातला जगलेला आनंद त्याला पुन्हा पुन्हा जगावासा वाटतो.  म्हणून झाल्या गेल्या गोष्टींची तो पुन्हा उजळणी करत राहतो. , 
कधी जुन्या एखाद अल्बम मधून फोटो काढून , त्यावरून हात फिरवून , कधी नजरेसमोर त्या क्षणांना उजाळा देऊन ..कधी आठवणीचा लेप चढवलेल्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन, 
कधी त्या व्यक्तीशी व्यक्तीशा भेट घेऊन त्यातला आनंद तो उपभोगत असतो.

काही दिवसापूर्वी तिच्यासोबत झालेलं मोबाईलवरील संभाषण आज तो असाच पुन्हा ऐकत बसला होता. ते लाडिक बोल पुन्हा पुन्हा ऐकताना , त्याचा चेहरा एकाकी खुलून जाई. .एकाकी हसू हि अनावर होई. अन हसता हसता स्वप्नील दुनियेत तो आपल्या भावी क्षणाचे रंग उधळून देई. असे कितीतरी रंग त्याने आनंद वलयात मुक्तपणे उधळून दिले होते . 
हवी तशी 'नटखट' अन 'खट्याळ' स्वभावाची सखी जी त्याच्या आयुष्यात चालून आली होती. 
उशिरा का होईना , प्रेमाचे दार खुले झाले होते. त्यात त्याने निर्धास्त प्रवेश केला होता. 
पण अजूनही सप्तपदी साठी किंव्हा लग्नाच्या बेडीत साठी म्हणा निर्णयाची गाठ बांधणे तिच्याकडून बाकी होते. पण त्याधीच दोघांमध्ये एक खटका उडाला. ज्याचा घाव त्याच्या जिव्हारी बसला होता. 
माणूस चुकतो , नाही अस नाही . माणूस आहे तो चुकणारच ., 
त्याच्याकडूनही अशीच एक चूक घडली. मुळात एखादी भावना अनावर झाली कि चूक हि घडतेच. 
किंव्हा एखाद कुठला प्रसंग घडतोच जो समोरच्याला अनपेक्षित असतो. 
पण त्या घडण्यामागे हि त्या आधीचे काही क्षण जबाबदार असतात. ते समोरचा गृहीत धरून चालत नाही . अन म्हणून , एकाकी हा असा का वागला ? असे प्रश्न त्यांच्या मनात वारेमाप उधळू लागतात.
 
अन त्याने त्याचं मन ढासळतं. कळवळतं . तिच्या बाबतीत हि असंच काहीस झालं. 
अन त्यानंतर....
क्रमश :- 
हृदया - एक स्वप्नं सखी.. 
- संकेत य पाटेकर 
१६.१०.२०१५ 

सोमवार, ७ डिसेंबर, २०१५

आठवणींच्या भावगर्दीत ..

किती हसरे असतात एकेक 'क्षण' न्हाई ....नजरेच्या आकंठ साठलेल्या भाव सागरात अन हृदयाच्या ध्यानस्थ मंदिरात , तिच्या व त्याच्या सहवासाने गंधित झालेले ते हसरे क्षण, एकदा का प्रवेश करते झाले कि 
ते अधून मधून मनाच्या तळघरात मिश्र भावनांचा, ' एकच हळवा तवंग निर्माण करतात . 

आठवणीच्या साच्याने , ' ज्यात आपण पुरतं आपलं देहभान हरपून जातो '.
तो जुन्या आठवणीतला अत्तरी रंग , सुगंधासह असा काही उधळला जातो कि डोळ्यातून क्षणभर अश्रू हि घळाळू लागतात .
काय काय घडतं. ह्या क्षणानुसार ......

हि वेळ पुढे सरत जाते . बदलाचे वारे वाहत जातात. माणसं माणसं बदलत जातात . 
अनुभवाने सिद्ध होतात. कुणी आधीपेक्षा अधिक कठोर तर कुणी हळवी अजून हळवी झालेली असतात. 
कुणी दूर तर कुणी हृदयाशी अजूनही जवळीक साधून असतात. . 
काहींच अजूनही त्याच शैलीतलं दिलखुलास बोलण असतं भेटन असतं . काहींच्या विचारांना अहंकारी लेप चढलेली असते. किंव्हा कुणाला आता आपणंच नकोस झालेलं असतो .
सांर चित्र पालटलेलं असतं. काही मात्र अजूनही तेच पुर्वीसारख भासतं .

पण हसऱ्या क्षणांचा आठवणीचा तो ठेवा , मात्र अजुनी तसाच टवटवीत, अन प्रसन्नतेने सदा बहारलेला असतो. तो क्षणभर कवटाळून घ्यावा , किंव्हा घटाघटाने पियुनी घ्यावा अस मनोमन वाटून जातं. अन त्यातच शब्दांचा फुलोरा ओठावर स्थिरावला जातो.
किती हसरे क्षण होते ते ...जुन्या मैफलीतले ...., तो मोकळा संवाद , तो हवासा सहवास ..ती संस्मरणीय भेट ! निसटले सगळे ......, आठवणीचा गंधित दर्प लेऊन ..!

असंच काही मनात आलेलं...अन न राहून लिहिलेलं 
संकेत य पाटेकर 
०६.१२.२०१५


मनाचे आर्जव...

ह्या मनाचे देखील किती हे ..आर्जव... 

नको नको म्हणतो , तरी देखील स्वतलाच सावरतं , विश्वास देत ते म्हणतं ..बघ रे , 
पुन्हा एकदा प्रयत्न करून ....वातावरण काहीसं निवळल असेल आता...
बरेच दिवस झाले रे....बोललो नाही. 
भेटलो नाही , कुठलाच संवाद नाही. हा नाही कि हु नाही .
निशब्दी मनाचे गहिरे अन दाह उसवणारे वारे फक्त वाह्तायेत. 
त्याचाच हा परिणाम अन होणारा त्रास ... म्हणूनच रुकरुक लागले रे, शांत राहवत नाही. 
चीड चीड होतेय नुसती मनाची ,संयम हि तुटू जातोय. तरीही स्वतःला सावरत मी पुन्हा प्रयत्न करतोय.....

नातं अन दुरावलेलं मन जर आपल्या पुढाकारानेच , पुन्हा जुळत असेल किंव्हा जुळणार असेल तर, प्रयत्न करायला काय हरकत आहे. हे ना ? 
अस स्वतःला बजावत मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो, पण किती वेळ रे , कितीदा ? मर्यादा नावाची देखील रूपरेखा असते कि नाही? 

कधी कधी खरच प्रश्न पडतो कि ज्याच्यावर जीव ओवाळाव . प्रेम करावं , ते इतके भावनाशुन्य , भावना कठोर कसे काय होतात ? 

कधी काळी आपल्याशीच मनमोकळे पणाने वावरणारी , न राहवून स्वत:हून संवाद साधणारी ,आपल्या काळजीत वेडीपीसी होणारी अन वचन बद्ध असणारी अन आपलीच म्हणून जवळ केलेली आपली हि लोकं , अशी कशी बऱ वागू शकतात ? प्रश्नावर प्रश्नांचे एक एक इमले रचले जातात . 

उत्तर मात्र असूनही नसल्यासारखं अन नकोसच वाटतं.
किती रे उरलो आपण त्यांच्या जीवनात , काय उरलेय किंम्मत आपली ? 
आणि नेमकं असं काय घडलंय इतकं कि ज्याने आपल्याला साफ दूर्लक्षिलं जातंय ? का ? 
ते नक्की कळत नाही . समोरून कोणताच प्रतिसाद मिळत नाही . 

पण आपली धडपड एकतर्फी चालू असते ... आज ना उद्या .......काहीतरी घडेलच , मनासारखं .., ह्या आशेवरच...
पण प्रयत्न करूनही पुन्हा पुन्हा मन निराशेच्या डोहात ढकलल जातं . 

अन वेदनेला नवां अंकुर फुटत जातो. हताश होवून जातो आपण .., डोळ्यावर एकाकी अंधारी यावी तसा काहीसा अंधार पसरतो .
दोष तरी कोणाला द्यावा , न्हाई ?

समोरच्याला कि स्वतःला , कि बदलेल्या ह्या परिस्थितीला , कि नशिबाला ? कळत नाही. 
तरीही आपण म्हणतो दोष नकोच ना कुणाला द्यायला . का द्यावा ?
पण कुठेतरी शेवट मात्र असतोच . पूर्णविराम द्यावा लागतो . 
जर हे असंच चालू राहील तर .....
कारण संयमाला देखील मर्यादा असतात. आपल्या उदारत्या प्रेमाला नसल्या तरी .., कारण प्रेम हे आजीवन असतं . त्याला मरण नाही. अंत नाही . संयमाच मात्र तसं नाही. त्याला हवा तो प्रतिसाद मिळाला तर तो टिकून , अन्यथा ते लुडबुड करतं...

अन शेवटी मनाला गुण गुणाय लावतं. 
अपनी अपनी जिंदगी है भाई , अपने अपने रास्ते..और अपनी अपनी मंजिले ! 
- संकेत य. पाटेकर 
०५.१२.२०१५




शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

सांत्वन..

एखादी भावना अनावर झाली कि 'अश्रू' किंव्हा 'राग' किंव्हा दोन्हीही अगदी जुळ्या भावंडा सारखी एकत्रितपणे नांदू लागतात .
तेंव्हा ऐकणारा हि घायाळ होतो . विव्हळतो. आज हि तसंच काहीस झालं . 
जितक्या सहजतेने शब्द कागदावर उमलतात ना , तितक्याच सहजतेने तेच शब्द , एखाद्या मनाचं सात्वनं करू शकत नाही .
हि एक खंत अजूनही ह्या मनास कुठेशी टोचत राहते. सलत राहते .
आज पापण्या पुन्हा एकदा जडावल्या ..पुन्हा एकदा मन स्तब्ध झालं .
तिच्या एक एक करुण शब्दाने ... ज्यात फक्त वेदना होत्या , अन त्या  वेदनांचा न सोसणारा दाह..कालपटून टाकणारा...करपून टाकणारा ....
कसं असतं आयुष्यं एकेकाचं ..... ऐकताना मेणासारखं वितळायला होतं अगदी .
पण ते मेण हि प्रकाश वाटा देऊन मोकळ होत ओ ,आधार देतं , असलेला अंधार नाहीसा करून ..
इथे नुसतंच वितळायला होतंय ... प्रकाश धर्म काही..वाट्याला नाही . तीच ठेच लागतेय मनाला .
जीवन हे संघर्षमय आहे. लढा हा आहेच अन तो असणारच...जगण्यासाठी. 
पण त्यासाठी हि आधार हवा असतो . कुणाचा न कुणाचा तरी त्याशिवाय उभं राहता येत नाही.
विश्वास अन प्रेम ह्या दोन धाग्यांनी नातं घट्ट ओवलं जातं . मग ते कुठलही नातं असो.. 
त्याघट्टपणाच्या आधारावरच ते पुढे सरत जातं. पण तो आधारच कमकुवत झाला तर...
आपलीच माणसं जेंव्हा आपल्याशी तर्हेवाईकपणे वागतात तेंव्हा ...नकोस वाटत अगदी...
हे जगणंच नकोस वाटतं ..
पण जगायला हवा यार ..आशेचा एक दिवा रोज उगवतोच ना ..नवी पहाट घेऊन ...इतकं सहन केलं मग आता धीर का सोडवा.
क्षण बदलतात . आणि त्या क्षणानुसार हि नको असलेली परीस्थितीही... , विश्वास ठेव . आशा ठेव . सारं बदलेल . नक्कीच बदलेल .
दुख प्रत्येकाला आहे ...त्याचं स्वरूप मात्र वेगवेगळ आहे. 
आपण किती सहन करतो ..ते आपल्यालाच माहिती असतं. दुसऱ्याला कितीही सांगितल तरी त्यातली ती दाहकता आपल्या इतकी त्यापर्यंत पोहोचणार नाही. हे मान्य . 
खंर तर सात्वनासाठी शब्दच नसतात...
वपुंच्याच शब्दात म्हणावं तर सांत्वन म्हणजे दुःखाच मूल.
मूल आईपेक्षा मोठं कसं होईल?मूल मोठं व्हायला लागलं की आई आणखी मोठी व्हायला लागते.म्हणून,समजूत घालणारं कुणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात.
तुझे हुंदके नजरेने पहीले नसले तरी हृदयाने ते जाणलेत .. ऐकलेत मी..
येणारा प्रत्येक क्षण हा कसोटीचा आहे नि असतो. . त्यात तोलून मापून आपण बाहेर पडतो . पडत असतो. ती आशावादी जिद्द मात्र कायम ठेव. त्यातून बाहेर पडण्यासाठी ..
काहीच उरलं नाही अस बोलू नकोस ...उद्याचा दिवस नक्कीच काही तरी घेऊन येईल . 
आनंदी वलयासह ...बागडत...बागडत...
तुझाच ..
एक मित्र 
- संकेत
३०.१०.०१५


सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

माणूस आहे ...तो चुकणारच ...

माणूस आहे ...तो चुकणारच ...

प्रेमात सगळ 'क्षेम' असतं अस म्हणतात . पण त्यासाठी क्षमाशील वृत्ती मुळात असवी लागते. अन प्रेम आतून असावं लागतं. खरं खुर.. हृदयाच्या सुप्त वाणीतून प्रकट झालेलं. 
तेंव्हा कुठे झाल्या गेल्या क्षणांना किंव्हा दुखावलेल्या आपल्या मनाला पुन्हा शांत करून , पुन्हा सार आपलसं करून . सारं विसरून, नव्याने नातं झुलवता येतं. 
मुळात प्रेम हे 'हृदय' जोडणं शिकवतं ..तोडनं नाही. 
दोन मनं एकत्रित आली कि तडजोड हि आलीच . नातं म्हटलं कि वाद विवाद आलेच ...मग ते शुल्लक कारणावरून असतील ..वा कुठलेही .. 
पण त्या एका कारणासाठी, त्या मागची पार्श्वभूमी न पाहता उमगता ..
तुम्ही जर टोकाची भूमिका घेऊन, एकमेकांपासून दूर जात असाल तर त्याला काही एक अर्थ नाही . त्या नात्याला हि अर्थ उरत नाही .
एका कारणावरून एवढ्या घडामोडी होत असतील .तर पुढचं आयुष्यं एकत्रित काढण अथवा जगण कठीण आहे.
माणूस समजायला अन समजून घ्यायला आयुष्यही अपुरं पडतं. 
जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा अन त्या त्या वेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीचा वा वातारणाचा परिणाम एकंदरीत आपल्या मनावर होत असतो. 
अन त्यातून वेगवेगळ्या भावछटा ना ना रुपी ढंगान प्रकट होत असतात. अन त्यानुसार आपण व्यक्त होत जातो.
स्वभावाचे विविध पैलू ...अश्यावेळी आपलं दर्शन देतात. मग ते आपल्याला अपेक्षित नसलेले स्वभाव गुण असतील वा दोष .. त्यावेळेस समोरच्याने बावरून न जाता . त्या मागची कारणे लक्षात घ्यावी. 
सांभाळून घ्यावं एकमेकांना ...
एका क्षणात नांत तोडण्याची बतावणी कशाला ?
माणूस आहे ...तो चुकणारच ....., तो काही सर्व गुण संपन्न नाही. देव नाही.
आपली चूक मान्य करण्याची वा पुन्हा नात्यात बहर आणण्यची त्यात धमक असेल तर माफ करायला काही हरकत नाही. 
मुळात आपली बाजू समजून माघार घेण वा आपली चूक मान्य करणं हि क्षमाशील मनाची अन सदृढ नात्याची लक्षण आहेत. 
तो सावरतोय मग तुम्ही का नको सावरायला ?
चूक कोणाची हि असली तरी एकाने बाजू सावरायची असते. नात्याची फळी म्हणून तर मजबूत राहते. त्याला पोखरून काढणाऱ्या वाळवीची कीड लागत नाही . ज्याला प्रेम कळलं ..त्याला नातं सांभाळाव लागत नाही ते आपुसकच सांभाळलं जातं.
आपल्या अपेक्षानुसार त्याने वागायलाच हवं किंव्हा असंच वागणं तुझं अपेक्षित आहे हि आपली वृत्ती सोडायला हवी .
समोरच्याच्या अश्या अनपेक्षित वागण्याने हृदयास घाव बसतो हे मान्य ..ती जखम काही वेळा भरून हि येणारी नसते. पण तरीही समोरच्याने आपली चूक मान्य केली ..तर त्याला माफ करायला हवच. 
तेवढेच ते घाव हि विरून जातील. 
प्रेम आहे नं ...मग सांभाळायला हवंच एकमेकांना नाही का ?त्यासाठी नातं का तोडावं ? 
मन तुटलचं तर ते पुन्हा जोडता यायला हवं . 
माणूस आपल्या माणसाशिवाय अन त्याच्या प्रेमाशिवाय जगू शकत नाही. त्याला आपलीच माणसं जवळ लागतात. प्रसंगी त्याला समजून घेणारी प्रसंगी समजून देणारी ...!
इथे मंगेश पाडगावकरांच्या काही ओळी आठवतात . 
प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
नातं तुझं माझं... 
संकेत य पाटेकर 
१२.१०.२०१५
 

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०१५

पहिल्या प्रेमाची सर ...


असंच काहीस लिहण्याचा प्रयत्न ..बघू जमतंय का मला ...Romantic जरा..
______________________
खर सांगू , मला तुझं हे वाक्य आता पटू लागलं आहे .
ह्या क्षणक्षणा मधलं मिळालेलं प्रेम , किंव्हा त्याची झुळूक सुद्धा आपल्याला
हवी हवीशी वाटते .
जेंव्हा नवेपणाचं एखादं नातं हळूहळू उलघडत असतं तेंव्हा, त्या नात्याच्या
सुरवातीस अन नातं उलगडेपर्यंत ...ती जी मधली स्पेस असते , त्यात ती व्यक्ती
,आपल्याशी किती प्रमाणात खरी अन जवळिकतेने वागतेय .
ह्याचं अंदाज बांधता येत नाही . सगळ कस तळ्यात मळ्यात असतं. अस्थिर असं..
पण अश्या झुलत्या मनाच्या स्थितीत हि , त्या क्षणामधलिक ओढ , ते प्रेम ,ती
आपुलकी सारं हवंहवसं वाटतं आपल्याला .
त्या रात्रीचे तुझे हे बोल अजूनही मनाशी ठासून आहेत बर का...
खरं तर ज्या विश्वासाने अन आपुलकीने आपण नातं जपतो .जपत असतो .
त्याच मूल्यमापन कधी करूच नये . पण काय होतं. कुठेतरी एक ठेच पोचत असते . सल खुपत असते. आपल्या मनाला.
जे काही घडतंय ते जाणीवपूर्वक कि खरंच आपलेपणानं ?त्याचा खुलासा होत नाही .
करता येत नाही .
आतल्या आत मन पोखरत जातं. अन नात्यावरचा तो विश्वास कुठेसा ढिला पडत जातो .
मला वाटत ह्या वेळेवर सुटणाऱ्या गोष्टी आहेत. थोडा वेळ द्यावा . नात अधिकतेने
खुलावं उलगडावं म्हणून , पण त्याच विश्वासानं ..दोघांच्याही.

आता हेच बघ ना !
तुझं माझं नातं घे ...
किती महिन्याची ओळख गं आपली , अगदी मोजून काहीच महिने.
विश्वासाने हे नातं फुलवत आलो आपण...
तुझी माझी ओळख तरी कुठलीशी होती बर सांग . एका माध्यमातून आपली मनं जुळली. अन हळूहळू ती बहरत गेली. शब्दांच्या वलयातून ...आपलेपणातून...
एकमेकांना आपण कधी पाहिलं हि न्हवतं. तरी देखील मनाची सुत जुळली .
ह्याला कारण काय ? तर तू दाखविलेला विश्वास ..त्याच विश्वासने आपण बोललो. बोलत
राहिलो अन एकदा भेटलो हि ..
आठवतेय , ती पहिली भेट ...
तुझं वाक्य फोनवरचं, अजूनही कानाशी घुमतयं बर का ? अरे खूप नर्वस झाले रे ?
मनातल्या मनात खूप हसून घेतलं होतं मी ( आता रागावू नकोस हा )
पण तेव्हढीच हुरहूर, चुरचुर देखील होती. का ?  कारण मी तुला कधी पाहिलं नव्हतं. तुझ्या बोलण्यावरून अन तुझ्या विचारसरणी वरून तुझं चित्र रेखाटल होतं तेवढंच ..

पण तरीदेखील मन खचलच ..पहिल्याच भेटीत ..
जे मनाशी चित्र रेखाटलं होतं त्याच्या कितीतरी पटीने ती अवाढव्य आकृती समोर
उभी होती . त्याच ठिकाणी, त्याच ठरल्या वेळेत , त्याच हाव भावनेने.
ते पाहूनच म्हटलं इथून पलायन केलेलं बर....
पण तेव्हड्यात तुझी कुठूनशी हाक आली .अन तेंव्हा हायसं वाटलं .
किती बर वाटलं म्हणून सांगू. शब्दात कथन करता येणार नाही. 

म्हणजे केलच तरी , एखाद्या मोठ्या बिकट प्रसंगातून आपण निसटलो ह्याचा जणू तो
साक्षात्कारच ...अस म्हणावं लागेल .. त्यानेच हसू फुटलं होतं .

तू देखील हे सगळ ऐकल्यावर किती दिलखुलास हसली होतीस.
किती गोड अन सालस रूप होतं तुझं ते..घायाळ झालो होतो अगदी ..
अन आजही आहे.
आपली हि तशी पहिलीच भेट , म्हणायला दिवस हि तसा खासच होता .
मैत्री दिनाचा , फ्रेंडशीप डे.. योगा योगच म्हणावं लागेल न्हाई .
कितीसार्या गोड गप्पा अन आठवणी रंगल्या त्या अवघ्या दोन तासाच्या अवधीत. कदापि
न विसरता येणाऱ्या ..आयुष्याच्या ओंजळीत कायम जपता येणाऱ्या ..
आठवतंय तो पाऊस, ऐनवेळी हळूच बरसलेला . नेमकी अचूक वेळ साधली होती ह्याने,
म्हणूनच एकाच छत्रीखाली दोघांना (दोघांकडे छत्री असूनही ) एकत्रितपणे वावरता
आलं होतं . पण त्यातही तू मुद्दाम मला डिवचल होतंस.
छत्री आहे माझ्याकडे म्हणून ..तेंव्हा नजरेतूनच काय तो संवाद साधला होता.
आठवतंय , किती Romantic क्षण होता नां तो...,
पहिलीच भेट , अन पहिलाच पाऊस ...

सी फेस च्या दिशेने नजर झेपावत केलेल्या अवांतर गप्पा  आठवतायेत  का ?. 
गप्पानेवजी  खंर तर त्याला 'प्रश्न-मंजुषा' खेळच  म्हणावा लागेल . कितीसे  प्रश्न करत होतीस ? बोल ना , सांग  ना अस म्हणत  ?
मी मात्र निशब्द होवून तुझ्या त्या प्रनार्थी चेहऱ्याकड कुतूहलाने पाहत होतो बस्स . किती सोज्वळ रूप ते ! 
पण त्यात हि तुझे  नखरेबोल शब्द अडून धरत...अस नको रे पाहूस , ऑक्वर्ड  वाटतंय.  हसू  सुटलं होतं तेंव्हा हि..., आठवतंय नं ! 

पहिल्यांदा असं  , कुणा एका मुलीसोबत , ते हि पहिल्याच भेटीत,  मी म्हणजे आपण कपल लोकांच्या (जोडप्य जोडप्याने बसलेले ) पंक्तीत जावून बसलो होतो .
अन त्यातही नेमकेपणानं आपल्याच  बाजूला एक  सहकुटुंब , सह आनंदासही , दानं शेंगदाणं , मुखी मिचकावत कडेलाच येऊन स्थिरावलेलं .  
जणू आपल्यातल्या बोलणं  छुप्या रीतीने ऐकण्यासाठीच ,आठवतंय ? 
तुझं तसंही तिकडे लक्ष न्ह्वतचं  म्हणा ... स्वतःच्याच प्रश्न कुंचल्यात गुंतली होतीस तू ..... असो , 
आपल्या एकमेकांच्या  आवडीनिवडी तश्या काही प्रमाणात  आपण जाणून घेतल्या होत्या.  फोनवरूनच..संवाद साधून ,  
त्यात तुला आईस क्रीम खूप आवडतं .हि गोष्ट लपून कशी राहील म्हणा .
म्हणून परतीच्या वाटेवरची  साज-संध्या आईस्क्रीमच्या  यम्मी फ्ल्वेर मध्ये ढवळून द्यावी  . यासाठी  दुकान धुंडाळू लागलो. तर त्याच्या हि धड थांगपत्ता लागला नाही. 
तसं कित्येकदा , त्या ठिकाणाला भेट  देऊन  आलोय  . पण नेमकेपणान तेंव्हाच रस्ता न सापडावा हे  एक मोठ आश्चर्यच म्हणावं लागेल ...;) 
असो, आपली आईस क्रीम , राहिली ती राहिलीच  ,नाही का    ?

बर हे  हि ..असू दे , 
पण  मैत्रीत्वाचा खास दिवस असूनही   ..साधं रिबीन BAND  हि घेऊन आलो नाही . 
हे कुठेतरी बोचलं  मात्र माझ्या मनाला , त्यात हि  तुझे लाडीकतेचे शब्दओळ., हळूच बरसले.  माझं रिबीन कुठे आहे ,  हा ? है  नां ? मी त्यावर  फक्त स्मित हास्य खुलवलेलं.  
खर तर 'नातं ' घट्ट रोवायला अशी BAND, रिबीनची  गरजच  नसते. .है ना ? हवा असतो तो फक्त विश्वासाचा बांधीलपणा . 
जो तुझ्या माझ्यात आहे . अन तो असाच राहिलं हि आशा व्यक्त  करतो. 

ऐ ,  ऐक ऐक,  अजून थोडं... 
दादर फलाटावर , तुला निरोप देताना , तुझे ते हळवे नाजुकसे बोल , आठवतंय ? 
हृदयात बंदिस्त आहेत .बर का ..
त्याच बरोबर , भेटत्या क्षणीच, दहा बारा पाऊलं पुढे टाकतो नाय टाकतो,  तर तू उपस्थित केलेला  प्रश्न देखील ., म्हणजे, 
कसं वाटल तुला भेटून ?  खरं  तर तुझ्या प्रश्नाचा पाढा  इथूनच सुरु झालेला , ह्या प्रश्नाने .. आठवतंय ? 
त्यातही माझं उत्तर तुला रुचलं न्हवतं  .  खट्टू झाली होतीस तू  ,  है ना ?
एका कवी मनाच्या अन लेखकाच्या ( मी काही लेखक वगैरे नाही आहे हा ) मुखातून फक्त,  'छान वाटलं' अस उत्तर  खंर तर कुणालाच पटणार नाही. 
मला देखील नाही. पण तरीही मी दिलं  . 
पण त्यात हि तुझ्या लाडिक हट्टा पुढे मला शरणागती पत्करावी लागली. है ना ? 
नाही , मला असं हे  उत्तर नको ...तसं ऊतर नको ..आठवतंय. ?

आठवणीतले  हे गोजिरे क्षण असेच कायम लक्षात राहतील . 
हृदयी मनात प्रेम अत्तराचा नवा गंध शिडकावत. 
तुझाच , 
....................

-संकेत पाटेकर 
.२७.०८.२०१५